Saturday, May 23, 2009

Emotionally Challenged!

बऱ्याचदा मी या अशा चर्चेमधे अडकतो. काहीतरी सांगायला जावं आणि त्यातून एकदम डिबेट्सच सुरू व्हाव्यात. म्हणजे एखाद्या नविन कन्सेप्टबद्दल वाचावं. एकदम ईंप्रेस होऊन कोणालातरी सांगावं आणि त्यानं आपल्यावरच हल्ला चढवावा की किती फालतू, युजलेस कन्सेप्ट आहे किंवा एकदम अशक्य म्हणून पकाऊ आहे. मग आपणच एकदम जसे काही स्वतःचच काहीतरी खोटं पडतय अशा भावानं बाजीप्रभू व्हायचं. मग अगदी शिरा ताणून चर्चा. शेवटी मग थकून भागून चर्चेचा सामना अनिर्णित जाहीर करणे. कोणच कसं काय आपल्यासारखं पाहू शकत नाही - हा आणि एक नंतरचा अचंभा - कदाचीत आपण काहीतरी स्पेशल आहे असे स्वतःला वाटून घेण्यासाठी. याचसारखा दुसरा प्रकार म्हणजे एखादी घटना सांगताना कोणीतरी मधेच असिंप्टोटीक शेरा मारावा. आपण त्याची नोंद म्हणून काहीतरी म्हणावं आणि पुढं जावं आणि मग त्यावरच परत आपल्याला सगळ्यानी मागे ओढावं. आणि सुरू लढाई!

"तू वाचली का बातमी? ईथल्या कोणाची कोण पोर, भारतातमधे अपघातात सापडली. पोलिसानी आत्महत्या म्हणून बंद केली केस!"
"नाही गं वाचली." माझं ड्राईवींग सुरू होतं.
"तसंही या लोकाना काम करायला नको. त्यात आणि या मुलीचे आई वडिल देशाबाहेर ... कोणाचा बाप विचारतोय याना केस दाबली तर!!"
"असं नाही व्हायला पाहिजे. आज लोक येतात आपल्या देशात. आपण काळजी नाही केली त्याची तर बंद करतील लोक यायचे."
"अरे... टुरीस्ट लोकाना तर कसलं लुबाडतात माहीत आहे ना? दसपट भाव लावतात! कश्शातही"
"हं."
"आमच्या ऑफीसमधल्या कोण अमुक अमुक गेलेला ताज बघायला. सगळं आवडलं वगैरे त्याला. पण लोक उल्लू बनवतात म्हणून कडवट तोंड करून सांगत होता!"
"हा हा. बिचारा. मेरेको उल्लू बनाया! म्हणून रडत होता काय?"
"नाहीतर काय अरे. पण आपलच नाव खराब करतो यार आपण!"

खरतर मला असली क्रिबींग सेशन्स आवडत नाहीत. म्हणजे त्यातून निष्पन्न काहीच होत नाही. फक्त आपल्या आतमधली अस्वस्थता बाहेर निघते. यामुळं कोणाचं काहीच होत नाही. फक्त स्वतःच स्वतःला समाधान देतो आपण. की बाबा, आपण बेधडक बोललो तरी. बोलल्यानंतर बरंही वाटतं. किंवा म्हणू अस्वस्थता कमी होते. पण सगळं आपल्याच विश्वामधे. असो. भारतामधले पर्यटक आणि त्यांच्या भोवतालचं जग बरच बरं होत चाललय. माझ्या ऑफिसमधला ऑस्ट्रेलिअन ब्रॅड पुण्यात मस्त ८-१० दिवस जाऊन खुश होऊन आला. पलीकडच्या राज्यात फेरफटका मारून यावा तसा. फार मोठी अचिवमेंट आहे यार. People are no more afraid of India, Crowd, and what not. पण हे मला तेव्हा नाही आठवले! मला वेगळाच प्रसंग आठवला. आणि दुर्दैवाने मीही क्रिब सेशनमधे हातभार लावला.

