बऱ्याचदा मी या अशा चर्चेमधे अडकतो. काहीतरी सांगायला जावं आणि त्यातून एकदम डिबेट्सच सुरू व्हाव्यात. म्हणजे एखाद्या नविन कन्सेप्टबद्दल वाचावं. एकदम ईंप्रेस होऊन कोणालातरी सांगावं आणि त्यानं आपल्यावरच हल्ला चढवावा की किती फालतू, युजलेस कन्सेप्ट आहे किंवा एकदम अशक्य म्हणून पकाऊ आहे. मग आपणच एकदम जसे काही स्वतःचच काहीतरी खोटं पडतय अशा भावानं बाजीप्रभू व्हायचं. मग अगदी शिरा ताणून चर्चा. शेवटी मग थकून भागून चर्चेचा सामना अनिर्णित जाहीर करणे. कोणच कसं काय आपल्यासारखं पाहू शकत नाही - हा आणि एक नंतरचा अचंभा - कदाचीत आपण काहीतरी स्पेशल आहे असे स्वतःला वाटून घेण्यासाठी. याचसारखा दुसरा प्रकार म्हणजे एखादी घटना सांगताना कोणीतरी मधेच असिंप्टोटीक शेरा मारावा. आपण त्याची नोंद म्हणून काहीतरी म्हणावं आणि पुढं जावं आणि मग त्यावरच परत आपल्याला सगळ्यानी मागे ओढावं. आणि सुरू लढाई!
"तू वाचली का बातमी? ईथल्या कोणाची कोण पोर, भारतातमधे अपघातात सापडली. पोलिसानी आत्महत्या म्हणून बंद केली केस!"
"नाही गं वाचली." माझं ड्राईवींग सुरू होतं.
"तसंही या लोकाना काम करायला नको. त्यात आणि या मुलीचे आई वडिल देशाबाहेर ... कोणाचा बाप विचारतोय याना केस दाबली तर!!"
"असं नाही व्हायला पाहिजे. आज लोक येतात आपल्या देशात. आपण काळजी नाही केली त्याची तर बंद करतील लोक यायचे."
"अरे... टुरीस्ट लोकाना तर कसलं लुबाडतात माहीत आहे ना? दसपट भाव लावतात! कश्शातही"
"हं."
"आमच्या ऑफीसमधल्या कोण अमुक अमुक गेलेला ताज बघायला. सगळं आवडलं वगैरे त्याला. पण लोक उल्लू बनवतात म्हणून कडवट तोंड करून सांगत होता!"
"हा हा. बिचारा. मेरेको उल्लू बनाया! म्हणून रडत होता काय?"
"नाहीतर काय अरे. पण आपलच नाव खराब करतो यार आपण!"
खरतर मला असली क्रिबींग सेशन्स आवडत नाहीत. म्हणजे त्यातून निष्पन्न काहीच होत नाही. फक्त आपल्या आतमधली अस्वस्थता बाहेर निघते. यामुळं कोणाचं काहीच होत नाही. फक्त स्वतःच स्वतःला समाधान देतो आपण. की बाबा, आपण बेधडक बोललो तरी. बोलल्यानंतर बरंही वाटतं. किंवा म्हणू अस्वस्थता कमी होते. पण सगळं आपल्याच विश्वामधे. असो. भारतामधले पर्यटक आणि त्यांच्या भोवतालचं जग बरच बरं होत चाललय. माझ्या ऑफिसमधला ऑस्ट्रेलिअन ब्रॅड पुण्यात मस्त ८-१० दिवस जाऊन खुश होऊन आला. पलीकडच्या राज्यात फेरफटका मारून यावा तसा. फार मोठी अचिवमेंट आहे यार. People are no more afraid of India, Crowd, and what not. पण हे मला तेव्हा नाही आठवले! मला वेगळाच प्रसंग आठवला. आणि दुर्दैवाने मीही क्रिब सेशनमधे हातभार लावला.
"अगं मीही मागे एकदा एक डिबेट बघत होतो. कोणा रशीयन का ब्रिटीश मुलीवर गोव्यामधे कोणीतरी अतीप्रसंग केला. डिबेट होती नॅशनल न्युज चॅनलवर. मुलीची आईपण तिथे. गोव्यातले लोकल रहिवासीपण उपस्थीत. मुद्दा काय तर, मुलगी ती तशीपण कमी कपडे घालून फिरायची, मुलांशी लगट करायची का असेच काहीतरी. तिच्यावरच संस्कारच नव्हते. आमच्याकडे कोणी करत नाही असे. and blah blah. I mean what the heck yaar! Does that give you right to do anything? डीबेट संस्कार या विषयावर की घडलेल्या घटनेवर? Talk about bloody संस्कार later yaar. तोंड वर करून बोलतात तरी कसे देव जाणे?"
"ओह. तिला वापरू देत ना कपडे कसलेही. Freedom आहे यार. ती तिच्या कल्चरने किंवा सवयीप्रमाणे वापरेल. म्हणून काहीपण कराल काय? तिला असतील ३-४ मित्र तिच्या देशात. म्हणून बोलली असेल गोव्यातही ३-४ मुलांशी. लगेच लगट काय? हे लोक तसेही वसवसलेले. हरकून गेले असतील मागे तिच्या. का म्हणून आपले कल्चर फोर्स करा तिच्यावर?"
विषय भरकटला हे ध्यानी येण्याच्य़ा आधीच माझीही वाट चुकली.
"That was not the time to discuss all that. जिथे जाऊ तिथल्या पद्धती, प्रपंच तिने बघीतले नाहीत. खरय. याबद्दल बोलू नंतर. मला या विषयाकडं जायचच नाहीए. कारण घडलेली घटना त्याच्याही पलीकडली आहे. बलात्कार हा गुन्हा आहे. आणि आहेच."
"हो रे. तसेही पद्धती नाही बघितल्या म्हणजे काय? आपण अमेरीकेत राहतो पण ईथे कोण आपल्याला फोर्स करते की त्यांच्यासारखे वागायला? आपण आपल्या रिवाजाप्रमाणे राहतोच ना?"
"आपण कोणच्याही रिवाजाला धक्का तर लावत नाहीए ना. हा प्रकार वेगळा आहे. आता जपानी कंपनीबरोबर व्यवहार करताना. त्यांच्या ग्रीटींग वगैरे करायच्या वेगळ्या पद्धती वगैरे नाही शिकत आपण? You should know how things will be received at new place, new cities, new country! आपलेच घोडे दामटा पुढं काय?"
"ते बिझनेस एटीकेटस. त्याचा काय संबंध ईथं? आणि असं कसं? आपल्या लोकाना काय म्हणे हौस लगेच मागे मागे जायची. झूमधले प्राणी आहेत काय पर्यटक? त्यांच्या वेगळ्या रीती तसे करत असतील. तुम्हाला काय लगेच सावज मिळाल्यासारखं त्याना पकडायचय? आपले रिवाज शिकवायला? काम नाहीए लोकाना! काहीतरी खुसपट काढून आपलं अस्तित्व दाखवायचय."
सहसा, यावर म्हणलं असतं की सगळ्या पुढारी लोकना, आपल्यासारख्या टाईमशीट्स भरायला लावल्या पाहिजेत! काम नाहीए त्याना! पण गाडी आधीच भरकटलेली. कुठेतरी कळत होतं की आपला मुद्दा सुटलाय आणि आपण दुसऱ्याच लाईनवर खर्ची पडतोय. पण ती एक भावना असते ना की समोरच्याला आपण काय म्हणतोय ते समजलच नाहीए! त्या तसल्या भावनेने आणखी शिरा ताणून मुद्दा मांडण्याचा जोश चढलेला. मुद्द्यवर येऊ रे नंतर.
"वेगासला गेलो. रोमचा गेटअप बघून लगेच म्हणालो आपण, In Rome, do as Romans do! तेव्हा का बरं नाही तुम्हाला हवं तसं केला? का म्हणून अट्टाहास रोमन व्हायचा? मला त्याविरुद्ध नाही बोलायचय. पण तसच, In India, do as Indians do का नाही? जास्ती restrictions आहेत म्हणून? ऊद्या माझ्या कोल्हापुरात कोणी आला. ऊघडा वागडा महाद्वार रोड वर फिरायला आला, छान ऊन पडलय म्हणून. लोक काय वेलकम करणार काय? शक्यच नाही. असशील तुझ्या देशामधे असं फिरत. पण दुसऱ्याकडं आलोय तर जरा त्यांच्या दमानं घ्यावं ना? मला हे म्हणायचय. दुसऱ्याच्या पद्धतींना, दुसऱ्याच्या रीवाजाला का धक्का लावा?"
"मग कसलं स्वातंत्र्य रे? ईथे मी मला हवं तसं करू शकते. वागू शकते. कोणी काही भुवया ऊंचावत नाही. सुरक्षीत वाटतं म्हणून. असं कुठं असतं काय? की स्वतंत्र आहात पण हे, हे आणि हे करायचं नाही. हे, हे आणि हे बघायचं नाही. हे, हे आणि हे बोलायचं नाही! आणि हे जर मोडलं तर मग जे होईल त्याला आणि कोणी जबाबदार नाही!"
"हे बघ. जे झालं मी त्याला डीफेंड करतच नाहीए. पण ..."
"नाहीतर काय? एवढे freedom पाहिजेच की!"
"अरे यार ... हक्क आणि कर्तव्य वगैरे काही शिकलोय की नाही शाळेत? फक्त "हक्क आहे, हक्क आहे!" म्हणून काय ऊड्या मारायच्या? तुमचे काही कर्तव्यपण आहे म्हणलं की मग तत्वज्ञान सुचतं होय? पण सोड मला बोलायचच नाहीए या विषयी. आपण भरकटतोय."
