Friday, May 08, 2015

evolution

It's been many days
and I have been thinking
such a great species we are
aren't we really?

We have been given five senses
which perhaps we never demanded
but we have them now
like the gift we never wanted

But hey, they make us special
or different, if I may say
who else has them all like the way we have them anyway

We use them all and use them more,
We grow with them and make them better

this was supposed to be the idea and was supposed to work tight
but it came with no instruction manual so we can't blame anyone right!

so this is what we did instead.

We glued our eyes on something called as LCD
24 x 7 and made that our world - 5 inches, 14 inches, 32 inches or whatever it maybe

We pushed buds inside the ear
and created fashion to make them look cooler
Noise cancelling is what we like more
because it cuts us off from outside clutter

We stand in a queue, but don't like anyone near
to clean our hands now we prefer touchless dryer
touch is only for the screens which by the way feels nothing,
so we invented technology to make it feel better

We are great foodies, and we love junk the most
we don't mind about the taste but calories matter more

What about the smell, it's just there
We know perfumes and farts just to be sure
that ends it all, all our abilities
such a sensible people with senses gone mild

But hey ... we are advanced species
don't doubt us yet
though we announce at public places
DO NOT TRUST THE STRANGERS

But we have so much got this logic of senses alright
look at this now
we created something and called it a machine,
one thing we did, we taught them the might

We took a liberty
and made them see,
We made them touch, and made them feel,
and today when they started talking to each other and we called it IOT!

Aren't we smart? You bet now we are
because we made the senses evolve
wasn't that the idea? to use them n grow

We may not talk
or may not collaborate
but machines would do it
and we will celebrate

We know one thing,
to grow is to delegate
and that's what we did
the evolution is outsourced
so we can forget

Wednesday, April 01, 2015

मै आजाद हू रे बाबा!

स्वातंत्र्याच्या नावाखाली गाढवपणा करून दाखवायचा. मग आपल्या गाढवपणाला गाढवपणासारखं ट्रीट केलं की खवळून उठायचं. हा गाढवपणा करताना फुकट मिळालेलं लाख मोलाचं "स्वातंत्र्य" वापरलं! म्हणून गाढवपणाच्या बाजूने नसलेले सगळे लोक, थेट स्वातंत्र्याच्या विरोधात उभे कारायचे! आणि मग त्यांची मुबलक अक्कल काढत बसायचं. इंटरनेट आहे आपल्याकडं. मग जगाच्या पाठीवर अजून कुठे कुठे गाढवपणा घडलाय याचे दाखले द्यायचे. आणि इतके सगळे दाखले असताना अजून गाढवपणाची सवय कशी काय झाली नाही यावर शाब्दिक कचरा करायचा. हा कचरा कमी पडेल का काय म्हणून कदाचित मग सगळ्यांनी मिळून "गाढवपणा"ची व्याख्या लिहावी असा हट्ट करायचा. त्यात तुमची व्याख्या बरोबर की आमची बरोबर असं करत करत इंच इंच लढवायचा! हे सगळं खूप हस्यास्पद करून सोडलं की मग काही काळानं आपला गाढवपणा जनरलाईज करायचा आणि आमच्याकडे कसे सगळे अजून गाढवच आहे हे गावभर कोकलत सुटायचं. कारण आपण स्वतंत्र आहोत. आणि व्यक्त होणं हा आपला हक्क आहे. आणि तो आपण मिळवलाच पाहिजे.

...

हे असं करणारी भटकी जमात हल्ली बऱ्याच ठिकाणी आढळून येते. स्वातंत्र्य, व्यक्ती स्वातंत्र्य, आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य यांचे आपापल्या सोयीनुसार अर्थ लावून रस्ता भटकलेले हे लोक.

ज्या उत्साहाने यांना गाढवपणाची व्याख्या करत बसावं असं वाटतं, हक्कांवर गदा आल्याचा भास होताच पोट तीडीकीने सगळ्यांची अक्कल काढावी असं वाटतं, त्याच उत्साहानं यांना कधीतरी परत शाळेमध्ये जाऊन १५ मार्काच्या नागरीक शास्त्रामधले हक्क आणि कर्तव्याच गुणोत्तर आणि प्रमाण पण परत शिकावं असं वाटो हीच प्रभू चरणी प्रार्थना.

कारण ही भटकी जमात वाढली तर पुढे जाऊन यांना आरक्षण पण द्यावं लागेल. आणि ते परवडायचं नाही!

आता हा आपला माझा शाब्दिक कचरा. नाही आवडला तर केरसुणीने बाजूला करून टाकून द्यावा.

Monday, March 23, 2015

Change The World... the poor world!

I visited the science museum yesterday, they had a section that said, Things That Changed The World! Almost everyone who did something significant in the field of science so far was there.

While I enjoyed my time there, on my way back, I found it a little amusing to see our infatuation to Change The World! The World seems like an IT job that everyone wants to change, every time they got hang of it! At times we almost treat The World like a dirty pair of pants, everyone seems to be in a hurry to change!

Aren't we too harsh on this poor World? No matter what this poor guy does, people are desperately after changing him! His quest to be better is like our endless chase to the good appraisal!


It has become so obvious that when you type in "Change The " in Google then even Google also suggests to Change The World before anything else! You turn on the TV, read the news paper or go to social media - people are either talking about the people or the new projects coming up to Change The World or the old ones that already Changed The World - almost at the same time! And nobody seems to see the contradiction!

With this rush, I am sure this poor World must have gone through identity crisis for a thousand times every year! Hoping at least this time, people would stop and say this is the final change! It's like that client who tricked you into a fixed price project and now submitting change requests after change requests, keeping everyone wondering, when is the final release!

I have also heard that the schools and colleges welcome the new students, giving them a hope that they would change The World some time and Then the institute would be so proud!
Seriously?
Isn't it like taking The Mess a little too much for granted?
I mean, it's like turning schools into a machine to produce people hoping for or hoping to Change The World!

At times, I feel, if someone announces that, The World is Perfect, half the population would go out of job or under depression!

Wonder if there was a place that taught how to be part of The World instead.
Now that will surely Change The World!

Tuesday, March 17, 2015

आयुष्यावर बोलू काही...

एक म्हातारा दिसला मला कॅफे मध्ये आज. जरा त्रस्तच होता. त्याच्या बोलण्यावरून तसं जाणवत होतं. माझ्याहून दूर बसलेला. काय बोलतोय ते ऐकू येत नसलं तरी तावातावाने जे हातवारे करत होता ते नजरेतनं सुटणं अशक्य होतं. राहून राहून त्याच्याकडे नजर जात होती. कॅफेमध्ये जे Jazz म्युजीक सुरु होतं त्याच्या तालावर या म्हाताऱ्याने कोणालातरी फैलावर घेतलेलं!

म्हाताऱ्याचे कपडे मळलेले. खूप दिवस कपडे धुण्या बिण्याच्या भानगडीत पडलाच नसावा. किंवा इथं येऊन बोलत बसण्यासाठी कपड्या बिपड्याचं भान सोडून आला असावा. दर दोन मिनिटाला भुवया वर खाली करत होत्या. घडी घडी हातोप्यातून बाहेर येऊन, त्याची बोटं कधी समोरच्याच्या तर कधी बाजुच्याच्या नाकावर वार करत असल्यासारखी वाटत होती! सरल्या आयुष्यातल्या घडल्या गोष्टींचा हिशोब मांडल्यासारख्या चेहऱ्यावर सुरकुत्या होत्या!

डिस्टर्ब करणारा भाग वेगळाच होता. हा म्हातारा एकटाच बसला होता. त्याच्या ना पुढे कोणी होतं की ना बाजूला!

सुमारे १५-२० मिनीटे त्याचा हा सगळा प्रकार सुरु होता! त्यानंतर म्हातारा निघायला उठला. कदाचित त्याला जे बोलून टाकायचं होतं, ते एकदाचं झालं असावं. केव्हाचं उरलेलं, पदरात साचलेलं, निचरा करायचं राहून गेलेलं, त्यातलं थोडसं का होईना त्या कॅफेमध्ये सांडून झालं असावं.

किंवा कॉफीचा कप रिकामा झाला असावा आणि आता दुसरा घ्यायला खिशामध्ये काही उरलं नसावं.

तो उठला आणि तसाच तंतरत निघून गेला. थोड्या वेळाने त्याच्या जागी आणखी कोणी येऊन बसलं. आणि त्यांच्या गप्पा रंगल्या. गप्पा होण्यासाठी तर असतात कॅफे! नाही?


कॅफे मध्ये अजूनही jazz म्युजीक सुरु होतं. मी ज्यांची वाट बघत होतो ते दोघेही येऊन पोचले होते. त्यांचं बाळ आता ६ महिन्याचं झालेलं. बोलायला काहीही येत नसलं तरी आपल्या आई बाबांनी आपलं ऐकावं असं त्याचं म्हणणं होतं. दर पाच मिनिटांनी त्याचा बाबा त्याच्याकडे बघून "हो क्का? बर हं!" अशी मान हलवायचा. त्या बाळासाठी तेवढी acknowledgement पुरेशी होती.

थोड्या फार गप्पा मारून आम्ही तिथून निघालो. मी मझ्या ट्रेन मध्ये बसलो. डोळे बंद केले. डोकं मागे टेकलं.

आयुष्याच्या अगदी दोन भिन्न टोकांवर उभ्या असलेल्या या दोन जीवांच्या बोलण्याच्या, व्यक्त होण्याच्या, या desperation ला पाहून, थोडा वेळ का होईना मलाच निःशब्द व्हायला झालं.

Sunday, March 08, 2015

Happy Woman's Day च्या निमित्तानं

(जरा फुरसातीमध्ये वाचण्यासाठी आणि बघण्यासाठी. म्हणजे आपण एक सिनेमा किंवा नाटक बघायला कसा वेळ काढून जातो? तसं. हे बघायला सुमारे ७० मिनिटाच्यावर वेळ लागायचा नाही. त्याहून कमी वेळात संपवूही नये ही विनंती. मला जे काय काय दिसलं, ते सगळं समोर ठेवतोय. त्यातून तुम्हाला काही वेगळं दिसलं तर जरूर सांगा. बाकी मी या विषयामधला पंडित नव्हे. म्हणून काही चुकलं असेल तर तेही सुधारून खाली लिहून पाठवा.)

महर्षी कर्वे जेव्हा शाळेच्या पुस्तकामध्ये आले, तेव्हा प्रथम झलक मिळाली "स्त्री" या प्रकारची. समाजातला शोषित, पिडीत आणि दुबळा घटक असं शाळेत सांगितलं. आपण ताबडतोब पडताळून बघितलं. वर्गातल्या मुली तर अजिबात गरीब वाटल्या नाहीत. घरी बहिण तर प्रसंगी बेदम मारायलापण मागं पुढं पहायची नाही. त्यामुळे तिनं दुबळं असायचा प्रश्नच नव्हता. या पलीकडे मुलगी कोणाला माहिती? पण परीक्षेत मार्क्स मिळवायचे होते. मग जे पुस्तकात वाढलंय ते मुकाट्याने गिळून आम्ही पुढे गेलो. आता ती तेव्हा झालेली ओळख, खरी समजायला बरीच वर्षं उलटायला लागली.

या दरम्यानच्या काळात हा शोषित, पिडीत विषय वेगवेगळ्या प्राकारे पण तितक्याच प्रखरतेनं पुढे आला. आणि जसा पुढे आणण्यात आला, तसा आम्ही गिळत आलो. जे म्हणाल ते सही. जे दाखवाल ते सही. पण मग शेवटी एका टप्प्यावर आल्यावर कळलं की हे दिलेलं मुकाट्यानं गिळायचं थांबवलं नाही तर भलतंच काहीतरी गणित चुकणारे.

