Showing posts with label इतिहास. Show all posts
Showing posts with label इतिहास. Show all posts

Saturday, September 15, 2018

पार्टीशन

संध्याकाळी थोडासा वेळ काढून बर्लिन वॉल मेमोरियलला धडकून आलो. खूपच तुटपुंजी माहिती आहे मला या वॉलबद्दल. कदाचित त्यामुळं कुतूहल बरंच आहे. असलेलं पार्टिशन इथल्या लोकांनी म्हणे काढून टाकलं आणि दोन तुकड्यांचा परत एक देश केला. ही कल्पनाच भारी वाटली एकूण. त्यामुळं खास जायचं होतं इथं. पण मी पोचतो ते बंद झालेलं. मग बाहेरून जे दिसलं ते बघून परत आलो. तिथं राहिलेले अवशेष, ग्राफिटी, आणि त्याभोवती घुटमळणाऱ्या सहलीसाठी आलेल्या टोळक्या असं एवढंच चित्र बघायला मिळालं.

दुसऱ्या महायुद्धनंतर अमेरिका आणि रशियामध्ये सुरू असलेल्या शीतयुद्धाचे पडसाद बर्लिनमध्ये ठळकपणे उमटले म्हणे. त्याचंच एक प्रतीक म्हणजे ही भिंत. लोकांना communist ईस्ट जर्मनी कडून capitalist वेस्ट जर्मनी कडे जायला मिळू नये म्हणून बांधलेली. नाना प्रकारे लोकांनी ही भिंत पार करायचा प्रयत्न केला. कोणी भुयारं खणली. कोणी विमानं उडवली, कोणी फुग्यातून गेले. या प्रयत्नात बरेच लोक यशस्वी झाले, तर काही लोक मारलेही गेले. प्रत्येक अशा प्रयत्नानंतर भिंत आणखीच दणकट करण्यात आली. भिंतीच्या बाजूला बंदुकी, landmines आणि वॉच टॉवर या गोष्टी येत गेल्या. हे सुरू असताना, वेस्ट जर्मनीची म्हणे बरीच प्रगती होत राहिली. आणि ईस्ट जर्मनी त्या मानाने गरिब राहिली. याच्या पार्श्वभूमीवर रशिया आणि अमेरिका यांचा शतरंज सुरूच होता. काही दशकं हे असंच सुरू राहिलं आणि मग १९८९ ला म्हणे भिंत पाडून शेवटी दोन देशांचा परत एक देश झाला. हा असा काहीसा इथला इतिहास आहे.

एकूणच पार्टीशनच्या फार उल्लेखनीय गोष्टी आपल्याला ज्ञात नसल्यानं याचं कौतुक जास्ती वाटलं. आणि हे पार्टीशन तर भीषण महायुद्धा नंतरचं. म्हणून खरं सांगायचं तर परिस्थितीचा अंदाजही नीटसा करता आला नाही. पण तसं म्हणलं तर युरोप मध्ये अशी बरीच ठिकाणं सर्रास आढळतात की जिथं आज बेल्जियन चॉकलेट घालून बनवलेला फ्रेंच क्रेप विकणारा पोलिश माणूस बर्लिनच्या रस्त्यावर उभा असेल. पहिलं आणि दुसरं महायुद्ध आठवलं तर याच देशाची माणसं एकमेकाला बेचिराख करायला निघालेली. या महायुद्धांच्या खलनायकांचा कायमच खूप उदो उदो होतो. मग ते चर्चिल असो, हिटलर असो किंवा मुसोलिनी असो. पण सध्याचं हे चित्र पाहून मला राहून राहून प्रश्न पडतो की इतक्या पराकोटीच्या रक्तपातानंतर, हे आजचं चित्र उभं करणारे नायक कोण असावेत? आणि तेही एका देशात नाही तर युरोपच्या इतक्या सगळ्या देशात एकाचवेळी कार्यरत असणारे. आम्हीच श्रेष्ठ, आम्हीच बरोबर होतो आणि आम्ही सोडून बाकी सगळ्यांचा द्वेष करा हे सुलभ तत्वज्ञान मागे सोडायला जित आणि जेते या दोघांनाही कोणी परावृत्त केलं असेल? सध्याच्या युरोपमध्ये एकमेकाचे हेवेदावे नाहीत असं नाही. फ्रेंच लोकांच्या स्वभावावर ताशेरे ओढले जातात. आर्थिक दृष्ट्या कमकुवत ग्रीस आणि इटलीची चेष्टा होते. पण जुनी उणी दुणी नव्या पिढीला संस्कार म्हणून देऊ केलेली आढळत नाहीत. किंवा मला तरी आढळली नाहीत.

