Thursday, August 28, 2014

#FavoriteBappa



आता उद्या आपल्या घरी गणपतीयेणार. पुढचे सातचे सात दिवस आपण त्यांना सुंदर दिमाखात ठेवणार. पण हे सात दिवस सरल्यावर अपली खरी जबाबदारी वाढेल. असं नाही वाटत तुम्हाला? घरचा पाहुणा मग आपल्या अख्ख्या गावाचा पाहुणाहोणार. घरी असताना मान राखला, पण आता घराबाहेर असताना किती मान राखला जातो यासाठी आपण काहीतरी करू शकू का?

मलाआठवतंय मागच्या वर्षी मी हे असं TooBusyToDoGood लिहिलेलं. आत्ता काहीच दिवसपूर्वी जन्माष्टमी नंतर लोकांचे पोस्ट वाचताना मला परत त्याचीच आठवण झाली. पण आता दरवेळी एवढंच बोलण्यापेक्षा यावेळी जरा वेगळं करायचं का?

बाहेर जाऊ, आणि आपल्यातलेच कोणी हरहुन्नरी कसे कसे उत्सव साजरा करतायत याबद्दल लिहायचं का? म्हणजे थोडक्यात सांगायचं तर, नकळत त्रागा करताना आपण जे नावडते आहे त्याला जास्ती भाव देत आलोय. की अमुक अमुक मुळे त्रास होतो. तमुक तमुक चूक आहे. अशामुळे गैरसोय झाली. तशामुळे ट्राफिक गंडलं! पण कुठेतरी कोणीतरी काहीतरी उल्लेखनीय करत असेलच की! यंदा आपण त्यांनाभाव दिला तर? अगदी भरभरून. त्यांना प्रोत्साहन दिलं तर? त्यांच्याबद्दल माहिती शेअर करू.

असा हा थोडासा बदल आपण आपल्या वागण्या बोलण्यात करून बघू! म्हणजे “पुढच्या वर्षी लवकर या” असं गणपतीला सांगताना आपल्यालाही पावशेर जोश जास्ती चढेल. म्हणजे असं म्हणता येईल, की बाप्पा बघ, यावेळी हे असं असं सुद्धा घडलं, पुढच्या वेळी ये, अजून काहीतरी करून दाखवू!

तेव्हा आपल्याला आढळलेल्या कोणव्यक्तीने, मंडळाने, कुटुंबाने, साजरा केलेल्या उल्लेखनीय गणेशोत्सवाबद्दल इथंलिहूया. नेहमीची लफडी होतातच पण त्यांना फाटा देऊन कोणीतरी काहीतरी बदल करायचाप्रयत्न करत असेल (आणि मला खत्री आहे, असं खूप लोक असतील), त्यांच्याबद्दल एकमेकाला सांगू. शेवटी कसंय, आपल्या लाडक्या सणाच्या दिवशी कोणाची गैरसोय होत असेल, तर तेही चांगले नाहीच न! कदाचित आपण चांगल्याचा प्रचार न करणं हेही त्यामागचं कारण असूच शकतं की! कदाचित आपण चांगल्या गोष्टीना जास्ती भाव दिला तर हळू हळू गैरसोयीचा भाग कमी होईल.

तर मग करायचं असं? जर इथं शेअर केलात तर ठीकच. आपण सगळेच वाचू आणि कौतुक करू. आपापल्या फेसबुकवर केलात तर हा #FavoriteBappa सहित करा. बघू पुढच्या दोन आठवड्यात आपल्याला काय काय सापडतं! ते सगळं मग आपल्याकडून गणपतीला souvenir असं म्हणू!


आपल्या सर्वांचे अनुभव वाचण्यास उत्सुक,
एक तुमच्या सारखाच भक्त


ता.क. खरं सांगायचं तर मला इथं चांगलं म्हणजे कसं याची काही उदाहरणं द्यायची होती. पण खास नाही सुचली. पण कदाचित पुढच्या वर्षी हाताशी खूप उदाहरणं असतील. अशी अशा नक्कीच आहे.


(Photo credit: Sayali)

Friday, August 15, 2014

माझा मेसेज बघा ... माझा मेसेज बघा!



माझा मेसेज बघा... माझा मेसेज बघा...
अहो वर आणखी दोघांनी तोच जरी टाकला असेल तरी मी परत टाकलाय बघा.
उद्या मी काही लक्षात ठेवणार नाहीये, पण तुम्हालाही आठवणार नाहीये.
तेव्हा आज तुम्ही माझा मेसेज बघा.
तसा मीही तो पाहिलेला नाहीये. इकडून आला, मी तिकडे चिकटवला.
कसा त्वरीत चपखल चिकटवलाय पहा.

उपलब्ध अशा सगळ्या माध्यमांवर आपल्या नावाचा एक मेसेज टाकून घ्या.
एकाहून जास्ती मेसेज टाकला तरी कोणी वाचणार नाहीये ... काळजी करू नका!
आपल्या भरघोस भक्तीची मग स्वतःलाच पावती द्या.
बाकी देशप्रेम?
ते आपल्या आपल्या सवडीने करायला आपण स्वतंत्र आहोतच की!