आपाल्याला स्त्रियांच्या वरचा अन्याय कळला. त्यावर काम करणारे लोक समजले. आपण काय करावं, काय नाही करावं हे समजलं. आपल्याबरोबर बाकीच्यांना कसं शहाणं करायचंय तेही कळलं. हे सुरु असताना, आम्ही ज्यांच्याकडून पेपर/टीवीवरुन मतं उसनी घ्यायचो, त्यांच्यापैकी काही लोकांना क्रांतिकारी व्हायची घाई झाली. आणि आमचा स्वतः विचार करण्याचा आळस उघड्यावर पडला. मुख्य मुद्दा सोडून आपण भलतीकडेच शिरा ताणून भांडतोय हे लक्षात येऊ लागलं. थोडंफार ठेचकाळत, थोडं फार धडपडत मग अक्कल आली. कोणाचं ऐकायचं. किती ऐकायचं. काय ऐकायचं. याचं भान येऊ लागलं.

हे सुरु असताना. एकदा वाटलं की आपल्यापेक्षा प्रगत असे खूप देश आहेत. तिकडं काय सुरु असेल? त्यांनी सोडवले असतील हे प्रश्न? त्यांच्याकडंही त्यांचे लोक त्यांच्या देशाला नावं ठेवत असतील? त्यांच्याकडून आपल्याला काही शिकण्यासारखं आहे का? हे सगळं बघता बघता जे जे समोर आलं त्यामध्ये काही वेगळे विषय कळले. काही सुरेख काम करणारी माणसं, संस्था समजल्या. आणि आपल्याला अजून खूप काही अभ्यास करावा लागेल हेही समजलं.

असो, आता नमनाला घडाभर तेल घालत बसत नाही. सुरु करतो या दोन संस्थांपासून.

आपल्याकडं सडक-सख्याहरी असतात न. तशा लोकांना ताळ्यावर आणायला www.stopstreetharassment.org, www.ihollaback.org सारख्या संस्था अमेरिकेत काम करतायत. त्यांनी मध्यंतरी एक विडीओ बनवला - एक मुलगी न्यूयॉर्कच्या रस्त्यावरून दहा तास चालत गेली तेव्हा अशा या सडक सख्याहरीनी काय काय कॉमेंट पास केले ते रेकॉर्ड करत.


एकानी हे असं बनवलं.
Things men say to women

हे थांबवण्यासाठी बऱ्याच संस्था आता कार्यरत आहेत. त्यापैकीच एकानी हे बनवलंय.



लोकांना हे सांगणं, शिकवणं, याला पर्याय नाही.

थोडक्यात "Let's make our streets safer!" ही थीम थोड्याफार फरकाने जगभरामध्ये आहे. याचा इलाज आपल्या सगळ्यांनाच शोधायचाय. हा प्रश्न सोडवणाऱ्या लोकांची खूप माहिती या दोन संस्थांच्या वेबसाईट वर आहे.

स्त्री-पुरुष समानता म्हणजे काय यावर खूप वेगळे वेगळे विचार आहेत. म्हणजे समजा एखादी स्त्री पोलीस बनून सिंघम सारखी गुंडांना हाणायला लागली, की तिने पुरुषाची बरोबरी केली, असं म्हणू का? आणि हे म्हणणं जितकं चुकीचं आहे तितक्याच चुकीच्या कल्पना घेऊन काही लोक फिरताना बऱ्याच ठिकाणी आढळतात.

मुलगी म्हणजे काय आणि मुलगा म्हणजे काय, यावर आपण पुढे येउच. पण तुरतास हा एक थोडा डीटूर घेऊ, जॉन ऑलिवरच्या या विडीओ मध्ये.


ही एक मजा आहे. आपण software अपडेट केलं की त्यातले bugs अपडेट होतात यातला थोडासा प्रकार असल्यासारखं वाटतं मला थोडसं.

खरं तर स्त्री-पुरुष समानता हा इतका अवघड विषय नाहीये. पण आता बनलाय तो. याची करणं बरीच असावीत. त्यापैकी एका बहुचर्चित कारणाबद्दल काम करणारा हा एक प्रोजेक्ट www.therepresentationproject.org.

यांनी आधी एक छोटी फिल्म बनवलेली. आणि मग त्याला खूपच प्रतिसाद मिळाल्यावर त्यांनी संस्थाच स्थापन केली. आज त्यांचा एक curriculum पण आहे.

त्यांच्या सर्वात पहिल्या फिल्मचा हा (जरा मोठा असला तरी) छोटा ट्रेलर.

Mis(s)Representation.

४ वर्षं झाली आता या ग्रुपला अस्तित्वात येऊन. काही गोष्टी बदलल्या. काही अजून बदलायचेत. मिडियामधून मुलींना कसं दाखवलं जातं आणि त्याचे काळात किंवा नकळत कुठवर परिणाम होऊ शकतात याबद्दल यांचं काम सुरुये.

मुलगी असणं म्हणजे अमुक अमुक. आणि मुलगा असणं म्हणजे अमुक अमुक. हे जे वेगवेगळ्या मध्यमातून दिसतं आणि जे बऱ्याचदा चूक असतं, त्याबद्दल यांचं काम सुरुये.

एका मुलीने केलेली एक कविता आठवली मला. खूप साऱ्या brands च्या खाली, खूप साऱ्या अलिखित पण "करायलाच" हव्यात अशा आजकालच्या गोष्टींच्या खाली दबलेला एक आवाज बाहेर काढतानाचा कविता.


तर या सगळ्या भुलभुलैय्या मधून थोडा तरी बाहेर यायचा मार्ग दिसावं म्हणून मागच्या वर्षी Truth in Ads Act ची मागणी झाली होती.


हा इतका मोठा प्रश्न असेल असं वाटलंच नव्हतं.

मी एकदा या सगळ्यांच्या बद्दल एका मित्राशी बोललो. तो म्हणाला की हे सगळं म्हणजे घराचं झालं थोडं आणि व्याह्यानं धाडलं घोडं असंय. आपल्याकडचे प्रश्न कमी आहेत काय की इकडे बघायचं आता? तसंही हे खरे प्रश्न नाहीचेत. The First World Problems! आपल्याकडचे प्रश्न जास्ती गंभीर आहेत. ते सोडवावे आधी!

मलाही हे थोडेसे प्रगत देशातले प्रगत प्रोब्लेम्स वाटले. पण मला हे आपल्याकडच्या प्रश्नांशी निगडीतपण वाटले. अगदीच. देश प्रगत झाला की प्रश्न मिटतात. हे असं नसतं हे कळायला लागलं, हेही नसे थोडके. प्रश्न डावलले आणि भलतीकडेच बोटं करण्यात वेळ घालवला की काय होऊ शकेल याची झलक वाटली. आपण प्रागत झाल्यावर आपल्यालाही हे प्रॉब्लेम दिसायला लागले तर मात्र वाईट वाटेल. आत्ताही थोड्या प्रमाणात आपण हे आपल्याकडंही बघतोच की. उगाच नसेल रेनीने ही कविता बनवलेली.


असो.

"सिर्फ हंगामा खडा करना मेरा मक्सद नही. मेरी कोशिश है की ये सुरत बदलनी चाहिये." हे आठवतंय दर रविवारी ऐकलेलं? हे खूप पटलंय आपल्याला. आता सुरुवात म्हणून कमीत कमी ते लक्षात ठेवू.

आता परत त्या मगासच्या विडोओ कडे येऊ. मिडिया हा एक कारणीभूत घटक जरी असला. तरी सगळं खापर त्यावरच फोडणं बरोबर नाही.

What Katie Couric said in the video can be and must be extended to larger population. What applies to media is what applies to every influential being. Isn't it?

So who are these Influential Beings

The influential people in the world.

The influential people in the country,

in the corporate world,

in the cities,

in the towns,

in our neighborhood,

on our lunch tables,

in the dinner parties and

of course in our homes.

Isn't it? You see? It comes back to us. And it has to. We can either maintain the status quo and reflect the views of the society or we become the change and act on it.

लहान मुलांना आपण मोठं करताना त्यांना काय आणि कसं बाळकडू देतो यावर खूप गोष्टी अवलंबून असतात. नाही? तसच त्यांच्या मनात काय काय भरवतो तेही तितकंच महत्वाचं की.



सोप्या गोष्टी अवघड केल्यासारखं नाही वाटत आता हे सगळं बघितल्यावर. "असं काय रडतोस बाई सारखं?" हे म्हणणं जितकं चूक आहे, तितकंच "तू मुलगी आहेस, तुला छान दिसत राहिलं पाहिजे!" हेही चुकीचं आहे. आणि हे एका जातीने, धर्माने, देशाने, किंवा फक्त पुरुषांनी किंवा स्त्रियांनी केलं असं नाहीये. हे आपण सगळ्यांनी मिळून केलंय. आता प्रत्येक देशात, भागात, याचे वेगवेगळे परिणाम झालेत. पण त्यांचं मूळ हे कुठून तरी येऊन या upbringing आणि education वर येऊन थबकतंय. त्यांच्याकडेही आणि आपल्याकडेही.

मगासच्या कवितेमाधला हनी सिंग हा चर्चेचा विषय अजिबात नाहीये. पण ती मुलगी शेवटी जे म्हणाली न ते खूप आवडलं. You are not just a masterpiece, but a painter too!

हे सांगण्याची आणि समजून घेण्याची गरज आहे. मला वाटतं की बऱ्याच मुलींना पण हे सांगावं लागतं. या validation बद्दल पण आणि masterpiece असण्याबद्दल पण. इतकं hammering झालंय आपल्यावर! पण चांगली गोष्ट ही आहे की हे सांगण्याचे वेगवेगळे प्रयत्न सुरु आहेत. आपल्याला फक्त त्या त्या वाहत्या पाण्यात हात धुवायचेत.

आता हा पिच्चर संपवताना एक पेशल विडीओ.

तुम्हाला हे माहिती आहे का? की प्रत्येक मुलामध्ये थोडीशी मुलगी असते आणि प्रत्येक मुलीमध्ये थोडासा मुलगा असतो? तुम्हाला हे माहिती आहे का, काही क्षमता, काही गुण masculine असतात. आणि काही feminine आसतात. यामध्ये कोण सरस हा विषय करायचा नसतो पण यांचं असणं acknowledge करणं महत्वाचं असतं. मला वाटायचं की मला माहितीये हे पण मग हा विडीओ पहिला आणि मग वाटलं की जरा चुकलंच सगळं. पुसा पाटी आणि परत काढा अक्षरं.


असो. थोडा वेळ घेऊ. समजू. उमगू. जे काम करतायत त्यांना साथ देऊ. नुसता हल्ला करण्यात काय अर्थ?

Hope we understand, respect and embrace the differences, may those be between cultures, religions or ... between genders!

Happy Women's Day!

Monday, March 02, 2015

What The Duck!

आपल्या आपल्या perspective ची गोष्ट आहे.
एक वॉरफिल्म बघून बाहेर आलो आत्ता. संपता संपता जरा डोकं जडच झालं. आता ज्यांना आवाडत असेल वॉरफिल्म त्यांच्यासाठी खूपच सही बनवला होता सिनेमा. आता जे खरंय तेच तर दाखवलेला. कोणी का तक्रार करा? पण आपल्याला जरा जड गेलाच किस्सा सगळा. आपल्यासाठी नाही ब्वा युद्ध मारामाऱ्या वगैरे असं वाटत असतानाच, कारण नसताना दिमाग जरा tangent मध्ये गेला.