"मला फक्त एवढच सांगायचय ..."
"नको. मला ऐकायचच नाहीए. खूनकी नदिया बेह जाएंगी. जंग छीड जायेगी."
एव्हाना माझं ऑफिस आलं! गाडीमधून हकालपट्टी झाली. दोघानी एकमेकाची शक्ती बहुतांशी खाऊन झालेली. मनात चीडचीड होती. मुद्दा सोडून नाही त्या विषयावर बाजीप्रभू झाल्याबद्दल. जे घडले त्याबद्दलचा राग, अस्वस्थता दुसऱ्या विषयावर निघाली. तो विषय कदाचीत रास्त होताही. पण ...? माहित नाही यार. काही गोष्टी मनामधे एकदम स्पष्ट असतात. एखादी गोष्ट चूक, बरोबर, रास्त, खराब आह. आणि आहे म्हणजे आहे. Last thing, you want is to discuss, argue and proive it!! वाद करू पण. मग शेवटी हकनाक एनर्जी वाया घालवली असं वाटतं. आपल्या मनाविरुद्ध कोणीतरी आपली एनर्जी वापरून टाकली आणि आपण काहीच करू शकलो नाही!! असे काहीतरी. Talk about conclusions. Talk about actionables. Spend hours for that. Why the heck do we spend hours and hours to talk about our feelings and emotions? I feel so much emotionally challenged at these times! अर्धवट विषयांच बॅगेज, आणि स्वतःच्या कल्पना, आणि सिद्धांत अभेद्य नाहीत ही अशी भावना. या अशा तिटक्या विटांचं काय बनणार जर दररोज कोणी येऊन त्यांच्यावर वार करणार असेल तर. आणि तसेही कोणी पुर्णतः वेगळं म्हणत नाही. पण कदाचीत आपण आपले मुद्दे सिद्ध करण्याऐवजी आपले मुद्दे सिद्ध करण्यासाठी खपतो. आणि दुसऱ्याच्या विटाना नकळत भगदाडं पाडतो.
Whatever. वेळ कोणाला आहे ईथं! मी समोर बघून स्वतःशीच म्हणालो, "च्यायला, अजुन अख्खा दिवस आहे!!"
Saturday, May 23, 2009
Saturday, May 02, 2009
बिंब
(स्फुर्ती: नुपुरची कविता)
असं होतं खरं मधेच ... अनोळखी वाटणं.
कधी ... हे आपणच का? ... असं होणं.
आरशात बघून विचारावं,
की नातं काय आपलं?
जे काल बिंब दिसलं
ते आज कुठं गेलं?
काही माझं हरवलं?
की मी कशात हरवलो?
मग दररोज आरशात बघणं
आणि आपल्याच बिंबाशी हितगुज करणं,
जुन्या बिंबाचं काय झालं,
आणि हे नवं कुठून तयार झालं
सगळं जरी आपलं असलं
तरी उगाच अनभीज्ञपणे वागणं
लाख यत्नानं ओळख पटवणं
आणि मग दुसऱ्या दिवशी परत कोणी वेगळच दिसणं!
असं होतं खरं मधेच ... अनोळखी वाटणं.
कधी ... हे आपणच का? ... असं होणं.
आरशात बघून विचारावं,
की नातं काय आपलं?
जे काल बिंब दिसलं
ते आज कुठं गेलं?
काही माझं हरवलं?
की मी कशात हरवलो?
मग दररोज आरशात बघणं
आणि आपल्याच बिंबाशी हितगुज करणं,
जुन्या बिंबाचं काय झालं,
आणि हे नवं कुठून तयार झालं
सगळं जरी आपलं असलं
तरी उगाच अनभीज्ञपणे वागणं
लाख यत्नानं ओळख पटवणं
आणि मग दुसऱ्या दिवशी परत कोणी वेगळच दिसणं!
Friday, February 27, 2009
मंदाकिनी
पाऊस आला पाहिला,
ना पाहिला मी सोहळा,
मृद्गंध सारा लोटला,
तोही असे ना वेगळा
शब्दास आली ही कळा,
दूरस्थ भासे भावना,
अल्हाद ना दे मानसी,
जैशी सुखाची शर्तशी
संगीत माया धुंदशी,
बेधुंद काया गुंगशी,
ना गंध वाटे त्यातही,
ना मग्न झाले आजही
झाले कसे वेडेपिसे,
हे अंतरीचे गूढसे,
कोणी असे का दूरचे,
लावी मनाला ओढसे
खरं सांगतो, हा वर जो काही प्रकार तयार झालाय, तो लिहिताना नाकी नऊ आले. बऱ्याच ब्लॉगवर मध्यंतरी कविता कविता पाहिल्या. मधे कुठेतरी वृत्तं वगैरेपण वाचली. मनोगत.कॉम ला धन्यवाद. तिथुनच हा किडा घुसला मनात. (मधेच सगळी वृत्तं, यमक वगैरेची बंधनं झुगाडून प्रसून जोशी सारखा धडा लिहायचा विचार आलेला पण त्याच्यासारखे आपल्याकडे शब्दभांडारही नाही आणि परत त्याला संगित लावून पावन करायला रेहमानही नाही). असो. मंदाकिनी मधे लिहायचा केलेला पहिला प्रयत्न आहे (म्हणून नाव पण तेच आहे. काही दुसरं सुचवलं कोणी तरी चालेल). समस्त कवीवर्गास अर्पण. आणि खरच, हे जो लोक वृत्तात वगैरे बसवून कविता लिहितात त्याना मनापासून सलाम. लयी महान आहात राव आपण! मलाही मजा आली आणि तेवढीच तारांबळही उडाली. :)
ना पाहिला मी सोहळा,
मृद्गंध सारा लोटला,
तोही असे ना वेगळा
शब्दास आली ही कळा,
दूरस्थ भासे भावना,
अल्हाद ना दे मानसी,
जैशी सुखाची शर्तशी
संगीत माया धुंदशी,
बेधुंद काया गुंगशी,
ना गंध वाटे त्यातही,
ना मग्न झाले आजही
झाले कसे वेडेपिसे,
हे अंतरीचे गूढसे,
कोणी असे का दूरचे,
लावी मनाला ओढसे
खरं सांगतो, हा वर जो काही प्रकार तयार झालाय, तो लिहिताना नाकी नऊ आले. बऱ्याच ब्लॉगवर मध्यंतरी कविता कविता पाहिल्या. मधे कुठेतरी वृत्तं वगैरेपण वाचली. मनोगत.कॉम ला धन्यवाद. तिथुनच हा किडा घुसला मनात. (मधेच सगळी वृत्तं, यमक वगैरेची बंधनं झुगाडून प्रसून जोशी सारखा धडा लिहायचा विचार आलेला पण त्याच्यासारखे आपल्याकडे शब्दभांडारही नाही आणि परत त्याला संगित लावून पावन करायला रेहमानही नाही). असो. मंदाकिनी मधे लिहायचा केलेला पहिला प्रयत्न आहे (म्हणून नाव पण तेच आहे. काही दुसरं सुचवलं कोणी तरी चालेल). समस्त कवीवर्गास अर्पण. आणि खरच, हे जो लोक वृत्तात वगैरे बसवून कविता लिहितात त्याना मनापासून सलाम. लयी महान आहात राव आपण! मलाही मजा आली आणि तेवढीच तारांबळही उडाली. :)
Monday, February 16, 2009
नॅनी
nani is offline. Messages you send will be delivered when nani comes online.
मी: Hey ... you there?
.
.
.
.
नॅनी: तू हल्ली ईतका बिजी कसा?
Sent at 11:16 AM on Monday
.
.
मी: सध्या जरा सिन्सिअर व्हायचे भूत चढलय ... मे बी त्याच्यामुळे
नॅनी: ईतका की ब्लॉगवर पण काही टाकला नाहीस. कित्येक वर्षात! १०० वर्ष झाली असतील!!!
मी: जखमेवर बोट!! :(
नॅनी: बिजी ऑफिसमधे. घरी काय बिजी ठेवतात तुला हे विचारतीये!
मी: कॉल्स असतात यार पुण्यामधे.
नॅनी: ऑफिसमधे प्युन तुझ्यापेक्षा जास्ती बिजी असेल.
मी: ;)
नॅनी: का काय झालं?
मी: आजतक मै तुमसे झूठ बोल रहा था. मै प्युन हू. हा ... मै प्युनही हू.
नॅनी: तुझी कंपनी भारी आहे बाबा. प्युनला अमेरीकेत ट्रान्सफर करतात!
मी: ईथे महाग असतात बाबा प्युन.
नॅनी: :) असो. पण ब्लॉगपासून दुरी का?
मी: परत जखमेवर बोट!
नॅनी: जखमच का खरं?
मी: नाहीतर काय? सप्टेंबर पासून नवा पोस्ट नाही. मग जखमच की!
नॅनी: तेच तर म्हणतीये.
मी: ११ अनपब्लीश्ड पोस्ट आहेत यार. सगळे अर्धवट राहिलेत. च्यायला मन पुढे सरकले की परत मागच्या विषयावर येतच नाही.
असो.
बघू.
होयेगा.
कुछ तो होयेगा.
हा वीकेंड.
गच्चीसाठी खच्ची!
नॅनी: चलो ... झोपायला जाते.
मी: बाय.
नॅनी: बाय. आणि लिही काहीतरी. तुझे पोस्ट्स खरच मिस् करते मी.
मी: आई शप्पथ! लेखक पेटला आता. लेखकाला माहितच नव्हते की त्याला कोणी मिस् करते. आता बासच.
हर हर महादेव.
नॅनी: :)
मी: झोप तू आता. सोक्ष मोक्ष लावतोच मी आता ईकडे.
नॅनी: पेटते रहो.
nani is offline. Messages you send will be delivered when nani comes online.
