Wednesday, June 19, 2013

The $ex and city!

काल सॉलिड धमाल झाली. खूप साऱ्या लोकांना खूप साऱ्या प्रकारे भीती वाटली. सकाळी एक बातमी छापून आली. फेसबुकने ती डोक्यावर घेतली. लोक आता सैरभैर होणार असे वाटू लागले पण तेवढ्यात दिवस संपला. बातमीचा lifa span संपला! आता तुम्हाला यावरून कशाचा काहीच क्लू लागत नसेल तर याचा अर्थ तुम्ही फेसबुक वाचत नाही. किंवा तुम्हालाही भीती वाटलेली पण आता लपवताय! फेसबुक न वाचणे म्हणजे ... बरं राहू दे. त्यावर परत कधीतरी. उगाच एका पोस्ट मध्ये इतक्यांदा विषयांतर नको. आपल्याला निवडणूक थोडीच लढवायचीये! (हे एका मित्राने सही सांगितलंय मला. कुठेही संवाद भरकटला की government, politics आणि corruption यावर काहीतरी भाष्य करून सोडून द्यायचा! त्याच्याहून चांगला escape route असूच शकत नाही! संबंध असो व नसो!) असो ... तर मला थोडीच निवडणूक लढवायचीये. आपण मुद्द्यावर येऊ की लोकांनी मुद्दा कसा सोडला!

काल चक्क हायकोर्टाने एक निर्णय दिला. म्हणजे निर्णय दिला ही न्यूज नाहीये. पण जो निर्णय दिला ती न्यूज आहे! मराठीमध्ये मथळा लिहायचा प्रयत्न केला पण जमत नाहीये ... म्हणून अख्खी न्यूजची लिंक देतो.

http://www.thehindu.com/news/national/tamil-nadu/couples-who-have-premarital-sex-to-be-considered-married-says-hc/article4824017.ece

हाहाकार! ही बातमी प्रत्येकापर्यंत वेगवेगळी पोचली असणार. लगेच पूर आले स्टेटस नी कमेंट चे! आणि करमणुकीचे कार्यक्रम सुरु झाले!

लग्न मंडप, कार्यालय, केटरींगवाले या सगळ्यांना तर धक्का बसला असणार! आता लग्नाच्या खर्चाने लोकांना देशोधडीला कसे लावणार? त्यांच्या असोसिएशनने बेकारी भत्ता वगैरेचे नियम वाचायला सुरू केले असावेत. स्पर्धेमुळे आधीच वांदे. आता या निर्णयामुळे तर सगळा डाव बदलला! कोर्टाने चक्क सांगितले की लग्न करण्याचा नी या सगळ्यांचा काहीही संबंध नाहीये!! काही हुशार कार्यालयवाल्यांनी लगेच कार्यालयाचे लॉजिंग बोर्डिंग मध्ये रूपांतर करायला सुरू केले असेल. बाहेर पाट्या लावल्या असतील "Hotel Decent - आमची कोठेही शाखा नाही!" बाजूला सलमान खानचा फोटो पण असेल! (आता सलमान खान "लग्न" या गोष्टीचा brand ambassador का? यावर चर्चा करायची असेल तर तुम्ही खुपच मागासलेले आहात यार!)

याहून जास्ती खळबळ टीवी सिनेमावाल्यांची झाली असावी! लग्नासाठी झगमग हवी. मोठा कार्यक्रम हवा. भरपूर लोक हवेत. हे सगळी गृहितकं आता उधळली गेली. कोर्टाचे जजमेंट असे म्हणतं.

"The court said marriage formalities as per various religious customs such as the tying of a mangalsutra, the exchange of garlands and rings or the registering of a marriage were only to comply with religious customs for the satisfaction of society."