आपल्या लहानपणीचा एक शो आठवला. एकदम उलट effect होता पण त्याचा.
अभ्यास करावा. बाहेर खेळ खेळावे. ते सोडून टीवीला काय चिकटून बसलाय? वगैरे सगळ्या प्रकारचं रागावणं खाऊनही मी तो शो बघायचो. त्यामध्ये असायचा पण खूप सारा दंगा! खूप सारे पैसे, मग त्या मागे चोर उचक्के, मग पळापळी, धडपड, एकमेकावर कुरघोडी, मग मधेच कधी कधी काला जादू, भूतं, आणि पुराणातली रहस्यं वगैरे! आणि कधी कधी एकदम सायन्स, gadgets, आणि रोबॉट वगैरे!

तेव्हा त्या शो मध्ये आवडायचं ब्वा आपल्याला हे सगळं. कसं का असेना? डोकं बिकं जड बीड नाही व्हायचं. आणि तेव्हाच का? आत्ता पण.

आता म्हणाल तर हा सगळा गोंधळ. नाही तर काहीच नव्हतं.
एकदम सोपा, सरळ, आणि सहज शो वाटायचा.
त्यातले सगळे लोक आपलेच असायचे.
म्हणजे शहाणे वाले पण! आणि वेडे वाले पण.
आपल्याला दोघांचं पण कौतुक.
ह्ये मोठमोठाले प्रश्न असायचे कधी कधी त्यात. म्हणजे आता जगाचं काय होणार वगैरे. अशा लेवलचेही.
आणि मग चला बाजारातून चार काकड्या आणतो अशा सहजतेने ते सोडवले पण जायचे.
आणि ते सगळं चालायचं आपल्याला.
सोपंच तर असायचं असतं की सगळ्यांनी.
माणसांनी आणि प्रश्नांनी. दोघांनीही.

असो.

सांगायचा मुद्दा काय. तर आपल्याला लयी आवडायचा हा असला शो. आणि आत्ता असंच वाचता वाचता असं वाचलं की हा आपला असा शो आता परत येणारे म्हणे. २०१७ मध्ये. माणसं कामाला लागल्येत कसून!

http://blogs.disney.com/oh-my-disney/2015/02/25/this-is-not-a-drill-were-getting-new-ducktales-in-2017/

आणि आता मला अचानक त्या वॉरफिल्मच आणि एकूणच सगळंच एकदम फ्रेश वाटायला लागलंय!

कारण विचाराल तर ... सोप्पंय...

जिंदगी तुफानी है ... जहा है ... डकबर्ग!
गडिया लेजर हवाई जहाज... ये है .........

Friday, February 20, 2015

At Doha Airport ...



It takes only 4 hours of flight delay to turn ordinary people into krantikari crowd! It’s quite entertaining out here at Doha airport. Thanks to Qatar Airlines. It was supposed to be 2.5 hours stop-over before changing the flight to London. It’s been 10 hours already. And I am still hoping that I would finally get to board the flight in another couple of hours.

Blame it on Injustice – Gods Among Us – that I was still waiting at a gate from where the boarding  was supposed to start at scheduled time. And never realized when they announced the change in departure gate and everyone around me already vanished long ago. I ran to another gate, burning the free breakfast they had offered in the morning when they announced the delay of 2 hours for the first time. This one was second round of announcing the delay. I reached the other gate. I could see huge crowd standing in the lobby from distance. As I walked closer, it got more entertaining.

Mostly it was British crowd. First time I heard British accent so loudly! All British sarcasm, anger, humor, mess, impatience and what not … it was all at peak!

Try imagining this…

The crowd was so close to the desk that the crew had to make efforts to come out if they had to. Nobody would still nudge even a centimeter anyway. People had started shouting from the crowd already. Some babies were crying too. I could hear random voices from the crowd showing the restlessness. The crew sent out the tallest man they had, in to the crowd to appeal for cooperation!

He made efforts to walk in to the center and said,
PLEASE … STEP BACK. PLEASE STEP BACK. YOU ALL ARE GOING TO GET A PLACE ON THE PLANE. PLEASE STEP BACK”

Needless to say, the crowd didn't quite move. Someone from the crowd shouted instead.
“Let us step forward. That’s where the plane is. That’s exactly what you guys are doing wrong!!”

Some random lady whose voice was barely audible and who was hardly visible, also attempted to shout. “What’s the problem with you guys? Why are you not doing your job!”
Not sure if anyone heard her or not. But I found her advice very genuine! Wish if everyone did the same. :)

So many impromptu obvious innovative suggestions were coming from all parts of the crowd. A few also were attempting to ask what has exactly caused the delay. But nobody seemed to be interested in answering that question.

I found my way to one corner from where I could get a good view of the drama. There was some coffee spilled over too on the way. People were cautious of it for some time but then they didn't care anyway.

I saw a Happy Man there. Despite all this chaos, this guy was literally sleeping on the ground, playing some game on the phone! Absolutely not bothered by this delay and the drama! He just knew, whenever they figure out some way, they would call him! I stood near him and continued to watch the crowd.

One guy came at random, pointed his finger at the plane standing outside and screamed, “THAT PLANE CAN NOT FLY!! IT’S IMPOSSIBLE” and he disappeared. It was getting too difficult to figure out who was serious  and who was not! But this guy made a few people quite nervous for sure! They started murmuring, “I am not taking this flight!” The other was more systematic. He found his way through the crowd past The Tall Man and reached the desk. He asked the crew at the desk, “We want to know if the plain is alright!”. The crew had absolutely no idea where this question is coming from! I couldn't stop laughing but the guy asking the question there was still genuinely concerned! Not sure how the crew handled.

The Happy Man was still not bothered at all. He was in peace with his game on the phone. Damn, I was missing my game too! I walked away from the crowd to look for some food and met a couple who was also watching all this from a distance. Suddenly I got to know from them that all these people who were there had a revised boarding pass and I was supposed to get one too. Apparently we were not boarding the same flight we were supposed to get on. We were being “adjusted” on other flights. Looking at the crowd, it was impossible for me to reach the desk to get another boarding pass. I walked to other desks nearby instead, made a chicken like face and they helped me with revised boarding pass.

Very politely the fellow said,
“Sir, This flight is full, the next one is  full too. I can put you on evening flight. Is it okay?” Like I had any option! He reminded me that the boarding starts at 4:20 pm. My body knew Indian timing, my phone knew British timing, I was only prepared to count 2.5 hours in Doha before boarding next flight. I had no clue what is this 4:20 pm!

It’s 4 pm here now. Boarding starts in another 20 minutes. Flight departure time at moment is 5:20 pm Qatar time. 

Sunday, February 15, 2015

किंमत

"तुम्ही तिथून निघाले असताना बोलला असता तर आपण चांदणी चौकातच घेतलं असतं हे."
"होय. तिथं आहे नर्सरी. मला बघिताल्यासारखं वाटतंय."
"नाहीतर काय. मस्त packing करूनपण दिला असता त्यांनी. वर ते बो आणि रिबीन पण लावली असती."
"ठीके की. आपल्याला रोपटं मिळालं. भावना महत्वाची. बुके दिला असता तर मला खरंच वाईट वाटलं असतं. त्यापेक्षा हे sapling मस्त"
"हं. पण हजार भर रुपयांचं बिल फाडलं असतं यावर... पुण्यात घेतलं असतं तर! इथं म्हणून स्वस्त मिळालं."
"... हं."
"शहरात लयी किंमत झाडाची. या खेड्यातल्या लोकांना काय किमत हो झाडांची. त्यांना कुठं काय कळतंय!"

"............................................................ हं"

Thursday, January 01, 2015

Perfectly Awesomely Average!

खूप खूप पूर्वी माणसाला फारशी अक्कल नव्हती. मग हळूहळू जशी अक्कल आली, तसं त्याला वाटायला लागलं की आपण खूप भारी आहे. पण लवकरच त्याच्यासारखी अक्कल असलेली बरीच माणसं त्याला दिसू लागली. मग त्याला वाटलं की पृथ्वी खूप भारी आहे! आपण सगळे राहतो त्यावर. बाकी सर्व आपल्या भोवती घिरट्या घालतंय! पण मग कळलंकी तसं काही नाहीये; आपण सगळे सूर्याभोवती फिरतोय. अगदीच वाईट वाटू नये म्हणून चंद्र होता आपल्या भोवती फिरणारा. पण मग त्यानं कुणाचं समाधान होणार? मग माणसाला वाटलंकी सूर्याभोवती फिरणाऱ्या ग्रहांपैकी आपली पृथ्वी म्हणजे लयी भारी. पण तेही समाधान फार काळ नाही टिकलं. कळलं की आपल्या या कुटुंबामध्ये गुरु, शनी वगैरे बाप माणसं पण आहेत. आपल्याला माहिती नव्हतं  तरी काय झालं? पृथ्वी फक्त त्यांपैकी एक खूपच साधारण आकाराचा आणि प्रकारचा ग्रह आहे. बस. नसर्वात मोठा. न सर्वात लहान. Perfectly average!

मग माणसाला असं वाटायला लागलं की आपला सूर्य एकदम भारी. याच्या पलीकडं काही नाही. हेच महान! पण छ्या हो. ते ही नाही. करोडो आहेत म्हणे सूर्य. आणि जवळपास प्रत्येक सूर्याची आपली आपली एक सूर्यमालिका! म्हणजे आपला सूर्य खूपच साधारण असा. ना खूप मोठा, ना खूप छोटा! Perfectly average!

मग या सगळ्या सूर्याना सामावून घेणारी आपली galaxy! ती तरी भारी असावी असं कोणाला तरी वाटणार इतक्यात कळलं की बाबा तसही नाहीये काही. कारोडो galaxies आहेत म्हणे. त्या पैकी आपली आहे एक. साधारण. Perfectly average!

Perfectly average! पण आपल्या सर्वांच्या अस्तित्वाला कारणीभूत. Spectacular. आपल्या सगळ्या लहान मोठ्या गोष्टीना सामावून घेणारी. Nonetheless a very beautiful place. युनिक असण्याचा सुंदर असण्याशी काय संबंध तसाही? 
पण आपला भूतकाळ बघता, ते तसं पुरत नाही आपल्याला कदाचित.

हे सगळं आज का? तर काही कारण असं नाही. जरा वाई वरून सातारा गाठतोय. माजेशीर वाटला हा मुलभूत गुण आपला. आपण कसे स्पेशल, युनिक आहोत हे स्वतःलाच पटवून देण्याचा. आता वर जे काही लिहिलंय ते तर सगळं विज्ञानाची कास धरून होतं तोपर्यंत विषय वेगळा होता! पण जित्याची खोड आहे आपली ती! अशी कशी जाणार? शास्त्राला निःशस्त्र करून बऱ्याच आघाड्यांवर ही वेगळेपणाची घोडदौड सुरु आहेच की. नाही?  मी कसा वेगळा? किंवा माझा गाव कसा वेगळा? किंवा माझा रंग कसा श्रेष्ठ? किंवा माझा धर्म कसा बेष्ट? आणि काय नि काय! कशाचा आनंद घ्यावा, आणि कशाचा अभिमान बाळगावा या मधली गल्लत. आता यामध्ये कुठलं विज्ञान सांगता आणि कुठलं काय?

खरंच गरज आहे का आपण वेगळे असण्याची? आपण स्पेशल असण्याची, श्रेष्ठ असण्याची आवश्यकता का भासत असेल आपल्याला? What if we are just perfectly average? What if that's how it is supposed to be?