हे कसं झालं असेल?







ता.क. केल्याने देशाटन वाला भाग आहे हा जरा. जसा हा प्रश्न सापडला तसंच आणखी जरा फिरलो की कदाचित त्याचं उत्तरही सापडेल अशी आशा आहे. बाकी इतिहासाचा अभ्यास इतिहासाच्या परीक्षा संपल्यानंतर इतका भारी वाटायला लागला हे गूढ जरा मजेशीर आहे.

Sunday, May 28, 2017

At Churchill War Rooms

War between Churchill and Hitler seemed like a war between bad and worse. Whom you called worse decided how you got judged. This war museum has a showcase of the heroism of Churchill's men, the side that won and also the propaganda of opposition party and the enemy in a corner, the side that lost. Being from the side that was neither or rather being from the side that was used to carry on this war, it was disturbing to walk thru these corridors to inhale the glory of said triumph.

There are always many shades to a story. History is just one of them. In Mein Kampf, Hitler argues about the evils of democracy, communism, socialism and also the hunger of European nations for land expansion. While one can argue about his inferences and methods, his observations can not be denied. Churchill and the allies had their version too. But if in the end, it is going to be about whose bad sells most, gets to call it a good then its a different question altogether. This continued to bother me as I walked further.

In fact, it is saddening many times that any kind of army really needs to exist in our world. I think, all of us are brought up with the teaching that says, you are good, but others may not be. Is that why we keep army?

Or it could be this one. People who know how to do things, get elected to power. And more often than not they show how spectacularly bad were they dealing with their disagreements with each other. Is that why we keep army?

And despite knowing it all, this breed of people continues​ to sacrifice life for this madness. They are still out there, and more than feeling proud, I think we should feel sad that they have to exist.

The war museums can make you really negative at times. Isn't it?.

Anyway, I found these pictures in the museum as I was passing by the isles.



Tuesday, March 21, 2017

My Encounter With The Truth


मला आठवतंय, शाळेत असताना शेंबूड पुसायला येत नसला तरी आम्ही हिरीरीनं गांधी, सावरकर, टिळक, चवीला हवा असेल तर गोडसे आणि थेट हिटलर मध्ये स्पर्धा लावायचो! हौशी लोक त्यामध्ये आंबेडकर, भगतसिंग पासून थेट शिवाजी, आणि अकबर यानाही ओढायला कमी करायचे नाहीत. उगाचच मला अमुक अमुक आवडतो असं एकानं म्हणायचं आणि मग बाकीच्यांनी त्याची इज्जत काढायची. Identifying yourself with whom you hate most or whom you cannot stand if anyone else hates at all ची ही आपली पहिली पायाभरणी असावी. आमच्या शाळेत जेव्हा आम्ही ही स्पर्धा भरवायचो तेव्हा, मला अमुक आवडतो म्हणणाऱ्यांनाही फारशी अक्कल नसायची आणि त्यांना उलट बोलणाऱ्यानाही फारसं कळलेलं नसायचं. पुढे इतिहासाच्या पेपरमध्ये शिट्ट्या वाजल्या की कळायचं की कोणी किती पुड्या सोडलेल्या. पण मोठं झाल्यावर आत्ता कुठे काय परीक्षा बिरीक्षा? त्यामुळे बऱ्याचशा बाबतीत मी त्या अवस्थेतून फारसा बाहेर आलोय असं वाटत नाही अजूनही. पण आलं पाहिजे खरं.