.
.
.
.
.
.
कोणाशी कधी कसे सुत जमावं याचा काही नेम नाही. एकदम अनपेक्षीत प्रकारे, काहीही कारण नसताना, किंबहुना चुकूनच आमची गाठभेट झाली. सुमारे ३ वर्ष झाली आता या ओळखीला. हा अनपेक्षीत प्रकार म्हणजे एक ईमेल होते की जे चुकुन मला आलेले.
आपल्या पुढची जनरेशन जशी नेहमी एकदम पांडू वाटते तशी नॅनीपण जरा पाकाऊ होती. चॅटमधे भरपूर "?" आणि "!"! शेवटचे अक्षर अगदी ओळभरेपर्यंत टाईप करणे हे असले प्रकार ठासून भरलेले. ईंटरनेट, ईमेल्स आणि चॅटचे पहिले नऊ दिवस सुरू असल्याने तेच तेच जुने झालेले फॉरवर्ड ईमेल्स पाठवायची. आठवड्याला "Must See...", "don't ignore", "toooooo good" या असल्या ईमेल्सचा रतिब टाकायची. आपण पाठवतो त्या ईमेल मधे काय आहे हे बघायच्या आधीच, माहित असल्या नसल्यांच्या ईनबॉक्समधे ते ईमेल पोहोचवणे म्हणजे आपले परमकर्तव्य आहे असे मानणाऱ्या लोकांपैकी एक होती ती. सुत जुळावे असे आणखी काहीच आमच्यात नव्हते - फक्त डेस्टीनी. माझ्या लेखी सर्वार्थाने निरर्थक प्रकारामधे मोडणारे सगळे गूण तिच्यात. आणि रूड हा शिक्का माझ्यावर आधीपासूनच. एकमेकाशी बोलण्याचे - बोलत राहण्याचे आम्हाला काहीच कारण नव्हते. कोणत्याही क्षणी, कोणत्याही दिवशी, "चल जा गेलास ऊडत" असे झाले असते तरी कोणालही नवल वाटले नसते. पण असे झाले नाही. उलट जास्तीच ट्युनींग जमत गेलं.
एकमेकांकडून काडीचीही अपेक्षा नाही आणि काही गमावण्याचे भय नाही. कदाचीत अशी एक बाजू कदाचीत प्रत्येकाला असते. आहेत त्या सर्व नात्यांना समांतर. आणि ती तशीच रहावी म्हणून मूक धडपडही सुरू असते. एकमेकापासून अनभीज्ञ असण्यामुळे आमच्यातल्या बोलण्यावर आमच्या आजूबाजूच्या तत्कालीक गोष्टींचा फारसा प्रभाव पडलाच नाही. एकमेकाचे मूड्स वगैरे प्रकार फारसे मधे आलेच नाहीत. नॅनी ऊगाच शंभर प्रश्न विचारायची. "काय संबंध हिचा?" हा विचार येण्यापेक्षा "काय फरक पडणार आहे?" हा विचार डोक्यात यायचा. खरं म्हणजे तर आजीबाईसारखे ईतके प्रश्न विचारते म्हणून नॅनी नाव पडलेले. आज जेव्हा असे कधी कधी निवांत बसतो तेव्हा वाटते, यार ... ३ वर्ष! केवढे काही झाले यात. मीही कुठच्या कुठे आलो आणि ती ही! जिथे आमच्या बोलण्यात "हू केअरस्?" भाव असायचा, तिथे बरेच दिवस कोणी पींग नाही केले की त्याचीही नोंद असायची. आणि हे असेच तब्बल ३ वर्ष सुरू आहे. मित्र व्हायला प्रत्यक्ष भेटायला थोडीच लागतं? बरेच किस्से ऐकलेले असे पेन फ्रेंड्स वगैरेचे. नॅनीमुळे मलाही असा एक अनुभव आला.
पण जरा विचार केला की वाटते की यात माझाच स्वार्थ होता. म्हणजे ते असे की कुठेतरी या मागच्या ईतक्या वर्षात हळू हळू मी स्वतःच गढूळ होत गेल्याची भावना येत होती. हाताकड बघीतलं की वाटायचं की यार ३-४ च तर रेघा आहेत. त्याही आखल्यासारख्या. असं कसं काय गिजमीट झाल्यासारखं वाटतय सगळं? बऱ्याच गोष्टी, बरेच विचार आतल्या आतच रहायचे. बोलतो कशाला? उगाच वाटायचे की आधी स्वतःकडे बघा - असले काहीतरी मीच स्वतःला म्हणून गप्प व्हायचो. आपलं अक्षर जरी चांगलं असलं तरी आपली पाटीच कोरी नसेल तर वाचणार तरी कोण? कधी काळी यावर असेही म्हणलो असतो, मी कसा का असेना म्हणून मी काय म्हणतो त्याचे महत्व आणि त्याचा दर्जा कमी थोडाच होतो? पण हळू हळू हे ऊत्तर पटेनासे झाले. आजुबाजूच्या बऱ्याच गोष्टींसाठी मी एक मूक प्रेक्षक व्हायचो. आणि आपण मूकपणे बघतो, म्हणून शब्द आणखीच रसातळाला जायचे. पण या सगळ्या गढूळपणात मग एक असेही अंग पुढे यायचे की जे एकदम पारदर्शक, एकदम स्वच्छ असायचं. अर्थाअर्थी काही संबंध नसताना, केवळ यात काही अशुद्ध नाही म्हणून बरं वाटायचं. त्याच्या टिकण्यानं किंवा न टिकण्यानं कोणालाही काही फरक पडणार नसायचा. पण तरीही त्याचं अस्तित्व ऊगाचच निरागस वाटायचं. त्यात कशाचं भय नाही. त्यामधे अजुनही खुली किताब आहोत आपण असे वाटायचं. यातून तयार होणारा नॉस्टॅल्जीयाच मग पुढे ते टिकवायला भाग पाडायचा. नॅनीबरोबरचं नातं कदाचीत माझ्यासाठी असं होत गेलं. आणि ते असच ठेवलं यामागं हा ईतका सगळा स्वार्थ! पण ... हे असं सगळं मला हल्ली वाटतं. म्हणजे आफ्टरमॅथ.
आपण टप्प्या टप्प्यानं मोठं होतो. प्रत्येक टप्प्यावर आपण वेगळे. बेटा बेटावरून पुढे जातो. प्रत्येक बेटावर कोणाकोणाला भेटतो. बऱ्याच कला दाखवतो. त्याची कदरही होते. त्यातून निर्माण झालेल्या अपेक्षांचे मुठभर मास चढवून मग पुढच्या बेटावर जातो. पण मग त्याच कला कलेकलेने मारूनही टाकतो. एक वेगळंच रुप घेतो. नव्या बेटावरच्या नव्या कला. चक्र सुरू. आणि मग परत एकदा या जुन्या बेटावरच्या सवंगड्यांची भेट झाली की मग मुखवटा पांघरतो. जसे काही आपण अजुन तसेच आहोत. पण मुखवट्यावीना होती ती मजा त्यात राहत नाही. कदाचीत समोरच्याला तिच मजा येतही असेल पण ते श्रेय कदाचीत मुखवट्याला आहे. बरीच बेटं पार केल्यावर, बरेच मुखवटे जमतात. आणि मग अचानक कुठेतरी एक जागा मिळते जिथे मुखवट्याची गरजच लागत नाही. कारण सगळंच अनोळखी. दरवेळी तितकंच नवं. मुखवट्यावीना स्वतःला बघणेही तितकेच रंजक. पुर्वी पुण्यात असताना दर वीकेंडला आश्रमातल्या मुलाना भेटायला जायचो. दरवेळी प्रचंड ताजंतवानं वाटायचं. त्या लहान लहान मुलांचा ऊत्साह बघून स्फुरण चढायचं. पण गेली २ वर्ष आता तो आश्रमही नाही आणि ती मुलंही नाहीत. अगदी तेवढं नाही, पण त्याची आठवण करून देणारं असं काहीतरी आहे हे बिना मुखवट्याचं वावरण्यात. नॅनी आणि माझी बडबड प्रसंगी अगदी निरर्थकही असली तरी यात अशी गोडी आहे. एकमेकाला चुकायचा स्कोपही आम्ही देत नाही आणि बरोबर चुक मोजतही नाही. एकदम काहीच्या काही बडबडत राहाणं आणि काहीच मनाला लावून न घेणं.
गेले ३ वर्ष ईतके काही झाले न भेटता. पुढेही कधी भेटू याची खात्री नाही. Thanks to Globalization. नॅनीचे लग्नही आहे आता थोड्या दिवसात. तिचे करीअरही सुरू होईल. एकामागून एक नव्या जबाबदाऱ्या खांद्यावरती घेईल. माझ्याही ऑफिसमधे माझ्या पुढच्या रोलची धडपड सुरू होईल. पायातली भिंगरी आणखी कुठेतरी घेऊन जाईल. आणखी एखादे बेट येईल. नवे लोक, नव्या कला, नवे मुखवटे. पण परत ती क्षणिक गडबड सरली की मेसेंजरवर एकमेकाला पिंग मारू ...
Hey ... you there?
मी: Hey ... you there?
.
.
.
.
नॅनी: तू हल्ली ईतका बिजी कसा?
Sent at 11:16 AM on Monday
.
.
मी: सध्या जरा सिन्सिअर व्हायचे भूत चढलय ... मे बी त्याच्यामुळे
नॅनी: ईतका की ब्लॉगवर पण काही टाकला नाहीस. कित्येक वर्षात! १०० वर्ष झाली असतील!!!
मी: जखमेवर बोट!! :(
नॅनी: बिजी ऑफिसमधे. घरी काय बिजी ठेवतात तुला हे विचारतीये!