"अगं मीही मागे एकदा एक डिबेट बघत होतो. कोणा रशीयन का ब्रिटीश मुलीवर गोव्यामधे कोणीतरी अतीप्रसंग केला. डिबेट होती नॅशनल न्युज चॅनलवर. मुलीची आईपण तिथे. गोव्यातले लोकल रहिवासीपण उपस्थीत. मुद्दा काय तर, मुलगी ती तशीपण कमी कपडे घालून फिरायची, मुलांशी लगट करायची का असेच काहीतरी. तिच्यावरच संस्कारच नव्हते. आमच्याकडे कोणी करत नाही असे. and blah blah. I mean what the heck yaar! Does that give you right to do anything? डीबेट संस्कार या विषयावर की घडलेल्या घटनेवर? Talk about bloody संस्कार later yaar. तोंड वर करून बोलतात तरी कसे देव जाणे?"
"ओह. तिला वापरू देत ना कपडे कसलेही. Freedom आहे यार. ती तिच्या कल्चरने किंवा सवयीप्रमाणे वापरेल. म्हणून काहीपण कराल काय? तिला असतील ३-४ मित्र तिच्या देशात. म्हणून बोलली असेल गोव्यातही ३-४ मुलांशी. लगेच लगट काय? हे लोक तसेही वसवसलेले. हरकून गेले असतील मागे तिच्या. का म्हणून आपले कल्चर फोर्स करा तिच्यावर?"

विषय भरकटला हे ध्यानी येण्याच्य़ा आधीच माझीही वाट चुकली.
"That was not the time to discuss all that. जिथे जाऊ तिथल्या पद्धती, प्रपंच तिने बघीतले नाहीत. खरय. याबद्दल बोलू नंतर. मला या विषयाकडं जायचच नाहीए. कारण घडलेली घटना त्याच्याही पलीकडली आहे. बलात्कार हा गुन्हा आहे. आणि आहेच."
"हो रे. तसेही पद्धती नाही बघितल्या म्हणजे काय? आपण अमेरीकेत राहतो पण ईथे कोण आपल्याला फोर्स करते की त्यांच्यासारखे वागायला? आपण आपल्या रिवाजाप्रमाणे राहतोच ना?"
"आपण कोणच्याही रिवाजाला धक्का तर लावत नाहीए ना. हा प्रकार वेगळा आहे. आता जपानी कंपनीबरोबर व्यवहार करताना. त्यांच्या ग्रीटींग वगैरे करायच्या वेगळ्या पद्धती वगैरे नाही शिकत आपण? You should know how things will be received at new place, new cities, new country! आपलेच घोडे दामटा पुढं काय?"
"ते बिझनेस एटीकेटस. त्याचा काय संबंध ईथं? आणि असं कसं? आपल्या लोकाना काय म्हणे हौस लगेच मागे मागे जायची. झूमधले प्राणी आहेत काय पर्यटक? त्यांच्या वेगळ्या रीती तसे करत असतील. तुम्हाला काय लगेच सावज मिळाल्यासारखं त्याना पकडायचय? आपले रिवाज शिकवायला? काम नाहीए लोकाना! काहीतरी खुसपट काढून आपलं अस्तित्व दाखवायचय."

सहसा, यावर म्हणलं असतं की सगळ्या पुढारी लोकना, आपल्यासारख्या टाईमशीट्स भरायला लावल्या पाहिजेत! काम नाहीए त्याना! पण गाडी आधीच भरकटलेली. कुठेतरी कळत होतं की आपला मुद्दा सुटलाय आणि आपण दुसऱ्याच लाईनवर खर्ची पडतोय. पण ती एक भावना असते ना की समोरच्याला आपण काय म्हणतोय ते समजलच नाहीए! त्या तसल्या भावनेने आणखी शिरा ताणून मुद्दा मांडण्याचा जोश चढलेला. मुद्द्यवर येऊ रे नंतर.

"वेगासला गेलो. रोमचा गेटअप बघून लगेच म्हणालो आपण, In Rome, do as Romans do! तेव्हा का बरं नाही तुम्हाला हवं तसं केला? का म्हणून अट्टाहास रोमन व्हायचा? मला त्याविरुद्ध नाही बोलायचय. पण तसच, In India, do as Indians do का नाही? जास्ती restrictions आहेत म्हणून? ऊद्या माझ्या कोल्हापुरात कोणी आला. ऊघडा वागडा महाद्वार रोड वर फिरायला आला, छान ऊन पडलय म्हणून. लोक काय वेलकम करणार काय? शक्यच नाही. असशील तुझ्या देशामधे असं फिरत. पण दुसऱ्याकडं आलोय तर जरा त्यांच्या दमानं घ्यावं ना? मला हे म्हणायचय. दुसऱ्याच्या पद्धतींना, दुसऱ्याच्या रीवाजाला का धक्का लावा?"