एका आजोबांशी याबद्दल बोलताना त्यांनी खूप सुंदर उदाहरण दिलं. ते हसले आणि म्हणाले, “किती वेगळं असलास म्हणजे पुरेल तुला? याचा मापदंड कळला की प्रश्न मिटेल. कारण मग पुढे काही उरणारच नाही.

जंगल बघितलंयस? तुम्ही लोक सुट्टी काढून ग्रीनरीच्या नावानं बघायला जाता आवर्जून, ते वालं जंगल! खूप सारी झाडं, आणि त्यांची सळसळणारी असंख्य पानं! बघितालीयेस? आपण माणसं आणि ही पानं फुलं थोड्या फार फरकानं एक सारखीच. तीही आपल्यासारखी असंख्य आहेत. आता बघितलंस तर प्रत्येक पान, प्रत्येक फूल त्याच्या त्याच्या परीनं खूप युनिक असतं. खूप खासप्रकारे बनलेलं. आणि ते तेवढं वेगळेपण त्यांना पुरेसं असतं. आता त्यांना हे कळलंय आणि आपला स्ट्रगल अजून सुरुये. हा एवढाच फरक. ती पानं फुलं त्यांच्या आपापल्या असण्यावर  खुश आहेत. आणि आपल्याला आपलं असणं पुरत नाहीये.”

मला खूपच आवडलंय हे उदाहरण. आज सरत्या वर्षाच्या काठावर बसून येत्या वर्षाकडे पाहिलं तर असं वाटतंय की, हे वर्ष, आपल्या असण्यात रमायला शिकवेल. आजूबाजूच्यांना त्यांच्या असण्यात रमू देईल. जे ब्रह्मांडामध्ये नाही, ते पिंडामध्ये असण्याचा हट्ट सोडायला लावेल. “मी श्रेष्ठ आणि बाकी कनिष्ठ” यात नसलेली मजा आणि “माझ्याच रंगात रंगलेले सगळे” या हट्टा मधला बेरंग समजावून देईल! नव्या गोष्टी तर करूच. पण प्रगतीच्या दिशेने. वेगळेपणाच्या किंवा श्रेष्ठत्वाच्या चढाओढीने नाही. बाकी जे आहे ते तसच छान आहे. Perfectly average. काहीही extravagant असायची गरजच नाही.

I had a perfectly average last year. And I wish to have a perfectly average next year too. I think, it will be wisely beautiful. Perfectly awesomely average! 

Wish you the same! :)



Monday, November 24, 2014

meaning...

with so many standing up to fix the world, 
with so many talking what's been not right around us,
with so many (socially) experimenting to open up our eyes and what not,
with so many eyes awaiting the Masiah, to bring the order,

I wonder

what if, the world is not broken?
what if, it's not so wrong?
what if it's not sensational, but sensitive?
what if, we are meant to blossom, and not fix?
flourish, and not fool?
succeed, and not struggle?
what if, it is working?

then,

will our life lose its meaning?

Monday, October 06, 2014

जन गण मन

Do you know, what is better for the kids growing in foreign land? I am talking about Indian kids living in foreign land. They can have Pakistani friends. They can grow up together. They can go to each others house frequently and eat together. Something the kids back in India and Pakistan can not experience any time sooner. Perhaps it's easier to discover this connection while living outside. There is so much in common. Our families eat same food. We like same films. We love same sports. We love food, song and dance. We make same mistakes. Perhaps it is actually simple to like each other. Isn't it? Haven't you experienced the same when you were outside?

I wish, some day, back in homeland, people get the same chance too!

I remember a very interesting optical illusion that fits so well here. Look at this one. The color of the two blocks looks totally different. Isn't it? Now keep the finger on the border where the blocks are touching each other in such way that the border is not visible at all. the Now suddenly the the two blocks look all the same color! Isn't it same for us too?



I watched Zeshan's video and felt so much like writing all this. I wish, I could express these feelings better. But I am sure, you will feel the same after watching it. Kudos to him for making this one.
We are separated by only a border!


Now I would like to end this note with this one from Gulzar ...

लकीरे है तो रहेने दो,
किसी ने गुस्से मे वो खींच दी थी,
उसी को अब बनाओ पाला
और आओ कबड्डी खेलते है,
मेरे पाले मे तुम आओ,
मुजे ललकारो, मेरे हाथ पर तुम हाथ मारो और भागो,
तुम्हें लपेटू टांग खिंचू और तुम्हें वापस न जाने दु,
तुम्हारे पाले मे जब कबड्डी-कबड्डी करता जाऊ मे,
मुजे तुम भी पकड़ लोगे,
मुजे छूने नहीं दोगे सरहद की वो लकीरे,
जो किसी ने गुस्से मे यूं ही खींच दी थी,
उसी को आओ अब पाला बनाए और कबड्डी खेलते है।

Sunday, September 28, 2014

एक गोष्ट त्याची आणि तिची

एक गोष्ट लिहित होतो. त्याची आणि तिची. पण दुर्लक्ष झालं त्यांच्याकडं! तमाम जगामध्ये घडणाऱ्या प्रत्येक गोष्टींवर भाष्य करण्याच्या माझ्या आगाऊ हावरटपणामुळे, त्यांच्या पदरात काहीच पडलं नाही. आज खूप दिवसांनी जुना कप्पा उघडला तर त्यां दोघांचे खूप सारे रिकामे संवाद सापडले. बरंच काही लिहायचं राहून गेलेलं. त्याच्यामध्ये आणि तिच्यामध्ये घडण्यासारखं खूप काही रचून ठेवलेलं. आता सगळं साचून राहिल्यासारखं वाटतंय इतका काळ उलटला.

एकमेकासमोर कित्येकदा उभं केलेलं त्यांना. पण गोष्ट पुढं सरकवायचं राहून गेलेलं. मग कधी तिनं पाठ फिरवली असेल. कधी त्याला शब्द सापडले नसतील. "जाऊ दे! असंच होतं सगळ्यांचं", हे त्यांनीही शतदा ऐकून घेतलं असेल. तशा सगळ्यांच्या काही ना काही गोष्टी असतातच की अशा. धक्का लागेपर्यंत एकाच वळणावर रेंगाळणाऱ्या.

कदाचित आजही त्यांचं असंच काहीतरी सुरु असेल.
तो कोण्या ट्रेन स्टेशनवर उभा असेल.
ती खांद्याला पिशवी लटकवून शहराचे कानेकोपरे भटकत असेल.
त्याच्या कानात हेडफोन लटकवलेले असतील.
ती कुठे सूर गवसतो बघत असेल.
त्याच्या कानातल्या गाण्यांचा आवाज इतका मोठा केला असेल की त्याच्या बाजूने जाणाऱ्या प्रत्येकाला अस्पष्ट तरी ऐकू जातच असेल. पण आजूबाजूचं स्वतःपर्यंत काहीच पोहोचू नये याची त्यानं काळजी घेतली असेल.
ती कुठल्यातरी भिंतीच्या अडोशाला पोटाशी पाय घेऊन बसलेल्या अज्ञात माणसाशीही संवाद साधत असेल. लोकांच्या थेट मनाला भिडत असेल. पण तिच्या मनातलं कुठं बाहेर सांडणार नाही याचा मात्र तिनं जाणीवपूर्वक प्रयत्न केलेला असेल.

तो आलेल्या ट्रेनमध्ये बसण्याची क्रिया एखाद्या यंत्राप्रमाणे करून मग काचेबाहेर बघण्यात गुंग होत असेल. काचेबाहेरच्या सर सर सर मागे जाणाऱ्या गोष्टींच्यात आणि कानात सुरु असलेल्या गाण्यांत एकच लय शोधायचा थोडासा फिल्मी प्रयत्न करत असेल. ज्याच्यात रमायला हवे होतो, ते वेगात मागे सोडतोय, असंही अधे मध्ये त्याला वाटत असेल, आणि मग तो मोठ्या लगबगीने परत स्वतःला आठवण करून देत असेल की त्याच्या आयुष्याला त्यानं कशी गती प्राप्त करून दिलीये. हे सगळं मनात सुरु असताना अंगावरच्या शर्टची इस्त्री आणि चेहऱ्यावरचा कुठलाही भाव हलणार नाही हे त्याला आता पक्कं जमत असेल.
फुटपाथवरून उठून आपल्या गाडीकडे जाताना आजूबाजूच्या प्रत्येक गोष्टीची ती नोंद घेत असेल. सिग्नलला थांबलेला बाईकवाला, गजरा विकणारी मुलगी, रस्ता क्रॉस करणारे आजोबा, हातवारे करत मोबाईलवर बोलणारा मुलगा. आणि या सगळ्यामधून तिच्या हाकेला प्रतिसाद देणारी तिची गाडी. "आजूबाजूला असलेल्या सजीव आणि निर्जीव गोष्टी या आपल्याच साठी खास रचून ठेवलेत आणि आपण त्यांच्याशी संवाद साधला तरच मजा नाहीतर मग आपणही निर्जीवच!" असं तिनं चारशे त्रेचाळीस लोकांना सांगितलं असेल. तरी आपल्याला हव्या असलेल्या गोष्टी आपल्या आजूबाजूला नसल्या तरी ते मनावर नाही घ्यायचं हे स्वतःला कितीवेळा सांगितलं याची गणती ती विसरली असेल.

काही गोष्टी का झाल्या आणि काही गोष्टी का होऊ शकल्या नाहीत, यांची उकल करत त्याला बसायचे नसेल.
काही गोष्टींची उकल होणं गरजेचं असेल तर ती आता आपोआप होईल आणि आपल्याला फक्त तोपर्यंत स्वतःला जगवत ठेवायचंय हे तिनं स्वतःला शिकवलं असेल.

आज त्यांच्या संवादातल्या रिकाम्या जागा भरायची इच्छा झाली. पण इतका काळ लोटला. इथून पुढं काय आणि कसं हा एक मोठा प्रश्नच आहे. तरीही लिहायला बसलो. पण मग बाजूला पाहावं तर महाराष्ट्रात युती तुटतीये, मोदींची कडक भाषणं सुरुयेत. आप दिल्लीमध्ये कसून काम करतंय, आपलं यान मंगळावर पोचतंय, आयफोनवर तुटून पडायची लाट आलीये. आणि अमुक अमुक घडतंय. तमुक तमूक बिघडतंय. आता या सगळ्यांवर काहीतरी पिंक टाकायची की इकडच्या रिकाम्या जागा भरायच्या हा ही एक वेगळा प्रश्न आहेच की.

... अधांतरी गोष्टींची व्यथा वेगळीच.
पण तशा सगळ्यांच्याच थोड्या फार गोष्टी अधांतरीच असतीलच की. नाही? मग आता माझ्याकडून एक गोष्ट अर्धवट राहिली तर मला गिल्ट फिलिंग कशाला?

खरं तर प्रत्येकाच्याच गोष्टीचा एक लेखक असेल. पण प्रत्येक लेखकाकडे एकच गोष्ट नसेल. मग लेखाकाच्याही काही आवडत्या आणि नावडत्या गोष्टी असतील. आपल्या गोष्टीचे आपण हिरो असतोच. आपण आपल्या लेखकाच्या आवडत्या गोष्टीचे हिरो की नावडत्या गोष्टीचे हिरो, हाच जरा तपशिलातला फरक असत असेल. बाकी सगळे सेमच की! नाही का?