घ्या म्हणजे! एका फटक्यात किस्सा खतम. इतकं खरं कसं बोलू शकतात कोर्टात? एक म्हणजे खरं? आणि तेही कोर्टात?? वर्षानुवर्ष अंधा कानून वगैरे करून जी काही चेष्टा चालवली होती त्याचं फळ हे! म्हणजे काही वेळा चक्क गोविंदाला पण वकील केलेला हो! शक्ती कपूर पण तिथे काहीतरी किस्से करायचा! कोर्टाने तरी किती वेळ सहन करायचं? त्यांनीही दिलं प्रत्युत्तर! सुरज बडजात्या (अरे होता न असा एक? विसरलात होय? चित्रहार बनवायचा! बघा आठवून!) पासून ते एकता कपूर पर्यंत सगळे हादरले असतील. मला वाटलं की हेच जरा लवकर झालं असतं तर "ये जवानी है दिवानी" मधून तरी सुटका झाली असती! पण इतका अधाशी कशाला होऊ. त्याचा पुढचा संभाव्य रिमेक तरी नाही व्हायचा यावर खुश होऊ!


"शादिके पेहले सेक्स नाही" असले डायलॉग नाहीत आता सिनेमामध्ये. किंबहुना "शादिके लिये सेक्स पेहले". हे असे काहीसे होईल. शादीवली रात पेक्षा शादिके पेहलेवली रात हे जास्ती प्रसिद्ध होईल. महेश भट्ट चा सुभाष घाई होईल! महेश भट्ट चे सगळे सिनेमे आता family movies म्हणून प्रदर्शित होतील! काही चतुर पत्रकारांनी हा त्याचाच किया कराया आहे अशी पण शक्यता वर्तवालीये! परदेस मधली महिमा चौधरी भारतामध्ये पळूनच येणार नाही! (असा पण होता न एक सिनेमा? असे काय करताय? "ये दिल" हे एकच गाणे नव्हते त्यात! त्यात एक अपूर्व अग्निहोत्री असतो. खूप futuristic विचाराने तो महिमाला अमेरिकेमध्ये घेऊन जातो नी तिथे म्हणतो "चाल अब जिंदगी जीते है!" तेव्हा हायकोर्टाने असला निर्णय दिलेला नसल्याने ती बिचारी अमेरिकेतून भारतामध्ये पळून येते! नी शाहरूखवर प्रेम करते! हा...! तोच तो परदेस). केवढा सारा खर्च वाचेल! ही स्कीम बचत गट किंवा सहकारी पत संस्था यांनीच काढायला हवी होती! पण असो, कोणाच्या का आरवण्याने होईना. सूर्य उगवला. किंवा चंद्र उगवला म्हणूया. Moon is closer to sex than the sun! God Bless Bollywood!

"ये शादी नाही हो सकती" असला डेंजर डायलॉग सिनेमामध्ये येऊन दंग नाही व्हायचा आता. नायक नी नायिका लगेच म्हणतील. अंकल, लेट हो गया. शादी को कब की हो गयी, ये बस satisfaction of society सुरु आहे. We are already satisfied!"

मला तर चिंता वाटते ते marriage certificate साठी त्रास देतात त्या लोकांची. आता काय करतील? विवाहित असूनही कोण्या कोपर्‍यातल्या ऑफिसामध्ये जाऊन चक्कर मारायला लावायचे. अहो आम्ही लग्न केलेय. प्लीज आम्हाला सर्टिफिकेट द्या! आता कदाचित ते कमी होतील. दवाखान्यात कदाचित फेऱ्या वाढतील! सिद्ध करा म्हणतील आम्हीच केले! परत कोर्ट म्हणते

"The court further said if necessary either party to a relationship could approach a Family Court for a declaration of marital status by supplying documentary proof for a sexual relationship"