"मग कसलं स्वातंत्र्य रे? ईथे मी मला हवं तसं करू शकते. वागू शकते. कोणी काही भुवया ऊंचावत नाही. सुरक्षीत वाटतं म्हणून. असं कुठं असतं काय? की स्वतंत्र आहात पण हे, हे आणि हे करायचं नाही. हे, हे आणि हे बघायचं नाही. हे, हे आणि हे बोलायचं नाही! आणि हे जर मोडलं तर मग जे होईल त्याला आणि कोणी जबाबदार नाही!"
"हे बघ. जे झालं मी त्याला डीफेंड करतच नाहीए. पण ..."
"नाहीतर काय? एवढे freedom पाहिजेच की!"
"अरे यार ... हक्क आणि कर्तव्य वगैरे काही शिकलोय की नाही शाळेत? फक्त "हक्क आहे, हक्क आहे!" म्हणून काय ऊड्या मारायच्या? तुमचे काही कर्तव्यपण आहे म्हणलं की मग तत्वज्ञान सुचतं होय? पण सोड मला बोलायचच नाहीए या विषयी. आपण भरकटतोय."
"मला फक्त एवढच सांगायचय ..."
"नको. मला ऐकायचच नाहीए. खूनकी नदिया बेह जाएंगी. जंग छीड जायेगी."

एव्हाना माझं ऑफिस आलं! गाडीमधून हकालपट्टी झाली. दोघानी एकमेकाची शक्ती बहुतांशी खाऊन झालेली. मनात चीडचीड होती. मुद्दा सोडून नाही त्या विषयावर बाजीप्रभू झाल्याबद्दल. जे घडले त्याबद्दलचा राग, अस्वस्थता दुसऱ्या विषयावर निघाली. तो विषय कदाचीत रास्त होताही. पण ...? माहित नाही यार. काही गोष्टी मनामधे एकदम स्पष्ट असतात. एखादी गोष्ट चूक, बरोबर, रास्त, खराब आह. आणि आहे म्हणजे आहे. Last thing, you want is to discuss, argue and proive it!! वाद करू पण. मग शेवटी हकनाक एनर्जी वाया घालवली असं वाटतं. आपल्या मनाविरुद्ध कोणीतरी आपली एनर्जी वापरून टाकली आणि आपण काहीच करू शकलो नाही!! असे काहीतरी. Talk about conclusions. Talk about actionables. Spend hours for that. Why the heck do we spend hours and hours to talk about our feelings and emotions? I feel so much emotionally challenged at these times! अर्धवट विषयांच बॅगेज, आणि स्वतःच्या कल्पना, आणि सिद्धांत अभेद्य नाहीत ही अशी भावना. या अशा तिटक्या विटांचं काय बनणार जर दररोज कोणी येऊन त्यांच्यावर वार करणार असेल तर. आणि तसेही कोणी पुर्णतः वेगळं म्हणत नाही. पण कदाचीत आपण आपले मुद्दे सिद्ध करण्याऐवजी आपले मुद्दे सिद्ध करण्यासाठी खपतो. आणि दुसऱ्याच्या विटाना नकळत भगदाडं पाडतो.

Whatever. वेळ कोणाला आहे ईथं! मी समोर बघून स्वतःशीच म्हणालो, "च्यायला, अजुन अख्खा दिवस आहे!!"

2 comments:

Unknown said...

मुह की बात छीन ली यार ... These days getting the same feeling after having debates/arguments..

Yogesh said...

मला असं वटत की प्रत्येक माणसाने परक्या जागी थोडी कळजी घायालाच हावी.माझे स्कूल क्रूष्णधवल लोकां च्या area मध्ये आहे. आम्हाला safety guildline आहेत. One of the guildlines is not to wear ear plug or talk on mobile while walking around campus at night. In other words it mean, तुमच्या possessions च प्रदर्शन करु नका. But it will be so good if there is no fear of robbery. And we can roam around anytime and with any gadget. But no world is perfect. Same can be applied in situation you mentioned. I don't want to defend any wrong action. that's why आपल्या देशाची अस्मीता सर्वा भार्तीयांनी जपायलाच हवी. We should be loyal, respectful to everyone.

Yogesh