Wednesday, December 18, 2013

The Glass Window

I am standing at the glass window, staring at the darkness outside. I stand here often. I have been doing it since I started living here. I think I am a savior! I think I am born to save something or someone from somebody … somehow! I am waiting for things to happen around me so that I can accidentally turn into the hero that everyone ever wanted! Or maybe I am supposed to know something … about something … that nobody ever knew about! I continue to stare outside. It’s darkness everywhere. I have hope but it’s a hopeless land.

I never saw anything magnificent outside!
No gigantic creature emerged out of nowhere!
No spaceship landed!
I never even saw any superhero swinging around here!
Nobody ever saved the world here! They don’t even save water!
I never saw anyone going around finding any clue to solve any mystery!
There is rather no mystery here other than absence of any mystery!
No ghost ever found this as an attractive place!
Nobody’s secret is guarded here!
There is no music played on my entry of exit from anywhere in any angle!

But I have hope. I am sure things will change. Someday, this window will break. Real things will be visible and hero will emerge.

I continue to stare at windows 8 now!
yawndarkness continues!

Saturday, November 16, 2013

Shampoo and Biscuits

"... ...
So Sachin won a match, and he got hundreds of thousands! My brother almost died on the border while saving a village! He got nothing. He got nothing because his name can't sell a shampoo or biscuit! So no one was interested in paying him. I voiced this, and they said I was being dramatic!They asked for a proof if my brother really is in army! Is this why people study and get smarter? to question people? They really asked me proofs, believe me. And I am dramatic when I talk about my brother. My brother is earning pride. So is my entire family. He made his choice to go to army and fight for the country. He is happy there. He never complained about money, nor is he short of it. But I feel bad for him. Sachin hits a sixer and every one cheers. Entire nation cheers. My brother and his troop, hit a terrorist, no one cares. They take a bullet and no one screams. Sachin is given out. And the nation gets hurt!

Well, I like Sachin too. Why would I hate him?

It's not only about the imbalance of recognition. It's about ignorance too.
Many people in my neighborhood say, we all should go and live abroad. There is nothing left in this country. Then what is my brother protecting? Why do they all ridicule the whole purpose of the life of my brother? Why not call my brother back right away? Let them all come back. But my brother doesn't care about it all. He says, there are people who think like that, who say like that. There are cynical people. But they don't make a country. They make nothing. There are people who invent things, solve problems, help others, inspire many. They make the country. One ought to focus on the bright side and protect it. It's a skill. Our country needs you to have it.

I say, he isn't aware of the darkness here. Or I never understand the brightness that he sees.

I want respect for him and his troop. Because the country doesn't run on shampoo and biscuits."

It was one of my colleagues, on this bhaubij. While leaving, she said, "Well, He likes Sachin too." as always, it was followed by her priceless smile.

Friday, October 18, 2013

सहज आठवलं म्हणून ...

आठवणीतल्या काही गोष्टी. काही ऐकीवातल्या. काही अनुभवलेल्या. काही बनवलेल्या. पण काहीतरी सांगून गेलेल्या. किंवा बरेच प्रश्न टाकून गेलेल्या. अशातलीच ही एक.

पुण्यातून मुंबईमध्ये कामासाठी जात होतो. Express Way सुरु व्हायचाच होता. हिंजेवाडी ब्रिज ओलांडला. संध्याकाळी परत येताना या इथेच गाड्या तुंबून काय हालत झालेली असेल याचा विचार आला. उगाचच उजवी भुवई वर आणि डावा डोळा लहान करून स्वतःशीच नाराजी व्यक्त केली. उगाच चीप चीप आवाज करत ड्राईवरला विचारलं, "तुला काय वाटतंय? कसं सुरुये सगळं आपल्याकडे एकूणच? काय होईल?"

"वाट लगा है देश का! हे नाही होत. ते नाही होत." असं आपल्यासारखंच काहीतरी बोलेल असं वाटलेलं मला. असलं बोलत, घरी किंवा ऑफिस मध्ये बसणं हाच असतो की आपला विरंगुळा.

"मस्त सुरुये सगळं!" तो म्हणाला.
"मस्त सुरुये?"
"हं!"
"पूर्वी ५-६ तास लागायचे या रस्त्यावरून मुंबईला पोचे पोचेपर्यंत. आता २-३ तास लागतात. तेव्हापासून चालवतोय गाडी मी. आणखी ३-४ वर्षामध्ये, साहेब, सिंगापूर होईल इथे!"
"किती तास चालवतोस गाडी दररोज?"
"कमीत कमी १२ तास तरी होतातच"
"कमीत कमी?"
"हो. त्यावर एक तास जरी झाला तर ज्यादा पैसे मिळतात."
"किती?"
"प्रत्येक तासाचे पन्नास रुपये."
"इतका वेळ बाहेर असतोस?"
"घर बैठके क्या है साहब? पैसा बहार है! देश तो आगे बढ राहा है, घर बैठा तो पीछे रेह जाऊंगा."

This is where the country is heading. Either with us. or without us! and this driver could see it. Can we?

Saturday, October 12, 2013

They are doing a fine job. Because we are not!

I was honored to stand in front of more than 20 politically active people and talk about how technology can be used in politics and governance. It was an interesting exercise and different experience to me. Should I say quite an eye opening? Let me leave aside the technology topic for a discussion some other time and share a realization I had during the event. Believe me it was quite revealing!

All the people sitting in front of me were either MLAs, local leaders or somehow associated to them. They came from almost all political outfits active in Pune. I had my own bias against politcs and politcal leaders like all (in)active citizens have. I don't want to name any party in particular but people sitting in front of me were all very confident that they were doing a genuinely good job! There was not a single doubt in anyone's mind. They all were crystal clear and the confidence was evident from every sentence they uttered. Wow! Until then, I was very confident that there is none out there who is doing a good job. At times, I also went to an extent, that I felt they all know it that they are not doing a good job but it's just that they don't want to do it either! And here they were right in front, all in one room. Each one of them super confident and proud of their work in individual areas! Quite revealing disconnect it was!

I generally have "opinions". I have opinions about almost everything. I love to write about it, tweet about it, crib about it. Rarely do I move out of our chair to really ask the questions to the right people, nor do I get such chance. But let's face it. Let's agree that not getting a chance to ask the questions to right people, can not be the reason for not getting out of chair and finding them out! Let's agree that by liking some post alone, or by tweeting alone, no kranti is going to happen! If anything, it perhaps is self-ego satisfaction than anything else. My neighbor comes to me and asks me authoritatively every time there is a candle march, if I tweeted of liked some facebook page. If my answer is negative, he gives me a look full of disgrace! Now lately, I have been regular in doing social activism or social self ego massaging! But let's agree, it ain't good for anyone! It affects nothing! It all flashed in my mind while I was standing there.

I was standing in front of the people who believed they were doing a good job, whom I believed never did anythign good. (It was like an appraisal situation where your manager feels that you have done nothing and you feel that you have almost moved the mountain! Here the roles were slightly reversed). Of course, I could not directly ask them since it wasn't Facebook or twitter, and they were actually there to hear it. Man, you got to compose a lot of things in mind before actually asking a question. World was a lot easier when it was only about posting on social media! It sure takes some guts to ask what you want to ask when you have a chance to ask. I posed an indirect question to all of them and was very sure I am either going to be out of my job or out of city if it goes wrong. The answer was very simple though. Because they were always clear.

For all of them, I, part of the educated mass, was silly, unorganized, and an unclear fool. They exactly knew their "vote bank". They did everything for them. They were available literally 24x7 for them. They facilitated, gas connection, electricity, pan card, blood donation, travel assistance and what not to them. The entire crew was always available to sort out the local disputes. They almost knew everyone by name, and each one from their "vote bank" knew them! They were the "goto" guys for every problem and need. Why wouldn't they feel that they are doing a good job? I was proudly never part of it. I was never heard. I never knew such thing existed. For them, I was someone who gathers somewhere, and makes noise about something that can not be heard. Even if I praised, it never reached them.

They don't care about me. That's why I never vote. Because I don't vote, I never matter to them. Because I don't matter, they never care about me.

Do I support the local political leaders creating a parallel governance by bypassing the system and becoming the "goto" person for all the needs? Do I support what's happening out there? Well, it's the later stage of discussion. Let's at least be there to start with. I definitely not support not voting! It's our responsibility to vote.

I just did my voter registration.

They are doing a fine job. Because we are not.

If they are really good, let's not be unfair calling them all useless. If they are not, let's all really be there and be the part of governance. Write back, if you need help in getting registered. It's not that difficult. Let's be aware. Let's make others aware.

... and yes, I am also sad, that there is no Sachin anymore in the cricket!

Thursday, October 03, 2013

Follow the rule!

परवा गुजारीश पहिला. एक तर मला कळत नाही की असले त्रासदायक सिनेमे काढतातच कशाला? असो. पण त्याबद्दल नंतर कधीतरी. च्यायला डोक्यात किडा सोडून गेला न पण हा सिनेमा!

इच्छामरण हा आता पुष्कळ वेळा चघळून झालेला विषय आहे. जगण्याची इच्छा. Spirit of living. हे सगळं ठीक असलं तरी, एखाद्या भाजीपाल्यासारखं १४-१५ वर्ष जगत आलेला इथन. त्यातूनही तमाम जनतेला आयुष्य कसं छान आहे असा आशावाद शिकवणाऱ्या पण स्वतः हालचाल करू न शकणाऱ्या इथनला स्वतःसाठी इच्छामरण मागताना झालेला त्रास. लोकांनी समजून घेण्याच्या पलीकडे असलेल्या त्याच्या समस्या. जगण्यावर त्याने मिळवलेला विजय, कल्पनेच्याही पलीकडचा. आणि म्हणून हक्काने मरण मागणारा त्याचा चेहरा खूप वेगळा वाटतो. त्याच्याइतकं आयुष्य कोणालाच कळलं नाही. असंही वाटतं. इतके सगळं करून त्याला लाचारपणे जज्जकडे मृत्यू मागवा लागतो. मला हाच मोठा अन्याय वाटला. अपमान वाटला. कोणाला पटवायची गरज का भासावी? माझं आयुष्य. मी जगलो. तुम्हा सर्वांच्या शतपटीने जास्ती चांगले जगलो. तेही भयंकर प्रतिकूल परिस्थितीमध्ये. आता मला तुम्हाला स्पष्टीकरण का द्यावे लागावे? ज्ञानेश्वरांनी कोवळ्या वयात समाधी घेतली. आजच्या काळात, त्यानाही कोर्टामध्ये उभे केले असते. "लिहिलास बाळा ज्ञानेश्वरी. मग? शहाणा झालास? समाधी हा ऑप्शन आमच्या घटनेमध्ये नाही. त्यामुळे तुला पुढे जगावे लागेल. तसेही १०+२+४ असले pattern असतात आमच्याकडे. तू इतक्या लवकर सगळं शिकूच शकत नाहीस. तुला पुढच्या इयत्तेमध्ये प्रवेश दिलंच कोणी?" असलं नक्कीच झालं असतं.

आता ज्ञानेश्वर आणि इथन एकाच तराजूमध्ये तोलाण्यासारखे विषय नाहीच आहेत. इथनचा विषय जरा नाजूक आणि वेगळा होता. खूपच इथनचा स्वतःचा होता. त्याचा सरसकट नियम होऊ शकत नाही. किंवा मला तसं सुचवायचंही नाहीये. पण खटकलेली बाब म्हणाल तर त्याला कोर्टात जाऊन आपली केस लढवण्याची. तीही अश्या लोकांसमोर की ज्यांना काडीचीही कल्पना नाहीये त्याच्या आयुष्याबद्दल! काल्पनिक गोष्टीचा इतका उहापोह कशाला? हे जरी खरं असेल तरी थोड्या फार फरकानं असल्याचं गोष्टी मला खूप ठिकाणी दिसू लागलेत! म्हणून असले सिनेमे बनवूच नयेत. च्यायला नंतर हा त्रास! इच्छामरण म्हणजे, एखाद्याच्या पीडा थांबवण्यासाठी त्याच्या मागणीनुसार डॉक्टरने त्याचे आयुष्य संपवणे. हा कायदा होऊ नये, याला खूप बाजू आहे. खूपशा धर्मांनाही मान्य नाहीये हे. कायदा म्हणतो की याचा खूप मोठा गैरवापर होऊ शकतो. आणि म्हणून असला कायदा आम्ही करणारच नाही. किंबहुना असलं काही नाहीच करायचं असा कायदा करणार. म्हणजे कोणी विचारही नाही करायचा याबद्दल!

