... and he was left alone with his car at the end of the day on an
empty road. Clock showed 11:30pm. Radio guy was planning to doze off as
he said, मधुर बेला कार्यक्रम अब समाप्त हो रहा है! He rolled down the
windows, shuffled thru other radio channels, fixed one that sounded less
loud and started driving towards the highway. It was drizzling, he
could feel the rain-drops on his elbow of the right hand that was
slightly outside the window. It was approaching mid-night, the road was
all dark, it was going to be 30 minutes ride till he reached his house.
He started driving on the left most lane not to bother anyone else with
his slow speed, raised the volume of the song. It was some old Suresh
Wadkar song. He remembered, he always has been a fan of such late night
drives. A slow number or some country music on the radio doubles the
charm of the nightly living streets and the running lights over the
head. This time, it was all with a little spice of rainfall too. He felt
as if it was an orchestrated exclusive event for him. The roads
throwing in a surprise treat. It was 11:45pm. It was chilling cold. The radio track changed to "मौला मेरे" from "चक दे". Now that was too much for a treat. He waited till it reached the line "लौटके आयेगा तू शर्त लगा ले!". It pushed him 6 years back in the past. He could feel his amateur self sitting next to him. He remembered the walk by the ocean and then to the top of the hill side nearby.
He remembered the time that he spent watching the overwhelming nature
from the top of the hill and putting himself together for coming days.
It brought a smile on his face because he felt, he was still standing at
the same juncture, carrying the same amateurish tags, newer yet similar
philosophies. He wanted not to reach home without finishing the song.
He slowed down further, looked outside the window. The blinking yellow
lights, the windshield wipers and the droplets falling on his right
elbow were adding to the rhythm, pushing him further deep down the
memory lane. He turned inside his apartment complex, the music too
fainted, the desperate commercial intruded his silent conversation with
himself. He parked his vehicle, it was past mid-night. He so much
wished, there could be a chai-stall nearby or a possibility of a walk
with the cup in the hand, or a midnight cafe with the benches outside
and view of the water dripping from outside of the ceiling. He took a
deep breath. Looked up towards the sky, felt the droplets on his face.
Amidst the chaos of the words in the world around him, this was a
welcome change. He looked up again and said, Thank You.
Saturday, July 12, 2014
Tuesday, July 08, 2014
जरा चुकलंच! नाही?
महाराज जेव्हा महाराज व्हायचे होते, तेव्हाची गोष्ट ही. पण महाराज, महाराज असल्यामुळे, त्यांना आता महाराजच म्हणू. तसेही कोणाच्या धार्मिक, मानसिक आणि शारीरिक भावना दुखावण्याचा आपला अजिबात विचार नाही. तर एकदा नेहमीसारखेच महाराज सह्याद्रीच्या कडेकपारीमधून घोडदौड करत आपल्या किल्ल्यात परत आले. मावळ्यांची दीन अवस्था बघून महाराजांना दया आली. महाराजांना सारख्या येणाऱ्या या दयेमुळे "महाराजांना दादोजींच्याकडे प्रशिक्षणासाठी पाठवा" हे जिजाऊंचे पत्र कोणीतरी मधल्या मध्ये बदलून "महाराजांना स्वराज्याची स्वप्नं पडू लागलीत म्हणून त्यांना कौंसलिंगला पाठवा" असं करून महाराजांना पोच केलं. जिजाऊनी केलेला आदेश म्हणून महाराजांना पर्याय नव्हता. ते गेले कौन्सलिंगला. तिथे समोर एक इंग्रज बसलेला - केन रुदरफोर्ड. इंग्रज का म्हणाल तर उगाच त्याच्या आडनावावरून त्याची जात हुडकायचा प्रयत्न होऊ नये म्हणून! नाहीतर पुढची गोष्ट वाचायच्या आधीच बरेच निष्कर्ष काढले जायचे! हा केन भविष्यातून भूतकाळात आलेला म्हणे. किंवा अशी आख्यायिका तरी होती.
महाराजांनी आपले विचार त्यासमोर मांडले, "आमच्या या भूमीवर आमच्या माणसांची ही अवस्था? हे बरोबर नाही. स्वराज्य झालेच पाहिजे. या लोकांसाठी मला काहीतरी करायचंय. आणि यासाठी माझे आयुष्य गेले तरी बेहत्तर. पण हे हिंदवी स्वराज्य व्हावे, ही श्रींची इच्छा!"
केनने महाराजांकडे 'तुषार कपूरचा पिच्चर बघतोस का?' असं विचारल्यासारखी नजर टाकली. (म्हणजे खूप कौतुकाच्या भावनेनं. असं म्हणायचं होतं. नाहीतर आपल्याला तुषारच्या चाहत्यांच्यापण भावना दुखवायच्या नाहीत) "छे रे वेड्या. असं थोडीच करतात?" महाराजांना वेड्या म्हणाल्यामुळे चार मावळ्यांच्या भावना दुखावल्या गेल्या, त्यांनी लगेच तलवारी काढल्या. बाह्यावर केल्या. एखादातरी तबेला किंवा अभ्यासिका फोडण्यासाठी त्यांनी तडक गावाकडे धाव घेतली. हर हर महादेवच्या आरोळ्या ऐकू आल्या. केन पुढे बोलू लागला. "आता उद्या म्हणशील की तुला मुघल राजांना पळवून लावायचंय. असं नसतं करायचं ब्वा! तो बघ तो तानाजी. बिचाऱ्याचा पोर लग्नाला येणारे. तुझ्या नादाला लागला तर उद्या त्याचं लग्न बाजूला ठेवून तुझ्याबरोबर गावभर फिरायला येईल! तो बाजी बघ. उद्या तो ऑनसाईट जायचं स्वप्नं बघू शकेल. पण तू नादी लावलास तर पन्हाळ्याच्या बाहेरही पडायचा नाही!"
महाराजांनी आपला मुद्दा परत मांडायचा प्रयत्न केला. केनला कळू शकेल अशी अजूनही त्यांना अशा होती.
"राष्ट्राची निर्मिती किंवा विकृती ही केवळ आपल्या आणि आपल्याच कर्माने होते. हा विचार लोकांच्या मनात रुजवण्याची गरज आहे! स्वराज्य निर्मितीचं कार्य एकट्या दुकट्याच नाही? स्वराज्याचं स्फुल्लिंग या मावळ्यांच्या मनात पेटलं पाहिजे. गुलामगीरी मिटवण्यासाठी त्यांच्यातला स्वाभिमान जागा झाला पाहिजे! मग प्राण गेले तरी बेहत्तर. मग ते प्राण माझे असो किंवा या मावळ्यांचे. हे राज्य स्वर्वांचे होईल. इथल्या लोकांना सक्षम बनवता येईल. आता रायारेश्वारी स्वराज्यस्थापनेची शपथ आणि मग काम सुरु. इथल्या लोकांना मिळत आलेली दुय्यम वागणुक आता थांबली पाहिजे. हे सगळे एक बनले पाहिजेत."
केनचा पेशन्स संपत चालला होता. त्याने परत एकदा मान नकारार्थी हलवत समजावण्याचा प्रयत्न केला. "विघ्नसंतोषीपणा आहे हा. शंभर वर्षाचा अनुभव आहे हो निजामाकडे? तुझ्या CV मध्ये तुम्ही अजूनही फ्रेशर म्हणूनच दिसतंय. स्वराज्याचा आगाऊपणा कुठे करतो?" महाराजांना आगाऊ म्हणालेला ऐकून आणखी चार मावळे बाह्या वर करून तलवारी काढून गावाकडे धावले. "दुय्यम स्थान नको असेल तर स्वातंत्र्य कुठे घेतो? परत मग तुझ्यावर जबाबदारी यायची यांना सुधारून मोठं करायची. त्यापेक्षा सोपा उपाय सांगतो तुला. जरा futuristic आहे. तडक निजामाच्या दरबारी जा. आणि तिथे या मावळ्यांसाठी एकच गोष्ट माग. माग म्हणजे अगदी हट्टच धर. सोडूच नको. निजामाला सांग की बघ या लोकांच्याकडे. कसे दीन आहेत. मागासलेले आहेत. यांना संधी हवी. तर यांच्यासाठी एकच गोष्ट दे. आरक्षण! मग परत ये इकडे. ज्याचा ज्याचा तुला उत्कर्ष करायचा आहे त्याला त्याला मग आरक्षण बहाल कर. ... ... हे बघ. तुला आत्ता झेपणार नाही हे. पण आजपासून तीनशे ते चारशे वर्षानंतर जी प्रगत मनुष्यजात असेल ते हेच करणारेत. तू आज तसे केलास तर इतिहासामध्ये तुझं नाव दूरदृष्टी असलेला म्हणून होईल. ...
एक दूरदृष्टी असलेला ...
एक दूरदृष्टी असलेला बलाढ्य निजामाचा प्रामाणिक सरदार ... शिवाजी भोसले (१६ टक्के आरक्षित)."
============================
कृपया, हे वाचून कोणी बशी आणि बशा फोडू नयेत. कारण तो हेतू नाहीये.
खरं
सांगू तर मला हा खेळच कळत नाही. २१ मे २००६ रोजी मी एका आरक्षण विरोधी
मोर्चामध्ये सहभागी झालो होतो. आज त्याला नऊ वर्षं होऊन गेलीत. आपल्याला एक
नवं आरक्षण देण्यात आलंय. स्वातंत्र्य मिळवून इतकी दशकं उलटली तरीही आम्ही
लोकांना मागासच ठेवलंय म्हणून मिरवायचं पदक!
या मुद्द्यामध्ये इतकी क्लिष्टता बाळगली जाते की काय सांगा? क्रिमी लेअर, उत्पन्न पातळी, तात्विक मुद्दे, तांत्रिक मुद्दे, आणि सर्वात महत्वाचे म्हणजे भावनिक मुद्दे! काहीही बोलायला जा की कोणाच्यातरी भावना दुखावतात! तुमचा उद्देश्य काहीही असो. तेवढेच पुरात नाही. मग कशाला पडा यात?
मला आता खूप भीती वाटतेय. माझ्या, आपल्या, सर्वांच्या आरक्षित भविष्याची. पावलो पावली भावना दुखावून घेणाऱ्या समाजाची. कदाचित हे लिहिल्यामुळे कोणाच्या दुखावलेल्या भावनांची. आणि म्हणून माझ्या भविष्याची. आडनावावरून जात हुडकत फिरणाऱ्या सुशिक्षितांची. यावर आपण काहीच करू नाही शकत या रुजत चाललेल्या भावनेची. एसी ऑफिसमध्ये बसून जगातल्या तमाम मुद्द्यांवर लिखाण करून तात्पुरते समाधान मानणाऱ्या तरुणांची. "तू त्यात नको रे पडू!" असं सांगणाऱ्या जिजाऊंची.
============================
असाही विचार केला तर ... की या सगळ्यात महाराजांच्याच भावना दुखावल्या गेल्या असतील? महाराज सोडा, एकूणच स्वातंत्र्यासाठी जे जे झटले त्यांच्या भावना वगैरे दुखावल्या असतील? आरक्षणच हवं होतं तर मग स्वातंत्र्य कशाला घेतलं? गांधी, टिळक, आझाद यांनी आरक्षणच मिळवण्यासाठी लढायचं होतं न? जरा चुकलच त्याचं! वेगळी "strategy" करायला हवी होती! किंवा माझच चुकलं असेल. आणि असेल तर हे लिहिल्याबद्दल सर्वांची बिनशर्त माफी.
या मुद्द्यामध्ये इतकी क्लिष्टता बाळगली जाते की काय सांगा? क्रिमी लेअर, उत्पन्न पातळी, तात्विक मुद्दे, तांत्रिक मुद्दे, आणि सर्वात महत्वाचे म्हणजे भावनिक मुद्दे! काहीही बोलायला जा की कोणाच्यातरी भावना दुखावतात! तुमचा उद्देश्य काहीही असो. तेवढेच पुरात नाही. मग कशाला पडा यात?
मला आता खूप भीती वाटतेय. माझ्या, आपल्या, सर्वांच्या आरक्षित भविष्याची. पावलो पावली भावना दुखावून घेणाऱ्या समाजाची. कदाचित हे लिहिल्यामुळे कोणाच्या दुखावलेल्या भावनांची. आणि म्हणून माझ्या भविष्याची. आडनावावरून जात हुडकत फिरणाऱ्या सुशिक्षितांची. यावर आपण काहीच करू नाही शकत या रुजत चाललेल्या भावनेची. एसी ऑफिसमध्ये बसून जगातल्या तमाम मुद्द्यांवर लिखाण करून तात्पुरते समाधान मानणाऱ्या तरुणांची. "तू त्यात नको रे पडू!" असं सांगणाऱ्या जिजाऊंची.
============================
असाही विचार केला तर ... की या सगळ्यात महाराजांच्याच भावना दुखावल्या गेल्या असतील? महाराज सोडा, एकूणच स्वातंत्र्यासाठी जे जे झटले त्यांच्या भावना वगैरे दुखावल्या असतील? आरक्षणच हवं होतं तर मग स्वातंत्र्य कशाला घेतलं? गांधी, टिळक, आझाद यांनी आरक्षणच मिळवण्यासाठी लढायचं होतं न? जरा चुकलच त्याचं! वेगळी "strategy" करायला हवी होती! किंवा माझच चुकलं असेल. आणि असेल तर हे लिहिल्याबद्दल सर्वांची बिनशर्त माफी.
Thursday, May 22, 2014
They are inexperienced!
"
बऱ्याचदा मला असं वाटतं की आम्ही लोक खूप approachable होतो जनतेला. आणि म्हणून कोणीही येऊन आम्हाला काहीही बोलून जाणे सोपे होते. सत्ताधारी कोणाच्याही आवाक्याबाहेर! सर्वसामान्य विचारही करू शकत नव्हते त्यांना काही बोलण्याचा. आम्ही केला विचार. तर आम्हाला ते कसं जमणार नाही, हे सांगायला हिरीरीने पुढे आलेले लोक खूप होते. आमच्या चुकांवर हसणारे लोक होते. सुरुवातीच्या काळात प्रश्न पडायचे की, "या" लोकांसाठी आपण सर्वस्व पणाला लावतोय? पण नंतर हा प्रश्न उरला नाही. ते लोक उरले नाहीत यातला भाग नाही. स्वतःला कशाचा फरक पडून घ्यायचा ते शिकलो आम्ही.
तुम्हाला काय वाटतं की देशाला मुक्त करणं हे एकच परमोच्च ध्येय होतं? तुम्हाला ६० वर्षानंतर मागे वळून बघताना असं वाटतंय. किंवा ऐकायला चांगलं वाटत म्हणून तुम्ही असं म्हणता की सगळा देश सामील झाला! ज्याला कळालं त्यानं यात उडी मारली. सगळा देश पेटून निघावा असे दिवस होते ते. पण सगळा देश नव्हता पेटलेला. इंग्रजांची सत्ता असावी असं म्हणणारे पण कमी नव्हतेच. तसे सगळे इंग्रज वाईट थोडीच होते? इंग्रजच करतील सगळं नीट यावरही गाढ श्रद्धा असणारे लोक होतेच. तुम्हा लोकांना काय येतं? बट्ट्याबोळ करणार तुम्ही! आत्ताच धड जमत नाहीये तुम्हाला काही! अनुभव कुठाय तुम्हाला काही? हे असले टोमणे असंख्य वेळा ऐकायचो आम्ही. हे लोक सत्ताधाऱ्याना प्रामाणिक राहिले. याची सल काही काळ राहिली.
वेड लागलंय या लोकांना. अशीच ओळख होती आमची. पण नंतर नंतर अभिमान वाटायचा त्याचापण! आपण जे करतोय ते बरोबर आहे. ते घडणे गरजेचे आहे. यावर अभूतपूर्व विश्वास होता. ज्या लोकांसाठी करतोय, त्यांची थोडीशी जास्ती साथ मिळावी असं वाटायचं. पण तसं होत नाही. प्रस्थापीत बुद्धीजीवी खचितच साथ द्यायला पुढे येतात. खरं सांगू तर क्रांती यांच्या जीवावर नाहीच होत. नाना म्हणून होते एक. आम्ही त्यांचे ऐकायचो. ते शिवाजी महाराजांचे उदाहरण द्यायचे. म्हणायचे, स्वकीयांचा बंदोबस्त करताना महाराजांची अर्धी उर्जा गेली! महाराजांनी आमचे खूप सारे प्रश्न सोडवले. आमच्या शेजारच्या जोशीकाकांना थोडेसे श्रम घेऊन आम्ही काय करतो त्याची माहिती घेणं जड होतं. पण चार लोक नावं ठेवायला लागले की मात्र दुप्पट उत्साहाने हेही सहभागी व्हायचे! अशा लोकांचे कितपत वाईट वाटून घ्यायचे किंवा तेच जोशीकाका नंतर जेव्हा चार लोक चांगले म्हणायला लागले तेव्हा स्तुतीही करू लागले, तर त्याचेही भान कितपत राखायचे, हे सर्व नानांनी दिलेल्या उदाहरणातून कळायचे.
