Sunday, September 28, 2008

Am I doing it right?

This is amazing how we come up with innovative ways of Discriminating. आणि परत आपणच काही काळानंतर कोणालातरी नेताही बनवतो हा भेदभाव ऊखडून काढायला. Maybe this is what we call "Creating Opportunities"!

हिंदू मुस्लीम होते ... कदाचीत कमी पडले म्हणून आपण मराठा आणि ब्राह्मण आणि बरेच काही पण वापरले एकमेकांच्यात फरक करायला. तिथेही नाही भागले म्हणून पोटजातीही वापरल्या. हेही कमी पडले म्हणून आता प्रांत - म्हणे ऊत्तर भारतीय आणि दक्षिण भारतीय. Narayan Murthy had said once - We could be the only country where we love to get discriminated.

While we know that Discrimination is the PROBLEM, we still innovate and make efforts to have this problem last forever. Why do our "thoughtful" solutions again have discrimination involved. How could they be solutions then!?

आज सकाळी एक प्रेजेंटेशन पाहिले. म्हणे मराठी लोकाना आरक्षण द्या. मराठी माणूस कुठेच नाही. दहा बारा ऊदाहरणे. एकदम रीअल. कसे सगळीकडे ऊत्तर भारतीय आहेत आणि मराठी माणसाला स्थानच नाही! शेवट काय? तर म्हणे मराठी माणसालापण जागा करू. ऊत्तर भारतीयाना दाखवून देऊ आणि भैय्याना दाखवून देऊ त्यांची जागा काय ते!! मधेच दक्षिण भारतीयानापण टोले मारले होते! अंबेडकर, फुले वगैरेंची ऊदाहरणे दिलेली. या "आपल्या" माणसानी भेदभाव केला नाही पण आता "आपल्या" विरुद्ध होतोय! आणि असे बरेच काही.

अंबेडकर, फुले वगैरेंची ऊदाहरणे देऊन सांगायचे की तुम्ही आता फक्त मराठी लोकांच्या भल्यासाठी झटा! लाज कशी नाही वाटत या लोकांची नावं घ्यायला - देव जाणे? हीच शिकवण घेतली काय आम्ही? खरच थक्क व्हायला होतं. आग रामेश्वरी आणि बंब सोमेश्वरी अशी हालत आहे. रोग काय? त्याचा ईलाज काय? काहीतरी ताळमेळ हवा ना. या प्रकाराचे पुढच्या ५-६ वर्षामधे काय काय परीणाम होतील याची सुक्ष्म तरी कल्पना आहे का? आपला आवाज ऐकवायचा हा सर्वात सोपा मार्ग आहे - आजीबात दुमत नाही आणि आपण करतोही असे - एकदम अभिमानाने. हे अंगाला लागलेले वळण आहे आणखी काही नाही. याहून दुसरा मार्ग माहित नाही, पण कोणीतरी काहीतरी धडपड करतय म्हणून काहीच नाही तर आपला पाठींबा तरी व्यक्त करावा म्हणून केलेला आपलाही माफक यत्न. मी स्वतः काही करत नाही म्हणून मी स्वतःला आणखी कोण काय करतो त्यावर टिप्पणी करू देत नाही. शाळेतली सवय ना - स्वतः काही करायचे नाही तर जो करतोय त्याला का त्रास देतो? अजुनही कानात आहे हेच. कदाचीत म्हणून बरोबर चुक वगैरे तुलना होतच नाही.

मला या सगळ्याचा अंत माहीत नाही. मला ऊत्तरं माहीत नाहीत कारण मला प्रश्नच माहीत नाहीए. सर्वत्र मराठी लोक नसणं हा वादाचा मुद्दा आहे की कुठल्याही कारणाने भेदभाव होणं हा आहे? कदाचीत मी सर्वत्र मराठी माणसाना आणेनही. मग मी त्यात आडनावं बघून हिंदू किती, मुस्लीम किती, मराठा किती, ब्राह्मण किती हे बघेन! त्याही ऊपर आणि जाती - पोट जाती बघेन. कधी ऊठलाच किडा तर त्याविरुद्ध आवाज ऊठवेन. We will do it, not because it is right ... but because we are good at it and that is easiest.