काही अंशी बरोबरही असेल हे. पण गैरवापर करणाऱ्या लोकांना पकडणे आणि वेसण घालणे तितकेसे सोपे नाहीये. म्हणून सब घोडे बारा टक्के म्हणून नियम लावायचा? शेवटी कोणाचंतरी भलं व्हावं म्हणूनच नियम बनवायचे न? मग अरे ते नियम न पळताही कोणाचं भलं होत असेल तर नियम पाळण्याचा अट्टाहास का? हे असंच नियमात गुराफाटायचं आपण की त्यामागच्या माणसाला समजून घ्यायचं? कोणी सुखी होवो न होवो, शेवटी नियम पाळल्याचे सुख! घरी जाऊन शांत झोप आली पाहिजे न! एक वकील मित्र म्हणाला, "माणूस म्हणून सगळं पटतंय पण एका व्यवस्थेचा भाग आहोत आपण. एकदा नियमाला फाटा दिला की मग शंभर लोक हात वर करतात. त्यांना कोण निस्तरणार?" म्हणजे जास्तीचे काम आणि अवघड प्रश्न नकोत म्हणून केलेली पळवाट आहे का ही? की मला कायद्याचं ज्ञान कमी आहे म्हणून मला एकट्यालाच असं वाटतंय?

इच्छामरण हा विषय गंभीर आहे. अशा १-२ पान खरडून त्यावर करण्यासारखा नाहीये. पण एकूण आपली अशी प्रवृत्ती खूप दिसून येते. एकानं चूक करायची आणि मग बाकीच्या साऱ्यांवर नियम लादायचे! असे बनवतो आपण नियम! बऱ्याच वेळा चूक करायचीपण गरज नसते. "कोणीतरी चूक करू शकेल" हे इतके पुरेसे असतं! शाळेत असताना हक्क आणि कर्तव्ये यावर नागरिक शास्त्रामध्ये एक धडा होता. उदाहरणार्थ गाडी चालवण्याचा आपल्याला हक्क आहे, पण लोकांना त्रास होईल इतका आवाज करत न जाणे, किंवा वेडेवाकडे न जाणे, हे आपले कर्तव्य आहे. आपण हक्क मिळाले की मोकाट सुटतो. आणि मग नियम लावावे लागतात. आपण सगळेच नसू पण आता एखाद दुसरा नक्कीच नियम धाब्यावर बसवतो. दिलेल्या हक्कांचा, मुभेचा गैरवापर करणं इतकं गृहीत पकडलंय की कोणी गैरवापर करण्याच्या आधीच हजार प्रकारचे नियम बनतात.

आता बघा. माझे तिच्यावर प्रेम आहे. आम्हाला लग्न करायचे आहे. तर मग आम्ही लग्न केलं हे मी कोण्या काळ्या कभिन्न आणि अंधारात बसलेल्या माणसासमोर का सिद्ध करायचं? तेही फोटो आणि राशन कार्ड दाखवून? कारण त्या हापिसातल्या बाईने सही शिक्का मारला नाहीतर तुम्ही दोघे शादीशुदा कसे? त्याचच दुसरं टोक. आता आम्ही दोघानी ठरवलं की बाबा आपलं काही जमत नाही आता आपण वेगळे होऊ! तेही असं लगेच होत नाहीच. तर इथेपण तुम्हाला कोर्टात जाऊन सिद्ध करावं लागतं! इथेही मिया बीबी राजी, वगैरे काही चालत नाही! पाच सहा महिने चकरा माराव्याच लागतात. हे हास्यास्पद नाहीये का? म्हणजे आधी लग्न करताना चकरा मारायच्या कागद रंगवण्यासाठी, आणि मग त्यातून मोकळे होताना परत चकरा मारायच्या ते कागद खोडण्यासाठी! मग मुळात ते कागद बनवलेच कशाला? त्यांचा सबंध काय? त्याशिवाय काय आम्ही सुखी राहिलोच नसतो का काय? लग्नव्यवस्था आणि त्याचे फायदे तोटे हा विषय खूप मोठा आहे. पण तिथेही सब घोडे बारा टक्के केलेच आहे आपण! मला त्याचं नवल वाटतं!

एका टळटळीत दुपारी. एका कोपऱ्यातल्या चौकात, जेव्हा कोणीही कुत्रा नव्हता, तेव्हा माझ्यासमोरचा लाल सिग्नल मात्र माजोरड्यासारखा सुरु होता. थोडावेळ थांबलो, आणि मी डावीकडे वळलो. समोर पोलिसाने पकडले. म्हणाला तुम्ही सिग्नल तोडलाय. पैसे भरा. मी म्हणालो. अरे भल्या माणसा. इथं कोणाचं नुकसान झालंय? कोणाला धोकातरी होता का? तुमचा सिग्नल नको हुशार इतका की समोरचे ट्राफिक बघून सुरु बंद व्हायला? आणि असे असतातही सिग्नल! पोलीस म्हणाला, साहेब, उगाच शहाणपणा शिकवू नका. लायसन्स ठेवून द्या. नंतर येऊन साहेबाना स्टोरी सांगा! मी म्हणालो, अरे बाबा, तू बघ न विचार करून! की तेही साहेबच करणार? मी नाहीच तोडत सिग्नल. पण इथे चिटपाखरू नाहीये. मी नेकीमध्ये थांबलोपण सिग्नल वर. पण निरर्थक आहे ते! गाढवपणा नाही का हा? ते मशीन म्हणालं थांबा तर आपण थांबायचं? तुमचं मशीन चूक आहे. मागासलेलं आहे. ते कधी दुरुस्त करणार? अंदाधुंद कारभार असू नये. शिस्त असावी. हे मलाही माहिती आहे. शेवटी नियम जो केलाय तो लोकांच्या सुरक्षिततेसाठीच केलाय न? आणि जेव्हा इथं तुंबल्यासारख ट्राफिक असतं, तेव्हा गरज आहे न शिस्तीची! आणि मी माझ्या सहकाऱ्यांनाही सांगतो तेव्हा नियम पाळायला! पण हे आत्ता काय? इतकं बोलल्यानंतर पुढं काय झालं हा वेगळा विषय. उगाच नियम म्हणून नियम पाळण्यात काय अर्थ? यालाच अंधश्रद्धा नाही का म्हणायची? अक्कल गहाण ठेवायची, आणि नियम पळत सुटायचे! म्हणायचं की हे असच असतं आणि तुलापण असच कराव लागेल! पटो. किंवा न पटो. 

ज्या लोकांच्या भल्यासाठी नियम बनवलेत त्या लोकांचे आता भले झालंय. आता नियम बंद करा. हे ही आपण नाही करणार! किंवा त्या नियमाने कोणाचेच भले होते नाहीये. आता नियम बंद करा! हे ही आपण करणार नाही! थोडासा नियमांना बाजूला ठेवून खरच भलं करायचा विचार करूया? तेही आपण करणार नाही!

हे इतकं क्लिष्ट कधी करून ठेवलं आपण हे सगळं? सगळं सोपं गणित असावं. काय बरोबर काय चूक. हे सहसा अवघड नसतच. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आपण समजूतदारपण दाखवायला सुरु केला की कदाचित कधीतरी मोठ्या मोठ्या गोष्टींची गणितं पण सोपी होतील. आता माझी एक मैत्रीण म्हणते की गणित म्हणालं की ते कधी सोपं असूच शकत नाही! कदाचित ते खरं असेल! काय सांगा! 


* Euthanasia (इच्छामरण) चे तीन प्रकार आहेत. एक म्हणजे स्वतः मागीतालेले मरण. हे बेल्जियम, नेदरलंड आणि लक्सेमबर्ग या देशांमध्ये आणि अमेरिकेच्या काही राज्यांमध्येच कायद्याने मान्य आहे याला assisted suicide असंही म्हणतात. दुसरा प्रकार म्हणजे, जेव्हा माणूस स्वतःचं मत व्यक्त करू शकत नसेल, तर त्याच्या नातेवाईक किंवा जवळच्या लोकांनी मागितलेले मरण. हे सर्व देशांमध्ये कायद्याने अमान्य आहे. अपवाद, नेदरलंडमधे केवळ नवजात शिशुसंदर्भात हे वापरले जाते, तेही खूप विशिष्ठ केसमध्ये! तिसरा प्रकार म्हणजे, जेव्हा माणूस आपलं मत व्यक्त करू शकत असतानासुद्धा, त्याला अंधारात ठेवून, किंवा धोक्याने मारणे. याला आपण हत्या म्हणतो. एकूणच इच्छामरण दोन प्रकारे करतात. एक म्हणजे, औषधोपचार बंद करून. आणि दुसरे म्हणजे ठराविक औषधं जादा प्रमाणात देऊन! इंटरनेटवर यासंदर्भात खूप NGOs नी आणि वैद्यकीय संस्थांनी दिलेली माहिती आढळते. यासंदर्भात कायदा सशक्त व्हावा म्हणून खूप प्रयत्नही सुरु आहेत. But I am sure they also have to go and convince so many totally unrelated, and uninterested people about this very important topic, before they actually reach the decision maker! It's so unfair!

Friday, September 20, 2013

प्रगतीच्या मार्गावर ... प्रेमाचा सुळसुळाट!

“मला love stories आवडत नाहीत! मला “I hate love stories” हा सिनेमाही आवडत नाही! हे प्रेमाचा भडिमार करणारे जे कोणी लोक आहेत न, ते सगळे खरे अतिरेकी आहेत! किती अरे त्रास द्यावा? त्याला काही प्रमाण? काही करा न करा, पण प्रेम कराच! बारा महिनेमे बारा प्रकारे करा. प्रेम केला नाहीत तर काहीच केला नाहीत! आयुष्यात काही करण्यासारखे असेल तर प्रेमच! प्रेम म्हणजे सर्वस्व. शेजारी पाजारी, कलीग, मित्र, मैत्रिणी, रस्त्यावर गर्दीमधले लोक, तो होर्न मारणारा काळा जाकेटवाला, सिग्नल तोडलेल्या बरोबर मांडवली करणारा पोलीस, किराणामाल वाला दुकानदार, करच्या दारावर टकटक करणारे भिकारी, हे सगळे तुम्ही नजरेआड झालात की प्रेमच करत असतात. मग तुम्हीच कसे काय करत नाही? प्रेमाचा विसर पडू देऊ नका. सगळीकडे प्रेमाच्याच आणाभाका घ्या.

आमच्याकडं प्रेम अमर असतं. प्रेम आंधळं असतं. प्रेम लुळं पांगळं पण असतं. कोण म्हणतो प्यार बिकाऊ नसतं? मी तर म्हणतो की प्रेमापेक्षा जास्ती बिकाऊ आणखी काहीच नसतं! प्रेमाच्या विक्रेत्यांचा सुळसुळाट तर पुण्यातल्या कुत्र्यांच्या सुळसुळाटापेक्षा जास्ती असतो! शाम्पू घ्या, तेल घ्या, साबण घ्या, टॉवेल घ्या, दात घासा, पाणी प्या, ज्यूस प्या, चिंगम चघळा, फिरायला जा, गाड्या घ्या, जेवायला जा, कपडे घाला, कपडे घालू नका, चड्ड्या घ्या, रुमाल घ्या, चोकलेट घ्या, बिस्कीट खा, पेन पेन्सिली घ्या, श्वास घ्या, मोबाईल घ्या, फोन करा, फोनची तोबा बिलं भरा, बल्ब घ्या, ट्यूब घ्या, घरं घ्या! आणि प्रेमात पडा. प्रेमात पडायचं असलं तर इतके सगळे अस्सल उपाय आहेत! का? का काय विचारता? का नसतंच विचारायचं. का विचारणारे शहाणे असतात आणि आपण तर हुशार आहोत! आपण कुठे शहाणे आहोत? हे सगळं करा म्हणजे कोणीतरी तुमच्या प्रेमात पडेल, किंवा तुम्ही कोणाच्यातरी प्रेमात पडाल! दिल दिल दिल करत पळत सुटा. “दिल” हरवा, मिळावा, सांभाळा, त्यावर छुरी चालवा, पागल बनवा, त्याची पुकार ऐका, त्याला शिव्या घाला, त्याचं ग्यान ऐका, ऐकू नका, दिल मध्ये कोणा कोणाला बसावा, तिथून हाकलून लावा, ते तोडा, फोडा, पायदळी तुडवा! Exchange offer देऊन त्याचा कुकर आणा! दिल मे दर्द घाला, कंदील घेऊन शोधात बसा. घंटा काही कळत नसेल, तरी दिलचा बोलबोला करत फिरा.