मी: कॉल्स असतात यार पुण्यामधे.
नॅनी: ऑफिसमधे प्युन तुझ्यापेक्षा जास्ती बिजी असेल.
मी: ;)
नॅनी: का काय झालं?
मी: आजतक मै तुमसे झूठ बोल रहा था. मै प्युन हू. हा ... मै प्युनही हू.
नॅनी: तुझी कंपनी भारी आहे बाबा. प्युनला अमेरीकेत ट्रान्सफर करतात!
मी: ईथे महाग असतात बाबा प्युन.
नॅनी: :) असो. पण ब्लॉगपासून दुरी का?
मी: परत जखमेवर बोट!
नॅनी: जखमच का खरं?
मी: नाहीतर काय? सप्टेंबर पासून नवा पोस्ट नाही. मग जखमच की!
नॅनी: तेच तर म्हणतीये.
मी: ११ अनपब्लीश्ड पोस्ट आहेत यार. सगळे अर्धवट राहिलेत. च्यायला मन पुढे सरकले की परत मागच्या विषयावर येतच नाही.
असो.
बघू.
होयेगा.
कुछ तो होयेगा.
हा वीकेंड.
गच्चीसाठी खच्ची!
नॅनी: चलो ... झोपायला जाते.
मी: बाय.
नॅनी: बाय. आणि लिही काहीतरी. तुझे पोस्ट्स खरच मिस् करते मी.
मी: आई शप्पथ! लेखक पेटला आता. लेखकाला माहितच नव्हते की त्याला कोणी मिस् करते. आता बासच.
हर हर महादेव.
नॅनी: :)
मी: झोप तू आता. सोक्ष मोक्ष लावतोच मी आता ईकडे.
नॅनी: पेटते रहो.
nani is offline. Messages you send will be delivered when nani comes online.
.
.
.
.
.
.
कोणाशी कधी कसे सुत जमावं याचा काही नेम नाही. एकदम अनपेक्षीत प्रकारे, काहीही कारण नसताना, किंबहुना चुकूनच आमची गाठभेट झाली. सुमारे ३ वर्ष झाली आता या ओळखीला. हा अनपेक्षीत प्रकार म्हणजे एक ईमेल होते की जे चुकुन मला आलेले.
आपल्या पुढची जनरेशन जशी नेहमी एकदम पांडू वाटते तशी नॅनीपण जरा पाकाऊ होती. चॅटमधे भरपूर "?" आणि "!"! शेवटचे अक्षर अगदी ओळभरेपर्यंत टाईप करणे हे असले प्रकार ठासून भरलेले. ईंटरनेट, ईमेल्स आणि चॅटचे पहिले नऊ दिवस सुरू असल्याने तेच तेच जुने झालेले फॉरवर्ड ईमेल्स पाठवायची. आठवड्याला "Must See...", "don't ignore", "toooooo good" या असल्या ईमेल्सचा रतिब टाकायची. आपण पाठवतो त्या ईमेल मधे काय आहे हे बघायच्या आधीच, माहित असल्या नसल्यांच्या ईनबॉक्समधे ते ईमेल पोहोचवणे म्हणजे आपले परमकर्तव्य आहे असे मानणाऱ्या लोकांपैकी एक होती ती. सुत जुळावे असे आणखी काहीच आमच्यात नव्हते - फक्त डेस्टीनी. माझ्या लेखी सर्वार्थाने निरर्थक प्रकारामधे मोडणारे सगळे गूण तिच्यात. आणि रूड हा शिक्का माझ्यावर आधीपासूनच. एकमेकाशी बोलण्याचे - बोलत राहण्याचे आम्हाला काहीच कारण नव्हते. कोणत्याही क्षणी, कोणत्याही दिवशी, "चल जा गेलास ऊडत" असे झाले असते तरी कोणालही नवल वाटले नसते. पण असे झाले नाही. उलट जास्तीच ट्युनींग जमत गेलं.
एकमेकांकडून काडीचीही अपेक्षा नाही आणि काही गमावण्याचे भय नाही. कदाचीत अशी एक बाजू कदाचीत प्रत्येकाला असते. आहेत त्या सर्व नात्यांना समांतर. आणि ती तशीच रहावी म्हणून मूक धडपडही सुरू असते. एकमेकापासून अनभीज्ञ असण्यामुळे आमच्यातल्या बोलण्यावर आमच्या आजूबाजूच्या तत्कालीक गोष्टींचा फारसा प्रभाव पडलाच नाही. एकमेकाचे मूड्स वगैरे प्रकार फारसे मधे आलेच नाहीत. नॅनी ऊगाच शंभर प्रश्न विचारायची. "काय संबंध हिचा?" हा विचार येण्यापेक्षा "काय फरक पडणार आहे?" हा विचार डोक्यात यायचा. खरं म्हणजे तर आजीबाईसारखे ईतके प्रश्न विचारते म्हणून नॅनी नाव पडलेले. आज जेव्हा असे कधी कधी निवांत बसतो तेव्हा वाटते, यार ... ३ वर्ष! केवढे काही झाले यात. मीही कुठच्या कुठे आलो आणि ती ही! जिथे आमच्या बोलण्यात "हू केअरस्?" भाव असायचा, तिथे बरेच दिवस कोणी पींग नाही केले की त्याचीही नोंद असायची. आणि हे असेच तब्बल ३ वर्ष सुरू आहे. मित्र व्हायला प्रत्यक्ष भेटायला थोडीच लागतं? बरेच किस्से ऐकलेले असे पेन फ्रेंड्स वगैरेचे. नॅनीमुळे मलाही असा एक अनुभव आला.
पण जरा विचार केला की वाटते की यात माझाच स्वार्थ होता. म्हणजे ते असे की कुठेतरी या मागच्या ईतक्या वर्षात हळू हळू मी स्वतःच गढूळ होत गेल्याची भावना येत होती. हाताकड बघीतलं की वाटायचं की यार ३-४ च तर रेघा आहेत. त्याही आखल्यासारख्या. असं कसं काय गिजमीट झाल्यासारखं वाटतय सगळं? बऱ्याच गोष्टी, बरेच विचार आतल्या आतच रहायचे. बोलतो कशाला? उगाच वाटायचे की आधी स्वतःकडे बघा - असले काहीतरी मीच स्वतःला म्हणून गप्प व्हायचो. आपलं अक्षर जरी चांगलं असलं तरी आपली पाटीच कोरी नसेल तर वाचणार तरी कोण? कधी काळी यावर असेही म्हणलो असतो, मी कसा का असेना म्हणून मी काय म्हणतो त्याचे महत्व आणि त्याचा दर्जा कमी थोडाच होतो? पण हळू हळू हे ऊत्तर पटेनासे झाले. आजुबाजूच्या बऱ्याच गोष्टींसाठी मी एक मूक प्रेक्षक व्हायचो. आणि आपण मूकपणे बघतो, म्हणून शब्द आणखीच रसातळाला जायचे. पण या सगळ्या गढूळपणात मग एक असेही अंग पुढे यायचे की जे एकदम पारदर्शक, एकदम स्वच्छ असायचं. अर्थाअर्थी काही संबंध नसताना, केवळ यात काही अशुद्ध नाही म्हणून बरं वाटायचं. त्याच्या टिकण्यानं किंवा न टिकण्यानं कोणालाही काही फरक पडणार नसायचा. पण तरीही त्याचं अस्तित्व ऊगाचच निरागस वाटायचं. त्यात कशाचं भय नाही. त्यामधे अजुनही खुली किताब आहोत आपण असे वाटायचं. यातून तयार होणारा नॉस्टॅल्जीयाच मग पुढे ते टिकवायला भाग पाडायचा. नॅनीबरोबरचं नातं कदाचीत माझ्यासाठी असं होत गेलं. आणि ते असच ठेवलं यामागं हा ईतका सगळा स्वार्थ! पण ... हे असं सगळं मला हल्ली वाटतं. म्हणजे आफ्टरमॅथ.
आपण टप्प्या टप्प्यानं मोठं होतो. प्रत्येक टप्प्यावर आपण वेगळे. बेटा बेटावरून पुढे जातो. प्रत्येक बेटावर कोणाकोणाला भेटतो. बऱ्याच कला दाखवतो. त्याची कदरही होते. त्यातून निर्माण झालेल्या अपेक्षांचे मुठभर मास चढवून मग पुढच्या बेटावर जातो. पण मग त्याच कला कलेकलेने मारूनही टाकतो. एक वेगळंच रुप घेतो. नव्या बेटावरच्या नव्या कला. चक्र सुरू. आणि मग परत एकदा या जुन्या बेटावरच्या सवंगड्यांची भेट झाली की मग मुखवटा पांघरतो. जसे काही आपण अजुन तसेच आहोत. पण मुखवट्यावीना होती ती मजा त्यात राहत नाही. कदाचीत समोरच्याला तिच मजा येतही असेल पण ते श्रेय कदाचीत मुखवट्याला आहे. बरीच बेटं पार केल्यावर, बरेच मुखवटे जमतात. आणि मग अचानक कुठेतरी एक जागा मिळते जिथे मुखवट्याची गरजच लागत नाही. कारण सगळंच अनोळखी. दरवेळी तितकंच नवं. मुखवट्यावीना स्वतःला बघणेही तितकेच रंजक. पुर्वी पुण्यात असताना दर वीकेंडला आश्रमातल्या मुलाना भेटायला जायचो. दरवेळी प्रचंड ताजंतवानं वाटायचं. त्या लहान लहान मुलांचा ऊत्साह बघून स्फुरण चढायचं. पण गेली २ वर्ष आता तो आश्रमही नाही आणि ती मुलंही नाहीत. अगदी तेवढं नाही, पण त्याची आठवण करून देणारं असं काहीतरी आहे हे बिना मुखवट्याचं वावरण्यात. नॅनी आणि माझी बडबड प्रसंगी अगदी निरर्थकही असली तरी यात अशी गोडी आहे. एकमेकाला चुकायचा स्कोपही आम्ही देत नाही आणि बरोबर चुक मोजतही नाही. एकदम काहीच्या काही बडबडत राहाणं आणि काहीच मनाला लावून न घेणं.