हे आठवायचं कारण म्हणजे, आपल्या पुस्तकी कारकिर्दीची तब्बल तीन पुस्तकं संपल्यावर आपण थेट गांधीबाबांची ऑटोबायोग्राफीच उचलली. हय गय नाय काय! पण हा प्रकार जरा वेगळाच निघाला. तब्बल एकोणीस तास खपवल्यावर कळलं की आपल्याला किती कमी कळलेलं तेच जास्ती कळलंय! म्हणून यावर काहीतरी लिहावं असं बऱ्याचदा उचंबळून आलं तरी काय आणि कसं लिहावं हे झेपत नव्हतं. माहिती असलेलं किंवा माहिती आहेच असं वाटलेलं पुसून परत पाटी कोरी करायची कुवत किंवा हिम्मत यांच्यातल्या एकात कुठेतरी विकेट पडायची.


मोहनबाबूंच पुस्तक संपून आता काही महिने झाले. पुस्तकात मोहनचा बॅरिस्टर होऊन नंतर महात्मा झाला. पण तो होता होता आपल्याला मात्र दम लागला. पुस्तकाच्या शेवटी महात्मा म्हणलं गेल्याबद्दल त्यालाही छान नाही वाटलं. गांधी हा विषयच जरा विचित्र करून ठेवलाय आपण. नाही? जॉब्स आणि मलालाचं पुस्तक समोर असताना, तेव्हा तेव्हा नव्यानं समजलेल्या गोष्टींबद्दल गप्पा मारता यायच्या. हे मला इथं नाही करता आलं. थेट टोकाचीच चर्चा सुरु व्हायची इथे. गांधींबद्दल एकूणच वाद जास्ती आहे. मग गांधीवाद तर दूरच राहिला. एखाद्या माणसाला महात्माच करून टाकलं की त्याच्यावर चर्चा होण्याचा स्कोप संपत असावा. एकदम दाऊ पेक्षा होलिअर! (मला असं शिवाजी महाराजांच्या बद्दलपण वाटतं. माणसाला माणूस असण्याची मुभा संपवली की मग विषयच संपला. असो. आधीच न झेपलेला विषय सुरु आहे, त्यात महाराज आणून सोडले म्हणजे तर सगळाच गोंधळ उडायचा. तर आपण मोहन वरच परत येऊ.)


आता बघा, आपल्याला ज्ञात असलेल्या गांधीना चोरून जाऊन नॉन वेज खायचं, किंवा नॉन वेज हेच इंग्रजांच्या ताकदीचं रहस्य आहे असं म्हणून सगळ्या भारताला नॉन वेज खायला घालून ताकदवान करायचा छुपा प्लॅन बनवायचं स्वातंत्र्य आहे? किंवा जगाला मदत करता करता, आपल्या बायकोला मात्र कानाला धरून घराबाहेर निघून जा असं सूनवण्याचं स्वातंत्र्य आहे? या पुस्तकातल्या मोहनला ते आहे. म्हणून तो जड जातो. तो प्रत्येक टप्प्यावर स्वतःला बदलत, सुधरत आणि घडवत जातो. म्हणून त्याला जज पण करता येत नाही. तिथं आणखी अवघडल्यासारखं होतं.


अशी ही गोष्ट, गुजरातमधून, इंग्लंड, फ्रांस मधून, आफ्रिकेतून भारतात येऊन थडकते. आता मोहन इथून पुढे जो काही असणार आहे, जे काही करणार आहे, ते सगळं थेट लोकांच्या समोरच असणार आहे. त्यात वेगळं काय लिहायचं? असं म्हणून रजा घेते. मात्र तेव्हाचा मोहन, आणि आपण महात्मा म्हणून मिरवतो ते गांधी यांच्यात लई तफावत आढळते!

जॉब्सच्या पुस्तकासारखं हे पुस्तकही थोडंसं I'm not particularly proud of all the things I've done च्या नोट वर सुरु होतं. इथे मोहन म्हणतो की मी चुकत शिकत दुरुस्त करत इथवर आलोय. हे माझे प्रयोग. या माझ्या बरोबर चूक गोष्टी. तुम्हाला यातून शिकण्यासाठी. एखाद्या विद्यार्थ्याने शास्त्रीय प्रयोग केल्यासारखे हे माझे प्रयोग. तेवढंच माझं श्रेय. बाकी शास्त्र वैश्विकच. मी कायम स्वतःला तपासत जाईन आणि जिथे जिथे गरज आहे तिथे तिथे बदल करत जाईन. म्हणजे हे जे आज म्हणतोय ते उद्या रिवाईज व्हायला स्कोप. आणि तो असलाच पाहिजे. मलाही. आणि तुम्हालाही.