तुम्ही आज ६० वर्षानंतर मागे बघताय तेव्हा तुम्हाला स्वातंत्र्य संग्राम वगैरे वाटतंय. Larger than life! जेव्हा हे सगळं सुरु होतं तेव्हा लोकांना शाश्वती नव्हती की खरच मिळणारे स्वातंत्र्य! पारतंत्र्याची सवय झालेली. त्याच्यात जगण शिकलेले लोक. तू मगाशी म्हणालास तसं, "उंगली क्यू कर राहे हो?" असं म्हणणारे लोक होते. आम्ही नव्हतो १०० टक्के बरोबर. आम्ही organized ही नव्हतो. हर कोपऱ्यातून वेगवेगळे आवाज उठत होते. पण सगळ्यांचा हेतू चांगला होता. एक होता. आमच्यावर टीका करणं काहींनी पसंत केलं. आमच्यातील उणीवा भरून काढण्यासाठी आम्हाला साथ देणं काहींनी पसंत केलं. साथ दिली त्यांना घेऊन आम्ही पुढे गेलो. हे महत्वाचे. हेतू शुद्ध ठेवला तर लोक जुळत जातात. ज्यांना समजायचं त्यांना कळत जात! आज नाही समजलं तरी काय झालं! नाहीच कळणारे ज्यांना, त्याचं दुःख काय करावं!
स्वातंत्र्य मिळवताना जे लोक जीवानिशी गेले ते गेले. तुरुंगवास भोगला तो भोगला. पण त्यापासून कोसभर लांब राहून, साहेबांचा जमानाच चांगला होता असं म्हणणारे लोकही होतेच की. नंतर एकदा जोशीकाका येऊन म्हणाले, मिळालेलं स्वातंत्र्य उपभोगायला आम्ही कितपत लायक अहोत हे काळात नाही! कारण जेव्हा सहभागाची गरज होती तेव्हा आम्ही टीका करत बसलेलो! त्यांना नाना म्हणाले. वेळ अजूनही गेलेली नाही. संग्राम अजूनही संपलेला नाही. १०० टक्के गणितं अजूनही सुटलेली नाहीयेत. आणि ते एकट्या दुकट्याच काम नाहीचे! उणीवा भरून काढता येतात का बघा. तुमच्या बाजूला असंख्य लोक आजही प्रयत्न करतायत. त्याला साथ द्या. ते अपूर्ण असतील. म्हणून त्याना दूर सरू नका. लायक किंवा नालायक यावरून तर ठरवणार? आपल्याला स्वातंत्र्य मिळवायचं होतं. इंग्रजांना घालवण हा फक्त त्यातला एक भाग होता. ते गेले म्हणजे स्वातंत्र्य मिळालं असं थोडीच आहे! आत्ता साथ सोडाल या संग्रामाची तर ६० वर्षानंतरही स्वातंत्र्य मिळालं असं वाटायचं नाही!
"
कर्नल जोगळेकारांबरोबर एक आजोबा भेटले. ते स्वातंत्र्य सेनानी होते. अनायासे भेट झाली आणि गप्पा रंगल्या. त्यांचं नाव विचारायचं राहून गेलं. पण पुन्हा भेट होईलच अशी इच्छा आहे. स्वातंत्र्य मिळालेलं बघायचंय त्यांना. त्यांना अजूनही आशा आहे.
बऱ्याचदा मला असं वाटतं की आम्ही लोक खूप approachable होतो जनतेला. आणि म्हणून कोणीही येऊन आम्हाला काहीही बोलून जाणे सोपे होते. सत्ताधारी कोणाच्याही आवाक्याबाहेर! सर्वसामान्य विचारही करू शकत नव्हते त्यांना काही बोलण्याचा. आम्ही केला विचार. तर आम्हाला ते कसं जमणार नाही, हे सांगायला हिरीरीने पुढे आलेले लोक खूप होते. आमच्या चुकांवर हसणारे लोक होते. सुरुवातीच्या काळात प्रश्न पडायचे की, "या" लोकांसाठी आपण सर्वस्व पणाला लावतोय? पण नंतर हा प्रश्न उरला नाही. ते लोक उरले नाहीत यातला भाग नाही. स्वतःला कशाचा फरक पडून घ्यायचा ते शिकलो आम्ही.
तुम्हाला काय वाटतं की देशाला मुक्त करणं हे एकच परमोच्च ध्येय होतं? तुम्हाला ६० वर्षानंतर मागे वळून बघताना असं वाटतंय. किंवा ऐकायला चांगलं वाटत म्हणून तुम्ही असं म्हणता की सगळा देश सामील झाला! ज्याला कळालं त्यानं यात उडी मारली. सगळा देश पेटून निघावा असे दिवस होते ते. पण सगळा देश नव्हता पेटलेला. इंग्रजांची सत्ता असावी असं म्हणणारे पण कमी नव्हतेच. तसे सगळे इंग्रज वाईट थोडीच होते? इंग्रजच करतील सगळं नीट यावरही गाढ श्रद्धा असणारे लोक होतेच. तुम्हा लोकांना काय येतं? बट्ट्याबोळ करणार तुम्ही! आत्ताच धड जमत नाहीये तुम्हाला काही! अनुभव कुठाय तुम्हाला काही? हे असले टोमणे असंख्य वेळा ऐकायचो आम्ही. हे लोक सत्ताधाऱ्याना प्रामाणिक राहिले. याची सल काही काळ राहिली.
वेड लागलंय या लोकांना. अशीच ओळख होती आमची. पण नंतर नंतर अभिमान वाटायचा त्याचापण! आपण जे करतोय ते बरोबर आहे. ते घडणे गरजेचे आहे. यावर अभूतपूर्व विश्वास होता. ज्या लोकांसाठी करतोय, त्यांची थोडीशी जास्ती साथ मिळावी असं वाटायचं. पण तसं होत नाही. प्रस्थापीत बुद्धीजीवी खचितच साथ द्यायला पुढे येतात. खरं सांगू तर क्रांती यांच्या जीवावर नाहीच होत. नाना म्हणून होते एक. आम्ही त्यांचे ऐकायचो. ते शिवाजी महाराजांचे उदाहरण द्यायचे. म्हणायचे, स्वकीयांचा बंदोबस्त करताना महाराजांची अर्धी उर्जा गेली! महाराजांनी आमचे खूप सारे प्रश्न सोडवले. आमच्या शेजारच्या जोशीकाकांना थोडेसे श्रम घेऊन आम्ही काय करतो त्याची माहिती घेणं जड होतं. पण चार लोक नावं ठेवायला लागले की मात्र दुप्पट उत्साहाने हेही सहभागी व्हायचे! अशा लोकांचे कितपत वाईट वाटून घ्यायचे किंवा तेच जोशीकाका नंतर जेव्हा चार लोक चांगले म्हणायला लागले तेव्हा स्तुतीही करू लागले, तर त्याचेही भान कितपत राखायचे, हे सर्व नानांनी दिलेल्या उदाहरणातून कळायचे.
तुम्ही आज ६० वर्षानंतर मागे बघताय तेव्हा तुम्हाला स्वातंत्र्य संग्राम वगैरे वाटतंय. Larger than life! जेव्हा हे सगळं सुरु होतं तेव्हा लोकांना शाश्वती नव्हती की खरच मिळणारे स्वातंत्र्य! पारतंत्र्याची सवय झालेली. त्याच्यात जगण शिकलेले लोक. तू मगाशी म्हणालास तसं, "उंगली क्यू कर राहे हो?" असं म्हणणारे लोक होते. आम्ही नव्हतो १०० टक्के बरोबर. आम्ही organized ही नव्हतो. हर कोपऱ्यातून वेगवेगळे आवाज उठत होते. पण सगळ्यांचा हेतू चांगला होता. एक होता. आमच्यावर टीका करणं काहींनी पसंत केलं. आमच्यातील उणीवा भरून काढण्यासाठी आम्हाला साथ देणं काहींनी पसंत केलं. साथ दिली त्यांना घेऊन आम्ही पुढे गेलो. हे महत्वाचे. हेतू शुद्ध ठेवला तर लोक जुळत जातात. ज्यांना समजायचं त्यांना कळत जात! आज नाही समजलं तरी काय झालं! नाहीच कळणारे ज्यांना, त्याचं दुःख काय करावं!
स्वातंत्र्य मिळवताना जे लोक जीवानिशी गेले ते गेले. तुरुंगवास भोगला तो भोगला. पण त्यापासून कोसभर लांब राहून, साहेबांचा जमानाच चांगला होता असं म्हणणारे लोकही होतेच की. नंतर एकदा जोशीकाका येऊन म्हणाले, मिळालेलं स्वातंत्र्य उपभोगायला आम्ही कितपत लायक अहोत हे काळात नाही! कारण जेव्हा सहभागाची गरज होती तेव्हा आम्ही टीका करत बसलेलो! त्यांना नाना म्हणाले. वेळ अजूनही गेलेली नाही. संग्राम अजूनही संपलेला नाही. १०० टक्के गणितं अजूनही सुटलेली नाहीयेत. आणि ते एकट्या दुकट्याच काम नाहीचे! उणीवा भरून काढता येतात का बघा. तुमच्या बाजूला असंख्य लोक आजही प्रयत्न करतायत. त्याला साथ द्या. ते अपूर्ण असतील. म्हणून त्याना दूर सरू नका. लायक किंवा नालायक यावरून तर ठरवणार? आपल्याला स्वातंत्र्य मिळवायचं होतं. इंग्रजांना घालवण हा फक्त त्यातला एक भाग होता. ते गेले म्हणजे स्वातंत्र्य मिळालं असं थोडीच आहे! आत्ता साथ सोडाल या संग्रामाची तर ६० वर्षानंतरही स्वातंत्र्य मिळालं असं वाटायचं नाही!
"
कर्नल जोगळेकारांबरोबर एक आजोबा भेटले. ते स्वातंत्र्य सेनानी होते. अनायासे भेट झाली आणि गप्पा रंगल्या. त्यांचं नाव विचारायचं राहून गेलं. पण पुन्हा भेट होईलच अशी इच्छा आहे. स्वातंत्र्य मिळालेलं बघायचंय त्यांना. त्यांना अजूनही आशा आहे.
Thursday, May 08, 2014
शहीद झालेला शहीद
७ वर्षामध्ये १७ निर्दोष लोकांना मुक्त करता करता शेवटी शहीदचाही निकाल लागला. मग काही काळ लोकांनी डोक्यावर घेतलं. नंतर परत लंबा सन्नाटा. तसं आपण सन्नाटामधेच राहणारे लोक आहोत म्हणा. आपल्याला कोणी आवाज केलेला आवडतच नाही. तशातलीच कथा. शहीदच्या उद्यापासून अस्तापर्यंतची. नंतर मग जरा ऑनलाईन बघितलं तर मग आणखी गोष्टी कळल्या. खरं खोटं आता कोणाला माहिती? पण जरा विचित्रच आहे नाही? एकूणच आपली निष्क्रियता किंवा काही ठराविक गोष्टींकडे कानाडोळा करण्याची सवय. सगळंच.
शहीद नावाचा सिनेमा पाहिला. शहीद आझमी नावाच्या माणसावर आहे तो. कोण हा माणूस असं विचारणार असाल तर खाली लिंक दिलीये.
दहशतवादी कारवायांमध्ये चुकीच्या पद्धतीने अटक झालेल्यांना सोडवण्याचा ध्यास घेतलेला एक तरुण. यानंच का घेतला असावा? कारण तोही असंच एकदा यामध्ये सापडलेला. आणि असा सापडला की सात वर्ष तुरुंगात बसावं लागलं! सात वर्ष! सात वर्ष म्हणजे आपण निवडणुकीबद्दल ओरडत आपापली देशभक्ती मिरवतोय त्या पेक्षा वीसपट मोठा कालावधी किंवा त्याहूनही जास्त. हा माणूस वकील बनतो. प्रचलीत गोष्टींशी जमत नाही म्हणून आपलीच practice सुरू करतो. सगळं पणाला लाऊन लढतो. कोणासाठी? जे हताश होऊन तुरुंगामध्ये बसलेत त्यांच्यासाठी. ज्यांना माहितीच नाहीये की बाबा आम्ही काय चूक केली! त्यांच्यासाठी. परत कोणाला "बाइज्जत बरी किया" ऐकण्यासाठी ६-७ वर्षं तुरुंगात राहावे लागू नये यासाठी. यामध्ये तयार झालेले शत्रू, न मिळालेलं सहकार्य पण तरीही गाठलेली उंची या सगळ्यांबद्दलचा सिनेमा.
दहशतवादी म्हणून लेबल लावायला आपण सगळे उत्सुक असतोच. चटकन निकाल लावून टाकायचा आपल्या बाजूनं म्हणेज संपला विषय! या अशा चुकीचं लेबल लागलेल्या लोकांना सोडवण्यासाठी शहीद लढला. पण त्याला थोडीफार जी फेम मिळाली ती त्याच्या हत्येनंतर.
उदो उदो व्हायला कोणीतरी मारायला का लागतं हे एक गूढ आहे! म्हणजे जिवंत असताना छळ छळ छळा. आपली अक्कल आणि लायकी नसताना काहीही आणि कसेही वागवा. Opinions are like assholes anyway. Everyone has one. मग आपापलं एक एक मिरवत फिरा. समोर गांधी आणि टिळक जरी आले असते तरी आम्ही त्यानाही आमची मतं ऐकवली असतीच. तीही कट्टरतेने! सखोल वगैरे विचार करणं किंवा ऐकून घेणं किंवा थोडा प्रयत्न करून खरं ते शोधणं हे नाहीच भावत आपल्याला! फेसबुकवर कुठेतरी वाचलेलंही पुरतं की आपल्याला. चांगलं काहीतरी करायला गेलं की त्यानं ११० टक्के चोख असावं ही का अपेक्षा? आणि तो १०० टक्के कसा नाहीये हे दाखवण्यासाठी किती ती चढाओढ! भले ९९ का असेना. पण मग ब्रेकिंग न्यूज अशी असेल की शेवटी १०० टक्के नाहीच न! काय सुख मिळत असेल हे दाखवण्यात आणि बघण्यात. म्हणजे मी नागडा आहेच पण तो ही काही अखंड कपडे घालून नाहीचे!!
आणि माणूस मेल्यावर असं काय घडत असावं की लगेच महानता प्राप्त होते? काहीतरी चांगला साक्षात्कार व्हायला किंवा कोणाचा चांगुलपणा, ग्रेट वगैरे असणं कळण्यासाठी कोणीतरी धारातीर्थी का पडावं लागतं आपल्याला? मला असं वाटतं की कदाचित आपल्याला हा साक्षात्कारही होत नसावाच. आता पडलाच आहे धारातीर्थी तर आमच्याकडे पद्धत आहे त्यांना महान करण्याची. मग करा महान! म्हणजे हे ही तितकंच निरर्थक नाही का? म्हणजे त्याला नावं ठेवतानाही आमच्याकडे पुरेशी माहिती नव्हती. म्हणजे बहुदा नसतेच ती आमच्याकडे. मग मृत्यूनंतरही माहिती मिळवणे आवश्यक नसतच. चार लोक महान करतात, चला आपणही करू. माणूस माकडाची प्रगत आवृत्ती आहे यावर माझा विश्वास नाही. मेंढराची प्रगत (?) आवृत्ती असावा माणूस.
शेवटी सगळीच चिडचिड. उगाच आग ओकतोय. स्वतःच्या निष्क्रियतेवर आलेला राग असावा. तसं म्हणाल तर शहीद बद्दल वाईट का वाटावं? सात वर्षात त्यानं १४ लोकांना आणि त्यांच्या कुटुंबाना जे काही दिलं ते किती लोकांना उभ्या आयुष्यात कोणालातरी देता येतं? कोणाचं आयुष्य जास्ती उजवं?
आपली ही सवय खूप घातक वाटते मला. थोडं अंतर्मुख व्हावं आपण अशी खूप गरज वाटते. आजही कोणीतरी असेल आजूबाजूला. प्रामाणिक हेतूनं काहीतरी करायचा प्रयत्न करत असेल. आपण त्याचं अपयश जास्ती बारीक लक्ष देऊन बघतोय की त्याच्यामध्ये असलेल्या चुकांचा जीवाच्या आकांतानं शोध घेतोय की चक्क पूर्णपणे कानाडोळा करतोय? फक्त हेतू चांगला असणं आपल्याला पुरातय की आपण चार हात लांब राहून ११०% ची मागणी करतोय? सामोराच्यात उणीवा असतील तर त्या आपण कशा भरून काढू, असा विचार करतोय की चला हा पण आपल्यासारखाच incomplete आहे यात सुख मानतोय? आता हे आपापलं गणित. यात कोणाला किंवा त्याच्यामधल्या चांगल्या हेतूला शहीद करवत नाही न हे जेव्हा बघणं जमेल तेव्हा खरं नाहीतर सगळीच Black Comedy!
Hope we stand up for the right causes. Hope we take efforts to be open and to find out truth. Hope we are proactive when we do that.
शहीद बद्दल ... http://en.wikipedia.org/wiki/Shahid_Azmi
शहीद बद्दल ... http://en.wikipedia.org/wiki/Shahid_Azmi
Sunday, April 20, 2014
प्रियकर, प्रेयसी आणि प्रेम!