माणसानं नर आणि मादी याहून थोडासा वेगळा विचार केला पाहिजे. असे एकीकडे बोंबलायचं आणि दुसरीकडे मुलगी हुडका. मुलगा हुडका असा भडीमार करायचा! जनावरामध्ये आणि आपल्यामध्ये फरक एवढाच की त्यांना मार्केटिंगचा त्रास नसतो. बाकी हुंगत हुंगत फिरणं हे उपजत असतंच. नावाला आपण प्रगत.
"

एवढं बोलून हुशारला धाप लागते. तो खाली बसतो! हुशार काही प्रगत नाही हे पुराना लोकांना आधीच माहिती असतं. वर तांडव करत, चेहऱ्यावर एवढे भाव आणून तो काय बोलला ते पुराना लोकांना झेपलेलंही नसतं! पण तरीही सगळे दया येऊन टाळ्या वाजवतात! हुशारला शिकार का जमत नाही हा प्रश्न अजूनही अनुत्तरीत असतो. हुशारला आपण एवढं कसं बोललो याचं त्याला आश्चर्य वाटलेलं असतं. शाहरुख खानला 'वो सत्तर मिनिट ...' म्हणाल्यावर कसं वाटलं असेल, हे हुशारला कळलेलं असतं. आपल्याला शिकार येत नाही, हे लपवण्यासाठी आपण केवढा मोठा तमाशा केला, आणि त्यातलं काहीच या लोकांना कसं कळलं नाही, याचा हुशारला आनंदही होतो आणि दुःखही!


... थोड्या वेळा पूर्वी, 


हुशारला शिकार येत नाही हे बघून समस्त पुराना लोक चकित होतात. शिकार करत नाही आणि तरीही जिवंत आहे. हट्टा कट्टा आहे. त्यामुळे हा देव वगैरे आहे की काय असंही काही पुराना लोकांना वाटलेलं असतं. पण एकूणच हुशारची हुशारी आणि बोलणं ऐकून, तसं नसेल हेही त्यांना लगेच कळलेलं असतं.

हुशारच्या मित्रवर्गामध्ये “शिकार” या शब्दाचे विशेष अर्थ असतात. हुशार ला अजून कोणी शिकार सापडलेली नसते. पण इथं आपल्या अमुक अमुक मित्राची शिकार कशी आहे आणि त्याने काय काय केलेलं वगैरे सांगून हुशार फुशारकी मारणार असतो पण त्याला वेळीच पुराना लोकांना अभिप्रेत शिकार म्हणजे काय आहे हे कळून तो आपला उत्साहाची शिकार करतो! आणि फक्त मान हलवतो. सकाळी चुकून लवकर उठल्यावर हुशारला बाल्कनीमध्ये कबुतरं आणि क्वचित चिमणी दिसत असते. मग तो विस्कटलेले केस, टी शर्ट आणि चड्डीमध्ये, हातवारे करत त्यांच्या मागे पळत असतो. अशानं त्या पक्ष्यांची पण करमणूक होत असते. तेही म्हणून परत परत हुशारच्याच बाल्कनीमध्ये येऊन दररोज नित्य नियमाने मुक्तपणे घाण करत असतात. तेव्हा इथे पुराना लोकांकडून चुकून शिकार शिकलोच तर काय करायचं हे हुशारनं मनात पक्कं केलेलं असतं. आपल्याला शिकार अजून नाही मिळाली याचा राग खरी शिकार करून काढता येईल, असेही त्याला वाटून जाते. PS3 सोडला तर हुशार कुठेच शिकार सदृश काही करत नसतो.

थोड्या वेळाने हुशारला अभिप्रेत “शिकार” चा अर्थ पुराना लोकाना कळतो. आणि तीही शिकार हुशार कडे नाही हे कळून त्यांना खूप हसू येते. या सगळ्या आदिवासी लोकांवर आपल्याला आधीच इम्प्रेशन मारता येत नाही आणि आता तर यांनी जखमेवर बोट ठेवलं म्हणून हुशार पेटून उठतो. त्याच्यामधला activist जागा होतो!

“स्त्री आणि पुरुष. आणि मग एवढंच प्रेम? त्याच्या छटा असतात की! तुम्हाला काय कळणार म्हणा! तुम्हाला कुठं काय फरक पडतो!..." थोडा वेळ हुशारला काळातच नाही की पुढे काय बोलायचं. "पण खरं सांगू? तुमच्याहून आम्ही जास्ती काही वेगळे नाही या बाबतीत. म्हणजे तुम्हाला तुम्ही जसे आहात तसे मान्य आहात. माहिती आहात. फरक एवढंच आहे की आम्हाला आम्ही अजून तुमच्यासारखेच आहोत हे मान्य नाहीये. माहिती नाहीये, असं म्हणणार नाही. इथं प्रेमाचं पिक येतं. एक गेला की दुसरा भेटतो. दुसरी गेली की तिसरी सापडते. हे सगळं ज्याला जमतो तो भाव खाऊन जातो. आम्हीही अशांनाच भाव देतो. कारण आम्हाला spicy आवडतं! वर आमच्यावर भडीमार होतो. एक ठराविक प्रकारे विचार करण्याचा. ठराविक गोष्टी आवडून घ्यायचा. ठराविक प्रकारे आयुष्य जगण्याचा!

मुळात मला love stories आवडत नाहीत! ...


थोडासा संदर्भ लागलाच तर ... प्रगतीच्या मार्गावर

Tuesday, September 10, 2013

Too busy to do good!

सकाळी सकाळी "पिंकी है पैसेवालोकी", "ताकी हो ताकी, हो ताकी ताकी ताकी रे" अशी आचरट गाणी कानावर पडली आणि दिवस सुरु झाला. मागच्या वर्षी "चिकनी चमेली", "पल्लू के पीछे छुपा के रख्खा है" या गाण्यांनी दिवस सुरु झाला होता. लोकांच्यातला सळसळता उत्साह तर काय सांगावा? त्यावर कलेची ही अशी आराधना. आणि आपली आराधना आजूबाजूच्या प्रत्येकाच्या कानापर्यंत पोचलीच पाहिजे, म्हणून प्रामाणिक धडपड. खूपच पवित्र वातावरण. सकाळी उठल्यापासून, ते आता पुढचे दाही दिवस अशाच भक्तीभावामध्ये न्हाऊन निघणार, या कल्पनेने मी तोंडावर पांघरूण घेऊन आणि आणखी एक तासभर झोपून घेतलो!

आपली सगळी तयारी चोख असल्याने, सकाळी सकाळी दुर्वा आणायला बाहेर जावे लागले. तिथे २ लहान मुलांची बडबड ऐकली. नुकतीच गोकुळाष्टमी झालेली. सोसायटीमध्ये लहान मुलानीपण काही बाही केलेलं. तर या दोघांची स्पर्धा सुरु होती. गोकुळाष्टमी vs गणेश चतुर्थी! त्यातल्या एकाचे स्पष्ट म्हणणे होतं की गणेश चतुर्थी म्हणजे सगळं वरवरचं असतं! गोकुळाष्टमीच जास्ती मजेशीर. असले सडेतोड मतं होऊ घातलेल्या भावी पिढी कडून ऐकून, मी उगाच आजू बाजूला घोटाळलो. "गोकुळाष्टमीला आपल्याकडे कोण आलेलं माहितीये न? आशिकी-२ मधली आरोही आलेली! माझ्या एका फ्रेंड कडे तर बिपाशा बसू आलेली! त्याच्या फ्रेंड कडे आलिया भट आलेली! मागच्या वर्षी तर सनी लिओन आलेली!" च्यायला यांना सनी लिओन कशी काय माहिती? असे विचार करून उगाच आश्चर्य वाटून घ्यायचा प्रयत्न केला. पण नाहीच झालं बुआ आश्चर्य! त्यांचे पुढे सुरूच होते, "गणेश चतुर्थीला काय? फक्त गाणीच असतात. येत कोणीच नाही! कसलं bore!" आता ही असली genuine चर्चा ऐकून मी उगाच मध्ये बोललो. "अरे, गोकुळाष्टमीला कृष्ण येतो आणि गणेश चतुर्थीला गणपती येतो! हे नाही का माहिती तुम्हाला?"

"वेडेच आहात काका. आई म्हणते. देव कायम आपल्या बरोबरच असतो!"

आधुनिकता आणि निरागसता याचा हा अनोखा मिलाप बघून मला पुढचं सुचेना. मी आपल्या दुर्वा घ्यायला निघून गेलो. नेहमीच आपल्या बरोबर असलेल्या देवाला वाहायला की खास आजच्या मुहूर्तावर भेटायला आलेल्या पिंकी किंवा चमेलीला वाहायला हे मात्र मला माहिती नव्हते.

पुढचे दहा दिवस आता गणपतीच्या मूर्तीसमोर चित्र विचित्र नाच बघायला मिळतील. जेवढी म्हणून अश्लील गाणी असतील, ती सगळी वाजतील. रस्त्यावर वाहतूक अडकून बसेल कारण गणपतीला बसायला जागा करून दिलेली असेल. ऑफिस ते घर आणि घर ते ऑफिस जाताना, हे सगळं सहन करत जावे लागेल. आणि असल्या कशाहीमुळे आपल्या धार्मिक भावना दुखावणार नाहीत. कारण धार्मिक भावना दुखवायचे मुद्दे वेगळेच असतात. किंबहुना, यापैकी कशाच्याही विरुद्ध बोलला, तर मात्र खूप लीकांच्या खूप काही भावना दुखावतील!

मला तर खात्री आहे गणपती दर वर्षी परत गेला की जाऊन, टिळकांना १० चाबूक मारत असेल. "ये तुने क्या कर दिया यार!" असे म्हणून!

पण हे सगळे आपलेच दात. आपलेच ओठ. आपणच वाढवलेल्या गोष्टी. आपणच दुर्लक्ष केलेल्या घटना. मग त्या आपणच सुधारावल्या पाहिजेत की.

माझ्या ओळखीचे एक आजोबा म्हणतात, "तुम्हा आजच्या पिढीला सगळ्यात काही न काही खुपत असतं! आणि मग आता तुम्ही याचा कीस पाडत बसणार. शेवटी फार फार तर मेणबत्त्या पेटवाल. त्या उपर काय कराल? एखादी गोष्टी चूक आहे म्हणून ओरडत फिरू नये. एखादी गोष्टी चूक आहे, तर बरोबर काय? ते शोधून काढावे. आणि त्याचा प्रचार करावा! हे थोडीच माहितीये तुम्हाला? चुका हुडकायच्या आणि फेसबुकवर टाकायच्या. या पलीकडे कुठे काय करता तुम्ही?"

थोडासा बदल आपणही करावाच की! जर काहीच बदल करणार नसू आपण, तर मग उगाच पुढच्या वर्षी लवकर या, असं कशाला म्हणायचं गणपतीला?

पण तो ही बिचारा येतो बापडा! पण कदाचित असं नसेल कशावरून की, गणपतीला अजून आशा असेल, काहीतरी बदल बघण्याची?

आता आपण त्याला किती काळ ताटकळवत ठेवायचं हे आपल्यावर अवलंबून. Perhaps, we all are too busy to do good things!

गणपती बाप्पा मोरया!