गेले ३ वर्ष ईतके काही झाले न भेटता. पुढेही कधी भेटू याची खात्री नाही. Thanks to Globalization. नॅनीचे लग्नही आहे आता थोड्या दिवसात. तिचे करीअरही सुरू होईल. एकामागून एक नव्या जबाबदाऱ्या खांद्यावरती घेईल. माझ्याही ऑफिसमधे माझ्या पुढच्या रोलची धडपड सुरू होईल. पायातली भिंगरी आणखी कुठेतरी घेऊन जाईल. आणखी एखादे बेट येईल. नवे लोक, नव्या कला, नवे मुखवटे. पण परत ती क्षणिक गडबड सरली की मेसेंजरवर एकमेकाला पिंग मारू ...
Hey ... you there?
Sunday, September 28, 2008
Am I doing it right?
This is amazing how we come up with innovative ways of Discriminating. आणि परत आपणच काही काळानंतर कोणालातरी नेताही बनवतो हा भेदभाव ऊखडून काढायला. Maybe this is what we call "Creating Opportunities"!
हिंदू मुस्लीम होते ... कदाचीत कमी पडले म्हणून आपण मराठा आणि ब्राह्मण आणि बरेच काही पण वापरले एकमेकांच्यात फरक करायला. तिथेही नाही भागले म्हणून पोटजातीही वापरल्या. हेही कमी पडले म्हणून आता प्रांत - म्हणे ऊत्तर भारतीय आणि दक्षिण भारतीय. Narayan Murthy had said once - We could be the only country where we love to get discriminated.
While we know that Discrimination is the PROBLEM, we still innovate and make efforts to have this problem last forever. Why do our "thoughtful" solutions again have discrimination involved. How could they be solutions then!?
आज सकाळी एक प्रेजेंटेशन पाहिले. म्हणे मराठी लोकाना आरक्षण द्या. मराठी माणूस कुठेच नाही. दहा बारा ऊदाहरणे. एकदम रीअल. कसे सगळीकडे ऊत्तर भारतीय आहेत आणि मराठी माणसाला स्थानच नाही! शेवट काय? तर म्हणे मराठी माणसालापण जागा करू. ऊत्तर भारतीयाना दाखवून देऊ आणि भैय्याना दाखवून देऊ त्यांची जागा काय ते!! मधेच दक्षिण भारतीयानापण टोले मारले होते! अंबेडकर, फुले वगैरेंची ऊदाहरणे दिलेली. या "आपल्या" माणसानी भेदभाव केला नाही पण आता "आपल्या" विरुद्ध होतोय! आणि असे बरेच काही.
अंबेडकर, फुले वगैरेंची ऊदाहरणे देऊन सांगायचे की तुम्ही आता फक्त मराठी लोकांच्या भल्यासाठी झटा! लाज कशी नाही वाटत या लोकांची नावं घ्यायला - देव जाणे? हीच शिकवण घेतली काय आम्ही? खरच थक्क व्हायला होतं. आग रामेश्वरी आणि बंब सोमेश्वरी अशी हालत आहे. रोग काय? त्याचा ईलाज काय? काहीतरी ताळमेळ हवा ना. या प्रकाराचे पुढच्या ५-६ वर्षामधे काय काय परीणाम होतील याची सुक्ष्म तरी कल्पना आहे का? आपला आवाज ऐकवायचा हा सर्वात सोपा मार्ग आहे - आजीबात दुमत नाही आणि आपण करतोही असे - एकदम अभिमानाने. हे अंगाला लागलेले वळण आहे आणखी काही नाही. याहून दुसरा मार्ग माहित नाही, पण कोणीतरी काहीतरी धडपड करतय म्हणून काहीच नाही तर आपला पाठींबा तरी व्यक्त करावा म्हणून केलेला आपलाही माफक यत्न. मी स्वतः काही करत नाही म्हणून मी स्वतःला आणखी कोण काय करतो त्यावर टिप्पणी करू देत नाही. शाळेतली सवय ना - स्वतः काही करायचे नाही तर जो करतोय त्याला का त्रास देतो? अजुनही कानात आहे हेच. कदाचीत म्हणून बरोबर चुक वगैरे तुलना होतच नाही.
मला या सगळ्याचा अंत माहीत नाही. मला ऊत्तरं माहीत नाहीत कारण मला प्रश्नच माहीत नाहीए. सर्वत्र मराठी लोक नसणं हा वादाचा मुद्दा आहे की कुठल्याही कारणाने भेदभाव होणं हा आहे? कदाचीत मी सर्वत्र मराठी माणसाना आणेनही. मग मी त्यात आडनावं बघून हिंदू किती, मुस्लीम किती, मराठा किती, ब्राह्मण किती हे बघेन! त्याही ऊपर आणि जाती - पोट जाती बघेन. कधी ऊठलाच किडा तर त्याविरुद्ध आवाज ऊठवेन. We will do it, not because it is right ... but because we are good at it and that is easiest.
कधीतरी आपण थांबले पाहीजे. किती काळ असेच मेसेजेस फॉरवर्ड करत राहणार? कधी विचार करणार? We have all the knowledge, we have brains, we know how to apply. Let's think. I do not know what to do and what will work but now, for sure, I know, this is not what I want to do.
Nothing against any individual - please do not take me wrong but really thought I should vent my thoughts somewhere and hence used the forum. I want this to be a better place for our next generations to come. Let them not fight the same battle. Battle against Discrimination.
का नाही मी विचार करत की कसे सुंदर बनवता येईल जग आपल्या पुढच्या पिढीसाठी? का त्यानीही त्यांचे आयुष्य घालवायचे अशाच गोष्टीसाठी. आज्जा लढला काळा गोरा साठी ... बाबा लढला हिंदू मुस्लीमसाठी आणि पोरगा लढतोय ऊत्तर - दक्षिण भारतीयांसाठी! कदाचीत नातू मोठा होईपर्यंत आम्ही आणि काहीतरी ईनोवेटीव भेद तयार करू! लढेल तोही. कुठल्याही प्रकारचा भेदभाव नाही करयचा हे माझ्या मुलाला शिकवताना मी का म्हणून अशा ऊत्तराना पाठींबा देऊ की जी ऊत्तरे भेदभावाच्याच पायावर ऊभी आहेत?
पुढच्या पिढीला शिकवायचे काम मी सुरू केलेय. पण सध्याच्या पिढीला कोण सांभाळेल? प्रश्नाकडे दुर्लक्ष करायचा आजिबात विचार नाहीए. एखादा मनुष्य त्याच्याच प्रांताच्या लोकाना पुढे आणताना बाकीच्यांची गळचेपी करतोय तर आहेच चुकीचे ते!! का नाही मी त्याला तिथेच बंद पाडत? का नाही त्याचाच निषेध करत? "तू तसे केलास तर मीही तसेच करेन ..." अरे... हे तर आपण शाळेत भांडताना करायचो. नाही काय? ही मधली ईतकी वर्षे शिकून काय प्रगती केली मग?
सगळं अनुत्तरीत आहे. म्हणून बाहेर काढायचं धाडस होत नव्हतं. आज आलं बाहेर. कोणाला यातून दुखावलं असेल तर मनापासून माफी मागतो. पण हे जग जितकं आपलं आहे तितकेच आपल्या पुढच्या पिढीचेही आहे. थोडी शक्ती हे सारे सुंदर बनवायला खर्च करू. ते नसेल तर कमीत कमी खराब करायला तरी नको खर्चूया.
हिंदू मुस्लीम होते ... कदाचीत कमी पडले म्हणून आपण मराठा आणि ब्राह्मण आणि बरेच काही पण वापरले एकमेकांच्यात फरक करायला. तिथेही नाही भागले म्हणून पोटजातीही वापरल्या. हेही कमी पडले म्हणून आता प्रांत - म्हणे ऊत्तर भारतीय आणि दक्षिण भारतीय. Narayan Murthy had said once - We could be the only country where we love to get discriminated.
While we know that Discrimination is the PROBLEM, we still innovate and make efforts to have this problem last forever. Why do our "thoughtful" solutions again have discrimination involved. How could they be solutions then!?
आज सकाळी एक प्रेजेंटेशन पाहिले. म्हणे मराठी लोकाना आरक्षण द्या. मराठी माणूस कुठेच नाही. दहा बारा ऊदाहरणे. एकदम रीअल. कसे सगळीकडे ऊत्तर भारतीय आहेत आणि मराठी माणसाला स्थानच नाही! शेवट काय? तर म्हणे मराठी माणसालापण जागा करू. ऊत्तर भारतीयाना दाखवून देऊ आणि भैय्याना दाखवून देऊ त्यांची जागा काय ते!! मधेच दक्षिण भारतीयानापण टोले मारले होते! अंबेडकर, फुले वगैरेंची ऊदाहरणे दिलेली. या "आपल्या" माणसानी भेदभाव केला नाही पण आता "आपल्या" विरुद्ध होतोय! आणि असे बरेच काही.