परवा कसला सही दिसत होता यार चंद्र! पूर्ण चंद्र ग्रहण होतं. बघितलं? लाल
लाल बुंद झालेला. नासानं लाइव दाखवलं पण होतं. किती दुर्मिळ योग! भारतामधून
नाही दिसला याचं एक दुःख राहीलच. हे सगळं दिवसभर बघून, वाचून, संध्याकाळी
टेरेसवर कॉफी घेऊन गेलो. तिथे लाल बुंद चंद्र दिसला. अहाहा. म्हणजे असा
किती वेळा दिसतो सांगा न? म्हणजे चंद्राचे इतके बारकावे नुसत्याच डोळ्यानं
दिसत होते. दुर्बीण वगैरे असती तर आणि काय काय झालं असतं. एक टक बघत राहिलं
त्याच्याकडे तर 3D असल्यासारखा पण दिसत होता. तसा एरवीपण दिसतोच पण तेव्हा
जरा जास्तीच. काय काय लिहावं या घटने बद्दल ते कमीच. प्रभावित होऊन मी बघत
होतो आणि मागून मित्र आला.
"काय छान दिसतोय .. नाही?"
"अगदीच रे"
"एकदम हम दिल दे चुके सनम आठवला!"
मी गप्प.
"अगदी चांद छुपा बदलमे ... शर्माके मेरी जाना ..."
इतकं out of context कोणी येऊन का असं डिस्टर्ब करावं? देव झोपलेला आहे हेच खरं! नाहीतर देवाला तरी हे असं कसं बघवत असेल? आणि चंद्र शर्मा बिर्माके कुठे छुपातोय? म्हणजे हे सुचतंच कसं? अरे समोर बघ मित्रा! कसा लाल बुंद झालाय. ब्लड मून म्हणत होते दिवस भर सगळे याला. काहीतरी वाचावं की! की दिसला चंद्र की लगेच शर्माके बादल के पीछेच घुसवायचा? हे असले प्रकार करत असावेत जग भर, म्हणूनच लाल बुंद झाला असावा चंद्र. सांगत असेल की अरे बाबानो, थोडी तरी इज्जत करा!
"नाही रे. ते नाहीये आठवत मला." आपला मूक निषेध नोंदवायचा माफक प्रयत्न केला. दिवसभर जे वाचलं ते आठवायचं सुरु होतं. पण हा माणूस ऐकायला तयार नव्हता.
"हं. सपने न मग? चंदा रे, चंदा रे. कभी तो जमीपे आ ... काय गाणं आहे राव हे! आज खासच आहे चंद्र! एकदम romantic! Candle light dinner आणि बाजूला wine चे ग्लास! अहाहा"
बेवडा साला. झिंगूनच असलं असंबंद्ध बोलू शकतात लोक. जमिनीवर कशाला आणतात बाबा चंद्राला. आणि हे असलं म्हणून पोरी कशा काय पटतात यांना? अचाट आहे यार!! मला वाटतं न, या अशा माजलेल्या प्रेमप्रेमी लोकांमुळे एके दिवशी आकाशातून चंद्रच गायब होईल. त्यानं तरी कितीकाळ सहन करावं न? Identity Crisis किती बघा न! पृथ्वीच्या काळजाचा तुकडा बिचारा. पण त्यातही काही शास्त्रज्ञाना प्रोब्लेम आहे. म्हणजे जन्मापासून बिचाऱ्याला त्रास. हा आला कुठून? आतला माणूस आहे की परप्रांतीय? इथून सुरुवात. आता इतकी वर्षं मुकाट्यानं फेरे मारतोय न पृथ्वीचे, मग कुळ कायद्यानं घ्या की त्याला आत. द्या त्याला हक्क. पण हे असले गहन प्रश्न सोडून, लोकांनी याला कुठेही कसाही वापरायला सुरु केलंय! प्रेमाच्या नावानं काहीही करायचं लायसन्स असतंच की. (आता स्पायडर म्यान ला पण नाचवला यांनी प्रेमाच्या नावानं तर बाकीच्यांची काय कथा? पण त्याच्याबद्दल परत कधीतरी!) प्रियकराची प्रेयसी लांब गेली की चंद्र, जवळ असली की तरीही चंद्र. तिच्या चेहऱ्यात चंद्र, चंद्रात ती. चंद्राचा ओवरयुज करून शेवटी लग्न झालं की मग मधुचंद्र! चंद्राच्या कोरीमध्ये आणि शंभर गोष्टी दिसायच्या! चंद्रा बरोबर चांदनी असते, कधी चंदानिया असते. या त्याच्या बहिणी की त्याच्या बायका? हे ही एक न उकललेलं कोडं आहे. बायका असतील तर कृष्णाला सोलिड स्पर्धाच की! एकूण काय तर आपण सोडतच नाहीत चंद्राला. या सगळ्यात त्याचा काहीही संबंधही नाही. त्याला कळतच नसेल की का बाबा मला गोवताय या सगळ्यात?
आता त्या बिचाऱ्याला आपली मतं मांडता येत नाहीत. पण मूक प्राणी वगैरेंवर दया बिया आपण करतच नाही तसंही न? प्रेयसीच्या चेहऱ्यात चंद्र वगैरे दिसणं हा अपमान नाही वाटत समस्त प्रेयासीना? चंद्रावर इतक्या काय प्रेमकविता खपाव्यात? म्हणून Woman Empowerment गरजेची आहे. कॉंग्रेसला कळलंय ते बरोब्बर. (इलेक्शन आहे म्हणून काहीतरी उगाचच आपलं पोलिटिक्स बद्दल! मनावर घेऊ नका नाहीतर तुम्हाला चंद्राची शपथ आहे!). मुलीनी परखड उत्तर दिलं पाहिजे. ही काळाची गरज आहे. एकतर सुरुवार सणसणीत थप्पड मारून झाली पाहिजे. "चंद्रामधलं काय बघून तुला मी आठवले रे? इतके डाग त्याच्यावर. ते डाग म्हणजे मुळात खड्डे आहेत मोठे मोठे! एक lifeless मोठा खडक चंद्र!! तो बघून तुला मी आठवूच कशी शकते?" हा प्रश्न मुलीनी विचारला तरच काहीतरी होऊ शकेल. चंद्राच्या नावावर ही जी काही अंदाधुंदी सुरुये, ती थांबलीच पाहिजे.
तशा मुलीही कमी कुठायत? चंद्राची साक्ष बिक्ष काय काढता अरे!! आपल्या प्रेमाला चंद्र कसा काय साक्षीदार असू शकतो? उद्या कोणाला पुरावा हवा असेल तर चंद्रावर जाऊन शोधा! ती एक लक्ष्य मध्ये प्रीती झिंटा म्हणाली ब्वा की मला चंद बिंद्र म्हणू नको नाहीतर मार खाशील. पण ते हिरोला झेपत नाही आणि तो थेट सैन्यातच भरती होतो! आता हे संस्कार केल्यावर कसं व्हायचं? कोण मुलगी धाडस करेल मग?
पूर्वीच्या काळी, चंद्रावर संशोधन करणाऱ्याना म्हणे खूप विरोध असायचा. म्हणायचे, देव आहेत ते. त्यांना त्या लेवल वरून खाली नका आणू. मला वाटतंय की त्यांना म्हणायचं असेल की चंद्राला त्या लेवलवरून खाली आणू नका, लोकांना झेपणार नाही! देव नाही आहेत ते म्हणालात तर लोक उभी आडवी केस घेतील! त्या लोकांना नक्की भविष्य दिसलं असणार. अतिपरिचयात अवज्ञा! म्हणून नको म्हणत असतील.
असो. शेवटी, मी कॉफी संपवली, आता काम आहे, म्हणून टेरेस वरून कटलो. तो मित्रही कटला. म्हणजे त्याचा काहीही इंटरेस्ट नव्हताच त्या चंद्रात. जणू काही, माझी तपश्चर्या भंग करायला पाठवलेला त्याला! सेक्स रेशो कमी होत चाललाय. देवालाही मेनका भेटली नसेल म्हणून याला पाठवला असणार. काय करणार? आपलं नशीबच असं! कसं आयुष्य काढतोय माझं मला माहिती! खरं सांगतोय. चंद्र साक्षीदार आहे!
"काय छान दिसतोय .. नाही?"
"अगदीच रे"
"एकदम हम दिल दे चुके सनम आठवला!"
मी गप्प.
"अगदी चांद छुपा बदलमे ... शर्माके मेरी जाना ..."
इतकं out of context कोणी येऊन का असं डिस्टर्ब करावं? देव झोपलेला आहे हेच खरं! नाहीतर देवाला तरी हे असं कसं बघवत असेल? आणि चंद्र शर्मा बिर्माके कुठे छुपातोय? म्हणजे हे सुचतंच कसं? अरे समोर बघ मित्रा! कसा लाल बुंद झालाय. ब्लड मून म्हणत होते दिवस भर सगळे याला. काहीतरी वाचावं की! की दिसला चंद्र की लगेच शर्माके बादल के पीछेच घुसवायचा? हे असले प्रकार करत असावेत जग भर, म्हणूनच लाल बुंद झाला असावा चंद्र. सांगत असेल की अरे बाबानो, थोडी तरी इज्जत करा!
"नाही रे. ते नाहीये आठवत मला." आपला मूक निषेध नोंदवायचा माफक प्रयत्न केला. दिवसभर जे वाचलं ते आठवायचं सुरु होतं. पण हा माणूस ऐकायला तयार नव्हता.
"हं. सपने न मग? चंदा रे, चंदा रे. कभी तो जमीपे आ ... काय गाणं आहे राव हे! आज खासच आहे चंद्र! एकदम romantic! Candle light dinner आणि बाजूला wine चे ग्लास! अहाहा"
बेवडा साला. झिंगूनच असलं असंबंद्ध बोलू शकतात लोक. जमिनीवर कशाला आणतात बाबा चंद्राला. आणि हे असलं म्हणून पोरी कशा काय पटतात यांना? अचाट आहे यार!! मला वाटतं न, या अशा माजलेल्या प्रेमप्रेमी लोकांमुळे एके दिवशी आकाशातून चंद्रच गायब होईल. त्यानं तरी कितीकाळ सहन करावं न? Identity Crisis किती बघा न! पृथ्वीच्या काळजाचा तुकडा बिचारा. पण त्यातही काही शास्त्रज्ञाना प्रोब्लेम आहे. म्हणजे जन्मापासून बिचाऱ्याला त्रास. हा आला कुठून? आतला माणूस आहे की परप्रांतीय? इथून सुरुवात. आता इतकी वर्षं मुकाट्यानं फेरे मारतोय न पृथ्वीचे, मग कुळ कायद्यानं घ्या की त्याला आत. द्या त्याला हक्क. पण हे असले गहन प्रश्न सोडून, लोकांनी याला कुठेही कसाही वापरायला सुरु केलंय! प्रेमाच्या नावानं काहीही करायचं लायसन्स असतंच की. (आता स्पायडर म्यान ला पण नाचवला यांनी प्रेमाच्या नावानं तर बाकीच्यांची काय कथा? पण त्याच्याबद्दल परत कधीतरी!) प्रियकराची प्रेयसी लांब गेली की चंद्र, जवळ असली की तरीही चंद्र. तिच्या चेहऱ्यात चंद्र, चंद्रात ती. चंद्राचा ओवरयुज करून शेवटी लग्न झालं की मग मधुचंद्र! चंद्राच्या कोरीमध्ये आणि शंभर गोष्टी दिसायच्या! चंद्रा बरोबर चांदनी असते, कधी चंदानिया असते. या त्याच्या बहिणी की त्याच्या बायका? हे ही एक न उकललेलं कोडं आहे. बायका असतील तर कृष्णाला सोलिड स्पर्धाच की! एकूण काय तर आपण सोडतच नाहीत चंद्राला. या सगळ्यात त्याचा काहीही संबंधही नाही. त्याला कळतच नसेल की का बाबा मला गोवताय या सगळ्यात?
आता त्या बिचाऱ्याला आपली मतं मांडता येत नाहीत. पण मूक प्राणी वगैरेंवर दया बिया आपण करतच नाही तसंही न? प्रेयसीच्या चेहऱ्यात चंद्र वगैरे दिसणं हा अपमान नाही वाटत समस्त प्रेयासीना? चंद्रावर इतक्या काय प्रेमकविता खपाव्यात? म्हणून Woman Empowerment गरजेची आहे. कॉंग्रेसला कळलंय ते बरोब्बर. (इलेक्शन आहे म्हणून काहीतरी उगाचच आपलं पोलिटिक्स बद्दल! मनावर घेऊ नका नाहीतर तुम्हाला चंद्राची शपथ आहे!). मुलीनी परखड उत्तर दिलं पाहिजे. ही काळाची गरज आहे. एकतर सुरुवार सणसणीत थप्पड मारून झाली पाहिजे. "चंद्रामधलं काय बघून तुला मी आठवले रे? इतके डाग त्याच्यावर. ते डाग म्हणजे मुळात खड्डे आहेत मोठे मोठे! एक lifeless मोठा खडक चंद्र!! तो बघून तुला मी आठवूच कशी शकते?" हा प्रश्न मुलीनी विचारला तरच काहीतरी होऊ शकेल. चंद्राच्या नावावर ही जी काही अंदाधुंदी सुरुये, ती थांबलीच पाहिजे.
तशा मुलीही कमी कुठायत? चंद्राची साक्ष बिक्ष काय काढता अरे!! आपल्या प्रेमाला चंद्र कसा काय साक्षीदार असू शकतो? उद्या कोणाला पुरावा हवा असेल तर चंद्रावर जाऊन शोधा! ती एक लक्ष्य मध्ये प्रीती झिंटा म्हणाली ब्वा की मला चंद बिंद्र म्हणू नको नाहीतर मार खाशील. पण ते हिरोला झेपत नाही आणि तो थेट सैन्यातच भरती होतो! आता हे संस्कार केल्यावर कसं व्हायचं? कोण मुलगी धाडस करेल मग?
पूर्वीच्या काळी, चंद्रावर संशोधन करणाऱ्याना म्हणे खूप विरोध असायचा. म्हणायचे, देव आहेत ते. त्यांना त्या लेवल वरून खाली नका आणू. मला वाटतंय की त्यांना म्हणायचं असेल की चंद्राला त्या लेवलवरून खाली आणू नका, लोकांना झेपणार नाही! देव नाही आहेत ते म्हणालात तर लोक उभी आडवी केस घेतील! त्या लोकांना नक्की भविष्य दिसलं असणार. अतिपरिचयात अवज्ञा! म्हणून नको म्हणत असतील.
असो. शेवटी, मी कॉफी संपवली, आता काम आहे, म्हणून टेरेस वरून कटलो. तो मित्रही कटला. म्हणजे त्याचा काहीही इंटरेस्ट नव्हताच त्या चंद्रात. जणू काही, माझी तपश्चर्या भंग करायला पाठवलेला त्याला! सेक्स रेशो कमी होत चाललाय. देवालाही मेनका भेटली नसेल म्हणून याला पाठवला असणार. काय करणार? आपलं नशीबच असं! कसं आयुष्य काढतोय माझं मला माहिती! खरं सांगतोय. चंद्र साक्षीदार आहे!
Tuesday, April 15, 2014
A Happy Birthday
While the Birthday wishes have started coming in already. I thought of being shameless and start asking for gifts!
So here is the request. A long one, but a good one.
I have been working on the project "The GoodBook" for a few months now (You may like the FB page for more details :)). Plan is to post the good stories. We already have a bunch and finishing a few more soon. We will start posting once we have a handful of stories ready. We are almost there. But here is to get there faster.
This birthday, on this 16th April, share a good story with me as a gift. It will help the project. It may be something good that you are doing, or your friend is doing, or someone at some corner of the world, you know, is doing. It may be one paragraph, one page or even a picture. Just share a good deed that is happening around you or that you know.
I have been doing it lately, and it's quite an experience so far. It's all about finding and interacting with some wonderful people around us who are doing good work, and then writing about it. Suddenly, this process started unveiling so many good things that are happening around us every day. It's a great feeling nonetheless. I am sure you would have good time also looking for the good ones and sharing those. I am deliberately not sharing any sample. Let it be open. Any story or event or deed that made you feel good is welcome. Basically, all types of gifts are welcome.
Thank you so much in advance.
A goodness volunteer.
goodnessfreaks@gmail.com (Share your stories on this email address)
PS (1): Feel free to share it with your friends. I won't mind anonymous gifts.
PS (2): Btw, please vote.
Saturday, March 15, 2014
Are we hating a lot lately?
मला न माझं मत मांडायचंय. आता मत मांडायचं म्हणजे काहीतरी पोट तीडकीनं न आवडायला पाहिजे! त्याशिवाय कसं मत मांडणार? मग आता मला आजू बाजूला बघायचंय आणि शोधायचंय की what can I hate! आणि ते कळलं की मग मी ते मत प्रखरतेने मांडायचंय. माझ्यामधला जागृत सुजाण नागरिक जागा करणार. पुढचं सोपं असतं. आपण असं केलं पुढच्याला खो मिळतो. तोही तेच करतो. काहीतरी solid हेट करत बसायचं. विषय असतात की खूप. त्याला कुठं तोटा आहे? आणि आपण तयार करू शकत नाही असं थोडीच आहे? किसका फाट्या, किसका तुट्या?
ज्या हिरीरीनं लोकं केजरीवाल विरोधी लिहितात, मोदीविरोधी लिहितात, सत्यमेव जयते विरोधी लिहितात, किंवा अगदीच मागे जाऊन, गांधी आणि नेहरू विरोधी लिहितात, त्या सगळ्याचच नवल करावं तितकं थोडं आहे!