Sunday, July 28, 2013

प्रगतीच्या मार्गावर

एकदा काय होतं, आपल्या मधला एक हुशार गरजू होतकरू तरुण रस्ता चुकतो. आणि तो जाऊन पोचतो अशा ठिकाणी जिथे मनुष्य गुहेमध्ये राहत असतो. हुशार तरुणाचे नाव असतं हुसेन शामराव रहेजा. हुशार खूप हुशार असल्यामुळे तो नोकरी करत असतो. विरंगुळ्यासाठी तो सांस बहू वाल्या मालिकांना addict झालेल्यांना नावे ठेवत असतो. घरी येऊन मग तो आपलं वेगळेपण जपण्यासाठी, आपल्या खोलीत जाऊन Big Bang Theory, Mad Men, आणि Gray's Anatomy सारख्या मालिका नियमित बघत असतो. Computer समोर बसला म्हणजे काहीतरी कामच करत असेल असे मानून घरचेपण त्याला हुशार हुशार म्हणत असतात. एके दिवशी तो ऑफिसमध्ये खरेखुरे काम करतो आणि मग थकून जातो. बिचारा मग पडल्या पडल्या लगेचच झोपतो. हुशार सकाळी पक्ष्यांचा किलबिलाटाने दचकतो. पक्ष्यांचे आवाज हुशार ने फक्त Age of Empires आणि Dota मधेच ऐकलेले असतात. आपण या अशा ठिकाणी कसे काय आलो हे त्याला काळात नाही. अदल्या दिवशी office चा cab चा driver जरा पिलेला होता असा संशय आला होता. इतकंच त्याला आठवत असतं. सकाळी सकाळी या गुहेच्या दारात आपण कसे काय उठलो याचं कोडं काही त्याला उलगडत नाही! आता ऑफिसमध्ये जाऊन HR कडे तक्रार करायची आणि मगच त्या ड्रायवरला धडा मिळेल, असं ठरवतो आणि त्याला जरा बरं वाटतं. हुशार तसा लहानपणापासूनच समाज सुधारक वृत्तीचा असतो. लहानपणी तो शाळेतल्या शिपायाची तक्रार करत असतो.

थोडा वेळ इकडे तिकडे भटकल्यावर हुशारला आपण onsite आल्या सारखं वाटू लागतं. पडेल ते काम करायचं आणि adjust व्हायचं त्याला शाळा कॉलेजपासून ट्रेनिंग मिळालं असल्यानं त्याला आपण onsite जाण्याच्या अगदीच लायक आहोत असं खूप आधीपासूनच वाटत असतं. Onsite जाऊन camera विकत घेण्याचं त्याचं स्वप्न असतं. Long Term Onsite असणार असेल तर Macbook घ्यायचं पण स्वप्न असतं. हुशार लगेच उठतो. आणि आजूबाजूला भटकायला निघतो. गुहेमध्ये ४-५ लोक कमरेला झावळ्या नेसून न्याहारी करत असतात. पण हुशार शाकाहारी असल्याने तो त्यांच्याकडे जात नाही. स्वतःच्या बलबुत्यावर गोष्टी शोधून काढाव्यात असं ठरवून हुशार चालायला लागतो. एवढी सगळी झाडं एकाच ठिकाणी बघून सुरुवातीला हुशार जरा बावचळून जातो. मधेच झाडावरून काहीतरी डोक्यावर पडल्यानं तो वैतागतो. "कुंड्यांमधलीच झाडं rocks" असं फेसबूकवर टाकायची इच्छा होते. पण त्यानं रोमिंग सुरु केलं नसल्याने त्याला काहीच करता येत नाही. थोडं फार भटकल्यावर त्याला कळतं की आजूबाजूच्या लोकांना खूप मुलभूत गोष्टीच माहिती नसतात! तब्बल ५ मिनिटं चालतो नी थकतो. ऑफिसच्या एका फ्लोरच्या एका टोकाहून दुसऱ्या टोकाकडे चालायला हुशारला ५ मिनिटं लागत असतात. त्यानंतर कॉफी घेतली नाही तर तो पुढचे चालू शकत नसतो. इथे कुठेच कॉफी मिळायची शक्यता नसते. त्याला आजूबाजूला गुहाच गुहा दिसत असतात. एकही थेटर, कॉफी शॉप, किवा काहीच लागत नाही. हुशार परत मुळच्या गुहेपाशी येतो. आतमधल्या लोकांची न्याहारी झालेली असते. त्यातला एक तरुण बाहेर येतो. आणि हुशारला बघून विचारतो. "काही शोधताय का?"

Onsite असल्यानं हुशार त्याला इंग्रजीमध्ये विचारतो. "Who are you?"
तो म्हणतो, "मी पुराना"
"पुराना मतलब क्या?" Onsite असल्यानं हुशार आता आपल्या मराठी विचारांचं हिंदीमध्ये भाषांतर करून विचारतो.
"पुराना म्हणजे पुरुषोत्तम रामदेव नामधारी."
"तुझ्या कंपनीचं नाव काय?" हुशार शेवटी नाईलाजाने मराठीवर येतोच. जगातला प्रत्येक माणूस कुठल्याना कुठल्या तरी कंपनी मध्ये काम करतच असतो अशी हुशारची खूप गाढ समजूत असते. पुराना कुठल्याच कंपनीमध्ये काम करत नसतो. तो सकाळी उठून शिकारीसाठी बाहेर पडत असतो. त्याच्या कळपातल्या सगळ्यांबरोबर तो भटकत असतो. कळपातल्या सगळ्यांचेच नाव पुराना असतं. यांना काहीतरी वेगवेगळी usernames द्यावी लागतील हे हुशार मनाशीच लिहून ठेवतो. हे सगळे पुराने जे काही मिळेल ते सगळे एकत्र बसून खात असतात. उन पाउस वारा यापासून बचावासाठी निरनिराळी निवाऱ्याची साधनं बांधत असतात. कायम एकत्र राहत असतात. हे सगळं बघून हुशार मधला Entrepreneur जागा होतो. (Entrepreneur म्हणजे काय हे माहिती नसेल तर तुम्ही English Vinglish पहिलाच नाही राव!). तसा हुशार नोकरदार माणूस. त्याला हे असलं शोभत नाही हे हुशार ला माहिती असतं. पण आपल्याला आयुष्यात मोठं व्हायची हीच संधी आहे असे मानून तो विचार करायला लागतो.

आपण खूपच आदिमानवाच्या वस्तीमध्ये आलो आहोत हे त्याला कळलेले असतं. त्यांच्यामानानं आपण खूपच प्रगत. म्हणजे या सगळ्या पुरान्यानी न ऐकलेल्या किंवा न बघितलेल्या गोष्टी आपण यांना सांगू शकतो. आणि म्हणजे आपण देव बनून जाऊ यांच्यासाठी! देव नाही तरी कमीत कमी टाटा, बिर्ला किवा अंबानी यांच्या लेवलचे होऊच की, या विचारानं हुशार खूप खुश होतो. हुशारच बॉस त्याला कायम म्हणत असतो, You got to be at the right place at the right time, हुशारला त्याचा अर्थ आत्ता प्रथम कळालेला असतो. हुशारच्या मनामध्ये त्याने एक मोठं बिझनेस साम्राज्य उभं केलेलं असतं. त्याला "हुशार and sons" असं नाव पण लागलेलं असतं. आता परत जाऊन HR कडे resignation द्यायचं नी मग farewell ला काय स्पीच द्यायचं याच्या विचारामध्ये मग्न असतानाच पुराना त्याला विचारतो.

इतक्यात पुराना विचारतो, "तू काही खात नाहीस?"
"इथं सबवे नाहीये न. म्हणून नाही खाल्लं. onsite गेलोकी सुरुवातीच्या दिवसात फक्त सबवे मधेच खावं असं मला एकानं सांगितलेलं."
"तुला फळं, भाज्या, खायच्या असतील तर आपल्याकडे खूप आहेत. मगाशी एक ससा पण मारून आणलाय मी."
"नाही नाही! आमच्याकडे non-veg वगैरे खायचं असेल तर आम्ही फक्त अशाच ठिकाणी जातो जिथे ज्या प्राण्याला खायचं त्या प्राण्याचे खूप आनंदित वालं चित्र बाहेर लावलेलं असतं. जरा कमी गिल्ट येते त्यामुळं. पण तसंही मी आता शाकाहारी आहे. म्हणून सब वे."
"सब वे मध्ये काय असतं?"
"सांगेन. लवकरच सांगेन. पण सध्या माझा विचार वेगळाच आहे. तुम्हाला सगळ्यांना मी आता एकदम खूप सुधारावणार आहे. You are lucky to have me here! मी खुप प्रगत समाजातून आलोय. आता मी तुमचा समाजसुधारक होणार."
"आम्ही शिकार करू शकतो. हत्यार बनवू शकतो. स्वतःचे रक्षण करू शकतो. आम्ही खूप प्रगत जमात आहोत. आम्हाला आणखी काही सुधारावण्याची गरज नाही."
"अरे येड्या, आम्ही पण असेच म्हणतो आमच्याकडे. पण तुम्ही आमच्या लेवलला नाही आलेला अजून. आणि मी तुम्हाला मदत करेन." कस्टमरला मापात काढायचं ज्ञान हुशारला त्याच्या बॉस ने दिलेलं असतं. हुशार Dilbert वाचून त्यातूनही बोध घेत असतो. त्यामुळं पुरणाला मापात काढण्यात हुशारला काहीच गैर वाटत नाही.

"तुम्हाला मी प्रगत जमातीमध्ये गोष्टी कशा होतात ते सांगेन. मग तुमची पण प्रगती होईल."
"पण मला नकोये प्रगती. मी प्रगतच आहे."
 "पहिला धडा. आपल्याला नको असं काही नसतं. खास करून जर फुकट मिळत असलं तर नक्कीच ते आपल्याला हवं असतं. प्रगत समाजात असाच होतं. आधी आनंदी लोक शोधायचे. त्यांना सांगायचं की ते आनंदी नाहीयेत. कारण काहीही द्यायचं तुमच्याकडे हातरुमाल नाहीये किवा तुमच्या भिंतीचा रंग नीला नाहीये किवा तुम्ही सिनेमा वाल्या नायिका वापरते तो साबण वापरत नाहीये. असले काहीही कारण देऊन त्यांना सांगायचे की ते आनंदी नाहीयेत. मग त्यांना त्या त्या गोष्टी द्यायच्या. मग ते सगळे आनंदी होतात. हीच प्रगती. प्रगत झालास तर सही आयुष्य जगशील."
"मी आत्तापण सही आयुष्य जगतोय." पुराना आपला मुद्दा सोडताच नसतो.
"हे बघ. एक काम कर. प्रोजेक्ट प्लान बनवून आण आधी. मग बोलू आपण." हुशार ला आपल्या बॉसची खूप आठवण होत असते म्हणून तो नकळत तो बॉस सारखं असंबद्ध बोलायला लागलेला असतो.

पुरानाला कशाचा प्रोजेक्ट प्लान आणि काय याचा काहीही थांग पत्ता लागत नाही. तो तसाच त्याच्या गुहेमध्ये जातो. थोड्या वेळाने आणखी काही लोकांना घेऊन येतो. त्यांना सांगतो, "तुम्हाला म्हणालेलो न, भूतदया करावी. आता इकडे या. याच्याकडे बघा. नाही का तुम्हाला दया येत? मुके प्राणी पण असेच निरागस असतात. त्यांना सगळ्यांनाच लगेच मारायचे नसते. या इकडे. बसा याच्या समोर. तुम्हाला पण दया येईल. भूतदया शिकाल तुम्ही." पुरानाच्या असल्या पुरोगामी विचारामुळे लोक त्याचे विशेष ऐकत नसत. पण दुपारच्या जेवणानंतर करमणूक म्हणून ते बाहेर येऊन हुशारच्या समोर बसतात.

"अरे तुला प्रोजेक्ट प्लान आणायला सांगितलेला. तू प्रोजेक्ट टीम आणलास? Requirement च्या आधी recruitment? हे कसं कळलं तुला? तुला आणखी पण कोणी शिकवताय का?" आपण बिझनेस सुरु करण्याच्या आधीच आपल्याला competition आली की काय, या विचारानं हुशार थोडा वेळ घाबरतो. पण मग समोरचे कुतुहूल पूर्ण चेहरे बघून आपणच इथे शहाणे असे वाटून त्याला स्फुरण चढते. त्याच्या चेहऱ्यावरचे हे सगळे बदल बघून पुरानाच्या लोकांना हा माणूस खरच आता करमणूक करणार यावर विश्वास बसतो.