अंबेडकर, फुले वगैरेंची ऊदाहरणे देऊन सांगायचे की तुम्ही आता फक्त मराठी लोकांच्या भल्यासाठी झटा! लाज कशी नाही वाटत या लोकांची नावं घ्यायला - देव जाणे? हीच शिकवण घेतली काय आम्ही? खरच थक्क व्हायला होतं. आग रामेश्वरी आणि बंब सोमेश्वरी अशी हालत आहे. रोग काय? त्याचा ईलाज काय? काहीतरी ताळमेळ हवा ना. या प्रकाराचे पुढच्या ५-६ वर्षामधे काय काय परीणाम होतील याची सुक्ष्म तरी कल्पना आहे का? आपला आवाज ऐकवायचा हा सर्वात सोपा मार्ग आहे - आजीबात दुमत नाही आणि आपण करतोही असे - एकदम अभिमानाने. हे अंगाला लागलेले वळण आहे आणखी काही नाही. याहून दुसरा मार्ग माहित नाही, पण कोणीतरी काहीतरी धडपड करतय म्हणून काहीच नाही तर आपला पाठींबा तरी व्यक्त करावा म्हणून केलेला आपलाही माफक यत्न. मी स्वतः काही करत नाही म्हणून मी स्वतःला आणखी कोण काय करतो त्यावर टिप्पणी करू देत नाही. शाळेतली सवय ना - स्वतः काही करायचे नाही तर जो करतोय त्याला का त्रास देतो? अजुनही कानात आहे हेच. कदाचीत म्हणून बरोबर चुक वगैरे तुलना होतच नाही.
मला या सगळ्याचा अंत माहीत नाही. मला ऊत्तरं माहीत नाहीत कारण मला प्रश्नच माहीत नाहीए. सर्वत्र मराठी लोक नसणं हा वादाचा मुद्दा आहे की कुठल्याही कारणाने भेदभाव होणं हा आहे? कदाचीत मी सर्वत्र मराठी माणसाना आणेनही. मग मी त्यात आडनावं बघून हिंदू किती, मुस्लीम किती, मराठा किती, ब्राह्मण किती हे बघेन! त्याही ऊपर आणि जाती - पोट जाती बघेन. कधी ऊठलाच किडा तर त्याविरुद्ध आवाज ऊठवेन. We will do it, not because it is right ... but because we are good at it and that is easiest.
कधीतरी आपण थांबले पाहीजे. किती काळ असेच मेसेजेस फॉरवर्ड करत राहणार? कधी विचार करणार? We have all the knowledge, we have brains, we know how to apply. Let's think. I do not know what to do and what will work but now, for sure, I know, this is not what I want to do.
Nothing against any individual - please do not take me wrong but really thought I should vent my thoughts somewhere and hence used the forum. I want this to be a better place for our next generations to come. Let them not fight the same battle. Battle against Discrimination.
का नाही मी विचार करत की कसे सुंदर बनवता येईल जग आपल्या पुढच्या पिढीसाठी? का त्यानीही त्यांचे आयुष्य घालवायचे अशाच गोष्टीसाठी. आज्जा लढला काळा गोरा साठी ... बाबा लढला हिंदू मुस्लीमसाठी आणि पोरगा लढतोय ऊत्तर - दक्षिण भारतीयांसाठी! कदाचीत नातू मोठा होईपर्यंत आम्ही आणि काहीतरी ईनोवेटीव भेद तयार करू! लढेल तोही. कुठल्याही प्रकारचा भेदभाव नाही करयचा हे माझ्या मुलाला शिकवताना मी का म्हणून अशा ऊत्तराना पाठींबा देऊ की जी ऊत्तरे भेदभावाच्याच पायावर ऊभी आहेत?
पुढच्या पिढीला शिकवायचे काम मी सुरू केलेय. पण सध्याच्या पिढीला कोण सांभाळेल? प्रश्नाकडे दुर्लक्ष करायचा आजिबात विचार नाहीए. एखादा मनुष्य त्याच्याच प्रांताच्या लोकाना पुढे आणताना बाकीच्यांची गळचेपी करतोय तर आहेच चुकीचे ते!! का नाही मी त्याला तिथेच बंद पाडत? का नाही त्याचाच निषेध करत? "तू तसे केलास तर मीही तसेच करेन ..." अरे... हे तर आपण शाळेत भांडताना करायचो. नाही काय? ही मधली ईतकी वर्षे शिकून काय प्रगती केली मग?
सगळं अनुत्तरीत आहे. म्हणून बाहेर काढायचं धाडस होत नव्हतं. आज आलं बाहेर. कोणाला यातून दुखावलं असेल तर मनापासून माफी मागतो. पण हे जग जितकं आपलं आहे तितकेच आपल्या पुढच्या पिढीचेही आहे. थोडी शक्ती हे सारे सुंदर बनवायला खर्च करू. ते नसेल तर कमीत कमी खराब करायला तरी नको खर्चूया.
Saturday, August 23, 2008
Life meri Blackberry
This is not the first time I am blogging during the journey, but this is different - thanks to American Airlines' "GoGo" - wifi with wings - which did not work but left the temptation that made me write all these things on my blackberry! Now this is quite interesting. You are in flight - several thousand fts above the ground, you make all the plans to write things, you pull out your bag n take out the laptop, start it and see that last 15 mins of battery are remaining, you still hurry n check the wireless, connect to it, see it connecting, by this time make even more plans like to email folks n all, and boom .... That bugger internet page takes you to a place that, with awesomely fresh look, asks you to pay first!! Ha ha, and then you think - "were you really expecting it to be free? This is US of A boss - nothing is free here."
Well not a very good start though, but not bad also. My earlier plans to catch a nap to remain fresh for next day were already in soup. I was up and in full mood of writing (though, do not know what) But then, as always, life meri blackberry! Pulled it out and here I am. Blogging - from mobile - flying - and smiling with no reason. This air hostess looks smarter - after seeing me pulling out the laptop n putting it back there in less than 10 mins with some restless gestures - she offerred me a different seat - where I am sitting now like a king with both the seats near to me empty, with my shoes off, n this blackberry in my hands n two tiny kids from next seat staring at me as if I am playing some kool game that their mom hasn't allowed them to touch in the flight.
Hmmmm ... Now this makes me feel better. Not sure if it is because I am doing this mobile blogging or because of these small things happening - but yeah, who cares?
Quite happening month it was - 4 more days to go - it could have been no larger than this - my parents came to US - or rather outside maharashtra for the first time n that too for more than a month which happens to be the longest period they have ever stayed away from home n home town in last more than 25 years! It was huge. While I am writing this, they are in another flight - on their way back. Things change so fast and that too upside down. You totally get to see what you never thought would happen but always hoped for. for example, my mom always dreamt about a cosy small home that she'll get to setup n manage of her own - I always wanted to see my dad taking a real long break from his daily routine. But even till couple months back, none of us knew it would happen in USA. That's God's way of telling - dude, just stay tuned - anything may come true!! God has his own tricks. You just need to know how to enjoy them. Expected/unexpected or good/ bad is a different ball game. Somehow I do not want to get into all that but have really want to continue enjoying it. This has developed a funny habit - I am actually trying find out some story, some meaning, some clue, some link or some interpretation in any of the happenings around me that could really make it worth living, remembering again, learning or something like that. It's fun.
This airhostess has come again, who seemed well n nice, now is offering me an apple juice and then chips with a real nice n wide smile saying, "only $3 for chips, sir". No wonders they hire more cute n smart n ... n ... girls in this industry. I just can't imagine a boy showing his teeth (or muscles?!) n selling some stupid chips or cookies and the passenger also buying it what he never wanted and that too with equally wide "thank you"! Only girls can make it happen. But maybe this time my blackberry was more powerful - my wide "thank you" didn't buy anything in reply to her offer. Said to her in my mind - "I just gave you a role in my first ever mobile blog! God bless your teeth!"
May be I am running all over the place now - not sure at the same time if this blackberry is going to save everything or not. This is high time my fingers should get off these tiny keyboard n sleep! After all how long can you write something descrete, perhaps disconnected, long enough? :) Those kids also have stopped stairing at me - making it less fun!
(Also high time - this blackberry should start supporting devnagari script - so that I can finish my other incomplete blogs - sometimes it feels like homework due or pending medicine that' s necessary to keep you alive!)
Good night.
Regards,
Rohit Bhosale -----------------------------------------------------------------------------------------
Sent from my Wireless Blackberry device.
Well not a very good start though, but not bad also. My earlier plans to catch a nap to remain fresh for next day were already in soup. I was up and in full mood of writing (though, do not know what) But then, as always, life meri blackberry! Pulled it out and here I am. Blogging - from mobile - flying - and smiling with no reason. This air hostess looks smarter - after seeing me pulling out the laptop n putting it back there in less than 10 mins with some restless gestures - she offerred me a different seat - where I am sitting now like a king with both the seats near to me empty, with my shoes off, n this blackberry in my hands n two tiny kids from next seat staring at me as if I am playing some kool game that their mom hasn't allowed them to touch in the flight.
Hmmmm ... Now this makes me feel better. Not sure if it is because I am doing this mobile blogging or because of these small things happening - but yeah, who cares?
Quite happening month it was - 4 more days to go - it could have been no larger than this - my parents came to US - or rather outside maharashtra for the first time n that too for more than a month which happens to be the longest period they have ever stayed away from home n home town in last more than 25 years! It was huge. While I am writing this, they are in another flight - on their way back. Things change so fast and that too upside down. You totally get to see what you never thought would happen but always hoped for. for example, my mom always dreamt about a cosy small home that she'll get to setup n manage of her own - I always wanted to see my dad taking a real long break from his daily routine. But even till couple months back, none of us knew it would happen in USA. That's God's way of telling - dude, just stay tuned - anything may come true!! God has his own tricks. You just need to know how to enjoy them. Expected/unexpected or good/ bad is a different ball game. Somehow I do not want to get into all that but have really want to continue enjoying it. This has developed a funny habit - I am actually trying find out some story, some meaning, some clue, some link or some interpretation in any of the happenings around me that could really make it worth living, remembering again, learning or something like that. It's fun.