हल्ली हे मला दररोज आठवतं. टीम मिन्चीन नव्हता का म्हणाला
दुर्दैवी आहे पण कदाचित खरं आहे. आपण खरच करतोय न असं? स्वतःचं अस्तित्व दाखवून देण्यासाठी आपल्याला कशाचा तरी तिरस्कार करायची का गरज लागावी? एखाद्याला शिक्षा द्यायला, दोषी ठरवायला, आपण इतके का आतुर कसे झालोत? "Share it with your friends if you are a true Indian" हे एवढंच पुरतं आपल्याला? आणि मग आपण आपल्या कोर्टात निकाल लावून टाकतो. प्रत्येकाला ज्या रेटने दोषी ठरवतोय आपण, त्याची भीती कशी वाटत नाहीये, याचं नवल वाटतंय मला. चांगलं करणाऱ्यान, १०० नाही १०१ टक्के चोख असलंच पाहिजे हा तर आपला खूप जुना नियम आहे. आणि १०१ टक्के चोख नसेल तर जी काही चांगुलकी असेल ती त्यानं गुंडाळून ठेवावी कारण मग आम्ही आमच्या चहा नाष्ट्याबरोबर त्याचे लचके तोडत बसणार.
इतकं काही, इतक्या कोणा कोणाबद्दल बोलतो यार आपण. तेही बिनदिक्कत! आपली मतं. आपले शब्द. आपल्यासाठीच बोथट नाही का बनलेत? कशाचच काही वाटत नाही. आणि हे सगळेच करतो आपण, एका मागो मग एक. एकामागून एक अनुकरणच करत बसायचं असेल तर देवानं आपल्याला माणूस का बनवलं असावं? विचाराच्या केवळ चकल्याच पडायच्या असतील, तर विचार करण्याची कुवत आपल्याला का दिली असेल?
आपल्या पुढच्या पिढीसाठी आपण hope तयार करतोय का? आजू बाजूच्या चांगल्या गोष्टी हुडकून त्यांना उचलून धरायचं शिकवतोय का?
मला चांगल्या गोष्टींबद्दल लिहायचंय. बोलायचंय. मला चांगल्या गोष्टी शोधायला शिकायचंय आणि मला जमलं तर बाकीच्यानाही शिकवायचंय.
आज होळी आहे. बघू या आपल्यातल्या बुऱ्या गोष्टीना कडी लावता येते का?
Happy Holi.
ज्या हिरीरीनं लोकं केजरीवाल विरोधी लिहितात, मोदीविरोधी लिहितात, सत्यमेव जयते विरोधी लिहितात, किंवा अगदीच मागे जाऊन, गांधी आणि नेहरू विरोधी लिहितात, त्या सगळ्याचच नवल करावं तितकं थोडं आहे!
हल्ली हे मला दररोज आठवतं. टीम मिन्चीन नव्हता का म्हणाला
... And I see it all the time online, people whose idea of being part of a subculture is to hate Coldplay or football or feminists or the Liberal Party. We have tendency to define ourselves in opposition to stuff
दुर्दैवी आहे पण कदाचित खरं आहे. आपण खरच करतोय न असं? स्वतःचं अस्तित्व दाखवून देण्यासाठी आपल्याला कशाचा तरी तिरस्कार करायची का गरज लागावी? एखाद्याला शिक्षा द्यायला, दोषी ठरवायला, आपण इतके का आतुर कसे झालोत? "Share it with your friends if you are a true Indian" हे एवढंच पुरतं आपल्याला? आणि मग आपण आपल्या कोर्टात निकाल लावून टाकतो. प्रत्येकाला ज्या रेटने दोषी ठरवतोय आपण, त्याची भीती कशी वाटत नाहीये, याचं नवल वाटतंय मला. चांगलं करणाऱ्यान, १०० नाही १०१ टक्के चोख असलंच पाहिजे हा तर आपला खूप जुना नियम आहे. आणि १०१ टक्के चोख नसेल तर जी काही चांगुलकी असेल ती त्यानं गुंडाळून ठेवावी कारण मग आम्ही आमच्या चहा नाष्ट्याबरोबर त्याचे लचके तोडत बसणार.
इतकं काही, इतक्या कोणा कोणाबद्दल बोलतो यार आपण. तेही बिनदिक्कत! आपली मतं. आपले शब्द. आपल्यासाठीच बोथट नाही का बनलेत? कशाचच काही वाटत नाही. आणि हे सगळेच करतो आपण, एका मागो मग एक. एकामागून एक अनुकरणच करत बसायचं असेल तर देवानं आपल्याला माणूस का बनवलं असावं? विचाराच्या केवळ चकल्याच पडायच्या असतील, तर विचार करण्याची कुवत आपल्याला का दिली असेल?
आपल्या पुढच्या पिढीसाठी आपण hope तयार करतोय का? आजू बाजूच्या चांगल्या गोष्टी हुडकून त्यांना उचलून धरायचं शिकवतोय का?
मला चांगल्या गोष्टींबद्दल लिहायचंय. बोलायचंय. मला चांगल्या गोष्टी शोधायला शिकायचंय आणि मला जमलं तर बाकीच्यानाही शिकवायचंय.
आज होळी आहे. बघू या आपल्यातल्या बुऱ्या गोष्टीना कडी लावता येते का?
Happy Holi.
Tuesday, February 18, 2014
अजनबी
अनोळखी शहरामध्ये आपुलकी सापडायची तिला. नवी नाती. नवी माणसं. कुठलाही पूर्वग्रह नाही. कुठलीही अपेक्षा नाही. उडत उडत आपोआप ती सर्वात उंच इमारतीच्या छतावर जाऊन पोहोचायची. टेकडी असेल, कधी कोणा अपार्टमेंटच्या टेरेस असेल, कधी कोणा restaurant मध्ये असेल. असं ठिकाण की जिथून अख्ख्या शहराचा आराखडा दिसावा. ते ठिकाण तिचं हक्काचं असायचं. नव्या शहराला लग्गेच आपलसं करायचा हा तिचा सर्वात आवडीचा मार्ग. तासंतास अशा ठिकाणी बसून राहायला तिला आवडे. "इथलं काहीच माहिती नाही" पासून, ते "यहासे दूर जहातक नजर जा रही है, वो सब मेरा इलाका है" असं फिलिंग येईपर्यंत. शहरांमध्ये चुकून कोणीतरी पेहचान का असलाच तरी तिला कोणीही रिसीव करायला नाही येणार, ही तिची अट असायची. कारण, बऱ्याचदा ती एक दिवस आधीच आलेली असायची. हा पहिला दिवस तिला स्वतःसाठी लागायचा. खूप उंचावरून पाण्यात उडी मारायच्या आधी, कठड्यावर काही क्षण काढतात न. तसा हा एक दिवस तिला लागायचा. यासाठी आदल्या दिवशी दुपारी किंवा रात्रीच पोहोचायची तरतूद केलेली असायची. शहर अगदीच अनोळखी असेल तर असलं काही करण्याची गरजच नाही.
रात्रीच्या काळोखात जे शहर दिसतं ते दिवसा नाही दिसू शकत अशा मताची ती. काळोखात न्हाऊन गेलेलं शहर. त्यामध्ये ती मिसळून जायची. या काळोखात समोर स्वतःचं तर प्रतिबिंब तर दिसत नाहीये न? हा प्रश्न तिला कधीच न सुटलेला? म्हणून तिनं असले प्रश्न ऑप्शनला टाकलेले. तसं असायचं काय समोर? लुकलुकणाऱ्या पिवळ्या नि लाल रंगाच्या लांबलचक ओळी. संपूर्ण शहरामधून अखंड पाळणाऱ्या. अधून मधून आपण बीझी असल्याचा चित्कार टाकणाऱ्या. कितीही उंच असली, तरी तिला ग्रीट करायला ते आवाज यायचेच. प्रत्येक शहराचा आवाजही वेगवेगळा. काही वेळा तिला ते आवाज मोठे वाटायचे. काही वेळा त्रस्त. काही वेळा निर्विकार. तर काही वेळा मौनी बाबासारखे, कळून न कळल्यासारखे. या आवाजाबरोबर त्या लाल पिवळ्या रांगांची चुळबुळ. बाजूला पांढर्या पिवळ्या पण अजिबात न लुकलुकणाऱ्या खिडक्या. काही पडद्या आड, काही काचे आड, काही गजा आड, तर काही सताड उघड्या. कदाचित प्रत्येक खिडकीची आपली आपली गोष्ट. तरी दुरून सगळ्या एकसारख्याच. रात्र जसजशी वाढत जाई, तसतशी ती लाल पिवळ्या ओळीनी आखलेली गडबड कमी होत जाई. खिडक्यांच्या पलीकडल्या गोष्टीना अर्धविराम मिळे. जीवाच्या आकांताने काहीतरी विकण्यासाठी अखंड जळत असलेले निर्विकार रंगीत साईन बोर्डस, हे एवढेच काय ते बाकी उरत. तिला हा सगळा बदल टिपत बसायला खूप आवडे. एखाद्या कॅनवास वरचे रंग हळू हळू निसटून, अख्खा कॅनवास आपल्यासाठी कोरा करकरीत होतोय असं तिला वाटे. आता हा कॅनवास रंगवायची संधी तिला मिळणार याचा आनंद कुठेतरी लपलेला असायचा त्यात. याच्याच कुठल्या तरी कोपर्यात तिची गोष्ट सुरु होणार. तिचे काही रंग तिथे सांडणार. काही रंग तिच्यावर उडणार. या अशा लघुकथांचं पुस्तक म्हणजे तिचं आयुष्य.
.............................
"मी खुश असेन, मी जे काही करेन त्यात. तुम्हाला आणखी काय हवंय?"
"असलं फालतू तत्वज्ञान नको सांगूस! चार लोक जे काय सांगतायत ते मूर्ख आहेत का?"
"चार चौघांनी केलं म्हणून करणं हे तरी कुठं हुशारीचं लक्षण आहे?"
"जगात तू एकटी हुशार! आम्हाला काही अक्कलच नाही की नाही?"
"मी जर मुलगा असते. तरीही तू मला असच अडवलं असतस?"
"हो. अगदीच अडवलं असतं! काळजी वाटणारच की तुझी!"
"मी चार चार चौघांच्या सारखं करणं तुझ्या लेखी जास्ती महत्वाचं आहे की मी खुश असणं?"
"... तुझ्या बाबांशी बोल तू!"
.............................
"तुझं कुठे काही ..."
"त्याचा काय संबंध?"
"आमचच चुकलं. तुझ्याकड लक्ष न दिल्याचा परिणाम!"
"तुमचं बारीक लक्ष होतं माझ्यावर."
"पण जग असच म्हणणार न!"
"तुम्ही जगाची फिकीर केली असती बाबा, तर मला असं वाढवलंच नसतं!"
"तुझा तो एक मित्र होता न ..."
"बॉंड गीरी करू नका."
"तो नसतो आज काल तुझ्या बरोबर."
"तुमचे ते एक टक्कल पडलेले, जाड काळा चष्मा घालणारे उंच मित्र होते. ते आज काल नसतात तुमच्या बरोबर!"
"या गोष्टी सारख्या नाहीयेत! उगाच अक्कल दाखवू नको! चार माणसं सांगतात म्हणून मुद्दाम हट्टानं उलट करायला बघातेयास तू!"
"मला सांगा मग, हे जे तुम्ही आणि आई ने, चार चौघांसारखे, चार चौघांसारखे वगैरे जे सुरु केलाय, तसं केलं की मगच माणूस खुश होतो. याची शाश्वती काय?"
"आम्ही खुश नाहीये का? आम्ही चार चौघांसाराखेच केले न? काय वाईट आहे त्यात?"
"इतका घाम गळून, इतकं शिकून, इतके कष्ट करून जर जीवाच्या आकांताने चार चौघांसाराखेच करायचे असेल तर मग काय मजा? तुम्हालाही तुम्ही काय म्हणताय ते पटत नाहीये बाबा! मान्य करा!"
"... तुझ्या आईशी बोल तू!"
............................
प्रत्येक शहरातली तिची माणसं वेगळी. त्यांच्याबरोबरच्या गोष्टी वेगळ्या. त्या सगळ्यांची ती आवडती. भिरभिरणाऱ्या फुलपाखरासारखी. जितक्या लवकर नव्या शहरामध्ये मिसळायची, तितक्याच लवकर त्यातून अलिप्त होऊन पुढेही निघून जायची. अशा या नव्या शहरांना मिठी मारण्यासाठी तिला अशा उंच जागांची गरज लागायची,
"Madam. It's closing time."
मंद वाऱ्यात उडणारे तिचे केस खूप लांबूनच लक्ष वेधून घ्यायचे. तेच थोडे बाजूला सारून, मग ती म्हणायची, "अरे यार ... आणि थोडा वेळ बसू दे न!!" समोरच्याची भाषा कुठलीही असली, तरी त्याला हे कळून जायचं. नाही कळलं तरी, तिच्या चेहऱ्याकडं बघून तिला नाही कोणीच म्हणायचं नाही! अतरंगी जागा शोधून काढायची ती, म्हणून बऱ्याचदा security guards च तिला हाकायला यायचे!
"Just a few more minutes Madam. We got to close it now!" किंवा "We don't allow anyone here" असलच काहीतरी म्हणायचे. पण तिला नाही म्हणणं त्यांच्या जीवावर यायचं! काही लोकांना हे वरदान असतं. तिलाही ते होतं!
"Thank you so much friend!" आणि अनोळखी शहरात तिनं हा पहिला मित्र बनवलेला असायचा.
रात्रीच्या काळोखात जे शहर दिसतं ते दिवसा नाही दिसू शकत अशा मताची ती. काळोखात न्हाऊन गेलेलं शहर. त्यामध्ये ती मिसळून जायची. या काळोखात समोर स्वतःचं तर प्रतिबिंब तर दिसत नाहीये न? हा प्रश्न तिला कधीच न सुटलेला? म्हणून तिनं असले प्रश्न ऑप्शनला टाकलेले. तसं असायचं काय समोर? लुकलुकणाऱ्या पिवळ्या नि लाल रंगाच्या लांबलचक ओळी. संपूर्ण शहरामधून अखंड पाळणाऱ्या. अधून मधून आपण बीझी असल्याचा चित्कार टाकणाऱ्या. कितीही उंच असली, तरी तिला ग्रीट करायला ते आवाज यायचेच. प्रत्येक शहराचा आवाजही वेगवेगळा. काही वेळा तिला ते आवाज मोठे वाटायचे. काही वेळा त्रस्त. काही वेळा निर्विकार. तर काही वेळा मौनी बाबासारखे, कळून न कळल्यासारखे. या आवाजाबरोबर त्या लाल पिवळ्या रांगांची चुळबुळ. बाजूला पांढर्या पिवळ्या पण अजिबात न लुकलुकणाऱ्या खिडक्या. काही पडद्या आड, काही काचे आड, काही गजा आड, तर काही सताड उघड्या. कदाचित प्रत्येक खिडकीची आपली आपली गोष्ट. तरी दुरून सगळ्या एकसारख्याच. रात्र जसजशी वाढत जाई, तसतशी ती लाल पिवळ्या ओळीनी आखलेली गडबड कमी होत जाई. खिडक्यांच्या पलीकडल्या गोष्टीना अर्धविराम मिळे. जीवाच्या आकांताने काहीतरी विकण्यासाठी अखंड जळत असलेले निर्विकार रंगीत साईन बोर्डस, हे एवढेच काय ते बाकी उरत. तिला हा सगळा बदल टिपत बसायला खूप आवडे. एखाद्या कॅनवास वरचे रंग हळू हळू निसटून, अख्खा कॅनवास आपल्यासाठी कोरा करकरीत होतोय असं तिला वाटे. आता हा कॅनवास रंगवायची संधी तिला मिळणार याचा आनंद कुठेतरी लपलेला असायचा त्यात. याच्याच कुठल्या तरी कोपर्यात तिची गोष्ट सुरु होणार. तिचे काही रंग तिथे सांडणार. काही रंग तिच्यावर उडणार. या अशा लघुकथांचं पुस्तक म्हणजे तिचं आयुष्य.
.............................
"मी खुश असेन, मी जे काही करेन त्यात. तुम्हाला आणखी काय हवंय?"
"असलं फालतू तत्वज्ञान नको सांगूस! चार लोक जे काय सांगतायत ते मूर्ख आहेत का?"
"चार चौघांनी केलं म्हणून करणं हे तरी कुठं हुशारीचं लक्षण आहे?"
"जगात तू एकटी हुशार! आम्हाला काही अक्कलच नाही की नाही?"
"मी जर मुलगा असते. तरीही तू मला असच अडवलं असतस?"
"हो. अगदीच अडवलं असतं! काळजी वाटणारच की तुझी!"
"मी चार चार चौघांच्या सारखं करणं तुझ्या लेखी जास्ती महत्वाचं आहे की मी खुश असणं?"
"... तुझ्या बाबांशी बोल तू!"
.............................
"तुझं कुठे काही ..."
"त्याचा काय संबंध?"
"आमचच चुकलं. तुझ्याकड लक्ष न दिल्याचा परिणाम!"
"तुमचं बारीक लक्ष होतं माझ्यावर."