"हे बघा, तुम्हाला मी आता जे सांगणारे ते लक्ष देऊन ऐका."
लोक टाळ्या वाजवतात. पानात, झाडत सळसळ होते. पण हुशार ला एव्हाना असल्याची सवय झाली असल्याने, तो घाबरत नाही. पुढे सांगतो.
"आपण पैसा नावाचा प्रकार शोधून काढायचा. प्रगतीला गती मिळवण्यासाठी पैसा हवाच. मी बघतोय कधीपासून तुमच्याकडे पैसा वगैरे प्रकार नाहीचे. आपण तिथून सुरुवात करू. म्हणजे तुमच्या सगळ्यांच्या आयुष्याला काहीतरी ध्येय प्राप्त होईल."
"कसलं ध्येय?"
"Good Question!" हुशारला परत आपल्या बॉस ची आठवण येते. तोही हुशार ला असच म्हणून एक बिस्कीट देत असतो. हुशारने आपल्या ड्रोवर मध्ये ती सगळी बिस्कीट मांडून ठेवलेली असतात. हुशार आत्तापण हात आजूबाजूला करतो बिस्कीट शोधण्यासाठी, पण हातात माती येते. हुशारला मातीची सवय नसल्याने तो हात झटकतो नी पुढे बोलू लागतो. "ध्येय कसले? हा आमच्या प्रगत जमान्यात पण प्रश्न पडतो लोकांना" हुशार ला थोडा वेळ आपले annual appraisal आठवते. पण तो तसाच पुढे बोलतो "ध्येय पैशाचे. आपण पैसा नावाचा प्रकार बनवायचा. आणि मग तो पैसा कमवायचे ध्येय ठेवायचे. म्हणजे तुम्ही सगळे सुखी होणार. तुमची प्रगती होणार."
समोरच्या लोकांना हे खूपच गमतीशीर वाटते. तरीही न राहवून त्यातला एक विचारतो.
"पैसा आपण बनवायचा. मग परत कमवायचा कशाला?"
"Again good question. आता हे शिकवणारे मी तुम्हाला. पण हळू हळू. तुम्ही खरच लकी आहात. की तुम्हाला मी मिळालोय.!"
गर्दीमधला एक जण पुरानाकडे खुण करून सांगतो की त्याला आत्ताच दया आलीये. बाकीचे लोक आता परत करमणूक होणार म्हणून उत्साहित होतात.
"आपण न मुठभर पैसे कमवायचे. आणि मग आपल्या गरजेच्या सगळ्या गोष्टीला पैसे देत बसायचे. म्हणजे खायचे पैसे. प्यायचे पैसे. हसायचे पैसे. रडायचे पैसे. लिहायचे पैसे. वाचायचे पैसे. राहायचे पैसे. शिकायचे पैसे. शिकवायचे पैसे. काही हवे असेल तर त्याचे पैसे. काही नको असेल तर त्याचे पैसे. असे अखंड पैसे देत घेत बसायचे."
गर्दीमधून पुरानाने एक शंका विचारली. "म्हणजे पैसे तयार करायचे नी वाटत बसायचे. मग शिकार कधी करायची?"
"बरोबर. तुमच्याकडे काही सध्या organized नाहीये. सगळ्यांना सगळे मिळते. ते बरोबर नाही. पैसे आले की मग प्रत्येकाची ऐपत ठरवायची. मग ज्याच्याकडे जास्ती पैसे त्याला जास्ती गोष्टी. ज्याच्याकडे कमी पैसे त्याला कमी गोष्टी. पण सगळ्यांनी अखंड पैसेच मिळवायचे. आणि मग ऐपत वाढवायची."
"अरे हुशार, मग हे सोपे नाही का? आपण सगळे जायचे. शिकार करायची. नी गुहेत येऊन खायचे?" 
हुशारला जरा प्रश्न समजायला वेळ लागतो. त्याला "हुशार and sons" च भवितव्य धोक्यात दिसायला लागतो.
"पैसा बनवायचा. मग कमवायचा. मग तुम्हाला हसत खेळत राहता येईल. हे असच असतं आमच्याकडे"

हुशारचे विचार पुराना लोकांसाठी खूपच करमणुकीचा विषय बनतात. त्यांच्या दररोज दुपारी गप्पा रंगू लागतात. झाडाखाली बसून हुशार त्यांना वेगवेगळ्या "प्रगत" गोष्टी सांगत असतो आणि झाडावर बसून बाकी सगळे त्याच्या गोष्टी ऐकत असतात. 

(क्रमशः)

Tuesday, July 16, 2013

मिल्खा मिल्खा भागलास का?

काहीही दाखवतात आज काल सिनेमा मध्ये. भाग मिल्खा भाग बनवण्याच्या आधी राकेश मेहरा स्वतः खूप भागला असावा! नाहीतर काही pointच नाहीये असलं काहीतरी बनवण्यात. आपल्याला सिनेमाचं वेगळं लॉजिक माहितीये. जे काही आपण नेहमी जगतोच तेच परत सिनेमामध्ये काय दाखवायचं म्हणून तिथे fiction बनवायचं. आणि आपल्यालाही आवडतच की ते! आणि मग ते आवडतं म्हणून आपण त्याच्यासारखं करायचा अखंड प्रयत्न करायचा. मी तर दबंग सारखे पाठीला चष्मे लावून फिरण्याचे प्रकार पण पाहिलेत. गाण्यात कोणी ओरडला की "जो भी मै केहना चाहु, बरबाद करे अल्फाज मेरे" की इकडे तमाम जनतेचे पण अल्फाज लगेच त्यांना बरबाद करायला लागतात! खोटं का सांगू? मी पाहिलंय हे माझ्या डोळ्यानं. या इथंच की. फेसबुकवर! म्हणजे आजू बाजूला जे नाही ते सिनेमामध्ये दाखवायचं आणि मग जे सिनेमामध्ये आहे ते आजू बाजूला उभं करायचं! अशी काहीशी आपली मजा सुरु असते!

या सगळ्यात भाग मिल्खा पहिला आणि एकदम धक्काच बसला! तसे पुर्वीपण धक्के बसलेले असे. एकदाची भडास काढतोच म्हणून आज लिहितोच!

१. नायक चक्क मेहनत घेताना दाखवलाय! असं कोणी करतं का? म्हणे मेहनत करायची. काबाड कष्ट करायचे. मग यश मिळणार! आपला आकाश कसा होता? टपोरीगीरी करायचा. मग शेवटी त्यालाच मिळते की नाही प्रीती झिंटा? उगाच कबिल बीबील काय व्हायचं? नायक म्हणाला कि कबिल झालाच की! नायिका पळवणे हे एकमेव गोल. प्यार प्यार करून थेऱ्या झाडायच्या. उसके लिये जगायचं असतं उसके लिये मरायचं असत! कष्ट बिष्ट काय! तेही नायिकेसाठी नाहीच म्हणे!!

२. नायिका म्हणते कुछ करके दिखाव. मग ये. आणि नायक मान्य करतो नि जातो कि खरच कूछ करायला! मला वाटलेलं एक गाणं म्हणेल नी मग सगळं sorted! अशीच असते कि पद्धत आपल्याकडे! नाही काय?

३. नायिका आता गेली. लग्न बिग्न केलं तिने हे कळल्यावर तर आपण लगेच तडक तिच्या घरी बिरी पोचतो. तिच्या नवऱ्याला धाब्यावर बसवून दुल्हनिया पळवून आणतो. हय गय नाय! कारण आपणच हिरो असतो न! पण इथे हा नायक बिचारा बर म्हणून आपल्या मूळ कामाला लागतो!!! कमीत कमी bomb defuse करणारा तरी व्हायचा न मग? तेही नाही. म्हणजे इतिहासावरून काही बोध घ्यायचाच नाही असं ठरवलं तर मग कोण काय करणार!

४. एकदा तर चिकणी पोरगी येते जवळ. तेही स्विमिंग पूल मध्ये. आणि हा म्हणतो "बाई, नंतर या!" ये लो करलो बात!! ऐसा भी कभी होता है?

५. सिनेमाभर नायक बिचारा इकडे तिकडे पळत असतो. आता नावात "भाग" आहे मान्य आहे! पण इतके कधी ते मनावर घेत का कोणी ते? हा चक्क athelete असतो. आणि सिनेमाभर athelete गिरी करत राहतो!! व्यायाम करतो. सराव करतो. काहीच्या काही! आपल्याला कुठे सवय असली? आम्ही शाळा college वरचे सिनेमे बघतो की ज्यात शाळा college केवळ २-४ मिनिट असतात! हे म्हणजे भलतच होतं!

६. आत्ता हे सगळं बघून काहीही परिणाम झालेत मनावर! कष्टेवीण फळ नाही असलं मनावर बिंबवल यांनी! मला वाटायचं exotic ठिकाणी ट्रीप केल्या. गाणी ऐकली म्हणाली आणि परत कामावर आलं की आपण एकदम स्टार होणार. म्हणजे गेले १०-१२ वर्षं तर मला असाच वाटतंय. आणि प्रयत्नही सुरु आहे. पण यांनी तर भलतच सांगितलंय. आता चक्क सकाळी सकाळी उठून मी कामावर येतो! या सिनेमाला कमीत कमी पेरेंटल गायडन्स तरी लेबल लावायचं न आधी! म्हणजे मनाची तयारी करून गेलो असतो!

७. हा माणूस चक्क एक गोल सेट करतो. आणि ते मिळवतो! हा म्हणजे अतिरेक होता! ते गोल कायम डोळ्यासमोर ठेवतो! असं नसतं यार करायचं. आम्ही तर अप्रेजल मध्ये गोल सेटिंग पण करायला कंटाळतो. मारत मरत करतो. आणि मग डायरेक्ट वर्षाअखेरीस त्याच्याकडे बघतो. असच तर करायचं असतं! असं दररोज दररोज कोण बघत बसेल त्याच्याकडे? लोक काय म्हणतील? तसंही अशा गोष्टी समोर ठळकपणे दाखवायच्या थोडीच असतात? म्हणजे तमाम जनतेला जाहीरपणे वेडावून दाखवण्यासारखे आहे हे! सेन्सर बोर्ड झोपलाय हेच खरंय.

८. मागे रांझाणा पाहिला नी कलेजेमे ठंडक पोचली. तडक जिममध्ये जावून सांगणार होतो. Body shody वगैरे काय बनवायची? धनुषकडे बघा! लवकरच सांगायचा प्लान होता. आणि आता मिल्खा बघितला! जरा टायमिंग चुकलच! आता सिनेमा आहे. आम्हाला कल्पना आहे की समोरचा जो आहे तो खरोखर मिल्खा नाहीये! तुम्ही अगदीच धनुषला वगैरे नाही आणणार काम करायला इतके माहिती आहे. पण इथे या माणसाने स्वतः कशाला मेहनत घेऊन मिल्खा व्हायचं? म्हणजे बघणाऱ्यांची पर्वाच नाही! झक मारत आज परत जिमला जावे लागणार!

आता काय. धावतो आहे. मिलाखा ने सांगितलंय. जरा दम लागला म्हणून म्हणून थांबायची पण सोय नाही! त्यांनी ते पण कवर केलय! बस भाग! एक गोल ठरव. आणि मग त्याकडं भाग! उगाच नाही ते लाड नाही करायचे! सिनेमांनी inspire करायचं थांबवलं पाहिजे यार! ये सब गया तेल लेने. आपण सिनेमा मोठा आहे म्हणून निषेध करू. असले आणि चार पाच सिनेमे आले तर हाहाकारच व्हायचा!


ता.क. पडद्यावर साक्षात नेहरू आले. नी त्यांची कोणी चेष्टा केली नाही! कमीत कमी government हा तरी आपल्या जिव्हाळ्याचा विषय! कोणावरही काहीही सबंध नसताना चेष्टा करायचं लायसन्स असतं की आपल्याकडं! नेहरूंच्या बद्दल आपला काही आक्षेप नाही. पण दिसला politics की घाल शिव्या अशीच की आपली पद्धत! कर चेष्टा! ते पण नाही यार या सिनेमामध्ये!