मोहनसाठी इंग्रज सरसकट बदनाम आणि वाईट होते असं वाटत नाही. म्हणजे ऑनसाईट जाऊन आलेल्याला जसे पाश्चिमात्य म्हणजे सरसकट संस्कृतीहीन वाटत नाहीत तसे. मोहनचा अभ्यास आणि वाचन एकदम बाप! मग ते धर्मग्रंथांचं असो, राजकीय असो किंवा ऐतिहासिक असो. वेगवेगळ्या थेरपीवरचा अभ्यासपण कडक. हायड्रो थेरपी, अर्थ थेरपी अशा नैसर्गिक उपचारावर खूप जाम विश्वास. पुस्तकामध्ये एक प्रसंग आहे ज्यात मोहन आपल्या तापानं फणफणलेल्या मुलाला या असल्या थेरपीने बरं करतो. तेव्हा अंगावर काटा येतो. मजा अशी आहे की असाच प्रकार जॉब्सच्या आयुष्यातही घडलेला. पण फरक असा की आपले आजार नॉन वेज न खाल्ल्याने, फलाहार केल्याने किंवा कोण्या हर्बल थेरपीनेच बरे होणार या हट्टापायी जॉब्सने आपला जीव गमावला. मोहनच्या प्रयोगामध्ये अशी कॅजुलटी होत नाही.


शेवटी मोहन पासून महात्मा पर्यंतचा प्रवास खडतर वाटतो. मोहनसाठी आणि त्याच्या अजूबाजूच्यांच्यासाठीसुद्धा. हा सगळा प्रवास मवाळ नक्कीच वाटत नाही. किंबहुना विलक्षण ताकदी शिवाय हे असं करणं अशक्यच असं वाटतं. आपल्या बायको आणि मुलांसाठी आपण काय करू शकलो आणि काय नाही याचं मोहनचं विश्लेषण आणि खंत दोनही मनाला लागतात. या पुस्तकातल्या बऱ्याच गोष्टी कशाच्या मागे दडतील इतक्या किरकोळ नाहीच वाटत, तरीही कुठं हरवल्या हेही कळत नाही.

असो. तर सुरुवातीला म्हणाल्या प्रमाणे अजूनही काय लिहायचं हे कळलं नाहीचय हे दिसलंच असेल. आजचे बरेचसे राजकीय किंवा सामाजिक पेच प्रसंग हे पुस्तक चाळताना परत परत आठवत राहतात. मी मागे हिंद स्वराज हे पॉकेटबुक वाचलेलं. त्यातल्या बऱ्याच मुद्द्यांची पार्श्वभूमी या पुस्तकात सापडते. गांधींना अभिप्रेत स्वराज आणि आपल्याला १५ ऑगस्ट १९४७ ला मिळालेलं स्वातंत्र्य हे फारच भिन्न वाटतात. आणि त्यानंतरही आपण फारसं त्याबद्दल काही केलंय असंही नाही दिसत. स्वावलंबी होण्यापासून, मग ते आपण स्वतः असो, आपलं घर असो, गाव असो, आपलं राज्य असो किंवा आपला देश असो, आपण एकूणच लांब चाललोय असं वाटतं. आणि याची खंत वाटू नये याची पुरेपूर काळजीही घेतोय. आणि हे फक्त भारत देशापुरतं सीमित नाहीए. अमेरिका आणि इग्लंडसारखे देशही याला अपवाद वाटत नाहीत. आणि म्हणून गांधी, त्यांचे विचार, त्यांच्या पद्धती हे more relevant than ever वाटले मला.


असो. शेवटी हा सगळा एक्को है कहानी पर बदले जमाना टाईप प्रकार आहे. जरा वेळ लागेल हे सगळं पचायला. दरम्यानच्या काळात लिओ टॉल्स्टॉयचं वॉर अँड पीस झालं. आता पुढचा पाडाव माईन काम्फ.