This airhostess has come again, who seemed well n nice, now is offering me an apple juice and then chips with a real nice n wide smile saying, "only $3 for chips, sir". No wonders they hire more cute n smart n ... n ... girls in this industry. I just can't imagine a boy showing his teeth (or muscles?!) n selling some stupid chips or cookies and the passenger also buying it what he never wanted and that too with equally wide "thank you"! Only girls can make it happen. But maybe this time my blackberry was more powerful - my wide "thank you" didn't buy anything in reply to her offer. Said to her in my mind - "I just gave you a role in my first ever mobile blog! God bless your teeth!"
May be I am running all over the place now - not sure at the same time if this blackberry is going to save everything or not. This is high time my fingers should get off these tiny keyboard n sleep! After all how long can you write something descrete, perhaps disconnected, long enough? :) Those kids also have stopped stairing at me - making it less fun!
(Also high time - this blackberry should start supporting devnagari script - so that I can finish my other incomplete blogs - sometimes it feels like homework due or pending medicine that' s necessary to keep you alive!)
Good night.
Regards,
Rohit Bhosale -----------------------------------------------------------------------------------------
Sent from my Wireless Blackberry device.
Monday, February 18, 2008
कारण मला ऊशीरा पोहोचायचे नाही
एक मुलगा भेटायचा मला - २६ नंबरच्या बस स्टॉपवर. डगळ्या पायजम्यामधे असायचा कायम. ऑफीस, घर, पार्टी कुठेही काही भेदभाव नाही - सगळीकडे तसाच पेहराव! बघूनच मजेशीर वाटायचा गडी. बस स्टॉप नामक प्रकारावर नाहीतरी आपल्याला कंठ फुटतोच तसा याच्या बरोबरही फुटायचा. हा अवलीयाही तमाम जनतेप्रमाणे सॉफ्टवेअर कंपनीमधे. डोळ्याला चष्मा पण म्हणे बीना नंबरचा - स्मार्ट वाटावे म्हणून लावलेला. हसतमुख. सदैव चौकड्याचा शर्ट किंवा टीशर्ट मधे. ऊभ्या ऊभ्या बऱ्याच गप्पा व्हायच्या. हा अवलीया तंद्री लागली की मात्र एकदम हसत असा काही क्रीप्टीक बोलायचा की ऐकता ऐकता एकदम फ्युज ऊडाल्यागम वाटायचे.
हल्ली कार घेतल्यापासून बस स्टॉपवर जाणे कमी झाले - पण परवा अचानक जावे लागले आणि योगायोगाने हाही भेटला. अगदी तसाच, जसा पुर्वी असायचा. म्हणाला प्रोजेक्ट बदलतोय. लंडनकडे कूच करायच्या तयारीमधे होता. पोस्ट वगैरे पण भलतीच बदलली होती. गडी अजून तसाच होता मात्र. म्हणाला या बेटावरून पुढच्या बेटावर निघालो. याची बेटही कन्सेप्ट मला आधीपासून माहीत होती. एकदम सरळ बोलणारा माणूस मधेच भडकायचा पण. काही गोष्टी असा काही बोलून जायचा की ऐकणाऱ्याला काय प्रतीक्रीया देऊ हा प्रश्न पडावा! काहीही म्हणजे काहीच्या काही बोलायचा हा गडी - तेही हसत. आणि पुढच्या क्षणी विषय एकदम निराळा!
"You know what? She is not vergin! And I can bet on that. It is just that I do not want to talk about it. That doesn't mean that she should assume I know nothing! बात करती है! तुला सांगतो ... पोरीना नको त्या ठीकाणी माज ... आणि नको त्या ठीकाणी लाज वाटते!"
एक ना दोन. बरेचसे असे त्याचे कमेंट हळू हळू आठवू लागले. पुढच्या बेटावरचा प्रवास सुखाचा जावो म्हणून मी निघालो. एकूणच एक वेगळ्याच दृष्टीकोन असलेला हा गडी फक्त बस स्टॉपवरच्या ओळखीमधे बरेच काही नवल बोलून गेला. त्याची बेटाची कन्सेप्ट, हा गेल्यावर जास्ती आठवते हल्ली.
.
.
.
.
एका दुसऱ्याच जगामधे आलोय मी. मी स्वतः आणलेय मला ईथे. अगदी जाणून बुजून! ठरवून वगैरे नाही पण एकदमच अनभीज्ञ होतो यापासून असेही नाही - अगदी पुरेपूर कल्पना होती आपण कुठे जातोय याची. ऐलतीर पैलतीर करत करत आपला तीर कधीच मागे सोडलाय मी. कोणा अनोळखी बेटावरून फिरतोय. हा बेट माझा नाही पण या बेटाबद्दल कुतूहल नेहमीच होते मला. ईथे यायची अफाट ईच्छा पण होती. मी आलोय त्या बेटावर पण त्यासाठी स्वतःचा गाव सोडावा लगेल याची जाणीव ऊशीरा झाली. जसे एकदा बाटला की बाटला! परत मागे फिरतो वगैरे प्रकरण चालत नाही तिथे! दोनही गोष्टी एकदम नाही होत. आता ईथून मला माझा गाव दुरवर अंधूक दिसतो. त्या गावामधे आता मी पाहूणा असेन. कारण या बेटावरची धुळ मला चिकटलीये. या बेटावरचा मीठ मझ्या रक्तात गेलेय.
ईथे सगळीच नवलाई. मान, अपमान, स्वाभीमान किंवा आत्मविश्वासाचे कपडे काय तर अगदी लाज, शरम, आब्रू आणि मैत्रीचेही बुरखेही वेगळे. कोणी नवे म्हणेल तर कोणी वेगळे! पण माझ्या गावासारखे नक्कीच नाहीत. हे सर्व कुतुहलाने बघता बघता कधी स्वतःवर पांघरले कोणास ठाऊक? मी या लोकांच्यातलाच एक वाटतो माझा मला! कधीकधी बेटाच्या ऊंच टोकावर चढून बसून मी माझा गाव पाहतो. तिथे नसलेला मी पाहतो. कधी नोंद न केलेली मर्यादा पाहतो. ईथे सगळेच स्वतःसाठी आदर्श. मी माझ्या गावातले बुजुर्ग आठवतो. मला आदर्श म्हणणाऱ्यांपासून पळून येताना मागे सोडलेला माझा आदर्श पाहतो.
परतीचा रस्ता दरवेळी मिळेलच असे नाही, पण परत जाण्याची ईच्छा करून कोणी लक्ष्य गाठायला निघत नाही. अशी बरीच बेटं लागतील, बरेच किनारे सोडावे लागतील. कुठवर जाऊ शकतो आपण हे मापायला मी नक्कीच निघालो नव्हतो. कुठे पोचायचेय नसेल माहीत तर ईंधन वाया घालवायची काय गरज? आणि जर माहीत असेल तर दिरंगाई कशाची? हिशोब एकदम सरळ आणि सोपा - समजायला आणि बोलायला. निघालो तर आहे, पण माझ्यामधला मला आवडणारा "मी" मागे सोडत. आणि कदाचीत हाच प्रश्न आहे - ज्याला मागे सोडतोय, त्यालाच अंतिम लक्ष्यापर्यंत पोचवायचे होते - तोच नाही राहीला तर पुढचा प्रवास काय कामाचा?
ईथे लोक मर्यादा ओलांडतील आणि मग शांतपण एक वेगळेच नाव देऊन नामानिराळे होतील. ईंपल्स होती ती म्हणून बऱ्याच गोष्टी खपवतील. स्वतःलाच शहाणपणाचे धडे शिकवतील. एकदम कमीत कमी प्रश्न पडावेत असे सोयीस्करपणे आपलेच एक वेगळे तत्वज्ञान बनवतील. ना प्रश्न, ना ऊत्तरे या अशा अवस्थेमधे आपण किती खुश आहोत हे बघून समाधानी होतील. हे एकदम अचाट! अगदी अनाकलनीय पण वरकरणी एकदम चौकटीबद्ध. काहीच पंगा नाही. "चुका होऊ शकतात" हे माझ्या गावामधे सहानुभूती देताना वापरायचे वाक्य होते - या बेटावर ते ब्रीद भासते. लांबून चकाकत होते ते सोने होते की वाळू हे समजायच्या आत किंवा समजून घेण्याच्या आत, मीही चमकू लागतो. एकदम लख्ख! आणि मग कधी बेटाच्या किनाऱ्यावरून आपल्या गावाकडे बघणाऱ्यांच्या भाऊगर्दीमधे जाऊन मीही सामील होतो. हे बेट या अशांच्याच गर्दीमुळे मग दुरून ऊजळून निघत असावे!
ईथे थांबायचे कोणालाच नाहीए. मलाही नाहीए. पण जाऊ त्या बेटावर, त्या बेटाचा रंग पांघरू, हे प्रवासाच्या सुरूवातीला माहीत नव्हते. आणि ही मिळालेली समज एक तगमग जागी करते. मी पुढे पुढे चाललोय यावर समाधान मानायचे की मी परतीचा रस्ता मिटवतोय याचे दुःख? मी आणि माझे लक्ष्य यातले अंतर कमी करतोय कि त्या लक्ष्या पर्यंत ज्याला पोहोचवायचे होते त्याला मागे सोडतोय याचे दुःख. तसे मलाही माहीत होते की बऱ्या़च बेटांवरून जाणार आहे, पण प्रत्येक बेटाचा रंग लागत जाईल हे जरा निराळेच. रंग लागू नये म्हणून की प्रयत्न केला नाही - पण रंग लागल्यावर, आपण परत बाटलो असे काही मात्र वाटून गेले - दरवेळी.