कधीतरी आपण थांबले पाहीजे. किती काळ असेच मेसेजेस फॉरवर्ड करत राहणार? कधी विचार करणार? We have all the knowledge, we have brains, we know how to apply. Let's think. I do not know what to do and what will work but now, for sure, I know, this is not what I want to do.

Nothing against any individual - please do not take me wrong but really thought I should vent my thoughts somewhere and hence used the forum. I want this to be a better place for our next generations to come. Let them not fight the same battle. Battle against Discrimination.

का नाही मी विचार करत की कसे सुंदर बनवता येईल जग आपल्या पुढच्या पिढीसाठी? का त्यानीही त्यांचे आयुष्य घालवायचे अशाच गोष्टीसाठी. आज्जा लढला काळा गोरा साठी ... बाबा लढला हिंदू मुस्लीमसाठी आणि पोरगा लढतोय ऊत्तर - दक्षिण भारतीयांसाठी! कदाचीत नातू मोठा होईपर्यंत आम्ही आणि काहीतरी ईनोवेटीव भेद तयार करू! लढेल तोही. कुठल्याही प्रकारचा भेदभाव नाही करयचा हे माझ्या मुलाला शिकवताना मी का म्हणून अशा ऊत्तराना पाठींबा देऊ की जी ऊत्तरे भेदभावाच्याच पायावर ऊभी आहेत?

पुढच्या पिढीला शिकवायचे काम मी सुरू केलेय. पण सध्याच्या पिढीला कोण सांभाळेल? प्रश्नाकडे दुर्लक्ष करायचा आजिबात विचार नाहीए. एखादा मनुष्य त्याच्याच प्रांताच्या लोकाना पुढे आणताना बाकीच्यांची गळचेपी करतोय तर आहेच चुकीचे ते!! का नाही मी त्याला तिथेच बंद पाडत? का नाही त्याचाच निषेध करत? "तू तसे केलास तर मीही तसेच करेन ..." अरे... हे तर आपण शाळेत भांडताना करायचो. नाही काय? ही मधली ईतकी वर्षे शिकून काय प्रगती केली मग?

सगळं अनुत्तरीत आहे. म्हणून बाहेर काढायचं धाडस होत नव्हतं. आज आलं बाहेर. कोणाला यातून दुखावलं असेल तर मनापासून माफी मागतो. पण हे जग जितकं आपलं आहे तितकेच आपल्या पुढच्या पिढीचेही आहे. थोडी शक्ती हे सारे सुंदर बनवायला खर्च करू. ते नसेल तर कमीत कमी खराब करायला तरी नको खर्चूया.

7 comments:

Dhananjay said...

Unfortunate but true!

HAREKRISHNAJI said...

Just perfect

@sh said...

petlays ki bhava...

Anonymous said...

Good one.. great thoughts and realy appreciate and with u on it.
We need to find the proudness in ourself rather than comparing with others.. more focus should be on how we can be better and make others life better rather than making someone worse. I totaly understand ur view and feel the same way. One more thing - I realy like your statement - Grand paretns fought with gore, dad fought with.... -:) it realy summarizes everything.

Great job

Anonymous said...

Hi Sangram,

I am not sure if you wrote this or you do not agree with what is mentioned in the blog, I personally agree with the blog if all those who climbed these ladders without any one elses support, I don't think that will be the case in many of the names...

Ideally what is mentioned is very true and we should stop looking at each other with some other identity.

Anonymous said...

100% sahamat

Anonymous said...

छान संग्राम छान,

सुंदर जग दिसंया साठी सुंदर दृष्टी हवी....

या संत भूमीत आम्ही जन्मलो, इथे ज्या संतानी समस्त विश्वाच्या कल्याणासाठी प्रार्थना केली, मागणे मागीतले, त्यांची सतत आठवण ठेवून आपण बुद्धिवाद्यानी अश्या प्रकारच्या "शालेय" गोष्टीना लांब ठेवुयात.
स्वामी विवेकानंद या अश्या प्रवृत्तिवरती प्रहार करीत, अशी दुकाने मांडणरे सर्व समाजाला वेठीस धरतात हे लक्षात ठेवले पाहिजे प्रसंगी अश्या एकत्मतेला तडा आणणार्यांच्या मागे कोण आहे त्यांची लबाडी ओळ्खायला पाहिजे त्याला विरोध केला पाहिजे ..
ॐ शान्ति शान्ति शान्ति...