Thursday, August 28, 2014

#FavoriteBappa



आता उद्या आपल्या घरी गणपतीयेणार. पुढचे सातचे सात दिवस आपण त्यांना सुंदर दिमाखात ठेवणार. पण हे सात दिवस सरल्यावर अपली खरी जबाबदारी वाढेल. असं नाही वाटत तुम्हाला? घरचा पाहुणा मग आपल्या अख्ख्या गावाचा पाहुणाहोणार. घरी असताना मान राखला, पण आता घराबाहेर असताना किती मान राखला जातो यासाठी आपण काहीतरी करू शकू का?

मलाआठवतंय मागच्या वर्षी मी हे असं TooBusyToDoGood लिहिलेलं. आत्ता काहीच दिवसपूर्वी जन्माष्टमी नंतर लोकांचे पोस्ट वाचताना मला परत त्याचीच आठवण झाली. पण आता दरवेळी एवढंच बोलण्यापेक्षा यावेळी जरा वेगळं करायचं का?

बाहेर जाऊ, आणि आपल्यातलेच कोणी हरहुन्नरी कसे कसे उत्सव साजरा करतायत याबद्दल लिहायचं का? म्हणजे थोडक्यात सांगायचं तर, नकळत त्रागा करताना आपण जे नावडते आहे त्याला जास्ती भाव देत आलोय. की अमुक अमुक मुळे त्रास होतो. तमुक तमुक चूक आहे. अशामुळे गैरसोय झाली. तशामुळे ट्राफिक गंडलं! पण कुठेतरी कोणीतरी काहीतरी उल्लेखनीय करत असेलच की! यंदा आपण त्यांनाभाव दिला तर? अगदी भरभरून. त्यांना प्रोत्साहन दिलं तर? त्यांच्याबद्दल माहिती शेअर करू.

असा हा थोडासा बदल आपण आपल्या वागण्या बोलण्यात करून बघू! म्हणजे “पुढच्या वर्षी लवकर या” असं गणपतीला सांगताना आपल्यालाही पावशेर जोश जास्ती चढेल. म्हणजे असं म्हणता येईल, की बाप्पा बघ, यावेळी हे असं असं सुद्धा घडलं, पुढच्या वेळी ये, अजून काहीतरी करून दाखवू!

तेव्हा आपल्याला आढळलेल्या कोणव्यक्तीने, मंडळाने, कुटुंबाने, साजरा केलेल्या उल्लेखनीय गणेशोत्सवाबद्दल इथंलिहूया. नेहमीची लफडी होतातच पण त्यांना फाटा देऊन कोणीतरी काहीतरी बदल करायचाप्रयत्न करत असेल (आणि मला खत्री आहे, असं खूप लोक असतील), त्यांच्याबद्दल एकमेकाला सांगू. शेवटी कसंय, आपल्या लाडक्या सणाच्या दिवशी कोणाची गैरसोय होत असेल, तर तेही चांगले नाहीच न! कदाचित आपण चांगल्याचा प्रचार न करणं हेही त्यामागचं कारण असूच शकतं की! कदाचित आपण चांगल्या गोष्टीना जास्ती भाव दिला तर हळू हळू गैरसोयीचा भाग कमी होईल.

तर मग करायचं असं? जर इथं शेअर केलात तर ठीकच. आपण सगळेच वाचू आणि कौतुक करू. आपापल्या फेसबुकवर केलात तर हा #FavoriteBappa सहित करा. बघू पुढच्या दोन आठवड्यात आपल्याला काय काय सापडतं! ते सगळं मग आपल्याकडून गणपतीला souvenir असं म्हणू!


आपल्या सर्वांचे अनुभव वाचण्यास उत्सुक,
एक तुमच्या सारखाच भक्त


ता.क. खरं सांगायचं तर मला इथं चांगलं म्हणजे कसं याची काही उदाहरणं द्यायची होती. पण खास नाही सुचली. पण कदाचित पुढच्या वर्षी हाताशी खूप उदाहरणं असतील. अशी अशा नक्कीच आहे.


(Photo credit: Sayali)

Friday, August 15, 2014

माझा मेसेज बघा ... माझा मेसेज बघा!



माझा मेसेज बघा... माझा मेसेज बघा...
अहो वर आणखी दोघांनी तोच जरी टाकला असेल तरी मी परत टाकलाय बघा.
उद्या मी काही लक्षात ठेवणार नाहीये, पण तुम्हालाही आठवणार नाहीये.
तेव्हा आज तुम्ही माझा मेसेज बघा.
तसा मीही तो पाहिलेला नाहीये. इकडून आला, मी तिकडे चिकटवला.
कसा त्वरीत चपखल चिकटवलाय पहा.

उपलब्ध अशा सगळ्या माध्यमांवर आपल्या नावाचा एक मेसेज टाकून घ्या.
एकाहून जास्ती मेसेज टाकला तरी कोणी वाचणार नाहीये ... काळजी करू नका!
आपल्या भरघोस भक्तीची मग स्वतःलाच पावती द्या.
बाकी देशप्रेम?
ते आपल्या आपल्या सवडीने करायला आपण स्वतंत्र आहोतच की!

अहो प्रधान मंत्री आज बोलले. तेही बिना कागद घेता बोलले!
म्हणाले खेड्यांचा विकास करूया, भारत स्वच्छ करूया,
म्हणाले डिजिटल इंडिया बनवूया!
अहो पण एक तासभर बोलले. त्यांना असेल एक तास वेळ. आपल्याला थोडीच आहे!
पण आपला आजचा कोटा संपला! आता मग?
आता हे सगळं बाकीचं आपल्या सवडीनं बघण्याला आपण स्वतंत्र आहोतच की.

थांबा जरा, एक जोक आलाय.
पूर्वीचा एक नेता कसा काहीच बोलत नव्हता त्याबद्दल लिहिलंय.
शेवटी जय हिंद आहे. आणि सच्चा देशप्रेमी असाल तर शेअर करा म्हणून लिहिलंय.
आता हे करूच शकतो. देशासाठी इतका वेळ देऊच शकतो.
हे लगेच फोरवर्ड करायला आम्ही स्वतंत्र आहोतच की!
तेव्हा तुम्ही आत्ता तो फॉरवर्ड केलेला माझा मेसेज बघा.


पण तरीही काही वेड्यांना आज परत स्फुरण चढेल.
झेंडा वंदन, सफेद कुरते, जिलेब्या, पेढे, राष्ट्रगीत हे सगळंच आठवेल!
सगळे स्वातंत्र्यवीर आठवतील. आणि त्यांच्यात स्पर्धा नसेल.
कारण हा जल्लोष स्वातंत्र्याचा! यामध्ये कोणा दुसऱ्या राष्ट्राचा द्वेष नसेल.
यामध्ये स्वतंत्रता या कल्पनेचा आदर असेल. सगळ्यांचा उद्देश्य एक असेल.

वर्षभर जाण ठेवण्याचा. जागृत राहण्याचा.
एक सशक्त, आदरणीयदेश बनवण्याचा.
आज दिवसभर जेकाही संकल्प केले, ते पूर्ण करण्याचा.
आणि यांच्यावर उद्या मेसेज बनतील. आपण पुढच्या वर्षी तेही फोरवर्ड करूया.

किंवा आपल्यावर मेसेज बनतील असे काहीतरी बनायचा संकल्प बनवूया!

वंदे मातरम!


वेड्या लोकांसाठी,
Prime Minister's Entire Independence Speech
Just in case



Image Credit: http://beta.metastudio.org/static/img/damitr/tricolor.jpg

Friday, August 08, 2014

फॉरेन विरीद्ध फोरेन



नव्या शहरात, नव्या देशात जाणं आता नवीन नाही. किंवा ते कुतूहलही आता फारसं उरलं नाही. आजूबाजूचे चार लोक आणि हाती असलेलं काम याच्या पलीकडे आपण थोडीच जातो? मग ते सिंगापूर असो किंवा शिंगणापूर. नाही म्हणलं तरी माणसाला “ढाई बिघा जमीन” पेक्षा जास्ती आणखी काय लागतं? अशा धरतीचं सपक तत्वज्ञान हे! पण वयाबरोबर कदाचित सपक गोष्टी पौष्टिक वाटत असाव्यात. ही असली अक्कल घेऊन लंडन मध्ये आपल्याला काय काय दिसणारे आणि आपण काय काय करणारोत याचं म्याच फिक्सिंग करून राणीच्या शहरात यायला निघालो.

समस्त फोरेणच्या जगात पंजाबी taxi ड्राइवर असत असतील, तरी आपल्याला लंडन मध्ये चक्क मुरुड जिल्ह्यातला मस्त मराठी ड्रायवर मिळाला. दिवेआगार आणि हरिहरेश्वरच्या समुद्राची चर्चा करत आम्ही थेम्सकाठच्या या शहराच्या रस्त्यावर आलो. विमानतळ एक तासापेक्षा कमी अंतरावर असणे वगैरे प्रकार आपल्या नशिबी नसतातच. त्यामुळे तासभरचा प्रवास पुढे वाढून ठेवलेला. मुरुडवासी या ड्राइवरने तासाचा प्रवास दीड तासाचा केला. त्याने गप्पांच्या ओघात शहराच्या आतून फेरफटका मारत, पहिल्याच दिवसाच्या पहिल्याच तासात, लंडन मधल्या खूप साऱ्या गोष्टी दाखवून टाकल्या. पण काचेच्या आतमधून. “इथं यायला लोक खूप प्रयत्न करतात. तरी त्यांना संधी मिळत नाही. तुला मिळालीये तर त्याचं चीज कर” असं काहीसं त्याच्या दुप्पट वयाच्या आजोबांसारखं बोलून तो अंतर्धान पावला. संधी मिळणं आणि संधी लाभण यामध्ये फरक असतोच की. पण आपण थोडीच आजोबा झालोय असली उत्तरं द्यायला? म्हणून काही उत्तर बित्तर नाही दिल. अधाशासारखं नव्या शहराचे कानेकोपरे मापणे सुरु ठेवलं.

यापुढे जे सुरु झालं ते म्याच फिक्सिंगपेक्षा काहीसं निराळं होतं. नकळत का होईना, मनातल्या मनात तुलना सुरु झालेली. कशाची म्हणाल तर पुण्याची आणि लंडनची नव्हे! एका फोरेणची दुसऱ्या फोरेणशी! लंडन आणि कॅलिफोर्नियाची. पहिल्या काही दिवसात, ठळकपणे जाणवलेल्या या काही गोष्टी. या व्यतिरिक्त तुम्हालाही काही जाणवलं असेल तर जरूर सांगा.


१. काही वर्षापूर्वी जेव्हा कॅलिफोर्नियामध्ये पोचालो तेव्हा इंटरनेट मिळायचे वांदे होते तेव्हा बाल्कनीमध्ये बसून कुठाल्यातरी शेजाऱ्याच्या इंटरनेटवर दिवस काढलेले. फुकटची कनेक्शन शोधणे असा टाईमपास होता काही दिवस. इकडे घरी पोचल्यावर इंटरनेट तर मिळाले पण काहीही ओपन करा. प्रत्येक वेबपेजवर कुकीजची वार्निंग. “आम्ही कुकीज वापरतोय. वापरणारच आहोत म्हणजे. तरी तुम्हाला सांगतलं ब्वा एकदा” या अशा धर्तीची. मग तुम्ही "got it" क्लिक करायचं. हे असं सगळीकडे. एकदा मला वाटलं की आपल्या मशीनमध्ये काही बिनसलं की काय? पण माझ्या मशीनला काहीही झालेलं नव्हतं. पहिल्यांदा वापरताना जवळ जवळ सगळ्याच वेबसाईट ही वार्निंग दाखवतात इथं. हे म्हणजे वेबसाईटनी युजर ला “केहके लुंगा” असं म्हणाल्यासारखं आहे. पण असो. इथं लोकांना आवडत असावं ब्वा! पुढे Torrent वगैरे काढावे तर चक्क सर्विस प्रोवाईडरन कॉपीराईटची काहीतरी वॉर्निंग दाखवावी!! शिव शिव शिव! हे म्हणजे अतीच की!