"Documentary proof" हा तासही माझ्या विशेष कुतूहलाचा विषय आहे. आता यासंदर्भात ऑफिसचा फॉर्म कसा असेल याच्या कल्पनेत वेळ जरा छान गेला. आजूबाजूचे लोक म्हणाले असे एकटाच काय हसतोस अधेमधे! मी म्हणालो futuristic विचार करतोय! काही चतुर मित्रांनी फेसबुकवर खूप नोबल मार्ग सुचवला. म्हणाले टेप करून ठेवा. आणि तेच घेऊन जा ऑफिस मध्ये! म्हणजे आता MMS scandal अधिकृत केल्यासारखे झाले! म्हणजे सगळ्या MMS scandal पटू ना भीती! च्यायला धंदाच बसवला! सरकारी दफ्तरे आता अचानक इंटरेस्टिंग होणार! फायली धूळ खात पडायच्या. आता फायलींचे टेप होणार नी ते नित्य नियमितपणे बघितले जाणार. Fraud ला जागाच नाही हो म्हणजे! वर सगळे कर्मचारी कायम आनंदी. म्हणजे आनंद, परमानंद, अत्यानंद साठी LIC ची policy घ्यायची गरज नाही! Revolutionary निर्णय! बीट नाहीये!

आई बाबांची काळजी मिटेल! मुलं घरी येऊन सांगतील. वर-वधू संशोधनासाठी काय नाव घालते? माझे मागच्याच आठवड्यात लग्न झाले. पुढे म्हणतील की फक्त मला confirm करायचंय की खरच झालं की मला वाटतंय झालं? सगळाच किस्सा सोपा केला! लग्नाच्या आधी करण्याच्या सोपस्कारामध्ये आता divorce decree चा पण समावेश होईल. म्हणजे कभी किधर कुछ गलतीसे हो भी गया हो तो! म्हणजे करिअर कौन्सलिंग मध्ये आता पुढे कशामध्ये स्कोप आहे? या प्रश्नाला आता घटस्फोट या क्षेत्रात बूम येणारे असे लोक सांगायला लागतील! कारण कोर्ट म्हणतं की,

"The court also said if after having a sexual relationship, the couple decided to separate due to difference of opinion, the ‘husband’ could not marry without getting a decree of divorce from the ‘wife’."

राहून राहून मला सारखे वाटते! आपण एका revolutionary generation चा भाग आहोत! किती सार्‍या अभूतपूर्व गोष्टी आपल्या जनरेशन मध्ये घडतायत! काल ही मला परत असे वाटलं!

दिवसाच्या शेवटी परत एकदा बातमी पूर्ण वाचली. दिवसभर जे काही भविष्य रंगवून मनोरंजन केलेलं त्यापेक्षा बातमी जरा वेगळीच होती. एका ठराविक केस मध्ये महिना ५०० नी १००० रुपयांसाठी मारामारी सुरू होती. एकीकडे live-in रिलेशन मध्ये राहून, २ मुलं वगैरे होऊन नंतर एका माणसाने जबाबदारी टाळायचा प्रयत्न केला होता. मुलाच्या जन्माच्या वेळी सही करून दिलेली दवाखान्यामध्ये. तेव्हा जबाबदारी घेतली. नंतर संबंध बिघडल्यावर अलाहिदा! कोर्टाने या एका ठराविक केस पुरता निकाल दिला की बाबा फालतू बडबड करू नको. सगळी history पाहता. तुम्हाला दोघांना नवरा आणि बायको हा दर्जा दिलाच पाहिजे. कार्यालयात जाऊन रिंग नाही घातली म्हणून या जबाबदारीपासून आता इतक्या वर्षानंतर, इतके काही झाल्यानंतर, तू निसटून जाऊ शकत नाहीस! मुकाट्याने जे काही देणं लागतोस ते दे. नी घटस्फोट घे.

परत आता जाऊन स्पष्टीकरण वगैरे देणं आपल्या फेसबुक च्या रुलबुक मध्ये थोडीच आहे. जनता आज दुसऱ्या विषयावर गेलेली आहे. काल एक दिवस या बातमीवर करमणूक करून घेतली. आज दुसरी. काही वेळा या कशातूनही करमणूक करून घेण्याच्या आपल्या सवयीची भीती वाटते यार मला!

1 comment:

Ruta said...

Mast ch lihilayas..khup awadla! Asach chalu ahe ajubajula..kharach.