Thursday, June 20, 2013

The other side of an Umbrella

च्यायला भर पावसाळ्यात मुंबईला फेऱ्या मारायला लागणं या सारखी शिक्षा दुसरी नाही. सलग ३ आठवडे तिथे राहायचे. दिवसभर मिटिंग करायच्या. रात्री खोलीवर येऊन ऑफिस मध्ये फोन लाऊन बसायचे. सगळं झालं की बाहेर फिरून येऊ वाटलं की पाऊस दत्त म्हणून उभा. एक नाही ... दोन नाही ... आठवडाभर असच व्हावं? पाऊस वगैरे गोष्टी आवडतात मला पण त्याने अशा टाईट शेड्यूल मध्ये येऊ नये. म्हणजे रात्री विचार केला की चला घाला कशी, जाऊन भिजून येऊ आता तर तेही वांदे! कपडे थोडीच आणले होते इतके सारे! वर पुरवून वापर सुरु होता. हॉटेलमध्ये इस्त्री बिस्त्रीला थोडीच टाकतो आपण काही! सगळा गठ्ठा घरी आणून धुवायचा असतो! गप्प खिडकीतून पाऊस बघत आपण काय पाप केलं असावं याचा हिशोब लावत डोळे मिटायचे!

पहिला आठवडा असच गेला. विकेंडला फुकट फिरणे झाले. दुसरा आठवडा गेला तेव्हा जाम बोर झाले. जेलमध्ये बंद केल्यासारख वाटत होतं. दररोज काय अरे रात्री पाऊस? नोकरदार माणसाने बाहेर तरी कधी पडायचं? सोमवारी असच परत येताना चक्क खोलीवर पोहोचायच्या आधीच पाऊस आला!! अभी ये तो सोचाही नाही था! पाऊस काय रात्रीच येणार हेच नेहमीचे गृहीतक होते. पाऊस तर सुटला होता बेभान. मंगळवारी सकाळी पण आला. होटेलवाल्याचे छत्री उसनी घेतली. रिसेप्शनच्या काचेच्या दरवाज्यापासून ते गेटपर्यंत जाण्यासाठी जी मोठी छत्री असते. तीच छत्री घेऊन मी डायरेक्ट बाहेरच पडलो. आता हीच श्रींची इच्छा होती हेही मी सिद्ध करू शकतो. अगदीच. नेमक्या त्याच छत्रीवर हॉटेलचे नाव छापलेले निघून गेलेले का असावे? हे दैवी संकेत मी लहानपणापासूनच लगेच ओळखतो. स्वतःच्या या सगळ्या कौतुकामध्ये असताना एक मुलगी दिसली. चक्क तिला छत्रीची फिकीर नव्हती. भिजत चालली होती. एकदा वाटले की भिजू की नको, भिजू की नको असा प्रकार सुरुये तिचा. पण जे काही सुरु होतं ते entertaining सुरु होतं. पावसाने पांचट केलेल्या त्या ट्रीपमध्ये अचानक पाणी दा रंग देख के गाणं वाजल्यासाराख झालं.

इतके दिवस कशी काय दिसली नाही ही पोरगी? की तीही आपल्यासारखीच आली असेल २-३ आठवड्यासाठी? आई शप्पथ! ही जर आपल्याच होटेलमध्ये राहत असेल तर? मग आणखी ३ आठवडे ट्रीप लांबली तरी चालेल! पण ती माझ्या होटेल मधली नव्हती. इतक नशीब चांगलं असतं तर मुळात पावसाने इतका त्रास दिलाच नसता. पण डेप्युटेशन वरच आली असणार. नाहीतर आजवर दिसली असतीच की. आई शप्पथ! म्हणजे आज मीटिंगमध्ये पोचलो की समोर हीच दिसायची. मग दररोज आपण धाप्लेल्या छात्रीमधून एकत्र यायचे! ऑफिस आलं. ती काही नाही आली. परत जाताना पाऊस आला. हॉटेलमध्ये पोचल्यावर गार्डपण आला. म्हणजे गार्ड छत्री बघायला आला. पण हॉटेलचं नाव नाहीये बघून ओशाळला. Sorry sir म्हणून निघून गेला. पण च्यायला ती काही आली नाही. फोन आवरले. बाहेर पडायचा स्कोप नव्हताच. कारण दत्त दारात उभा होता. उभा काय कोसळत होता. काय नशीब आहे यार आपल? हे असलंच आयुष्य काढायचंय. सिनेमामध्ये काहीही दाखवतात यार. म्हणजे आत्तापर्यंत आम्ही स्वित्झर्लंड मध्ये गाणे गायला हवे होतो! तर इथे तर ही मुलगी न माझ्या होटेलची. न कुठली! गाणं तर सोडूनच देऊ! सिनेमे सगळे बंद केले पाहिजेत यावर कधीतरी काहीतरी रोख ठोक लिहून आपण क्रांती करू अशा विचारात डोळे मिटले.

पुढच्या दिवशी ती परत दिसली. परत एकदा आईची शप्पथ घेऊन झाली. ही पोरगी इथल्याच कुठल्यातरी हॉटेलमध्ये असावी याचीही खात्री झाली! म्हणजे कालच्या दिवशी पण खूप साऱ्या खात्र्या झालेल्या. पण आजची जास्ती फ्रेश खात्री होती. तिच्या मागे मागे गेलो. छत्री हवी का असे विचारणार तोवर ती आणि एका बाईच्या छात्रीमध्ये घुसली. रंगीलाच्या आमिर खान सारखी पिवळी साडी नेसलेली तिनं. साला लंगुर के मुह मे अंगूर! मैत्रीणीच असतील. गप्पा मारत मारत निवांत चालत होत्या दोघी. नी मागून मी. शेवटी bus stop आला. पिवळा आमीर खान निघून गेला. आणि ही मुलगी बस मध्ये शिरली. माझा डीटूर झाला होता. मुलीच्या नादात मिटींगची पहिली २० मिनिटे चुकणार होती. पण पावसावर ढकलून मी माझी सही सलामत सुटका करून घेतली.

आता ही मुलगी मला दररोज दिसायला लागली. काह्तीअरी गडबड होती. ही आधी का दिसली नाही देव जाणे. पण ही हॉटेलमध्ये राहत नाही याची खात्री झालेली. ही एकदम पक्की खात्री होती. तिथेच आसपास राहणारी असावी ही. दररोज कोणीतरी विचित्र बाई हुदाकायची नी तिच्या छात्रीमध्ये शिरायची! सायको वगैरे असावी असंही वाटलं एकदा. पण सुंदर मुली सायको नसतात. त्यामुळे ती शक्यता लगेच cancel करून टाकली. एकदा संध्याकाळी घरी येताना भेटवी अशी खूप इच्छा होती. म्हणजे कुठे राहते वगैरे सगळाच ट्रेस लागला असता. पण सगळं असं मनासारखं झालं असतं तर मग कशाला? आपल्यालाला काहीही हवं असलं उत्कट की फक्त एकाच गोष्ट मिळत होती. ती म्हणजे धो धो पाऊस. पूर्वी असेच थकून भागून सगळे कवी लोक शेवटी पावसालाच सगळ्याची उपमा देत असावेत. पावसावरच्या सगळ्या romantic कवितांमध्ये मला अचानक मला हा समस्त कवींचा sadness दिसू लागला. कालिदास पण असच माझ्यासारखा ऑफिसला जाऊन जाऊन पाकला असावा. रात्री फिरायला मिळत नसेल पावसामुळे मग सगळे मनातले मांडे असावेत त्याचे. समोर पाऊस दिसतोय म्हणून पावसात सजवले असावेत मांडे! त्याला थोडीच साहित्य वगैरे माहिती असणारे. आपण काढली असणारेत साहित्यिक मूल्य त्यातून! त्या बिचाऱ्याला माझ्यासारखं sad डेप्युटेशन वर पाठवलं असणारे. आता कालिदासानं खरच पावसावर कविता केल्या होत्या की आपल्याला कवी म्हणाला की फक्त कालिदासच आठवतो? या सगळ्या गोंधळात ती चक्क परत दिसली. ही चर्चगेटवर काय करतेय? आई शप्पथ! ही पण याच इमारतीमध्ये येते की काय? काय हे दुर्दैव!! लगेच वीज कडाडली. हा हा हा हा करून गडगडत झाला. मला खात्री पटली की ही पोरगी याच इमारतीमध्ये येते. आणि मी मागचे इतके दिवस झाक मारत होतो. याला काहीच अर्थ नव्हता. आजही थोडावेळ बाहेर आलो नसतो तर हे ही कळले नसते!

पण ही पावसात बाहेर काय करतेय? कदाचित नसेल या इमारतीमाधली. नाहीतरी पावसात बाहेर काय करत असती? आता परत नवी खात्री झाली की या इमारतीमाधली नसावी. पण आपण इतके दिवस झाक मारत होतो हे नक्की होते. ही दररोज येत असावी इथे. आपण येड्यागत आत खुर्च्या गरम करत असायचो! आज भेटूच. तशी आठवडाभर ओळख आहेच की. लांबून का होईना. पण तिनेही कधीतरी बघितले असेलच की. आज एक चांगली गोष्ट अशी होती की आज पाठलाग करायचा नव्हता. ती साक्षात समोर होती. आणि आमच्या मध्ये कोणतीही आगाऊ बाई नव्हती की जिच्या छात्रीमध्ये शिरून ही अंतर्धान पावेल! आता मी हा असा समोर गेलो की ती हसेल माझ्याकडे बघून. मीही हसेन. नी मग छत्री मोठी आहेच आपली. तिला bus stop पर्यंत आपणही सोडूच की. मग परत ऑफिस आहेच की. नवे मित्र मैत्रिणी केलेच पाहिजेत. शाळा कॉलेज संपल्यावर कुठे काय नवे मित्र करतो आपण. आज ही संधी आलीये. दैवी संकेत आहे. जनसंपर्क वाढवलाच पाहिजे. वेगवेगळया गावात डेप्युटेशनला यासाठीच पाठवतात. असे म्हणत म्हणत. माझी चाल मंदावलेली. पण ही पोरगी कधी बाजूने येऊन निघून गेली कळलेच नाही.

I can't believe this. ती बाजूने निघून गेली नी मी प्लान करत होतो? Occupational Hazards!!! या ऑफिस नी ऑफिस च्या कामाने आयुष्य उध्वस्त केलेय माझे. हे काही नाही. स्त्रीदाक्षिण्य वगैरे काही आहे की नाही. मी जातो तडक. नी विचारतो. आजारी पडेल बिचारी. बस. Stop it! I don't need reasons. I am just asking. That's it.

"Excuse me!" तिने वळून बघितलं. "Should I drop you till the bus stop?" च्यायला घातली का कशी!! म्हणजे तिला कळणार आता की मी दररोज तिला follow करायचो! नाहीतर मला काय माहिती ही bus stop वरच जायची ते!? चला sorry म्हणू नी पळून जाऊ. हे आपल्या बस की बात नाहीये. सुंदर मुली झेपत नाहीत सहसा. मिटींग अर्धवट राहिलीये. दुसरीच कोणीतरी वाटलीस म्हणू आणि निघू!

"ठीके!" ती किंचित हसून म्हणाली.

खल्लास!! परत आईची शप्पथ घेतली एक. तसे कोणाला follow थोडीच केलेले आपण! आपला रस्ता एक होता त्याला मी काय करणार? दैवी संकेत होता तो. मी पकडला. तिने उशिरा पकडला असेल. पण मदतच तर करत होतो.