"पण जग असच म्हणणार न!"
"तुम्ही जगाची फिकीर केली असती बाबा, तर मला असं वाढवलंच नसतं!"
"तुझा तो एक मित्र होता न ..."
"बॉंड गीरी करू नका."
"तो नसतो आज काल तुझ्या बरोबर."
"तुमचे ते एक टक्कल पडलेले, जाड काळा चष्मा घालणारे उंच मित्र होते. ते आज काल नसतात तुमच्या बरोबर!"
"या गोष्टी सारख्या नाहीयेत! उगाच अक्कल दाखवू नको! चार माणसं सांगतात म्हणून मुद्दाम हट्टानं उलट करायला बघातेयास तू!"
"मला सांगा मग, हे जे तुम्ही आणि आई ने, चार चौघांसारखे, चार चौघांसारखे वगैरे जे सुरु केलाय, तसं केलं की मगच माणूस खुश होतो. याची शाश्वती काय?"
"आम्ही खुश नाहीये का? आम्ही चार चौघांसाराखेच केले न? काय वाईट आहे त्यात?"
"इतका घाम गळून, इतकं शिकून, इतके कष्ट करून जर जीवाच्या आकांताने चार चौघांसाराखेच करायचे असेल तर मग काय मजा? तुम्हालाही तुम्ही काय म्हणताय ते पटत नाहीये बाबा! मान्य करा!"
"... तुझ्या आईशी बोल तू!"
............................
प्रत्येक शहरातली तिची माणसं वेगळी. त्यांच्याबरोबरच्या गोष्टी वेगळ्या. त्या सगळ्यांची ती आवडती. भिरभिरणाऱ्या फुलपाखरासारखी. जितक्या लवकर नव्या शहरामध्ये मिसळायची, तितक्याच लवकर त्यातून अलिप्त होऊन पुढेही निघून जायची. अशा या नव्या शहरांना मिठी मारण्यासाठी तिला अशा उंच जागांची गरज लागायची,
"Madam. It's closing time."
मंद वाऱ्यात उडणारे तिचे केस खूप लांबूनच लक्ष वेधून घ्यायचे. तेच थोडे बाजूला सारून, मग ती म्हणायची, "अरे यार ... आणि थोडा वेळ बसू दे न!!" समोरच्याची भाषा कुठलीही असली, तरी त्याला हे कळून जायचं. नाही कळलं तरी, तिच्या चेहऱ्याकडं बघून तिला नाही कोणीच म्हणायचं नाही! अतरंगी जागा शोधून काढायची ती, म्हणून बऱ्याचदा security guards च तिला हाकायला यायचे!
"Just a few more minutes Madam. We got to close it now!" किंवा "We don't allow anyone here" असलच काहीतरी म्हणायचे. पण तिला नाही म्हणणं त्यांच्या जीवावर यायचं! काही लोकांना हे वरदान असतं. तिलाही ते होतं!
"Thank you so much friend!" आणि अनोळखी शहरात तिनं हा पहिला मित्र बनवलेला असायचा.
Thursday, February 13, 2014
Happy Valentine's Day!
मी एक जाहिरात बघितली. कशाची होती आठवत नाही पण एक छान दृश्य होतं. त्यात एक छोटं कुत्र्याचं पिल्लू आणि एक घोडा मित्र असतात. त्यांचा मालक ते पिल्लू विकून टाकतो. तर सगळे घोडे मिळून त्याला घेऊन जाणारी गाडी अडवतात. आणि मग ते पिल्लू परत येतं. आणि मग धावत धावत जाऊन मालकाला प्रेमानं मिठी मारतं!
हेच जर माणसाचं असतं तर असं जे झालं ते सगळं विसरून मिठी मारायला जमलं असतं?
न वापरल्यामुळे खूप प्रमाणात उरलेली, देवानं दिलेली, विचार करायची क्षमता वापरून, आपण गोष्टी सोप्या करतो की क्लिष्ट करतो हा संशोधनाचा विषय वाटतो मला. विसरून जाणं ही कला जर जमली तर आई शप्पथ, किती गोष्टी निकालात निघतील! आजसे बीस साल पेहले जो थप्पड लगायी थी, उसकी गुंज आज तक कशाला आठवायला हवी?
खूप ओसरती पहिली जाहिरात ती पण छान वाटलं बघून. ते प्रेम बघून.
लहान मुलांचं नसतं? तुम्ही काहीही म्हणालात, किंवा केलात तरी नंतर येऊन चिकटायची ती चिकटतात. समोरच्याचं आपल्यावर केवळ प्रेमच असू शकतं. यावर गाढ विश्वास असतो त्यांचा. ते पुरतं त्यांना. आता आपण सगळेच कधी न कधी तरी लहान होतोच की! आता कुठल्याशा त्या क्षणाला आपण हे सगळं टाकून दिलं देव जाणे?
असं तर होत नाहीये, की आपण कोणा कोणावर का का प्रेम नाही करायचं, याचीच मोठी यादी करतोय? की एखादं जरी चांगलं कारण असलं तरी तेही पुरतं आपल्याला प्रेम करायला? अप्रिय गोष्टी विसरायला?
आपल्या आजूबाजूच्या व्यक्ती आणि त्यांच्या कृती या सगळ्यांच्या केवळ चांगल्या आणि चांगल्याच गोष्टी मनात ठेवणं आणि बाकी सगळ्याला फाटा देणं असा असू शकेल यंदाचा Valentine's Day?
आजूबाजूच्या प्रत्येकावर प्रेम करण्याचं, आजूबाजूची प्रत्येक गोष्ट आवडण्याचं, एक तरी कारण शोधणं असा असू शकेल यंदाचा Valentine's Day?
गुलाबांच्या पाकळ्यांच्या पलीकडे, अंधुक मिणमिणत्या मेणबत्त्यांच्या पलीकडे, कागदावरच्या छापील भावनांच्या पलीकडे, केवळ दोन व्यक्तींमध्ये अडकून न पडलेलं प्रेम शोधणं, असा असू शकेल यंदाचा Valentine's Day?
टाळलेला मोह ...!
|| श्री Valentineराव प्रसन्न ||
कॉलेज संपलं. पोरगी जवळपास पटलीच होती. सासराही खिशात होता. रांचोचा पूर्ण मामला सेट होता. पण ते सगळं सोडून पठ्ठ्या कितीतरी वर्षं अज्ञातवासात गेला! पुढे मग त्याला शेवटी पिया येऊन मिळते आणि उनकी नाक नही टकराती वगैरे बाकीचा तपशील सोडा. पण विचार करा या कॉलेज संपल्यापासून ते थेट ते परत भेटेपर्यंतचा भाग दाखवण्याचा मोह टाळणे किती कठीण काम आहे? तुम्ही केलाच नाही न विचार? कारण डायरेक्ट ते दोघे एकमेकांना मिळाले हेच पहिला तुम्ही! मला हा विचार आला. आणि धडकी भरली. मग राजू हिरानीचे आणखी आभार मानले मी. 3-idiots आणखी जास्ती आवडला! लौव ष्टोरीचा मोह टाळला आणि मग भले झाले असली उदाहरणं आपल्याला तशीही विशेष आवडतात! नाही पटत अजून? आता बघा काय काय होऊ शकलं असतं!
थोडा विचार करा!
सगळा मामला सेट असताना रांचो कॉलेज मधून गायब. पियाला पण पत्ता नाही. फरहान आणि राजू पण भांबावलेले. आता पिया आहे भरणार! मेरा प्यार खो गया वगैरे म्हणणार. मग कब तक कुवारी रहोगी म्हणून विरू सहस्रबुद्धे तिला मार्गी लावायची प्रयत्न सुरु करणार. तिकडे रांचोला ही परफेक्ट वेळ आहे हे कळणार! अशाच वेळी विकतची दुखणी आणि तत्वं घ्यायची असतात न! सगळं सुरळीत वगैरे करेल तर मजा काय! मग लगेच रांचो तत्वांशी प्रामाणिक होणार. मिया बीबी राजी वगैरे म्हणून हळूच पियाला संपर्क साधून सच सच सांगून, आपण प्यार पा लिया वगैरे ... आज्जीबात नाही करणार! झूठका सहारा लिया असं पिया म्हणेल म्हणून नाही. पिया म्हणालीही असती की झूठ वगैरे गेलं तेल लावत. तुला मी आवडते मला तू आवडतो. मग कशाला दंगा? पण मग वेळेचं महत्व कसं कळणार न? (मै समय हु. म्हणून लहानपणी आपल्या जनरेशनच्या मनावर वेळेचं महत्व बिंबवलय की नाही?) म्हणून तो तसलं काही आज्जीबात करणार नाही. तर तो पियाला आपल्या दिलमध्ये ठेवून, आपल्या आयुष्याच्या एकमेव ध्येयाकडे जाणार. सायन्स! आता मग त्याला दररोज प्रत्येक टेस्ट ट्यूब मध्ये, प्रत्येक उपकरणामध्ये पिया दिसणार. एकटा नदीकाठी बसून सोनू निगम किंवा थेट आतिफ असलमला गाणी म्हणायला लावणार! त्याच्या सायन्स सेंटरला भेट द्यायला एखादे कपल आले की हा कपाळावर हात मारणार. कारण याला तो आणि पिया आठवणार. कोणी लग्नात आमंत्रण दिलं की याला पिया पहिल्यांदा भेटलेली ते आठवणार. अहाहा. या केवळ सुंदर आठवणी आहेत. याने मला काहीही फरक पडत नाही. हे तो स्वतःला समजावणार आणि प्रेक्षकांना रडवणार.
तिकडे पिया पण अस्ताव्यस्त. आता रांचो गेला. पण काहीतरी केलेच पाहिजे की. मग ती आधी मापात काढलेल्या जुन्या हिरोला पकडणार. तो चप्पल घड्याळांच्या किमती सांगणार. (विसरला? होता की तो एक ... मेरी घडी भी वोही समय दिखती है ... ज्याला म्हणालेला तो) तिला त्याच्या घड्याळ आणि चपलात रांचो दिसणार! पण ती तरीही स्वतःला समजावणार. की अरे हे असेच व्हायचे होते. रांचोची इच्छा हीच होती. नाहीतर थांबला असता न! मग ती स्वतःला या price tag वाल्या माणसाच्या प्रेमात पाडणार. त्यालाही आपल्या प्रेमात पडणार. रांचोच्या आठवणी तर केवळ अशाच! मंद वाऱ्याची झुळूक. गेलेला चांगला वेळ. एक स्वप्न. किंवा असच काहीतरी होतं. या अर्थच श्रेया घोशाल कडून गाणं म्हणवून घेणार.
आता अचानक सगळं सेट झालेलं असताना. मधेच रंचो उपटला तर मग तिच्या मनातली द्विधा दाखवणं हे किती बेष्ट! आहाहा! मग जरा गिल्ट वगैरे. आता तर मी इतके सारे घडवून आणले. आता मीच कशी माघारी फिरू? हा प्रश्न! सदा सुहागन राहो म्हणून तिच्या होणाऱ्या सासऱ्यांनी दिलेला आशीर्वाद तिच्या कानात घुमणार! तसा तिनं स्वतःला सुद्धा या price tag वाल्याच्या प्रेमात पडलयच की! आता आला पहिला हिरो म्हणून अशी कशी टाकेल याला? साजन मध्ये माधुरी नाही म्हणत? मला पण वोटिंगचा हक्क मिळाला पाहिजे! तुम्ही दोघेच का ठरवणार? तसं!
तुम्हाला काय वाटलं की एक फोन आला नी लगेच पिया गेली रांचोकडे? किती काय काय होऊ शकलं असतं!
झालंच तर आणखीही शक्यता आहेतच की. मैने "रांचो"को मनसे अपना पती मान लिया है असं म्हणून पिया काही वर्षं जावेद जाफरी बरोबर पण संसार थाटू शकेल. बघा, वाईट डील नाहीये. श्रीमंत आहे. छान ठिकाणी राहतो. बाप पण मेलाय त्याचा. किंवा वांगडू आडनाव आपल्यामध्ये कसं चालेल म्हणून विरू सहस्रबुद्धे नवीन प्रॉब्लेम तयार करू शकतील! किंवा खास वैचारिक लोकांसाठी, असंही होऊ शकेल. पिया आणि रंचो भेटले. मग ते चर्चा करतील. मुझे अब लौट जाना होगा. ये सही नही है. जमाना हमे जिने नाही देगा. हम अमुक अमुक को क्या मुह दिखायेंगे? असले प्रश्न पडूच शकतात की. तशी मी परवा एक फिल्म पहिली. त्यात एका बहिणीबरोबर लग्न होत असताना शेवटी हिरो म्हणतो अरे थांबा. नेम चुकला. मला त्या दुसरी बरोबर लग्न करायचंय. मग त्यांना असले अमुक अमुक को कैसा मुह दिखायेंगे वगैरे प्रश्न नाही पडत. सुरळीत होतं सगळं. पण असो. तो पण एक टाळलेला मोह असावा!
विचार करा. काहीही होऊ शकलं असतं!
हे सगळं डोळ्यासमोर आलं आणि मग 3-idiots किती पटीमध्ये जास्ती आवडला काय सांगू? राजू हिरानीला धन्यवाद! किंवा त्या सगळ्यांनाच धन्यवाद! ऐसेहीच taken for granted नही लो!
या valentine's day ला अशा साऱ्या टाळलेल्या लौव ष्टोरीना सलाम! Let's thank them all for not existing and making our life beautiful!
Happy Valentine's Day!
आपला आनंद द्विगुणीत करण्यासाठी आपल्या आणखी प्रेमी मित्र मैत्रीणीना शेअर करालच अशी अपेक्षा. कळावे. लोभ असावा.
(या शेअर करण्याच्या आणि करवण्याच्या सवयीबद्दल कधीतरी खास लिहायला आवडेल! ... पुढच्या वेळी!)
Sunday, January 19, 2014
I love, we love, you love, you love, he, she, it loves, they love
One in love, one in shell
One is lost so the other in hell
More or less, it's all the same
Like it hate it, we're all lame
It's social, it's public
Yet very specific
Love stories are in abundance
You make it or fake it
It's there, it's not there
It's confused, and a chaotic fare
There's more glare
Than what's actually in there
You connect, you share
You talk, you dare
If you see the roads clear
Why do you take the twist dear?
Dramatic, pathetic, symbolic, alcoholic
Eventually it is never realistic
One in love, one in shell
One is lost so the other in hell
I love the louv! Because it's so funny!
One is lost so the other in hell
More or less, it's all the same
Like it hate it, we're all lame
It's social, it's public
Yet very specific
Love stories are in abundance
You make it or fake it
It's there, it's not there
It's confused, and a chaotic fare
There's more glare
Than what's actually in there
You connect, you share
You talk, you dare
If you see the roads clear
Why do you take the twist dear?
Dramatic, pathetic, symbolic, alcoholic
Eventually it is never realistic
One in love, one in shell
One is lost so the other in hell
I love the louv! Because it's so funny!
Sunday, January 12, 2014
हट्टाने हुतात्मा!
प्रत्येकाची आपापली अशी खूप पेशल नि युनिक़ ष्टोरी असतेच की. अगदी, प्रत्येक टपरीवर जसा अगदी एक सारखाच पेशल चाय मिळतो. तसा. तशी आपण एक पेशल वाली आणि एकदम युनिक लाव ष्टोरी लिहिली पाहिजे राव. लव ष्टोरी नाही लिहिली तर मग काय लिहिला! तसं लव ष्टोरीला काय काय लागतं? एक नायक? एक नायिका? नाही. आपण आधुनिक ष्टोरी लिहिणार! त्याला खूप सारे लोक लागतात. तेही असे की ज्यातला खरा नायक कोण होता आणि खरी नायिका कोण होती याचाच पत्ता नाही लागला पाहिजे! (म्हणालो नव्हतो एकदम पेशल वाली युनिक स्टोरी असणारे!).
पहिला मुलगा घ्यायचा. पहिली मुलगी घ्यायची. याचं तिच्यावर प्रेम. तिचं याच्यावर प्रेम. तुम्हाला काय वाटलं? हा शेवट आहे? नाही. ही सुरुवात आहे. यांचा टाईम एक्सिस बदलायचा. म्हणजे तिचं याच्यावर प्रेम, तेव्हा याचं तिच्यावर प्रेम नाही. याचं तिच्यावर प्रेम तेव्हा तिचं याच्यावर प्रेम नाही! अहाहा. आता जमतंय. मग आणखी लोक आणायचे. प्रत्येकाला रोजगार मिळालाच पाहिजे की. जेव्हा पहिल्या मुलाचं पहिल्या मुलीवर प्रेम नाहीये, तेव्हा याच्यावर प्रेम करणारी दुसरी मुलगी आणायची. जेव्हा पहिल्या मुलाचं पहिल्या मुलावर प्रेम नाहीये तेव्हा कोणावर तरी असलं पाहिजे की म्हणून दुसरा मुलगा आणायचा. आता कसं सगळं भरल्या भरल्या सारखं वाटतंय.