२. मला आठवतंय, अमेरिकेमध्ये कुठेपण भटकताना समोर फिरंग आला की भुवया उंचावून गुड मोर्निंग, गुड इविनिंग करून जायचा. नकळत आम्ही पण करू लागलो होतो. समोरच्याकडून उत्तराची अपेक्षा कधीच नसायची. पण हे रुटीन होतं. उगाच जाता येत एकमेकाला ग्रीट करात बसायचं. हा आपण बघितलेला पहिला फोरेणर. (त्या आधी एशियामध्ये फिरलेलो पण तिकडच्या लोकांना फोरेणर नाही म्हणवल. असंच. racist वगैरे नाही. पण ते म्हणजेच आपलेच आयसोटोप वाटले.) तर इकडचा फिरंग चक्क खाली मान घालून निघून जातो!! असं थोडीच करतात फोरेणर? असं कसं? मी एक दोनदा स्वतःहून म्हणायचा प्रयत्न केला. पण समोरचा ऐकायला थांबतो कुठे? आठवडाभर फिरल्यावर मला एक जण भेटला की जो स्वतः बेंचवर बसला होता आणि मी बाजूने जाताना मला गुड इविनींग म्हणाला. हा खरा फोरेणर! पण तो ब्रिटीश नव्हता. :(

३. पुण्यातून बाहेर पडलो तेव्हा ट्राफिकची शिस्त वगैरे लिहिती बसलो होतो. इकडं तर धर्मभ्रष्ट झाल्यासारखं वाटलं. गाड्या सिग्नल पाळतात पण लोक काहीही करतात हो! "जे वॉक" वगैरे भानगड नाहीच! बऱ्याचदा उजवीकडे बघा, डावीकडे बघा, आणि असाल तिथून रस्ता पार करा. हाच एक नियम! तिथे चालणाऱ्या लोकांसाठी लाल पिवळे लाईट आहेत ते करमणुकीसाठी असल्यासारखं! कॅलिफोर्नियामध्ये असताना दंड करायचे लोक! इकडे भाईचारा सुरु होता सगळीकडे. लाल सिग्नलच्या नाकावर टिच्चून आपल्याकडे जशा गाड्या पुढे जातात तसे इथले पादचारी लोक बिनधास्त कुठूनही रस्ता पार करतात. हे म्हणजे एकदम होमली फिलिंग! तसा इथे चक्क रस्त्यावर थुंकणारा गोरा पण मी माझ्या या डोळ्यांनी पाहिलेला आहे. इथे पान खायची संस्कृती नसल्याने असल्या दुर्मिळ गोऱ्यांच्या कलेचे ठसे उमटलेले नाहीत! पण असो. ग्लोबलायजेशन म्हणू हो. आणि काय?

४. भारतामधून आला असाल तर लंडन आपलंच शहर आहे असं वाटायला वेळ नाही लागत. कॅलिफोर्नियामध्ये नव्हतं ब्वा असं वाटलं कधी. याचं कारण म्हणजे इथल्या इमारती. विटांची बांधणी आणि कौलारू छप्पर. किंवा बाहेरून तरी असं दिसतं तसं. आपल्याकडचच पण जरा सुबत्ता असलेलं टुमदार शहर असं लगेच वाटून जातं. आपल्यातलच वाटलं शहर मग सुरु केली किरकिर! म्हणजे वर जी काय आरती ओवाळली, ती अशामुळेच. एकदम आपल्या शहरात करतो तशी! असो. पण इथल्या इमारती खूपच खास! मजा आ गया!! कॅलिफोर्निया मधल्यासारखं लाकडी बिकडी काही नाही इथं काही!

५. आणि शेवटचं म्हणाल तर फ्याशन! आता याचं काय सांगावं रे बाबा! सुरुवातीला "अरे काय हे ध्यान?" पासून ते "इसमे कुछ बात है" पर्यंत जायला फार वेळ नाही लागला. San Francisco मध्ये बघितलेले अचाट प्रकार आठवले. इथे जे दिसले ते आता हळू हळू इंटरेस्टींग वाटण्यापर्यंत मजल गेलीये. शेवटी कसय न. अंगात घालायची गोष्ट एक आणि ती carry करणं दुसरं! हट्टानं रंगवलेले केस, उघडलेली बटणे किंवा घातलेले कपडे, हा प्रकार म्हणजे फ्याशन हे San Francisco मधलं आपलं दृश्य. इथे मात्र जरा elegance वाटला. पहिल्या दिवशी disaster वाटलेल्या स्टाईलची आता डोळ्याला सवय होऊ लागलीये. २ वर्ष राहून पण San Francisco मध्ये गेल्यावर, तिथल्या फ्याशनची सवय नाही झाली! ते अचाटच वाटत राहिलं.

बाकी न, इथले लोक सगळे कशातरी सारखे वाटतात. सगळे. हर किसीकी शकल किसीना किसीसे तो मिलतीही है. यातला प्रकार. म्हणजे प्रत्येकजण आपण पाहिलेल्या कुठाल्या न कुठल्या तरी सिनेमाचा कलाकार वाटतो. सगळे तसेच वाटतात. ट्रेन मध्ये आजूबाजूला बघितलं की च्यायला याला किंवा हिला कुठेतारी बघितलय असं फिलिंग जोरदार येतं. तसही समोर दिसणारा माणूस गोरा आहे म्हणजे ब्रिटीश आहे, असं असण्याची शक्यता ताशी कमीच. आता बाहेरून येऊन राहणारी इतकी खंडीभर माणसं आहेत तर मग त्यात पक्का ब्रिटीश कुठे सापडायचा? अमेरीकेमध्ये लोक पाउंड कमी करायच्या मागं पाळतात. इकडचे लोक पाउंड मिळवायला पाळतात. या अशा धावपळीमध्ये बनलेलं हे शहर. आत्ता जितके दिवस नशिबात असेल तितके दिवस नवं काहीतारी दाखवेल अशी अपेक्षा. आपण आपलं अधाशासारखं बघणं सुरु ठेवावं.

Friday, August 01, 2014

Driving Crazy ... or Driving Easy!



There are two things that bother me when I go out. One is the roads and other is the people on the road! I tried telling things to the road but the words got lost in the potholes! So I turned to the people on the road. And I was there too, very much part of that insanity, making faces at fellow riders! Here is what I want to tell the people who use the road!
  1. It's driving. Really. Else they would have called it racing.
  2. Don't take it literally when they say "Make your own rules".
  3. When it turns Green, it's really not telling you to start honking. Trust me. I have read the rules.
  4. The Yellow is to press the breaks, not the accelerator.
  5. Your vehicle doesn't really eject your seat if you wait until the Red signal goes off. Try staying put. It's safe.
  6. There is a PIL pending in the court demanding government to play meditation music till the time they fix the roads. This peaceful proposal has been submitted by T-Series, Tips and Fountain Music. Hold on to the patience till then. Traffic Jams are considered as indirect Dharna supporting this PIL. So be happy about the traffic jams.
  7. If you are stuck in the traffic jam, then most probably the vehicle in front of you and the one on the back also are stuck in the traffic jam. Don't behave as if you are the only one stuck!
  8. If the lane on your right side is empty, perhaps it is really for the vehicles coming in opposite direction.
  9. Where there is a space, there need not be a way. We got the proverb all wrong!
  10. Driving is a good time to focus on the road. Worth trying out. You may focus on other things while in the parking lot.
  11. It's not smart to look at the smart phone while driving. Mobile phones are to be used when you are not mobile.
  12. When the vehicle gives a side indicator, mostly it is going to turn that direction. It's really not an invitation to you to overtake on that side.
  13. Don't suddenly realize that you also have the accelerator when someone overtakes you. Remember, the accelerator was always there and you were doing just fine without pressing it too hard.
  14. It's completely alright to have to stop on the road for some reason. God understands that it's not a sin.
  15. Honking is not the key to clear the traffic jam. It doesn't work. Really.
  16. If you got so tempted to comment on #4, then you missed the point completely!
  17. Don't worry about #6 a lot. It's false.
Yes, the roads are bad and are designed to get messed up in rainy season. And it's government's job to fix those. And we pay taxes too. And we deserve better driving conditions. And yeah, we are frustrated or desperate!

But let's not add to the misery! We can continue to be in our senses even when we get behind the wheel. What say?
While we wait for the government to fix the roads, let's fix the people on the road. Feel free to share it with those who drive on the roads.

PS (1): If you share it within 10 minutes, then goodluck will come to you tonight in the traffic while going home. You already are seeing what happens when you ignored it.
PS (2): Anyone interested to make poster of it? :-)
PS (3): Go an extra mile, there are hardly any traffic jams there.
PS (4): Don't spend energy in finding out why the vehicles in the photo are driving in wrong direction.

Saturday, July 12, 2014

the drive

 
 
... and he was left alone with his car at the end of the day on an empty road. Clock showed 11:30pm. Radio guy was planning to doze off as he said, मधुर बेला कार्यक्रम अब समाप्त हो रहा है! He rolled down the windows, shuffled thru other radio channels, fixed one that sounded less loud and started driving towards the highway. It was drizzling, he could feel the rain-drops on his elbow of the right hand that was slightly outside the window. It was approaching mid-night, the road was all dark, it was going to be 30 minutes ride till he reached his house. He started driving on the left most lane not to bother anyone else with his slow speed, raised the volume of the song. It was some old Suresh Wadkar song. He remembered, he always has been a fan of such late night drives. A slow number or some country music on the radio doubles the charm of the nightly living streets and the running lights over the head. This time, it was all with a little spice of rainfall too. He felt as if it was an orchestrated exclusive event for him. The roads throwing in a surprise treat. It was 11:45pm. It was chilling cold. The radio track changed to "मौला मेरे" from "चक दे". Now that was too much for a treat. He waited till it reached the line "लौटके आयेगा तू शर्त लगा ले!". It pushed him 6 years back in the past. He could feel his amateur self sitting next to him. He remembered the walk by the ocean and then to the top of the hill side nearby. He remembered the time that he spent watching the overwhelming nature from the top of the hill and putting himself together for coming days. It brought a smile on his face because he felt, he was still standing at the same juncture, carrying the same amateurish tags, newer yet similar philosophies. He wanted not to reach home without finishing the song. He slowed down further, looked outside the window. The blinking yellow lights, the windshield wipers and the droplets falling on his right elbow were adding to the rhythm, pushing him further deep down the memory lane. He turned inside his apartment complex, the music too fainted, the desperate commercial intruded his silent conversation with himself. He parked his vehicle, it was past mid-night. He so much wished, there could be a chai-stall nearby or a possibility of a walk with the cup in the hand, or a midnight cafe with the benches outside and view of the water dripping from outside of the ceiling. He took a deep breath. Looked up towards the sky, felt the droplets on his face. Amidst the chaos of the words in the world around him, this was a welcome change. He looked up again and said, Thank You.

Tuesday, July 08, 2014

जरा चुकलंच! नाही?