पोरगी तर महा बिलंदर निघाली. जरा वेळाने म्हणाली की bus stop वगैरे नाकोचे तिला. अशीच फिरत होती! ऑफिस अर्धवट सोडून मी चक्क चालत होतो तिच्याबरोबर. ऑफिसचं मंगळसूत्र कधीच काढून खिशात ठेवलेलं. काहीही असलं तरी ती बोलत मात्र इंटरेस्टिंग होती. मी तसा माझ्याच धुंदीमध्ये होतो. पाणी दा रंग परत वाजत होतं! पावसानं इकडून तिकडून झोडपून काढलं होतं. पण Who cares? छान गप्पा होत होत्या. कॉलेजनंतर प्रथमच इतक्या खुलून कोण अनोळखी व्यक्तीबरोबर बोललो असेन. आता इतका पराक्रम झालाच होता. तर म्हणालो चाल .. मारीन ड्राईव्ह ला जाऊ. तीही बर म्हणाली. इकडे मिटींग धाब्यावर बसवलेली. मधूनच मी कुठे कसा गायब झालो? का गायब झालो? याची उत्तरं तयार करत होतो मनात. पण ही मुलगी वेळच देत नव्हती. कोणी सलग इतका वेळ कसे काय इंटरेस्टिंग राहू शकतं? I hope she was also thinking the same! थोड्यावेळात उन्ह पडलं चकक. ऑफिसमध्ये डीच मारल्याचं जरा गिल्ट फिलिंग आलेलं. पाऊस उतरला तसा आपला जोश पण उतरला. That's so not fair! मधेच चर्चा थांबली आमची. च्यायला काय वाटलं असेल तिला. हा का मधेच थांबला म्हणून? ऑफिसमध्ये गेलं पाहिजे यार. हे असले फालतू विचार अधे मध्ये कसे येतात काळात नाही. पण असो. मजा आली. बस पण. जाऊच आता. पाऊस उतरलं. चला. निघतो. वगैरे झालं. एकदम SRK जागा झाला. परत गेलो नी तिला छत्री देऊन आलो. म्हणालो घे. परत पाऊस आला तर! त्या छत्रीवर हॉटेलचं लिहिलेलं नाव निघून गेलेलं हा खरच दैवी संकेत होता याची खात्री झाली परत एकदा.

तिनं विचारलं काय करतोस? आता ऑफिस वगैरे बकवास गोष्टी काय सांगू. म्हणालो युनिवर्सिटीमध्ये आहे. जरा अचानक cool dude वरून हुशार फील आला मलापण. बाकी ती थोडीच छत्री परत करायला येणारे? आपले नशीब असते एवढे तर मग कशाला.

पुढे ऑफिस मध्ये काय झालं यासाठी परत कधीतरी लिहीन.

(Inspired by, https://www.facebook.com/notes/aditi-moghe/oh-umbrella-/542926972425668. अर्थातच, कल्पनाकी उडान)

Wednesday, June 19, 2013

The $ex and city!

काल सॉलिड धमाल झाली. खूप साऱ्या लोकांना खूप साऱ्या प्रकारे भीती वाटली. सकाळी एक बातमी छापून आली. फेसबुकने ती डोक्यावर घेतली. लोक आता सैरभैर होणार असे वाटू लागले पण तेवढ्यात दिवस संपला. बातमीचा lifa span संपला! आता तुम्हाला यावरून कशाचा काहीच क्लू लागत नसेल तर याचा अर्थ तुम्ही फेसबुक वाचत नाही. किंवा तुम्हालाही भीती वाटलेली पण आता लपवताय! फेसबुक न वाचणे म्हणजे ... बरं राहू दे. त्यावर परत कधीतरी. उगाच एका पोस्ट मध्ये इतक्यांदा विषयांतर नको. आपल्याला निवडणूक थोडीच लढवायचीये! (हे एका मित्राने सही सांगितलंय मला. कुठेही संवाद भरकटला की government, politics आणि corruption यावर काहीतरी भाष्य करून सोडून द्यायचा! त्याच्याहून चांगला escape route असूच शकत नाही! संबंध असो व नसो!) असो ... तर मला थोडीच निवडणूक लढवायचीये. आपण मुद्द्यावर येऊ की लोकांनी मुद्दा कसा सोडला!

काल चक्क हायकोर्टाने एक निर्णय दिला. म्हणजे निर्णय दिला ही न्यूज नाहीये. पण जो निर्णय दिला ती न्यूज आहे! मराठीमध्ये मथळा लिहायचा प्रयत्न केला पण जमत नाहीये ... म्हणून अख्खी न्यूजची लिंक देतो.

http://www.thehindu.com/news/national/tamil-nadu/couples-who-have-premarital-sex-to-be-considered-married-says-hc/article4824017.ece

हाहाकार! ही बातमी प्रत्येकापर्यंत वेगवेगळी पोचली असणार. लगेच पूर आले स्टेटस नी कमेंट चे! आणि करमणुकीचे कार्यक्रम सुरु झाले!

लग्न मंडप, कार्यालय, केटरींगवाले या सगळ्यांना तर धक्का बसला असणार! आता लग्नाच्या खर्चाने लोकांना देशोधडीला कसे लावणार? त्यांच्या असोसिएशनने बेकारी भत्ता वगैरेचे नियम वाचायला सुरू केले असावेत. स्पर्धेमुळे आधीच वांदे. आता या निर्णयामुळे तर सगळा डाव बदलला! कोर्टाने चक्क सांगितले की लग्न करण्याचा नी या सगळ्यांचा काहीही संबंध नाहीये!! काही हुशार कार्यालयवाल्यांनी लगेच कार्यालयाचे लॉजिंग बोर्डिंग मध्ये रूपांतर करायला सुरू केले असेल. बाहेर पाट्या लावल्या असतील "Hotel Decent - आमची कोठेही शाखा नाही!" बाजूला सलमान खानचा फोटो पण असेल! (आता सलमान खान "लग्न" या गोष्टीचा brand ambassador का? यावर चर्चा करायची असेल तर तुम्ही खुपच मागासलेले आहात यार!)

याहून जास्ती खळबळ टीवी सिनेमावाल्यांची झाली असावी! लग्नासाठी झगमग हवी. मोठा कार्यक्रम हवा. भरपूर लोक हवेत. हे सगळी गृहितकं आता उधळली गेली. कोर्टाचे जजमेंट असे म्हणतं.

"The court said marriage formalities as per various religious customs such as the tying of a mangalsutra, the exchange of garlands and rings or the registering of a marriage were only to comply with religious customs for the satisfaction of society."

घ्या म्हणजे! एका फटक्यात किस्सा खतम. इतकं खरं कसं बोलू शकतात कोर्टात? एक म्हणजे खरं? आणि तेही कोर्टात?? वर्षानुवर्ष अंधा कानून वगैरे करून जी काही चेष्टा चालवली होती त्याचं फळ हे! म्हणजे काही वेळा चक्क गोविंदाला पण वकील केलेला हो! शक्ती कपूर पण तिथे काहीतरी किस्से करायचा! कोर्टाने तरी किती वेळ सहन करायचं? त्यांनीही दिलं प्रत्युत्तर! सुरज बडजात्या (अरे होता न असा एक? विसरलात होय? चित्रहार बनवायचा! बघा आठवून!) पासून ते एकता कपूर पर्यंत सगळे हादरले असतील. मला वाटलं की हेच जरा लवकर झालं असतं तर "ये जवानी है दिवानी" मधून तरी सुटका झाली असती! पण इतका अधाशी कशाला होऊ. त्याचा पुढचा संभाव्य रिमेक तरी नाही व्हायचा यावर खुश होऊ!


"शादिके पेहले सेक्स नाही" असले डायलॉग नाहीत आता सिनेमामध्ये. किंबहुना "शादिके लिये सेक्स पेहले". हे असे काहीसे होईल. शादीवली रात पेक्षा शादिके पेहलेवली रात हे जास्ती प्रसिद्ध होईल. महेश भट्ट चा सुभाष घाई होईल! महेश भट्ट चे सगळे सिनेमे आता family movies म्हणून प्रदर्शित होतील! काही चतुर पत्रकारांनी हा त्याचाच किया कराया आहे अशी पण शक्यता वर्तवालीये! परदेस मधली महिमा चौधरी भारतामध्ये पळूनच येणार नाही! (असा पण होता न एक सिनेमा? असे काय करताय? "ये दिल" हे एकच गाणे नव्हते त्यात! त्यात एक अपूर्व अग्निहोत्री असतो. खूप futuristic विचाराने तो महिमाला अमेरिकेमध्ये घेऊन जातो नी तिथे म्हणतो "चाल अब जिंदगी जीते है!" तेव्हा हायकोर्टाने असला निर्णय दिलेला नसल्याने ती बिचारी अमेरिकेतून भारतामध्ये पळून येते! नी शाहरूखवर प्रेम करते! हा...! तोच तो परदेस). केवढा सारा खर्च वाचेल! ही स्कीम बचत गट किंवा सहकारी पत संस्था यांनीच काढायला हवी होती! पण असो, कोणाच्या का आरवण्याने होईना. सूर्य उगवला. किंवा चंद्र उगवला म्हणूया. Moon is closer to sex than the sun! God Bless Bollywood!

"ये शादी नाही हो सकती" असला डेंजर डायलॉग सिनेमामध्ये येऊन दंग नाही व्हायचा आता. नायक नी नायिका लगेच म्हणतील. अंकल, लेट हो गया. शादी को कब की हो गयी, ये बस satisfaction of society सुरु आहे. We are already satisfied!"

मला तर चिंता वाटते ते marriage certificate साठी त्रास देतात त्या लोकांची. आता काय करतील? विवाहित असूनही कोण्या कोपर्‍यातल्या ऑफिसामध्ये जाऊन चक्कर मारायला लावायचे. अहो आम्ही लग्न केलेय. प्लीज आम्हाला सर्टिफिकेट द्या! आता कदाचित ते कमी होतील. दवाखान्यात कदाचित फेऱ्या वाढतील! सिद्ध करा म्हणतील आम्हीच केले! परत कोर्ट म्हणते

"The court further said if necessary either party to a relationship could approach a Family Court for a declaration of marital status by supplying documentary proof for a sexual relationship"

"Documentary proof" हा तासही माझ्या विशेष कुतूहलाचा विषय आहे. आता यासंदर्भात ऑफिसचा फॉर्म कसा असेल याच्या कल्पनेत वेळ जरा छान गेला. आजूबाजूचे लोक म्हणाले असे एकटाच काय हसतोस अधेमधे! मी म्हणालो futuristic विचार करतोय! काही चतुर मित्रांनी फेसबुकवर खूप नोबल मार्ग सुचवला. म्हणाले टेप करून ठेवा. आणि तेच घेऊन जा ऑफिस मध्ये! म्हणजे आता MMS scandal अधिकृत केल्यासारखे झाले! म्हणजे सगळ्या MMS scandal पटू ना भीती! च्यायला धंदाच बसवला! सरकारी दफ्तरे आता अचानक इंटरेस्टिंग होणार! फायली धूळ खात पडायच्या. आता फायलींचे टेप होणार नी ते नित्य नियमितपणे बघितले जाणार. Fraud ला जागाच नाही हो म्हणजे! वर सगळे कर्मचारी कायम आनंदी. म्हणजे आनंद, परमानंद, अत्यानंद साठी LIC ची policy घ्यायची गरज नाही! Revolutionary निर्णय! बीट नाहीये!

आई बाबांची काळजी मिटेल! मुलं घरी येऊन सांगतील. वर-वधू संशोधनासाठी काय नाव घालते? माझे मागच्याच आठवड्यात लग्न झाले. पुढे म्हणतील की फक्त मला confirm करायचंय की खरच झालं की मला वाटतंय झालं? सगळाच किस्सा सोपा केला! लग्नाच्या आधी करण्याच्या सोपस्कारामध्ये आता divorce decree चा पण समावेश होईल. म्हणजे कभी किधर कुछ गलतीसे हो भी गया हो तो! म्हणजे करिअर कौन्सलिंग मध्ये आता पुढे कशामध्ये स्कोप आहे? या प्रश्नाला आता घटस्फोट या क्षेत्रात बूम येणारे असे लोक सांगायला लागतील! कारण कोर्ट म्हणतं की,

"The court also said if after having a sexual relationship, the couple decided to separate due to difference of opinion, the ‘husband’ could not marry without getting a decree of divorce from the ‘wife’."