पहिला मुलगा, पहिली मुलगी, दुसरा मुलगा, दुसरी मुलगी. ही आपली पात्रं. आता हे हलवलेले टाईम एक्सिस जोडायचे. इंटर्वलच्या आधी तिचे याच्यावर प्रेम. इंटर्वलच्या नंतर याचे तिच्यावर प्रेम. तेच तेच सीन रिपीट मारायचे. फक्त याच्या ऐवजी तिला टाकायचं आणि तिच्या ऐवजी याला टाकायचं. सारांश असा की दोनही मुलांचे पहिल्या मुलीवर प्रेम. आणि दोनही मुलींचे पहिल्या मुलावर प्रेम. आता हे बघून तुम्हाला बुलीअन एक्वेशन आठवली असतील तर तुम्ही खरे इंजिनिअर! फक्त आपली ष्टोरी पेशल करायचीये न म्हणून टाईम एक्सिस हलवलाय आपण. तर या सगळ्याच्या इंटरसेक्शन मध्ये पहिला मुलगा नी पहिली मुलगी एकत्र येणार असं वाटत असेल तर फसलात राव तुम्ही. मग ष्टोरी सुरूच कशाला केली असती? आता परम्युटेशन कोम्बीनेशन लावायची. कथा सशक्त झाली पाहिजे न?
पहिल्या मुलाला पहिली मुलगी आवडायला लागली तेव्हा त्याच्यावर दुसऱ्या मुलीचं प्रेम होतं. मग तिला थोडा वेळ तटस्थ ठेवायचं. पहिल्या मुलाला उपरती आली की मग घर बार सब कुछ सोडून पहिल्या मुलीच्या मागे पाठवायचं. पहिल्या मुलीला टायटनची जाहीरात करवायची. म्हणजे तिने सांगायचे की टाईम बघ. तेरा टायमिंग गलत हो गया! वो अलग टाईम था. ये अलग टाईम है. शाळा कॉलेजपासून सगळ्या ठिकाणी लेट पोहचत असला तरी असा दणका त्याला पहिल्यांदाच मिळालाय असा विशेष खुलासा करायचा. मग ह्युमर टाकायचा. मुलाला घड्याळाची दुकानं पालथी घालायला लावायची. तुम्हाला काय वाटलं? परत दुसऱ्या मुलीकड पाठवू आपण त्याला? मग शहाणा म्हणाल की त्याला तुम्ही? असं नाही करायचं. दुसऱ्या मुलीला तटस्थतेतून जागं करायचं. पहिल्या मुलानं अकलेचे धिंडवडे काढलेले बघून तिनं तरीही त्याला परत यायची ऑफर द्यायची. आणि मग हे इथंच सोडायचं. लोकांना कुतूहल वाटलं पाहिजे की! म्हणजे पहिला मुलगा अक्कल थोडी वापरणार की अखंड असाच गुळ काढत बसणार याचं!
तेव्हा इकडे दुसऱ्या मुलाला हळू हळू पहिल्या मुलीच्या प्रेमात पडायचं. (नीट वाचत नाही बा तुम्ही राव. मगाशी दुसऱ्या मुलाचे प्रेम आहे असं थोडीच म्हणालेलो आपण? फक्त मुलीलाच प्रेमात पडलेलं की नाही?). मग सरसकट सगळ्याचाच आवाका वाढवायचा. प्रत्येक पत्राला अधे मधे जग हिंडावंयचं. अगदीच intense इमोशन हव्या असतील तर सगळ्यांना तसंही वेगवेगळ्या भागात राहायला पाठवायचं. तात्विक प्रेम आहे असं म्हणू हवं तर. उगाच सगळे एकत्र कशाला हवेत? तसंही आपली युनिक आहे की नाही ष्टोरी? ग्लोबल विलेजचा मुद्दा मांडायचा. पहिल्या मुलाला तसंही गुळ काढत बसायला आवडतच की. त्याच्या तोंडून अधे मधे तत्वज्ञान वदवायचं. (अहो रेड्यानं देखील गीता म्हणालेलीच की!)
आता या नंतर दोन तीन पर्याय ठेवायचे शेवट करण्याचे.
प्लीज. पहिला मुलगा पहिली मुलगी नाही एकत्र येऊ शकत. कारण ष्टोरी पेशल आहे आपली. ते सोडून विचार करू. तसंही आपल्याला हे सगळं एकत्र आणताना खूप सारा त्याग आणि खूप सारं तत्वज्ञान दाखवायचंय.
एक lite version असं असू शकतं.पहिल्या मुलाने परत दुसऱ्या मुलीकडं जायचं. जैसे थे.
पहिल्या मुलीनं दुसऱ्या मुलाकडं जायचं. जैसे थे.
आपण कसे थिरथिरे नाही हे दाखवून द्यायचं.
पहिल्या मुलानं पुढे जाऊन गुळाच्या बिजिनेस मध्ये invest कारचं.
पहिल्या मुलीनं पुढे जाऊन घड्याळाच्या बिजिनेस मध्ये invest करायचं.
मग standard version असं असू शकतं.पहिल्या मुलीनं टायटनची brand ambassador व्हायचं. माघारी फिरायचंच नाही. दुसऱ्या मुलाकडं घड्याळ जरी असलं तरी ते स्लो चालतंय याच्याबद्दल काहीतरी जागतिक प्रयत्न करवून आणायचे.
पहिल्या मुलानं गुळाच्या ढेपा बनवायचा लघुद्योग सुरु करायचा - बाबाजीका ठुल्लू गुळ केंद्र!
दुसऱ्या मुलानं thanks giving ला स्वस्तात iPad मिळाल्यासारखं खुश व्हायचं आणि दुसऱ्या दिवशी नेहमीच्या कामाला लागायचं.
दुसऱ्या मुलीनं अचंभित होऊन सगळीकडं बघायचं आणि शहाण्या माणसानं यांच्या नादी लागू नये असं म्हणून शहाण्यासारखं यातून बाजूला व्हायचं.
मग premium version असं असू शकतं.पहिल्या मुलीनं टायटनची brand ambassador व्हायचं. माघारी फिरायचंच नाही. पुढे रोलेक्स घड्याळवाल्याबरोबर टायमिंग साधायचं.
दुसऱ्या मुलानं thanks giving ला स्वस्तात iPad न मिळाल्यानं फारसं नाखुश नाही व्हायचं आणि दुसऱ्या दिवशी नेहमीच्या कामाला लागायचं.
पहिल्या मुलानं गुळाच्या ढेपा बनवायचा लघुद्योग सुरु करायचा - बाबाजीका ठुल्लू गुळ केंद्र!
दुसऱ्या मुलीनं गुळ केंद्राला भेट देऊन पहिल्या मुलाला थोडी अक्कल शिकवायची. आणि शेवटी परत अचंभित होऊन शहाण्या माणसानं यांच्या नादी लागू नये असं म्हणून शहाण्यासारखं यातून बाजूला व्हायचं.
मग gold version असं असू शकतं.एकदम गोव्यामध्ये जायचं. चौघानाही बिड्या फुकत, दारू हाणत, बीचवर हिप्पी झालेलं दाखवायचं!
मग limited version असं असू शकतं.
चौघांनी मिळून विपश्यना करायला जायचं!
Saturday, January 04, 2014
Rewind
I missed the lake today. सकाळी उठलो तेव्हा गाडी काढून लेकवर जाऊन यावं असं वाटलं. अमेरिकतल्या ज्या काही थोड्या गोष्टी मिस करतो, त्यातली ही एक. माझ्याबरोबर असलेल्या प्रत्येकाला किमान एकदा तरी मी तिकडे घेऊन गेलोच होतो. पुढच्या वेळी त्यांच्यापैकी कोणी असायचे नाही बरोबर, हा भाग वेगळा. खूपवेळा कुठल्याशा पार्ट्यांना जायचे टाळून मी एकटाच लेकवर जाऊन बसायचो. किंवा सकाळी बाकी लोक उठायच्या आत चक्कर मारून यायचो. It was always peaceful. It was always soothing. एक थकेला कॅफे होता बाजूला. तिथे चुकून कधीतरी कधीतरी काहीतरी घेतलं असेल. तिथल्या walking trails ना, बेंचेस ना, काठावरच्या बाकड्याना माझी आठवण असावी. लेकवर बहुदा एकटाच जायचो पण तरीही लेकवर एकटं नाही वाटायचं.
एखाद्या ठिकाणाशी काहीही कारण नसताना जवळीक होते, तशातली ही लेक होती. Love at first sight! लेकच्या बाजूची walk, किंवा मध्यरात्री Stanford University वर मारलेला फेरफटका, या गोष्टी माझ्या स्वतःच्या होत्या. माझ्या हक्काच्या. US वरून तुझ्यासाठी काय आणू, असं विचारलं कोणी तर मी या दोन गोष्टी नक्की सांगेन.
एखाद्या ठिकाणाशी काहीही कारण नसताना जवळीक होते, तशातली ही लेक होती. Love at first sight! लेकच्या बाजूची walk, किंवा मध्यरात्री Stanford University वर मारलेला फेरफटका, या गोष्टी माझ्या स्वतःच्या होत्या. माझ्या हक्काच्या. US वरून तुझ्यासाठी काय आणू, असं विचारलं कोणी तर मी या दोन गोष्टी नक्की सांगेन.
Wednesday, December 18, 2013
The Glass Window
I am standing at the glass window, staring at the darkness outside. I stand here often. I have been doing it since I started living here. I think I am a savior! I think I am born to save something or someone from somebody … somehow! I am waiting for things to happen around me so that I can accidentally turn into the hero that everyone ever wanted! Or maybe I am supposed to know something … about something … that nobody ever knew about! I continue to stare outside. It’s darkness everywhere. I have hope but it’s a hopeless land.
I never saw anything magnificent outside!
No gigantic creature emerged out of nowhere!
No spaceship landed!
I never even saw any superhero swinging around here!
Nobody ever saved the world here! They don’t even save water!
I never saw anyone going around finding any clue to solve any mystery!
There is rather no mystery here other than absence of any mystery!
No ghost ever found this as an attractive place!
Nobody’s secret is guarded here!
There is no music played on my entry of exit from anywhere in any angle!
But I have hope. I am sure things will change. Someday, this window will break. Real things will be visible and hero will emerge.
I continue to stare at windows 8 now!
yawndarkness continues!
I never saw anything magnificent outside!
No gigantic creature emerged out of nowhere!
No spaceship landed!
I never even saw any superhero swinging around here!
Nobody ever saved the world here! They don’t even save water!
I never saw anyone going around finding any clue to solve any mystery!
There is rather no mystery here other than absence of any mystery!
No ghost ever found this as an attractive place!
Nobody’s secret is guarded here!
There is no music played on my entry of exit from anywhere in any angle!
But I have hope. I am sure things will change. Someday, this window will break. Real things will be visible and hero will emerge.
I continue to stare at windows 8 now!
yawndarkness continues!
Saturday, November 16, 2013
Shampoo and Biscuits
"... ...
So Sachin won a match, and he got hundreds of thousands! My brother almost died on the border while saving a village! He got nothing. He got nothing because his name can't sell a shampoo or biscuit! So no one was interested in paying him. I voiced this, and they said I was being dramatic!They asked for a proof if my brother really is in army! Is this why people study and get smarter? to question people? They really asked me proofs, believe me. And I am dramatic when I talk about my brother. My brother is earning pride. So is my entire family. He made his choice to go to army and fight for the country. He is happy there. He never complained about money, nor is he short of it. But I feel bad for him. Sachin hits a sixer and every one cheers. Entire nation cheers. My brother and his troop, hit a terrorist, no one cares. They take a bullet and no one screams. Sachin is given out. And the nation gets hurt!
Well, I like Sachin too. Why would I hate him?
It's not only about the imbalance of recognition. It's about ignorance too.
Many people in my neighborhood say, we all should go and live abroad. There is nothing left in this country. Then what is my brother protecting? Why do they all ridicule the whole purpose of the life of my brother? Why not call my brother back right away? Let them all come back. But my brother doesn't care about it all. He says, there are people who think like that, who say like that. There are cynical people. But they don't make a country. They make nothing. There are people who invent things, solve problems, help others, inspire many. They make the country. One ought to focus on the bright side and protect it. It's a skill. Our country needs you to have it.
I say, he isn't aware of the darkness here. Or I never understand the brightness that he sees.
I want respect for him and his troop. Because the country doesn't run on shampoo and biscuits."
It was one of my colleagues, on this bhaubij. While leaving, she said, "Well, He likes Sachin too." as always, it was followed by her priceless smile.
So Sachin won a match, and he got hundreds of thousands! My brother almost died on the border while saving a village! He got nothing. He got nothing because his name can't sell a shampoo or biscuit! So no one was interested in paying him. I voiced this, and they said I was being dramatic!They asked for a proof if my brother really is in army! Is this why people study and get smarter? to question people? They really asked me proofs, believe me. And I am dramatic when I talk about my brother. My brother is earning pride. So is my entire family. He made his choice to go to army and fight for the country. He is happy there. He never complained about money, nor is he short of it. But I feel bad for him. Sachin hits a sixer and every one cheers. Entire nation cheers. My brother and his troop, hit a terrorist, no one cares. They take a bullet and no one screams. Sachin is given out. And the nation gets hurt!
Well, I like Sachin too. Why would I hate him?
It's not only about the imbalance of recognition. It's about ignorance too.
Many people in my neighborhood say, we all should go and live abroad. There is nothing left in this country. Then what is my brother protecting? Why do they all ridicule the whole purpose of the life of my brother? Why not call my brother back right away? Let them all come back. But my brother doesn't care about it all. He says, there are people who think like that, who say like that. There are cynical people. But they don't make a country. They make nothing. There are people who invent things, solve problems, help others, inspire many. They make the country. One ought to focus on the bright side and protect it. It's a skill. Our country needs you to have it.
I say, he isn't aware of the darkness here. Or I never understand the brightness that he sees.
I want respect for him and his troop. Because the country doesn't run on shampoo and biscuits."
It was one of my colleagues, on this bhaubij. While leaving, she said, "Well, He likes Sachin too." as always, it was followed by her priceless smile.
Friday, October 18, 2013
सहज आठवलं म्हणून ...
आठवणीतल्या काही गोष्टी. काही ऐकीवातल्या. काही अनुभवलेल्या. काही बनवलेल्या. पण काहीतरी सांगून गेलेल्या. किंवा बरेच प्रश्न टाकून गेलेल्या. अशातलीच ही एक.
पुण्यातून मुंबईमध्ये कामासाठी जात होतो. Express Way सुरु व्हायचाच होता. हिंजेवाडी ब्रिज ओलांडला. संध्याकाळी परत येताना या इथेच गाड्या तुंबून काय हालत झालेली असेल याचा विचार आला. उगाचच उजवी भुवई वर आणि डावा डोळा लहान करून स्वतःशीच नाराजी व्यक्त केली. उगाच चीप चीप आवाज करत ड्राईवरला विचारलं, "तुला काय वाटतंय? कसं सुरुये सगळं आपल्याकडे एकूणच? काय होईल?"
"वाट लगा है देश का! हे नाही होत. ते नाही होत." असं आपल्यासारखंच काहीतरी बोलेल असं वाटलेलं मला. असलं बोलत, घरी किंवा ऑफिस मध्ये बसणं हाच असतो की आपला विरंगुळा.
"मस्त सुरुये सगळं!" तो म्हणाला.
"मस्त सुरुये?"
"हं!"
"पूर्वी ५-६ तास लागायचे या रस्त्यावरून मुंबईला पोचे पोचेपर्यंत. आता २-३ तास लागतात. तेव्हापासून चालवतोय गाडी मी. आणखी ३-४ वर्षामध्ये, साहेब, सिंगापूर होईल इथे!"
"किती तास चालवतोस गाडी दररोज?"
"कमीत कमी १२ तास तरी होतातच"
"कमीत कमी?"
"हो. त्यावर एक तास जरी झाला तर ज्यादा पैसे मिळतात."
"किती?"
"प्रत्येक तासाचे पन्नास रुपये."
"इतका वेळ बाहेर असतोस?"
"घर बैठके क्या है साहब? पैसा बहार है! देश तो आगे बढ राहा है, घर बैठा तो पीछे रेह जाऊंगा."
This is where the country is heading. Either with us. or without us! and this driver could see it. Can we?
Saturday, October 12, 2013
They are doing a fine job. Because we are not!
I was honored to stand in front of more than 20 politically active people and talk about how technology can be used in politics and governance. It was an interesting exercise and different experience to me. Should I say quite an eye opening? Let me leave aside the technology topic for a discussion some other time and share a realization I had during the event. Believe me it was quite revealing!
All the people sitting in front of me were either MLAs, local leaders or somehow associated to them. They came from almost all political outfits active in Pune. I had my own bias against politcs and politcal leaders like all (in)active citizens have. I don't want to name any party in particular but people sitting in front of me were all very confident that they were doing a genuinely good job! There was not a single doubt in anyone's mind. They all were crystal clear and the confidence was evident from every sentence they uttered. Wow! Until then, I was very confident that there is none out there who is doing a good job. At times, I also went to an extent, that I felt they all know it that they are not doing a good job but it's just that they don't want to do it either! And here they were right in front, all in one room. Each one of them super confident and proud of their work in individual areas! Quite revealing disconnect it was!