सुख दुःखाच्या गोष्टी केल्या की ऊगाच जरा भावनीक झाल्यासारखे वाटते. हे बेट हा एक टप्पा आहे, प्रत्येक जण येतो या टप्प्यावर. या टप्प्यावर कोणीच थांबायचे म्हणून येत नाही. पण काही थकून तर काही समाधान मानून ईथेच नांगर टकतात. बकीचे पुढे जातात. थांबले ते बरोबर? की पुढे निघाले ते बरोबर? हे असले हिशोब मांडायचा माझा मानस नाही. तसे जरी समाधान आपले ईतके स्वस्त नाही की या टप्प्यावरच हत्यारं ठेवावी, पण कुठेतरी धुसर भीतीही वाटते - ऊद्या तसेच झाले तर ...? मी ईथेच अडकून पडलो तर...? किंवा ईथेच मलाही समधान गवसले तर...? हा आत्मविश्वासाचा कमकुवतपणा की या बेटावरच्या कपड्यांचा परीणाम? मला या प्रश्नाचे ऊत्तरही शोधायचाही विचार नाही, कारण मला विषयच बदलायचा नाही. पुढे एक दुसरे बेट वाट बघत असेल, मला तिथे ऊशिरा पोहोचायचे नाही.
हल्ली कार घेतल्यापासून बस स्टॉपवर जाणे कमी झाले - पण परवा अचानक जावे लागले आणि योगायोगाने हाही भेटला. अगदी तसाच, जसा पुर्वी असायचा. म्हणाला प्रोजेक्ट बदलतोय. लंडनकडे कूच करायच्या तयारीमधे होता. पोस्ट वगैरे पण भलतीच बदलली होती. गडी अजून तसाच होता मात्र. म्हणाला या बेटावरून पुढच्या बेटावर निघालो. याची बेटही कन्सेप्ट मला आधीपासून माहीत होती. एकदम सरळ बोलणारा माणूस मधेच भडकायचा पण. काही गोष्टी असा काही बोलून जायचा की ऐकणाऱ्याला काय प्रतीक्रीया देऊ हा प्रश्न पडावा! काहीही म्हणजे काहीच्या काही बोलायचा हा गडी - तेही हसत. आणि पुढच्या क्षणी विषय एकदम निराळा!
"You know what? She is not vergin! And I can bet on that. It is just that I do not want to talk about it. That doesn't mean that she should assume I know nothing! बात करती है! तुला सांगतो ... पोरीना नको त्या ठीकाणी माज ... आणि नको त्या ठीकाणी लाज वाटते!"
एक ना दोन. बरेचसे असे त्याचे कमेंट हळू हळू आठवू लागले. पुढच्या बेटावरचा प्रवास सुखाचा जावो म्हणून मी निघालो. एकूणच एक वेगळ्याच दृष्टीकोन असलेला हा गडी फक्त बस स्टॉपवरच्या ओळखीमधे बरेच काही नवल बोलून गेला. त्याची बेटाची कन्सेप्ट, हा गेल्यावर जास्ती आठवते हल्ली.
.
.
.
.
एका दुसऱ्याच जगामधे आलोय मी. मी स्वतः आणलेय मला ईथे. अगदी जाणून बुजून! ठरवून वगैरे नाही पण एकदमच अनभीज्ञ होतो यापासून असेही नाही - अगदी पुरेपूर कल्पना होती आपण कुठे जातोय याची. ऐलतीर पैलतीर करत करत आपला तीर कधीच मागे सोडलाय मी. कोणा अनोळखी बेटावरून फिरतोय. हा बेट माझा नाही पण या बेटाबद्दल कुतूहल नेहमीच होते मला. ईथे यायची अफाट ईच्छा पण होती. मी आलोय त्या बेटावर पण त्यासाठी स्वतःचा गाव सोडावा लगेल याची जाणीव ऊशीरा झाली. जसे एकदा बाटला की बाटला! परत मागे फिरतो वगैरे प्रकरण चालत नाही तिथे! दोनही गोष्टी एकदम नाही होत. आता ईथून मला माझा गाव दुरवर अंधूक दिसतो. त्या गावामधे आता मी पाहूणा असेन. कारण या बेटावरची धुळ मला चिकटलीये. या बेटावरचा मीठ मझ्या रक्तात गेलेय.
ईथे सगळीच नवलाई. मान, अपमान, स्वाभीमान किंवा आत्मविश्वासाचे कपडे काय तर अगदी लाज, शरम, आब्रू आणि मैत्रीचेही बुरखेही वेगळे. कोणी नवे म्हणेल तर कोणी वेगळे! पण माझ्या गावासारखे नक्कीच नाहीत. हे सर्व कुतुहलाने बघता बघता कधी स्वतःवर पांघरले कोणास ठाऊक? मी या लोकांच्यातलाच एक वाटतो माझा मला! कधीकधी बेटाच्या ऊंच टोकावर चढून बसून मी माझा गाव पाहतो. तिथे नसलेला मी पाहतो. कधी नोंद न केलेली मर्यादा पाहतो. ईथे सगळेच स्वतःसाठी आदर्श. मी माझ्या गावातले बुजुर्ग आठवतो. मला आदर्श म्हणणाऱ्यांपासून पळून येताना मागे सोडलेला माझा आदर्श पाहतो.
परतीचा रस्ता दरवेळी मिळेलच असे नाही, पण परत जाण्याची ईच्छा करून कोणी लक्ष्य गाठायला निघत नाही. अशी बरीच बेटं लागतील, बरेच किनारे सोडावे लागतील. कुठवर जाऊ शकतो आपण हे मापायला मी नक्कीच निघालो नव्हतो. कुठे पोचायचेय नसेल माहीत तर ईंधन वाया घालवायची काय गरज? आणि जर माहीत असेल तर दिरंगाई कशाची? हिशोब एकदम सरळ आणि सोपा - समजायला आणि बोलायला. निघालो तर आहे, पण माझ्यामधला मला आवडणारा "मी" मागे सोडत. आणि कदाचीत हाच प्रश्न आहे - ज्याला मागे सोडतोय, त्यालाच अंतिम लक्ष्यापर्यंत पोचवायचे होते - तोच नाही राहीला तर पुढचा प्रवास काय कामाचा?
ईथे लोक मर्यादा ओलांडतील आणि मग शांतपण एक वेगळेच नाव देऊन नामानिराळे होतील. ईंपल्स होती ती म्हणून बऱ्याच गोष्टी खपवतील. स्वतःलाच शहाणपणाचे धडे शिकवतील. एकदम कमीत कमी प्रश्न पडावेत असे सोयीस्करपणे आपलेच एक वेगळे तत्वज्ञान बनवतील. ना प्रश्न, ना ऊत्तरे या अशा अवस्थेमधे आपण किती खुश आहोत हे बघून समाधानी होतील. हे एकदम अचाट! अगदी अनाकलनीय पण वरकरणी एकदम चौकटीबद्ध. काहीच पंगा नाही. "चुका होऊ शकतात" हे माझ्या गावामधे सहानुभूती देताना वापरायचे वाक्य होते - या बेटावर ते ब्रीद भासते. लांबून चकाकत होते ते सोने होते की वाळू हे समजायच्या आत किंवा समजून घेण्याच्या आत, मीही चमकू लागतो. एकदम लख्ख! आणि मग कधी बेटाच्या किनाऱ्यावरून आपल्या गावाकडे बघणाऱ्यांच्या भाऊगर्दीमधे जाऊन मीही सामील होतो. हे बेट या अशांच्याच गर्दीमुळे मग दुरून ऊजळून निघत असावे!
ईथे थांबायचे कोणालाच नाहीए. मलाही नाहीए. पण जाऊ त्या बेटावर, त्या बेटाचा रंग पांघरू, हे प्रवासाच्या सुरूवातीला माहीत नव्हते. आणि ही मिळालेली समज एक तगमग जागी करते. मी पुढे पुढे चाललोय यावर समाधान मानायचे की मी परतीचा रस्ता मिटवतोय याचे दुःख? मी आणि माझे लक्ष्य यातले अंतर कमी करतोय कि त्या लक्ष्या पर्यंत ज्याला पोहोचवायचे होते त्याला मागे सोडतोय याचे दुःख. तसे मलाही माहीत होते की बऱ्या़च बेटांवरून जाणार आहे, पण प्रत्येक बेटाचा रंग लागत जाईल हे जरा निराळेच. रंग लागू नये म्हणून की प्रयत्न केला नाही - पण रंग लागल्यावर, आपण परत बाटलो असे काही मात्र वाटून गेले - दरवेळी.
सुख दुःखाच्या गोष्टी केल्या की ऊगाच जरा भावनीक झाल्यासारखे वाटते. हे बेट हा एक टप्पा आहे, प्रत्येक जण येतो या टप्प्यावर. या टप्प्यावर कोणीच थांबायचे म्हणून येत नाही. पण काही थकून तर काही समाधान मानून ईथेच नांगर टकतात. बकीचे पुढे जातात. थांबले ते बरोबर? की पुढे निघाले ते बरोबर? हे असले हिशोब मांडायचा माझा मानस नाही. तसे जरी समाधान आपले ईतके स्वस्त नाही की या टप्प्यावरच हत्यारं ठेवावी, पण कुठेतरी धुसर भीतीही वाटते - ऊद्या तसेच झाले तर ...? मी ईथेच अडकून पडलो तर...? किंवा ईथेच मलाही समधान गवसले तर...? हा आत्मविश्वासाचा कमकुवतपणा की या बेटावरच्या कपड्यांचा परीणाम? मला या प्रश्नाचे ऊत्तरही शोधायचाही विचार नाही, कारण मला विषयच बदलायचा नाही. पुढे एक दुसरे बेट वाट बघत असेल, मला तिथे ऊशिरा पोहोचायचे नाही.
Subscribe to:
Posts (Atom)