राहून राहून मला सारखे वाटते! आपण एका revolutionary generation चा भाग आहोत! किती सार्‍या अभूतपूर्व गोष्टी आपल्या जनरेशन मध्ये घडतायत! काल ही मला परत असे वाटलं!

दिवसाच्या शेवटी परत एकदा बातमी पूर्ण वाचली. दिवसभर जे काही भविष्य रंगवून मनोरंजन केलेलं त्यापेक्षा बातमी जरा वेगळीच होती. एका ठराविक केस मध्ये महिना ५०० नी १००० रुपयांसाठी मारामारी सुरू होती. एकीकडे live-in रिलेशन मध्ये राहून, २ मुलं वगैरे होऊन नंतर एका माणसाने जबाबदारी टाळायचा प्रयत्न केला होता. मुलाच्या जन्माच्या वेळी सही करून दिलेली दवाखान्यामध्ये. तेव्हा जबाबदारी घेतली. नंतर संबंध बिघडल्यावर अलाहिदा! कोर्टाने या एका ठराविक केस पुरता निकाल दिला की बाबा फालतू बडबड करू नको. सगळी history पाहता. तुम्हाला दोघांना नवरा आणि बायको हा दर्जा दिलाच पाहिजे. कार्यालयात जाऊन रिंग नाही घातली म्हणून या जबाबदारीपासून आता इतक्या वर्षानंतर, इतके काही झाल्यानंतर, तू निसटून जाऊ शकत नाहीस! मुकाट्याने जे काही देणं लागतोस ते दे. नी घटस्फोट घे.

परत आता जाऊन स्पष्टीकरण वगैरे देणं आपल्या फेसबुक च्या रुलबुक मध्ये थोडीच आहे. जनता आज दुसऱ्या विषयावर गेलेली आहे. काल एक दिवस या बातमीवर करमणूक करून घेतली. आज दुसरी. काही वेळा या कशातूनही करमणूक करून घेण्याच्या आपल्या सवयीची भीती वाटते यार मला!

Monday, February 04, 2013

कुछ तेरे पास, कुछ मेरे पास


(खूप जुन्या लिखाणामध्ये सापडलेलं काहीसं. अपूर्ण म्हणून सोडून दिलं होतं ... कदाचित. यामध्ये अपूर्ण काय आहे समजायचा विचार केला गेले काही दिवस. पण नाही समजले! म्हणून जसेच्या तसे पोस्ट करतोय. एवढं सारं हिंदी आणि ते ही दर्दभरं, एकट्याला झेपायचं  अवघडच आहे. आत्ता आठवत नाही फारसं पण बराचसा भाग अस्मि ने लिहिला होता. कदाचित थोडेसे काना मात्रे उकर मी दिले असावेत ;-). असो ज्याला सापडले त्याचा माल!!!!!)

बोरीयतभरी जिंदगी, कुछ तेरे पास, कुछ मेरे पास
हर एक सांस लेनाभी लगे जैसे एक सजा,
विरानी गलीयोकी यादें है बस, कुछ तेरे पास, कुछ मेरे पास

सोचा थोडा नशा करले, तो सुहानी लगने लगे जिंदगी
पर हमने छुआ तो जैसे दारूभी फिकी फिकीसी हो गयी
बिना नशेकी शराबके, भरे हुए ग्लास, कुछ तेरे पास, कुछ मेरे पास

मंजिले कुछ धुंदलीसी,
तलाश मे खोये चांदसी
ओझलसे सितारे रेह गये ईस रातमे, कुछ तेरे पास, कुछ मेरे पास

वैसे हर एककी होती है जिंदगी जरासी उलझी,
जरासी टेढी, जरासी कडवी,
ईंटरवल के पेहले दी एंडवाली फिल्मे, कुछ तेरे पास, कुछ मेरे पास

कोशिश है शायद जीनेकी,
या शायद मर जानेकी
जो रेह गये बगैर जिये, ऐसे अनदेखे ख्वाब, कुछ तेरे पास, कुछ मेरे पास

सोचा था कभी सोचनेकी जरुरत ना होगी, ना मौके आएंगे
पर लगता है ये सोचनेमे जरासी गलती हो गयी
कभी न सोचनेके झूठे वादे सारे, कुछ तेरे पास, कुछ मेरे पास


शायद है भी नही जिंदगी ईतनी सॅडसी
अनदेखे खुशियोंके पल सारे रंगे हमने बोरीयतमे
यही खुदको समझाते हुए असली नकली बोहोतसे पल मेरे पास, बोहोतसे पल तेरे पास

Sunday, January 27, 2013

बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात

काहीच सुचेना. काहीच होईना. नन्नाचा पाढा सोडला तर बाकी काहीच येईना. टीवी वर बघाव तर मतं मांडायला भुकेली माणसं. Cameraman नं "ACTION" म्हणालं की लगेच समोर एकच भाकर आहे समजून तुटून पडतात. घटनेचे भुकेले news channels. बाहेर मेणबत्त्यांचा जमाना. कृतकृत्य व्हायचा कीवा जागृत नागरिक असल्याचा स्वतःला पुरावा द्यायची गरज वाटली की लगेच घ्यायची मेणबत्ती हातात आणि सुटायच! कधीकधी वाटतं की कारणही बघायची गरज लागणार नाही काही दिवसात. असाच बाहेर पडायचं हातात मेणबत्ती घेऊन, बघणारा आपापल्या सोयीनं अर्थ लावून घेईल. कीवा कधी कधी घरात कोणी ऐकेना म्हणून पण मिनी-मेणबत्ती मोर्चा पण निघेल. बेडरूम पासून हॉल पर्यंत. रस्त्यावरून जावं तर सगळेच असंतुष्ठ. काळा गॉगल लावून रस्त्याच्या कोपऱ्या कोपऱ्यावर टांगलेल्या फोटो मधून वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे घेणारे सोडले तर, बाकीचे कोणच खुश दिसत नाही. ते फोतोमाढले पण का एवढे खुश असतात कळत नाहीच. पण तरीही मी खुश नाही आणि ते कसे काय खुश? म्हणून कदाचित बाकीच्यांना आणखी चेव असावा. पेपरमधल्या बातम्या बघितल्या, तर त्यातही इतक्या सहज एखादी चांगली बातमी नाहीच सापडत! Depressing बातम्यांना मात्र उत आलेला असतो. म्हणजे मी का उघडावा पेपर? असा प्रश्न कोणालाच पडत नसेल? की आपल्याला तेच हवं असतं वाचायला?

असं तुम्हालाही नाही का वाटत की इतकं वाईट खरच झालं असेल का जग? काहीच चांगलं होत नसेल का आज काल? कोणालाच इच्छा होत नसेल का काहीतरी inspiring कीवा motivating सांगायची? ही कुठून घेतली आपण सवय? दुःख कुरवाळायची? गेले काही दिवस "आजकी २०० खबरे" असले बघायला मिळतंय news channel वर. त्या २०० पैकी एखादी तरी बातमी तुफान motivating असावी! की वाटावं, ये हुई न बात! चल आपणही असं काहीतरी करू! पण नाहीच होत च्यायला असं!

तसं सुखपण फारसं महाग नाहीचे? रेडिओवर बाई एक प्रश्न विचारते, जितका फालतू तितका चांगलं! म्हणजे "बे चा पाढा म्हणा" असेही असू शकतं. मग हजार call येतात. त्यात तुक्का बसतो एकाचा नि मग त्याला फुकट movie tickets मिळतात. लगेच तो lucky होतो. टाळ्या नि शिट्ट्या! सुख इतकं सोप्पही झालाय. तेही हेवा करावं असं सुख. कोणाला काही फुकट मिळाल की त्याचं उदात्तीकरण हमखास करतो आपण! टीवीवर फालतू प्रश्न सोडवून कीवा बऱ्याचद काहीही न करता झालेल्या lucky winner आपल्यासमोर goal देऊन जातात! म्हणजे फोन करत राहायचं! नंबर लागला की तुम्ही तुम्ही हिरो! काहीच नाहीतर, "च्यायला ते सगळे सुखी आहेत, मीच नाही!" हा आपलाच समज दृढ करायला ते पुरते. पुढे खूप वेळ आपण त्यांची चर्चाही करतो!

हे कुठेतरी काहीतरी चूक आहे हे आतून पण काळत असतच की. पण १० पैकी ८ लोक हे असेच करत असतील तर मी का मागे पडू? बहुमताकडे धावायची सवय नवीन नव्हे. म्हणून वेगळ चुकूनही नाही करत! सगळेच कुठेतरी इतके अगतिक झालेत की चुकून सहज असच मलापण lottery का लागावी ही प्रत्येकाची अशा आहे. आधी आशा होती, आता आग्रह आहे. कारण मला वाटतंय की मी सोडून बाकीच्या सगळ्यांना काही न काहीतरी फुकट मिळतंय! मग मलाच का नाही? तशा मलाही फुकट गोष्टी मिळत असतातच. पण ते आपल्याला मिळणं एकतर obvious असतं! किवा बाकीच्यांना आपल्याहून खूप जास्ती मिळत असतं, किवा आपल्याहून खूप जास्ती वेळा मिळत असतं! म्हणून It doesn't count! आणि या फुकट गोष्टी नाही मिळाल्यामुळे कदाचित हा राग! इतरांबद्दलचा! आणि त्यामुळं भूक कदाचित, आजू बाजूच्या खराब गोष्टी बघायची नी त्यातून आपलं frustration काढायची! हे सगळं असच असतं, हे आपल्या स्वतःच्याच मनावर नकळत बिंबवायची!

खरच काहीही नसेल चांगलं घडत जगात? मला नाही वाटत यार. असेल की काहीतरी. का कुठूनच पुढं येत नाही ते? का आपल्याला कोलाहल आवडतो? का नसलेल्या गोष्टींचे आकर्षण असते? कोणीतरी खडतर परिश्रम करून मोठं झालेला असेल, तर तो माणूस का आकर्षित करत नाही? "च्यायला मी कधी एवढं कष्ट करून काहीतरी मिळवणार?" असं वाटणारी वेडी माणसं कुठतरी असतीलच की? सत्यमेव जयतेच्या प्रत्येक भागात कोणी न कोणी inspiring आणलेलं. अशा माणसांचा उदो उदो करायला आपण कधी शिकणार? ही अशी उदाहरणं का विरून जातात? किती लोक आठवतात आपल्याला की जे सत्यमेव जयते मध्ये आले? ज्यांनी लोकांच्या हितासाठी खूप काही काही केलंय? का नाही देवी शेट्टी आठवत? का नाही विल्सन आठवत? का नाही आपण त्यांच्या तळमळीबद्दल दिवसेंदिवस बोलत? का नाही inspire होत? का या गोष्टी चार दिवसात विरून जातात आणि मग आपली नजर परत कोलाहालाकडे वळते? लोकांना जे बघायला आवडतं, ते आम्ही दाखवतो, छापतो! ही असली फालतू करणं आपण कधी सोडणार? Media वर ढकलायचं कधी सोडणार? किंवा आपल्याला कोणी न कोणीतरी लागतोच खापर फोडायला! अगदी कोणीच नाही सापडलं तर, Government आहेच! तसा government नेही स्टेटस maintain केला आहेच. पण आपल्या या desperate वागण्याला उत्तर काय? घडलेल्या प्रत्येक घटनेचं खापर फोडायला असे काही desperate व्हायचं की ते केलं नाही की मला कदाचित स्वतःकडे बघायची वेळ येईल हि भीती अंतर्मुख व्हायची वेळ येईल. मग उत्तरंच मिळायची बंद झाली तर? लोक आपल्याला जसे समजतात ते आपण आणि खरे आपण यातला फरक समोर आला तर? आणि सगळ्यात शेवटी काहीतरी action करायची जबाबदारी आपल्यावरच आली तर? मग खापर कोणावर फोडणार? मग त्याच्याशी कसे deal करणार?

शेवटी बोलाचीच कढी, आणि बोलाचाच भात. कंटाळा आला यार! खरच काहीतरी करुया. जमत नसेल तर प्रयत्न तरी करू. दुसऱ्यावर नको ढकलूया! मेणबत्त्या पकडणाऱ्या हातानी जरा डोकंपण खाजावूया. शोधून काढूया, की आपण स्वतः काय करू शकतो.