I generally have "opinions". I have opinions about almost everything. I love to write about it, tweet about it, crib about it. Rarely do I move out of our chair to really ask the questions to the right people, nor do I get such chance. But let's face it. Let's agree that not getting a chance to ask the questions to right people, can not be the reason for not getting out of chair and finding them out! Let's agree that by liking some post alone, or by tweeting alone, no kranti is going to happen! If anything, it perhaps is self-ego satisfaction than anything else. My neighbor comes to me and asks me authoritatively every time there is a candle march, if I tweeted of liked some facebook page. If my answer is negative, he gives me a look full of disgrace! Now lately, I have been regular in doing social activism or social self ego massaging! But let's agree, it ain't good for anyone! It affects nothing! It all flashed in my mind while I was standing there.
I was standing in front of the people who believed they were doing a good job, whom I believed never did anythign good. (It was like an appraisal situation where your manager feels that you have done nothing and you feel that you have almost moved the mountain! Here the roles were slightly reversed). Of course, I could not directly ask them since it wasn't Facebook or twitter, and they were actually there to hear it. Man, you got to compose a lot of things in mind before actually asking a question. World was a lot easier when it was only about posting on social media! It sure takes some guts to ask what you want to ask when you have a chance to ask. I posed an indirect question to all of them and was very sure I am either going to be out of my job or out of city if it goes wrong. The answer was very simple though. Because they were always clear.
For all of them, I, part of the educated mass, was silly, unorganized, and an unclear fool. They exactly knew their "vote bank". They did everything for them. They were available literally 24x7 for them. They facilitated, gas connection, electricity, pan card, blood donation, travel assistance and what not to them. The entire crew was always available to sort out the local disputes. They almost knew everyone by name, and each one from their "vote bank" knew them! They were the "goto" guys for every problem and need. Why wouldn't they feel that they are doing a good job? I was proudly never part of it. I was never heard. I never knew such thing existed. For them, I was someone who gathers somewhere, and makes noise about something that can not be heard. Even if I praised, it never reached them.
They don't care about me. That's why I never vote. Because I don't vote, I never matter to them. Because I don't matter, they never care about me.
Do I support the local political leaders creating a parallel governance by bypassing the system and becoming the "goto" person for all the needs? Do I support what's happening out there? Well, it's the later stage of discussion. Let's at least be there to start with. I definitely not support not voting! It's our responsibility to vote.
I just did my voter registration.
They are doing a fine job. Because we are not.
If they are really good, let's not be unfair calling them all useless. If they are not, let's all really be there and be the part of governance. Write back, if you need help in getting registered. It's not that difficult. Let's be aware. Let's make others aware.
... and yes, I am also sad, that there is no Sachin anymore in the cricket!
Thursday, October 03, 2013
Follow the rule!
परवा गुजारीश पहिला. एक तर मला कळत नाही की असले त्रासदायक सिनेमे काढतातच कशाला? असो. पण त्याबद्दल नंतर कधीतरी. च्यायला डोक्यात किडा सोडून गेला न पण हा सिनेमा!
इच्छामरण हा आता पुष्कळ वेळा चघळून झालेला विषय आहे. जगण्याची इच्छा. Spirit of living. हे सगळं ठीक असलं तरी, एखाद्या भाजीपाल्यासारखं १४-१५ वर्ष जगत आलेला इथन. त्यातूनही तमाम जनतेला आयुष्य कसं छान आहे असा आशावाद शिकवणाऱ्या पण स्वतः हालचाल करू न शकणाऱ्या इथनला स्वतःसाठी इच्छामरण मागताना झालेला त्रास. लोकांनी समजून घेण्याच्या पलीकडे असलेल्या त्याच्या समस्या. जगण्यावर त्याने मिळवलेला विजय, कल्पनेच्याही पलीकडचा. आणि म्हणून हक्काने मरण मागणारा त्याचा चेहरा खूप वेगळा वाटतो. त्याच्याइतकं आयुष्य कोणालाच कळलं नाही. असंही वाटतं. इतके सगळं करून त्याला लाचारपणे जज्जकडे मृत्यू मागवा लागतो. मला हाच मोठा अन्याय वाटला. अपमान वाटला. कोणाला पटवायची गरज का भासावी? माझं आयुष्य. मी जगलो. तुम्हा सर्वांच्या शतपटीने जास्ती चांगले जगलो. तेही भयंकर प्रतिकूल परिस्थितीमध्ये. आता मला तुम्हाला स्पष्टीकरण का द्यावे लागावे? ज्ञानेश्वरांनी कोवळ्या वयात समाधी घेतली. आजच्या काळात, त्यानाही कोर्टामध्ये उभे केले असते. "लिहिलास बाळा ज्ञानेश्वरी. मग? शहाणा झालास? समाधी हा ऑप्शन आमच्या घटनेमध्ये नाही. त्यामुळे तुला पुढे जगावे लागेल. तसेही १०+२+४ असले pattern असतात आमच्याकडे. तू इतक्या लवकर सगळं शिकूच शकत नाहीस. तुला पुढच्या इयत्तेमध्ये प्रवेश दिलंच कोणी?" असलं नक्कीच झालं असतं.
आता ज्ञानेश्वर आणि इथन एकाच तराजूमध्ये तोलाण्यासारखे विषय नाहीच आहेत. इथनचा विषय जरा नाजूक आणि वेगळा होता. खूपच इथनचा स्वतःचा होता. त्याचा सरसकट नियम होऊ शकत नाही. किंवा मला तसं सुचवायचंही नाहीये. पण खटकलेली बाब म्हणाल तर त्याला कोर्टात जाऊन आपली केस लढवण्याची. तीही अश्या लोकांसमोर की ज्यांना काडीचीही कल्पना नाहीये त्याच्या आयुष्याबद्दल! काल्पनिक गोष्टीचा इतका उहापोह कशाला? हे जरी खरं असेल तरी थोड्या फार फरकानं असल्याचं गोष्टी मला खूप ठिकाणी दिसू लागलेत! म्हणून असले सिनेमे बनवूच नयेत. च्यायला नंतर हा त्रास! इच्छामरण म्हणजे, एखाद्याच्या पीडा थांबवण्यासाठी त्याच्या मागणीनुसार डॉक्टरने त्याचे आयुष्य संपवणे. हा कायदा होऊ नये, याला खूप बाजू आहे. खूपशा धर्मांनाही मान्य नाहीये हे. कायदा म्हणतो की याचा खूप मोठा गैरवापर होऊ शकतो. आणि म्हणून असला कायदा आम्ही करणारच नाही. किंबहुना असलं काही नाहीच करायचं असा कायदा करणार. म्हणजे कोणी विचारही नाही करायचा याबद्दल!
काही अंशी बरोबरही असेल हे. पण गैरवापर करणाऱ्या लोकांना पकडणे आणि वेसण घालणे तितकेसे सोपे नाहीये. म्हणून सब घोडे बारा टक्के म्हणून नियम लावायचा? शेवटी कोणाचंतरी भलं व्हावं म्हणूनच नियम बनवायचे न? मग अरे ते नियम न पळताही कोणाचं भलं होत असेल तर नियम पाळण्याचा अट्टाहास का? हे असंच नियमात गुराफाटायचं आपण की त्यामागच्या माणसाला समजून घ्यायचं? कोणी सुखी होवो न होवो, शेवटी नियम पाळल्याचे सुख! घरी जाऊन शांत झोप आली पाहिजे न! एक वकील मित्र म्हणाला, "माणूस म्हणून सगळं पटतंय पण एका व्यवस्थेचा भाग आहोत आपण. एकदा नियमाला फाटा दिला की मग शंभर लोक हात वर करतात. त्यांना कोण निस्तरणार?" म्हणजे जास्तीचे काम आणि अवघड प्रश्न नकोत म्हणून केलेली पळवाट आहे का ही? की मला कायद्याचं ज्ञान कमी आहे म्हणून मला एकट्यालाच असं वाटतंय?
इच्छामरण हा विषय गंभीर आहे. अशा १-२ पान खरडून त्यावर करण्यासारखा नाहीये. पण एकूण आपली अशी प्रवृत्ती खूप दिसून येते. एकानं चूक करायची आणि मग बाकीच्या साऱ्यांवर नियम लादायचे! असे बनवतो आपण नियम! बऱ्याच वेळा चूक करायचीपण गरज नसते. "कोणीतरी चूक करू शकेल" हे इतके पुरेसे असतं! शाळेत असताना हक्क आणि कर्तव्ये यावर नागरिक शास्त्रामध्ये एक धडा होता. उदाहरणार्थ गाडी चालवण्याचा आपल्याला हक्क आहे, पण लोकांना त्रास होईल इतका आवाज करत न जाणे, किंवा वेडेवाकडे न जाणे, हे आपले कर्तव्य आहे. आपण हक्क मिळाले की मोकाट सुटतो. आणि मग नियम लावावे लागतात. आपण सगळेच नसू पण आता एखाद दुसरा नक्कीच नियम धाब्यावर बसवतो. दिलेल्या हक्कांचा, मुभेचा गैरवापर करणं इतकं गृहीत पकडलंय की कोणी गैरवापर करण्याच्या आधीच हजार प्रकारचे नियम बनतात.
आता बघा. माझे तिच्यावर प्रेम आहे. आम्हाला लग्न करायचे आहे. तर मग आम्ही लग्न केलं हे मी कोण्या काळ्या कभिन्न आणि अंधारात बसलेल्या माणसासमोर का सिद्ध करायचं? तेही फोटो आणि राशन कार्ड दाखवून? कारण त्या हापिसातल्या बाईने सही शिक्का मारला नाहीतर तुम्ही दोघे शादीशुदा कसे? त्याचच दुसरं टोक. आता आम्ही दोघानी ठरवलं की बाबा आपलं काही जमत नाही आता आपण वेगळे होऊ! तेही असं लगेच होत नाहीच. तर इथेपण तुम्हाला कोर्टात जाऊन सिद्ध करावं लागतं! इथेही मिया बीबी राजी, वगैरे काही चालत नाही! पाच सहा महिने चकरा माराव्याच लागतात. हे हास्यास्पद नाहीये का? म्हणजे आधी लग्न करताना चकरा मारायच्या कागद रंगवण्यासाठी, आणि मग त्यातून मोकळे होताना परत चकरा मारायच्या ते कागद खोडण्यासाठी! मग मुळात ते कागद बनवलेच कशाला? त्यांचा सबंध काय? त्याशिवाय काय आम्ही सुखी राहिलोच नसतो का काय? लग्नव्यवस्था आणि त्याचे फायदे तोटे हा विषय खूप मोठा आहे. पण तिथेही सब घोडे बारा टक्के केलेच आहे आपण! मला त्याचं नवल वाटतं!
एका टळटळीत दुपारी. एका कोपऱ्यातल्या चौकात, जेव्हा कोणीही कुत्रा नव्हता, तेव्हा माझ्यासमोरचा लाल सिग्नल मात्र माजोरड्यासारखा सुरु होता. थोडावेळ थांबलो, आणि मी डावीकडे वळलो. समोर पोलिसाने पकडले. म्हणाला तुम्ही सिग्नल तोडलाय. पैसे भरा. मी म्हणालो. अरे भल्या माणसा. इथं कोणाचं नुकसान झालंय? कोणाला धोकातरी होता का? तुमचा सिग्नल नको हुशार इतका की समोरचे ट्राफिक बघून सुरु बंद व्हायला? आणि असे असतातही सिग्नल! पोलीस म्हणाला, साहेब, उगाच शहाणपणा शिकवू नका. लायसन्स ठेवून द्या. नंतर येऊन साहेबाना स्टोरी सांगा! मी म्हणालो, अरे बाबा, तू बघ न विचार करून! की तेही साहेबच करणार? मी नाहीच तोडत सिग्नल. पण इथे चिटपाखरू नाहीये. मी नेकीमध्ये थांबलोपण सिग्नल वर. पण निरर्थक आहे ते! गाढवपणा नाही का हा? ते मशीन म्हणालं थांबा तर आपण थांबायचं? तुमचं मशीन चूक आहे. मागासलेलं आहे. ते कधी दुरुस्त करणार? अंदाधुंद कारभार असू नये. शिस्त असावी. हे मलाही माहिती आहे. शेवटी नियम जो केलाय तो लोकांच्या सुरक्षिततेसाठीच केलाय न? आणि जेव्हा इथं तुंबल्यासारख ट्राफिक असतं, तेव्हा गरज आहे न शिस्तीची! आणि मी माझ्या सहकाऱ्यांनाही सांगतो तेव्हा नियम पाळायला! पण हे आत्ता काय? इतकं बोलल्यानंतर पुढं काय झालं हा वेगळा विषय. उगाच नियम म्हणून नियम पाळण्यात काय अर्थ? यालाच अंधश्रद्धा नाही का म्हणायची? अक्कल गहाण ठेवायची, आणि नियम पळत सुटायचे! म्हणायचं की हे असच असतं आणि तुलापण असच कराव लागेल! पटो. किंवा न पटो.
ज्या लोकांच्या भल्यासाठी नियम बनवलेत त्या लोकांचे आता भले झालंय. आता नियम बंद करा. हे ही आपण नाही करणार! किंवा त्या नियमाने कोणाचेच भले होते नाहीये. आता नियम बंद करा! हे ही आपण करणार नाही! थोडासा नियमांना बाजूला ठेवून खरच भलं करायचा विचार करूया? तेही आपण करणार नाही!
हे इतकं क्लिष्ट कधी करून ठेवलं आपण हे सगळं? सगळं सोपं गणित असावं. काय बरोबर काय चूक. हे सहसा अवघड नसतच. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आपण समजूतदारपण दाखवायला सुरु केला की कदाचित कधीतरी मोठ्या मोठ्या गोष्टींची गणितं पण सोपी होतील. आता माझी एक मैत्रीण म्हणते की गणित म्हणालं की ते कधी सोपं असूच शकत नाही! कदाचित ते खरं असेल! काय सांगा!
* Euthanasia (इच्छामरण) चे तीन प्रकार आहेत. एक म्हणजे स्वतः मागीतालेले मरण. हे बेल्जियम, नेदरलंड आणि लक्सेमबर्ग या देशांमध्ये आणि अमेरिकेच्या काही राज्यांमध्येच कायद्याने मान्य आहे याला assisted suicide असंही म्हणतात. दुसरा प्रकार म्हणजे, जेव्हा माणूस स्वतःचं मत व्यक्त करू शकत नसेल, तर त्याच्या नातेवाईक किंवा जवळच्या लोकांनी मागितलेले मरण. हे सर्व देशांमध्ये कायद्याने अमान्य आहे. अपवाद, नेदरलंडमधे केवळ नवजात शिशुसंदर्भात हे वापरले जाते, तेही खूप विशिष्ठ केसमध्ये! तिसरा प्रकार म्हणजे, जेव्हा माणूस आपलं मत व्यक्त करू शकत असतानासुद्धा, त्याला अंधारात ठेवून, किंवा धोक्याने मारणे. याला आपण हत्या म्हणतो. एकूणच इच्छामरण दोन प्रकारे करतात. एक म्हणजे, औषधोपचार बंद करून. आणि दुसरे म्हणजे ठराविक औषधं जादा प्रमाणात देऊन! इंटरनेटवर यासंदर्भात खूप NGOs नी आणि वैद्यकीय संस्थांनी दिलेली माहिती आढळते. यासंदर्भात कायदा सशक्त व्हावा म्हणून खूप प्रयत्नही सुरु आहेत. But I am sure they also have to go and convince so many totally unrelated, and uninterested people about this very important topic, before they actually reach the decision maker! It's so unfair!
Friday, September 20, 2013
प्रगतीच्या मार्गावर ... प्रेमाचा सुळसुळाट!
“मला love stories आवडत नाहीत! मला “I hate love stories” हा सिनेमाही आवडत नाही! हे प्रेमाचा भडिमार करणारे जे कोणी लोक आहेत न, ते सगळे खरे अतिरेकी आहेत! किती अरे त्रास द्यावा? त्याला काही प्रमाण? काही करा न करा, पण प्रेम कराच! बारा महिनेमे बारा प्रकारे करा. प्रेम केला नाहीत तर काहीच केला नाहीत! आयुष्यात काही करण्यासारखे असेल तर प्रेमच! प्रेम म्हणजे सर्वस्व. शेजारी पाजारी, कलीग, मित्र, मैत्रिणी, रस्त्यावर गर्दीमधले लोक, तो होर्न मारणारा काळा जाकेटवाला, सिग्नल तोडलेल्या बरोबर मांडवली करणारा पोलीस, किराणामाल वाला दुकानदार, करच्या दारावर टकटक करणारे भिकारी, हे सगळे तुम्ही नजरेआड झालात की प्रेमच करत असतात. मग तुम्हीच कसे काय करत नाही? प्रेमाचा विसर पडू देऊ नका. सगळीकडे प्रेमाच्याच आणाभाका घ्या.