महाराज जेव्हा महाराज व्हायचे होते, तेव्हाची गोष्ट ही. पण महाराज, महाराज असल्यामुळे, त्यांना आता महाराजच म्हणू. तसेही कोणाच्या धार्मिक, मानसिक आणि शारीरिक भावना दुखावण्याचा आपला अजिबात विचार नाही. तर एकदा नेहमीसारखेच महाराज सह्याद्रीच्या कडेकपारीमधून घोडदौड करत आपल्या किल्ल्यात परत आले. मावळ्यांची दीन अवस्था बघून महाराजांना दया आली. महाराजांना सारख्या येणाऱ्या या दयेमुळे "महाराजांना दादोजींच्याकडे प्रशिक्षणासाठी पाठवा" हे जिजाऊंचे पत्र कोणीतरी मधल्या मध्ये बदलून "महाराजांना स्वराज्याची स्वप्नं पडू लागलीत म्हणून त्यांना कौंसलिंगला पाठवा" असं करून महाराजांना पोच केलं. जिजाऊनी केलेला आदेश म्हणून महाराजांना पर्याय नव्हता. ते गेले कौन्सलिंगला. तिथे समोर एक इंग्रज बसलेला - केन रुदरफोर्ड. इंग्रज का म्हणाल तर उगाच त्याच्या आडनावावरून त्याची जात हुडकायचा प्रयत्न होऊ नये म्हणून! नाहीतर पुढची गोष्ट वाचायच्या आधीच बरेच निष्कर्ष काढले जायचे! हा केन भविष्यातून भूतकाळात आलेला म्हणे. किंवा अशी आख्यायिका तरी होती.

महाराजांनी आपले विचार त्यासमोर मांडले, "आमच्या या भूमीवर आमच्या माणसांची ही अवस्था? हे बरोबर नाही. स्वराज्य झालेच पाहिजे. या लोकांसाठी मला काहीतरी करायचंय. आणि यासाठी माझे आयुष्य गेले तरी बेहत्तर. पण हे हिंदवी स्वराज्य व्हावे, ही श्रींची इच्छा!"

केनने महाराजांकडे 'तुषार कपूरचा पिच्चर बघतोस का?' असं विचारल्यासारखी नजर टाकली. (म्हणजे खूप कौतुकाच्या भावनेनं. असं म्हणायचं होतं. नाहीतर आपल्याला तुषारच्या चाहत्यांच्यापण भावना दुखवायच्या नाहीत) "छे रे वेड्या. असं थोडीच करतात?" महाराजांना वेड्या म्हणाल्यामुळे चार मावळ्यांच्या भावना दुखावल्या गेल्या, त्यांनी लगेच तलवारी काढल्या. बाह्यावर केल्या. एखादातरी तबेला किंवा अभ्यासिका फोडण्यासाठी त्यांनी तडक गावाकडे धाव घेतली. हर हर महादेवच्या आरोळ्या ऐकू आल्या. केन पुढे बोलू लागला. "आता उद्या म्हणशील की तुला मुघल राजांना पळवून लावायचंय. असं नसतं करायचं ब्वा! तो बघ तो तानाजी. बिचाऱ्याचा पोर लग्नाला येणारे. तुझ्या नादाला लागला तर उद्या त्याचं लग्न बाजूला ठेवून तुझ्याबरोबर गावभर फिरायला येईल! तो बाजी बघ. उद्या तो ऑनसाईट जायचं स्वप्नं बघू शकेल. पण तू नादी लावलास तर पन्हाळ्याच्या बाहेरही पडायचा नाही!"

महाराजांनी आपला मुद्दा परत मांडायचा प्रयत्न केला. केनला कळू शकेल अशी अजूनही त्यांना अशा होती.
"राष्ट्राची निर्मिती किंवा विकृती ही केवळ आपल्या आणि आपल्याच कर्माने होते. हा विचार लोकांच्या मनात रुजवण्याची गरज आहे! स्वराज्य निर्मितीचं कार्य एकट्या दुकट्याच नाही? स्वराज्याचं स्फुल्लिंग या मावळ्यांच्या मनात पेटलं पाहिजे. गुलामगीरी मिटवण्यासाठी त्यांच्यातला स्वाभिमान जागा झाला पाहिजे! मग प्राण गेले तरी बेहत्तर. मग ते प्राण माझे असो किंवा या मावळ्यांचे. हे राज्य स्वर्वांचे होईल. इथल्या लोकांना सक्षम बनवता येईल. आता रायारेश्वारी स्वराज्यस्थापनेची शपथ आणि मग काम सुरु. इथल्या लोकांना मिळत आलेली दुय्यम वागणुक आता थांबली पाहिजे. हे सगळे एक बनले पाहिजेत."

केनचा पेशन्स संपत चालला होता. त्याने परत एकदा मान नकारार्थी हलवत समजावण्याचा प्रयत्न केला. "विघ्नसंतोषीपणा आहे हा. शंभर वर्षाचा अनुभव आहे हो निजामाकडे? तुझ्या CV मध्ये तुम्ही अजूनही फ्रेशर म्हणूनच दिसतंय. स्वराज्याचा आगाऊपणा कुठे करतो?" महाराजांना आगाऊ म्हणालेला ऐकून आणखी चार मावळे बाह्या वर करून तलवारी काढून गावाकडे धावले. "दुय्यम स्थान नको असेल तर स्वातंत्र्य कुठे घेतो? परत मग तुझ्यावर जबाबदारी यायची यांना सुधारून मोठं करायची. त्यापेक्षा सोपा उपाय सांगतो तुला. जरा futuristic आहे. तडक निजामाच्या दरबारी जा. आणि तिथे या मावळ्यांसाठी एकच गोष्ट माग. माग म्हणजे अगदी हट्टच धर. सोडूच नको. निजामाला सांग की बघ या लोकांच्याकडे. कसे दीन आहेत. मागासलेले आहेत. यांना संधी हवी. तर यांच्यासाठी एकच गोष्ट दे. आरक्षण! मग परत ये इकडे. ज्याचा ज्याचा तुला उत्कर्ष करायचा आहे त्याला त्याला मग आरक्षण बहाल कर. ... ... हे बघ. तुला आत्ता झेपणार नाही हे. पण आजपासून तीनशे ते चारशे वर्षानंतर जी प्रगत मनुष्यजात असेल ते हेच करणारेत. तू आज तसे केलास तर इतिहासामध्ये तुझं नाव दूरदृष्टी असलेला म्हणून होईल. ...

एक दूरदृष्टी असलेला ...

एक दूरदृष्टी असलेला बलाढ्य निजामाचा प्रामाणिक सरदार ... शिवाजी भोसले (१६ टक्के आरक्षित)."

============================

कृपया, हे वाचून कोणी बशी आणि बशा फोडू नयेत. कारण तो हेतू नाहीये.
खरं सांगू तर मला हा खेळच कळत नाही. २१ मे २००६ रोजी मी एका आरक्षण विरोधी मोर्चामध्ये सहभागी झालो होतो. आज त्याला नऊ वर्षं होऊन गेलीत. आपल्याला एक नवं आरक्षण देण्यात आलंय. स्वातंत्र्य मिळवून इतकी दशकं उलटली तरीही आम्ही लोकांना मागासच ठेवलंय म्हणून मिरवायचं पदक!

या मुद्द्यामध्ये इतकी क्लिष्टता बाळगली जाते की काय सांगा? क्रिमी लेअर, उत्पन्न पातळी, तात्विक मुद्दे, तांत्रिक मुद्दे, आणि सर्वात महत्वाचे म्हणजे भावनिक मुद्दे! काहीही बोलायला जा की कोणाच्यातरी भावना दुखावतात! तुमचा उद्देश्य काहीही असो. तेवढेच पुरात नाही. मग कशाला पडा यात?

मला आता खूप भीती वाटतेय. माझ्या, आपल्या, सर्वांच्या आरक्षित भविष्याची. पावलो पावली भावना दुखावून घेणाऱ्या समाजाची. कदाचित हे लिहिल्यामुळे कोणाच्या दुखावलेल्या भावनांची. आणि म्हणून माझ्या भविष्याची. आडनावावरून जात हुडकत फिरणाऱ्या सुशिक्षितांची. यावर आपण काहीच करू नाही शकत या रुजत चाललेल्या भावनेची. एसी ऑफिसमध्ये बसून जगातल्या तमाम मुद्द्यांवर लिखाण करून तात्पुरते समाधान मानणाऱ्या तरुणांची. "तू त्यात नको रे पडू!" असं सांगणाऱ्या जिजाऊंची.

============================

असाही विचार केला तर ... की या सगळ्यात महाराजांच्याच भावना दुखावल्या गेल्या असतील? महाराज सोडा, एकूणच स्वातंत्र्यासाठी जे जे झटले त्यांच्या भावना वगैरे दुखावल्या असतील? आरक्षणच हवं होतं तर मग स्वातंत्र्य कशाला घेतलं? गांधी, टिळक, आझाद यांनी आरक्षणच मिळवण्यासाठी लढायचं होतं न? जरा चुकलच त्याचं! वेगळी "strategy" करायला हवी होती! किंवा माझच चुकलं असेल. आणि असेल तर हे लिहिल्याबद्दल सर्वांची बिनशर्त माफी.

Thursday, May 22, 2014

They are inexperienced!

"
बऱ्याचदा मला असं वाटतं की आम्ही लोक खूप approachable होतो जनतेला. आणि म्हणून कोणीही येऊन आम्हाला काहीही बोलून जाणे सोपे होते. सत्ताधारी कोणाच्याही आवाक्याबाहेर! सर्वसामान्य विचारही करू शकत नव्हते त्यांना काही बोलण्याचा. आम्ही केला विचार. तर आम्हाला ते कसं जमणार नाही, हे सांगायला हिरीरीने पुढे आलेले लोक खूप होते. आमच्या चुकांवर हसणारे लोक होते. सुरुवातीच्या काळात प्रश्न पडायचे की, "या" लोकांसाठी आपण सर्वस्व पणाला लावतोय? पण नंतर हा प्रश्न उरला नाही. ते लोक उरले नाहीत यातला भाग नाही. स्वतःला कशाचा फरक पडून घ्यायचा ते शिकलो आम्ही.

तुम्हाला काय वाटतं की देशाला मुक्त करणं हे एकच परमोच्च ध्येय होतं? तुम्हाला ६० वर्षानंतर मागे वळून बघताना असं वाटतंय. किंवा ऐकायला चांगलं वाटत म्हणून तुम्ही असं म्हणता की सगळा देश सामील झाला! ज्याला कळालं त्यानं यात उडी मारली. सगळा देश पेटून निघावा असे दिवस होते ते. पण सगळा देश नव्हता पेटलेला. इंग्रजांची सत्ता असावी असं म्हणणारे पण कमी नव्हतेच. तसे सगळे इंग्रज वाईट थोडीच होते? इंग्रजच करतील सगळं नीट यावरही गाढ श्रद्धा असणारे लोक होतेच. तुम्हा लोकांना काय येतं? बट्ट्याबोळ करणार तुम्ही! आत्ताच धड जमत नाहीये तुम्हाला काही! अनुभव कुठाय तुम्हाला काही? हे असले टोमणे असंख्य वेळा ऐकायचो आम्ही. हे लोक सत्ताधाऱ्याना प्रामाणिक राहिले. याची सल काही काळ राहिली.