आमच्याकडं प्रेम अमर असतं. प्रेम आंधळं असतं. प्रेम लुळं पांगळं पण असतं. कोण म्हणतो प्यार बिकाऊ नसतं? मी तर म्हणतो की प्रेमापेक्षा जास्ती बिकाऊ आणखी काहीच नसतं! प्रेमाच्या विक्रेत्यांचा सुळसुळाट तर पुण्यातल्या कुत्र्यांच्या सुळसुळाटापेक्षा जास्ती असतो! शाम्पू घ्या, तेल घ्या, साबण घ्या, टॉवेल घ्या, दात घासा, पाणी प्या, ज्यूस प्या, चिंगम चघळा, फिरायला जा, गाड्या घ्या, जेवायला जा, कपडे घाला, कपडे घालू नका, चड्ड्या घ्या, रुमाल घ्या, चोकलेट घ्या, बिस्कीट खा, पेन पेन्सिली घ्या, श्वास घ्या, मोबाईल घ्या, फोन करा, फोनची तोबा बिलं भरा, बल्ब घ्या, ट्यूब घ्या, घरं घ्या! आणि प्रेमात पडा. प्रेमात पडायचं असलं तर इतके सगळे अस्सल उपाय आहेत! का? का काय विचारता? का नसतंच विचारायचं. का विचारणारे शहाणे असतात आणि आपण तर हुशार आहोत! आपण कुठे शहाणे आहोत? हे सगळं करा म्हणजे कोणीतरी तुमच्या प्रेमात पडेल, किंवा तुम्ही कोणाच्यातरी प्रेमात पडाल! दिल दिल दिल करत पळत सुटा. “दिल” हरवा, मिळावा, सांभाळा, त्यावर छुरी चालवा, पागल बनवा, त्याची पुकार ऐका, त्याला शिव्या घाला, त्याचं ग्यान ऐका, ऐकू नका, दिल मध्ये कोणा कोणाला बसावा, तिथून हाकलून लावा, ते तोडा, फोडा, पायदळी तुडवा! Exchange offer देऊन त्याचा कुकर आणा! दिल मे दर्द घाला, कंदील घेऊन शोधात बसा. घंटा काही कळत नसेल, तरी दिलचा बोलबोला करत फिरा.
माणसानं नर आणि मादी याहून थोडासा वेगळा विचार केला पाहिजे. असे एकीकडे बोंबलायचं आणि दुसरीकडे मुलगी हुडका. मुलगा हुडका असा भडीमार करायचा! जनावरामध्ये आणि आपल्यामध्ये फरक एवढाच की त्यांना मार्केटिंगचा त्रास नसतो. बाकी हुंगत हुंगत फिरणं हे उपजत असतंच. नावाला आपण प्रगत.
"
एवढं बोलून हुशारला धाप लागते. तो खाली बसतो! हुशार काही प्रगत नाही हे पुराना लोकांना आधीच माहिती असतं. वर तांडव करत, चेहऱ्यावर एवढे भाव आणून तो काय बोलला ते पुराना लोकांना झेपलेलंही नसतं! पण तरीही सगळे दया येऊन टाळ्या वाजवतात! हुशारला शिकार का जमत नाही हा प्रश्न अजूनही अनुत्तरीत असतो. हुशारला आपण एवढं कसं बोललो याचं त्याला आश्चर्य वाटलेलं असतं. शाहरुख खानला 'वो सत्तर मिनिट ...' म्हणाल्यावर कसं वाटलं असेल, हे हुशारला कळलेलं असतं. आपल्याला शिकार येत नाही, हे लपवण्यासाठी आपण केवढा मोठा तमाशा केला, आणि त्यातलं काहीच या लोकांना कसं कळलं नाही, याचा हुशारला आनंदही होतो आणि दुःखही!
... थोड्या वेळा पूर्वी,
हुशारला शिकार येत नाही हे बघून समस्त पुराना लोक चकित होतात. शिकार करत नाही आणि तरीही जिवंत आहे. हट्टा कट्टा आहे. त्यामुळे हा देव वगैरे आहे की काय असंही काही पुराना लोकांना वाटलेलं असतं. पण एकूणच हुशारची हुशारी आणि बोलणं ऐकून, तसं नसेल हेही त्यांना लगेच कळलेलं असतं.
हुशारच्या मित्रवर्गामध्ये “शिकार” या शब्दाचे विशेष अर्थ असतात. हुशार ला अजून कोणी शिकार सापडलेली नसते. पण इथं आपल्या अमुक अमुक मित्राची शिकार कशी आहे आणि त्याने काय काय केलेलं वगैरे सांगून हुशार फुशारकी मारणार असतो पण त्याला वेळीच पुराना लोकांना अभिप्रेत शिकार म्हणजे काय आहे हे कळून तो आपला उत्साहाची शिकार करतो! आणि फक्त मान हलवतो. सकाळी चुकून लवकर उठल्यावर हुशारला बाल्कनीमध्ये कबुतरं आणि क्वचित चिमणी दिसत असते. मग तो विस्कटलेले केस, टी शर्ट आणि चड्डीमध्ये, हातवारे करत त्यांच्या मागे पळत असतो. अशानं त्या पक्ष्यांची पण करमणूक होत असते. तेही म्हणून परत परत हुशारच्याच बाल्कनीमध्ये येऊन दररोज नित्य नियमाने मुक्तपणे घाण करत असतात. तेव्हा इथे पुराना लोकांकडून चुकून शिकार शिकलोच तर काय करायचं हे हुशारनं मनात पक्कं केलेलं असतं. आपल्याला शिकार अजून नाही मिळाली याचा राग खरी शिकार करून काढता येईल, असेही त्याला वाटून जाते. PS3 सोडला तर हुशार कुठेच शिकार सदृश काही करत नसतो.
थोड्या वेळाने हुशारला अभिप्रेत “शिकार” चा अर्थ पुराना लोकाना कळतो. आणि तीही शिकार हुशार कडे नाही हे कळून त्यांना खूप हसू येते. या सगळ्या आदिवासी लोकांवर आपल्याला आधीच इम्प्रेशन मारता येत नाही आणि आता तर यांनी जखमेवर बोट ठेवलं म्हणून हुशार पेटून उठतो. त्याच्यामधला activist जागा होतो!
“स्त्री आणि पुरुष. आणि मग एवढंच प्रेम? त्याच्या छटा असतात की! तुम्हाला काय कळणार म्हणा! तुम्हाला कुठं काय फरक पडतो!..." थोडा वेळ हुशारला काळातच नाही की पुढे काय बोलायचं. "पण खरं सांगू? तुमच्याहून आम्ही जास्ती काही वेगळे नाही या बाबतीत. म्हणजे तुम्हाला तुम्ही जसे आहात तसे मान्य आहात. माहिती आहात. फरक एवढंच आहे की आम्हाला आम्ही अजून तुमच्यासारखेच आहोत हे मान्य नाहीये. माहिती नाहीये, असं म्हणणार नाही. इथं प्रेमाचं पिक येतं. एक गेला की दुसरा भेटतो. दुसरी गेली की तिसरी सापडते. हे सगळं ज्याला जमतो तो भाव खाऊन जातो. आम्हीही अशांनाच भाव देतो. कारण आम्हाला spicy आवडतं! वर आमच्यावर भडीमार होतो. एक ठराविक प्रकारे विचार करण्याचा. ठराविक गोष्टी आवडून घ्यायचा. ठराविक प्रकारे आयुष्य जगण्याचा!
मुळात मला love stories आवडत नाहीत! ...
थोडासा संदर्भ लागलाच तर ... प्रगतीच्या मार्गावर
Tuesday, September 10, 2013
Too busy to do good!
सकाळी सकाळी "पिंकी है पैसेवालोकी", "ताकी हो ताकी, हो ताकी ताकी ताकी रे" अशी आचरट गाणी कानावर पडली आणि दिवस सुरु झाला. मागच्या वर्षी "चिकनी चमेली", "पल्लू के पीछे छुपा के रख्खा है" या गाण्यांनी दिवस सुरु झाला होता. लोकांच्यातला सळसळता उत्साह तर काय सांगावा? त्यावर कलेची ही अशी आराधना. आणि आपली आराधना आजूबाजूच्या प्रत्येकाच्या कानापर्यंत पोचलीच पाहिजे, म्हणून प्रामाणिक धडपड. खूपच पवित्र वातावरण. सकाळी उठल्यापासून, ते आता पुढचे दाही दिवस अशाच भक्तीभावामध्ये न्हाऊन निघणार, या कल्पनेने मी तोंडावर पांघरूण घेऊन आणि आणखी एक तासभर झोपून घेतलो!
आपली सगळी तयारी चोख असल्याने, सकाळी सकाळी दुर्वा आणायला बाहेर जावे लागले. तिथे २ लहान मुलांची बडबड ऐकली. नुकतीच गोकुळाष्टमी झालेली. सोसायटीमध्ये लहान मुलानीपण काही बाही केलेलं. तर या दोघांची स्पर्धा सुरु होती. गोकुळाष्टमी vs गणेश चतुर्थी! त्यातल्या एकाचे स्पष्ट म्हणणे होतं की गणेश चतुर्थी म्हणजे सगळं वरवरचं असतं! गोकुळाष्टमीच जास्ती मजेशीर. असले सडेतोड मतं होऊ घातलेल्या भावी पिढी कडून ऐकून, मी उगाच आजू बाजूला घोटाळलो. "गोकुळाष्टमीला आपल्याकडे कोण आलेलं माहितीये न? आशिकी-२ मधली आरोही आलेली! माझ्या एका फ्रेंड कडे तर बिपाशा बसू आलेली! त्याच्या फ्रेंड कडे आलिया भट आलेली! मागच्या वर्षी तर सनी लिओन आलेली!" च्यायला यांना सनी लिओन कशी काय माहिती? असे विचार करून उगाच आश्चर्य वाटून घ्यायचा प्रयत्न केला. पण नाहीच झालं बुआ आश्चर्य! त्यांचे पुढे सुरूच होते, "गणेश चतुर्थीला काय? फक्त गाणीच असतात. येत कोणीच नाही! कसलं bore!" आता ही असली genuine चर्चा ऐकून मी उगाच मध्ये बोललो. "अरे, गोकुळाष्टमीला कृष्ण येतो आणि गणेश चतुर्थीला गणपती येतो! हे नाही का माहिती तुम्हाला?"
"वेडेच आहात काका. आई म्हणते. देव कायम आपल्या बरोबरच असतो!"
आधुनिकता आणि निरागसता याचा हा अनोखा मिलाप बघून मला पुढचं सुचेना. मी आपल्या दुर्वा घ्यायला निघून गेलो. नेहमीच आपल्या बरोबर असलेल्या देवाला वाहायला की खास आजच्या मुहूर्तावर भेटायला आलेल्या पिंकी किंवा चमेलीला वाहायला हे मात्र मला माहिती नव्हते.
पुढचे दहा दिवस आता गणपतीच्या मूर्तीसमोर चित्र विचित्र नाच बघायला मिळतील. जेवढी म्हणून अश्लील गाणी असतील, ती सगळी वाजतील. रस्त्यावर वाहतूक अडकून बसेल कारण गणपतीला बसायला जागा करून दिलेली असेल. ऑफिस ते घर आणि घर ते ऑफिस जाताना, हे सगळं सहन करत जावे लागेल. आणि असल्या कशाहीमुळे आपल्या धार्मिक भावना दुखावणार नाहीत. कारण धार्मिक भावना दुखवायचे मुद्दे वेगळेच असतात. किंबहुना, यापैकी कशाच्याही विरुद्ध बोलला, तर मात्र खूप लीकांच्या खूप काही भावना दुखावतील!
मला तर खात्री आहे गणपती दर वर्षी परत गेला की जाऊन, टिळकांना १० चाबूक मारत असेल. "ये तुने क्या कर दिया यार!" असे म्हणून!
पण हे सगळे आपलेच दात. आपलेच ओठ. आपणच वाढवलेल्या गोष्टी. आपणच दुर्लक्ष केलेल्या घटना. मग त्या आपणच सुधारावल्या पाहिजेत की.
माझ्या ओळखीचे एक आजोबा म्हणतात, "तुम्हा आजच्या पिढीला सगळ्यात काही न काही खुपत असतं! आणि मग आता तुम्ही याचा कीस पाडत बसणार. शेवटी फार फार तर मेणबत्त्या पेटवाल. त्या उपर काय कराल? एखादी गोष्टी चूक आहे म्हणून ओरडत फिरू नये. एखादी गोष्टी चूक आहे, तर बरोबर काय? ते शोधून काढावे. आणि त्याचा प्रचार करावा! हे थोडीच माहितीये तुम्हाला? चुका हुडकायच्या आणि फेसबुकवर टाकायच्या. या पलीकडे कुठे काय करता तुम्ही?"
थोडासा बदल आपणही करावाच की! जर काहीच बदल करणार नसू आपण, तर मग उगाच पुढच्या वर्षी लवकर या, असं कशाला म्हणायचं गणपतीला?
पण तो ही बिचारा येतो बापडा! पण कदाचित असं नसेल कशावरून की, गणपतीला अजून आशा असेल, काहीतरी बदल बघण्याची?
आपली सगळी तयारी चोख असल्याने, सकाळी सकाळी दुर्वा आणायला बाहेर जावे लागले. तिथे २ लहान मुलांची बडबड ऐकली. नुकतीच गोकुळाष्टमी झालेली. सोसायटीमध्ये लहान मुलानीपण काही बाही केलेलं. तर या दोघांची स्पर्धा सुरु होती. गोकुळाष्टमी vs गणेश चतुर्थी! त्यातल्या एकाचे स्पष्ट म्हणणे होतं की गणेश चतुर्थी म्हणजे सगळं वरवरचं असतं! गोकुळाष्टमीच जास्ती मजेशीर. असले सडेतोड मतं होऊ घातलेल्या भावी पिढी कडून ऐकून, मी उगाच आजू बाजूला घोटाळलो. "गोकुळाष्टमीला आपल्याकडे कोण आलेलं माहितीये न? आशिकी-२ मधली आरोही आलेली! माझ्या एका फ्रेंड कडे तर बिपाशा बसू आलेली! त्याच्या फ्रेंड कडे आलिया भट आलेली! मागच्या वर्षी तर सनी लिओन आलेली!" च्यायला यांना सनी लिओन कशी काय माहिती? असे विचार करून उगाच आश्चर्य वाटून घ्यायचा प्रयत्न केला. पण नाहीच झालं बुआ आश्चर्य! त्यांचे पुढे सुरूच होते, "गणेश चतुर्थीला काय? फक्त गाणीच असतात. येत कोणीच नाही! कसलं bore!" आता ही असली genuine चर्चा ऐकून मी उगाच मध्ये बोललो. "अरे, गोकुळाष्टमीला कृष्ण येतो आणि गणेश चतुर्थीला गणपती येतो! हे नाही का माहिती तुम्हाला?"
"वेडेच आहात काका. आई म्हणते. देव कायम आपल्या बरोबरच असतो!"
आधुनिकता आणि निरागसता याचा हा अनोखा मिलाप बघून मला पुढचं सुचेना. मी आपल्या दुर्वा घ्यायला निघून गेलो. नेहमीच आपल्या बरोबर असलेल्या देवाला वाहायला की खास आजच्या मुहूर्तावर भेटायला आलेल्या पिंकी किंवा चमेलीला वाहायला हे मात्र मला माहिती नव्हते.
पुढचे दहा दिवस आता गणपतीच्या मूर्तीसमोर चित्र विचित्र नाच बघायला मिळतील. जेवढी म्हणून अश्लील गाणी असतील, ती सगळी वाजतील. रस्त्यावर वाहतूक अडकून बसेल कारण गणपतीला बसायला जागा करून दिलेली असेल. ऑफिस ते घर आणि घर ते ऑफिस जाताना, हे सगळं सहन करत जावे लागेल. आणि असल्या कशाहीमुळे आपल्या धार्मिक भावना दुखावणार नाहीत. कारण धार्मिक भावना दुखवायचे मुद्दे वेगळेच असतात. किंबहुना, यापैकी कशाच्याही विरुद्ध बोलला, तर मात्र खूप लीकांच्या खूप काही भावना दुखावतील!
मला तर खात्री आहे गणपती दर वर्षी परत गेला की जाऊन, टिळकांना १० चाबूक मारत असेल. "ये तुने क्या कर दिया यार!" असे म्हणून!
पण हे सगळे आपलेच दात. आपलेच ओठ. आपणच वाढवलेल्या गोष्टी. आपणच दुर्लक्ष केलेल्या घटना. मग त्या आपणच सुधारावल्या पाहिजेत की.
माझ्या ओळखीचे एक आजोबा म्हणतात, "तुम्हा आजच्या पिढीला सगळ्यात काही न काही खुपत असतं! आणि मग आता तुम्ही याचा कीस पाडत बसणार. शेवटी फार फार तर मेणबत्त्या पेटवाल. त्या उपर काय कराल? एखादी गोष्टी चूक आहे म्हणून ओरडत फिरू नये. एखादी गोष्टी चूक आहे, तर बरोबर काय? ते शोधून काढावे. आणि त्याचा प्रचार करावा! हे थोडीच माहितीये तुम्हाला? चुका हुडकायच्या आणि फेसबुकवर टाकायच्या. या पलीकडे कुठे काय करता तुम्ही?"
थोडासा बदल आपणही करावाच की! जर काहीच बदल करणार नसू आपण, तर मग उगाच पुढच्या वर्षी लवकर या, असं कशाला म्हणायचं गणपतीला?
पण तो ही बिचारा येतो बापडा! पण कदाचित असं नसेल कशावरून की, गणपतीला अजून आशा असेल, काहीतरी बदल बघण्याची?
आता आपण त्याला किती काळ ताटकळवत ठेवायचं हे आपल्यावर अवलंबून. Perhaps, we all are too busy to do good things!
गणपती बाप्पा मोरया!
गणपती बाप्पा मोरया!
Subscribe to:
Posts (Atom)