वेड लागलंय या लोकांना. अशीच ओळख होती आमची. पण नंतर नंतर अभिमान वाटायचा त्याचापण! आपण जे करतोय ते बरोबर आहे. ते घडणे गरजेचे आहे. यावर अभूतपूर्व विश्वास होता. ज्या लोकांसाठी करतोय, त्यांची थोडीशी जास्ती साथ मिळावी असं वाटायचं. पण तसं होत नाही. प्रस्थापीत बुद्धीजीवी खचितच साथ द्यायला पुढे येतात. खरं सांगू तर क्रांती यांच्या जीवावर नाहीच होत. नाना म्हणून होते एक. आम्ही त्यांचे ऐकायचो. ते शिवाजी महाराजांचे उदाहरण द्यायचे. म्हणायचे, स्वकीयांचा बंदोबस्त करताना महाराजांची अर्धी उर्जा गेली! महाराजांनी आमचे खूप सारे प्रश्न सोडवले. आमच्या शेजारच्या जोशीकाकांना थोडेसे श्रम घेऊन आम्ही काय करतो त्याची माहिती घेणं जड होतं. पण चार लोक नावं ठेवायला लागले की मात्र दुप्पट उत्साहाने हेही सहभागी व्हायचे! अशा लोकांचे कितपत वाईट वाटून घ्यायचे किंवा तेच जोशीकाका नंतर जेव्हा चार लोक चांगले म्हणायला लागले तेव्हा स्तुतीही करू लागले, तर त्याचेही भान कितपत राखायचे, हे सर्व नानांनी दिलेल्या उदाहरणातून कळायचे.

तुम्ही आज ६० वर्षानंतर मागे बघताय तेव्हा तुम्हाला स्वातंत्र्य संग्राम वगैरे वाटतंय. Larger than life! जेव्हा हे सगळं सुरु होतं तेव्हा लोकांना शाश्वती नव्हती की खरच मिळणारे स्वातंत्र्य! पारतंत्र्याची सवय झालेली. त्याच्यात जगण शिकलेले लोक. तू मगाशी म्हणालास तसं, "उंगली क्यू कर राहे हो?" असं म्हणणारे लोक होते. आम्ही नव्हतो १०० टक्के बरोबर. आम्ही organized ही नव्हतो. हर कोपऱ्यातून वेगवेगळे आवाज उठत होते. पण सगळ्यांचा हेतू चांगला होता. एक होता. आमच्यावर टीका करणं काहींनी पसंत केलं. आमच्यातील उणीवा भरून काढण्यासाठी आम्हाला साथ देणं काहींनी पसंत केलं. साथ दिली त्यांना घेऊन आम्ही पुढे गेलो. हे महत्वाचे. हेतू शुद्ध ठेवला तर लोक जुळत जातात. ज्यांना समजायचं त्यांना कळत जात! आज नाही समजलं तरी काय झालं! नाहीच कळणारे ज्यांना, त्याचं दुःख काय करावं!

स्वातंत्र्य मिळवताना जे लोक जीवानिशी गेले ते गेले. तुरुंगवास भोगला तो भोगला. पण त्यापासून कोसभर लांब राहून, साहेबांचा जमानाच चांगला होता असं म्हणणारे लोकही होतेच की. नंतर एकदा जोशीकाका येऊन म्हणाले, मिळालेलं स्वातंत्र्य उपभोगायला आम्ही कितपत लायक अहोत हे काळात नाही! कारण जेव्हा सहभागाची गरज होती तेव्हा आम्ही टीका करत बसलेलो! त्यांना नाना म्हणाले. वेळ अजूनही गेलेली नाही. संग्राम अजूनही संपलेला नाही. १०० टक्के गणितं अजूनही सुटलेली नाहीयेत. आणि ते एकट्या दुकट्याच काम नाहीचे! उणीवा भरून काढता येतात का बघा. तुमच्या बाजूला असंख्य लोक आजही प्रयत्न करतायत. त्याला साथ द्या. ते अपूर्ण असतील. म्हणून त्याना दूर सरू नका. लायक किंवा नालायक यावरून तर ठरवणार? आपल्याला स्वातंत्र्य मिळवायचं होतं. इंग्रजांना घालवण हा फक्त त्यातला एक भाग होता. ते गेले म्हणजे स्वातंत्र्य मिळालं असं थोडीच आहे! आत्ता साथ सोडाल या संग्रामाची तर ६० वर्षानंतरही स्वातंत्र्य मिळालं असं वाटायचं नाही!
"

कर्नल जोगळेकारांबरोबर एक आजोबा भेटले. ते स्वातंत्र्य सेनानी होते. अनायासे भेट झाली आणि गप्पा रंगल्या. त्यांचं नाव विचारायचं राहून गेलं. पण पुन्हा भेट होईलच अशी इच्छा आहे. स्वातंत्र्य मिळालेलं बघायचंय त्यांना. त्यांना अजूनही आशा आहे.

Thursday, May 08, 2014

शहीद झालेला शहीद



७ वर्षामध्ये १७ निर्दोष लोकांना मुक्त करता करता शेवटी शहीदचाही निकाल लागला. मग काही काळ लोकांनी डोक्यावर घेतलं. नंतर परत लंबा सन्नाटा. तसं आपण सन्नाटामधेच राहणारे लोक आहोत म्हणा. आपल्याला कोणी आवाज केलेला आवडतच नाही. तशातलीच कथा. शहीदच्या उद्यापासून अस्तापर्यंतची. नंतर मग जरा ऑनलाईन बघितलं तर मग आणखी गोष्टी कळल्या. खरं खोटं आता कोणाला माहिती? पण जरा विचित्रच आहे नाही? एकूणच आपली निष्क्रियता किंवा काही ठराविक गोष्टींकडे कानाडोळा करण्याची सवय. सगळंच.

शहीद नावाचा सिनेमा पाहिला. शहीद आझमी नावाच्या माणसावर आहे तो. कोण हा माणूस असं विचारणार असाल तर खाली लिंक दिलीये.

दहशतवादी कारवायांमध्ये चुकीच्या पद्धतीने अटक झालेल्यांना सोडवण्याचा ध्यास घेतलेला एक तरुण. यानंच का घेतला असावा? कारण तोही असंच एकदा यामध्ये सापडलेला. आणि असा सापडला की सात वर्ष तुरुंगात बसावं लागलं! सात वर्ष! सात वर्ष म्हणजे आपण निवडणुकीबद्दल ओरडत आपापली देशभक्ती मिरवतोय त्या पेक्षा वीसपट मोठा कालावधी किंवा त्याहूनही जास्त. हा माणूस वकील बनतो. प्रचलीत गोष्टींशी जमत नाही म्हणून आपलीच practice सुरू करतो. सगळं पणाला लाऊन लढतो. कोणासाठी? जे हताश होऊन तुरुंगामध्ये बसलेत त्यांच्यासाठी. ज्यांना माहितीच नाहीये की बाबा आम्ही काय चूक केली! त्यांच्यासाठी. परत कोणाला "बाइज्जत बरी किया" ऐकण्यासाठी ६-७ वर्षं तुरुंगात राहावे लागू नये यासाठी. यामध्ये तयार झालेले शत्रू, न मिळालेलं सहकार्य पण तरीही गाठलेली उंची या सगळ्यांबद्दलचा सिनेमा.

दहशतवादी म्हणून लेबल लावायला आपण सगळे उत्सुक असतोच. चटकन निकाल लावून टाकायचा आपल्या बाजूनं म्हणेज संपला विषय! या अशा चुकीचं लेबल लागलेल्या लोकांना सोडवण्यासाठी शहीद लढला. पण त्याला थोडीफार जी फेम मिळाली ती त्याच्या हत्येनंतर.

उदो उदो व्हायला कोणीतरी मारायला का लागतं हे एक गूढ आहे! म्हणजे जिवंत असताना छळ छळ छळा. आपली अक्कल आणि लायकी नसताना काहीही आणि कसेही वागवा. Opinions are like assholes anyway. Everyone has one. मग आपापलं एक एक मिरवत फिरा. समोर गांधी आणि टिळक जरी आले असते तरी आम्ही त्यानाही आमची मतं ऐकवली असतीच. तीही कट्टरतेने! सखोल वगैरे विचार करणं किंवा ऐकून घेणं किंवा थोडा प्रयत्न करून खरं ते शोधणं हे नाहीच भावत आपल्याला! फेसबुकवर कुठेतरी वाचलेलंही पुरतं की आपल्याला. चांगलं काहीतरी करायला गेलं की त्यानं ११० टक्के चोख असावं ही का अपेक्षा? आणि तो १०० टक्के कसा नाहीये हे दाखवण्यासाठी किती ती चढाओढ! भले ९९ का असेना. पण मग ब्रेकिंग न्यूज अशी असेल की शेवटी १०० टक्के नाहीच न! काय सुख मिळत असेल हे दाखवण्यात आणि बघण्यात. म्हणजे मी नागडा आहेच पण तो ही काही अखंड कपडे घालून नाहीचे!!

आणि माणूस मेल्यावर असं काय घडत असावं की लगेच महानता प्राप्त होते? काहीतरी चांगला साक्षात्कार व्हायला किंवा कोणाचा चांगुलपणा, ग्रेट वगैरे असणं कळण्यासाठी कोणीतरी धारातीर्थी का पडावं लागतं आपल्याला? मला असं वाटतं की कदाचित आपल्याला हा साक्षात्कारही होत नसावाच. आता पडलाच आहे धारातीर्थी तर आमच्याकडे पद्धत आहे त्यांना महान करण्याची. मग करा महान! म्हणजे हे ही तितकंच निरर्थक नाही का? म्हणजे त्याला नावं ठेवतानाही आमच्याकडे पुरेशी माहिती नव्हती. म्हणजे बहुदा नसतेच ती आमच्याकडे. मग मृत्यूनंतरही माहिती मिळवणे आवश्यक नसतच. चार लोक महान करतात, चला आपणही करू. माणूस माकडाची प्रगत आवृत्ती आहे यावर माझा विश्वास नाही. मेंढराची प्रगत (?) आवृत्ती असावा माणूस.

शेवटी सगळीच चिडचिड. उगाच आग ओकतोय. स्वतःच्या निष्क्रियतेवर आलेला राग असावा. तसं म्हणाल तर शहीद बद्दल वाईट का वाटावं? सात वर्षात त्यानं १४ लोकांना आणि त्यांच्या कुटुंबाना जे काही दिलं ते किती लोकांना उभ्या आयुष्यात कोणालातरी देता येतं? कोणाचं आयुष्य जास्ती उजवं?

आपली ही सवय खूप घातक वाटते मला. थोडं अंतर्मुख व्हावं आपण अशी खूप गरज वाटते. आजही कोणीतरी असेल आजूबाजूला. प्रामाणिक हेतूनं काहीतरी करायचा प्रयत्न करत असेल. आपण त्याचं अपयश जास्ती बारीक लक्ष देऊन बघतोय की त्याच्यामध्ये असलेल्या चुकांचा जीवाच्या आकांतानं शोध घेतोय की चक्क पूर्णपणे कानाडोळा करतोय? फक्त हेतू चांगला असणं आपल्याला पुरातय की आपण चार हात लांब राहून ११०% ची मागणी करतोय? सामोराच्यात उणीवा असतील तर त्या आपण कशा भरून काढू, असा विचार करतोय की चला हा पण आपल्यासारखाच incomplete आहे यात सुख मानतोय? आता हे आपापलं गणित. यात कोणाला किंवा त्याच्यामधल्या चांगल्या हेतूला शहीद करवत नाही न हे जेव्हा बघणं जमेल तेव्हा खरं नाहीतर सगळीच Black Comedy! 
Hope we stand up for the right causes. Hope we take efforts to be open and to find out truth. Hope we are proactive when we do that.
शहीद बद्दल ... http://en.wikipedia.org/wiki/Shahid_Azmi