अहो प्रधान मंत्री आज बोलले. तेही बिना कागद घेता बोलले!
म्हणाले खेड्यांचा विकास करूया, भारत स्वच्छ करूया,
म्हणाले डिजिटल इंडिया बनवूया!
अहो पण एक तासभर बोलले. त्यांना असेल एक तास वेळ. आपल्याला थोडीच आहे!
पण आपला आजचा कोटा संपला! आता मग?
आता हे सगळं बाकीचं आपल्या सवडीनं बघण्याला आपण स्वतंत्र आहोतच की.

थांबा जरा, एक जोक आलाय.
पूर्वीचा एक नेता कसा काहीच बोलत नव्हता त्याबद्दल लिहिलंय.
शेवटी जय हिंद आहे. आणि सच्चा देशप्रेमी असाल तर शेअर करा म्हणून लिहिलंय.
आता हे करूच शकतो. देशासाठी इतका वेळ देऊच शकतो.
हे लगेच फोरवर्ड करायला आम्ही स्वतंत्र आहोतच की!
तेव्हा तुम्ही आत्ता तो फॉरवर्ड केलेला माझा मेसेज बघा.


पण तरीही काही वेड्यांना आज परत स्फुरण चढेल.
झेंडा वंदन, सफेद कुरते, जिलेब्या, पेढे, राष्ट्रगीत हे सगळंच आठवेल!
सगळे स्वातंत्र्यवीर आठवतील. आणि त्यांच्यात स्पर्धा नसेल.
कारण हा जल्लोष स्वातंत्र्याचा! यामध्ये कोणा दुसऱ्या राष्ट्राचा द्वेष नसेल.
यामध्ये स्वतंत्रता या कल्पनेचा आदर असेल. सगळ्यांचा उद्देश्य एक असेल.

वर्षभर जाण ठेवण्याचा. जागृत राहण्याचा.
एक सशक्त, आदरणीयदेश बनवण्याचा.
आज दिवसभर जेकाही संकल्प केले, ते पूर्ण करण्याचा.
आणि यांच्यावर उद्या मेसेज बनतील. आपण पुढच्या वर्षी तेही फोरवर्ड करूया.

किंवा आपल्यावर मेसेज बनतील असे काहीतरी बनायचा संकल्प बनवूया!

वंदे मातरम!


वेड्या लोकांसाठी,
Prime Minister's Entire Independence Speech
Just in case



Image Credit: http://beta.metastudio.org/static/img/damitr/tricolor.jpg

Friday, August 08, 2014

फॉरेन विरीद्ध फोरेन



नव्या शहरात, नव्या देशात जाणं आता नवीन नाही. किंवा ते कुतूहलही आता फारसं उरलं नाही. आजूबाजूचे चार लोक आणि हाती असलेलं काम याच्या पलीकडे आपण थोडीच जातो? मग ते सिंगापूर असो किंवा शिंगणापूर. नाही म्हणलं तरी माणसाला “ढाई बिघा जमीन” पेक्षा जास्ती आणखी काय लागतं? अशा धरतीचं सपक तत्वज्ञान हे! पण वयाबरोबर कदाचित सपक गोष्टी पौष्टिक वाटत असाव्यात. ही असली अक्कल घेऊन लंडन मध्ये आपल्याला काय काय दिसणारे आणि आपण काय काय करणारोत याचं म्याच फिक्सिंग करून राणीच्या शहरात यायला निघालो.

समस्त फोरेणच्या जगात पंजाबी taxi ड्राइवर असत असतील, तरी आपल्याला लंडन मध्ये चक्क मुरुड जिल्ह्यातला मस्त मराठी ड्रायवर मिळाला. दिवेआगार आणि हरिहरेश्वरच्या समुद्राची चर्चा करत आम्ही थेम्सकाठच्या या शहराच्या रस्त्यावर आलो. विमानतळ एक तासापेक्षा कमी अंतरावर असणे वगैरे प्रकार आपल्या नशिबी नसतातच. त्यामुळे तासभरचा प्रवास पुढे वाढून ठेवलेला. मुरुडवासी या ड्राइवरने तासाचा प्रवास दीड तासाचा केला. त्याने गप्पांच्या ओघात शहराच्या आतून फेरफटका मारत, पहिल्याच दिवसाच्या पहिल्याच तासात, लंडन मधल्या खूप साऱ्या गोष्टी दाखवून टाकल्या. पण काचेच्या आतमधून. “इथं यायला लोक खूप प्रयत्न करतात. तरी त्यांना संधी मिळत नाही. तुला मिळालीये तर त्याचं चीज कर” असं काहीसं त्याच्या दुप्पट वयाच्या आजोबांसारखं बोलून तो अंतर्धान पावला. संधी मिळणं आणि संधी लाभण यामध्ये फरक असतोच की. पण आपण थोडीच आजोबा झालोय असली उत्तरं द्यायला? म्हणून काही उत्तर बित्तर नाही दिल. अधाशासारखं नव्या शहराचे कानेकोपरे मापणे सुरु ठेवलं.

यापुढे जे सुरु झालं ते म्याच फिक्सिंगपेक्षा काहीसं निराळं होतं. नकळत का होईना, मनातल्या मनात तुलना सुरु झालेली. कशाची म्हणाल तर पुण्याची आणि लंडनची नव्हे! एका फोरेणची दुसऱ्या फोरेणशी! लंडन आणि कॅलिफोर्नियाची. पहिल्या काही दिवसात, ठळकपणे जाणवलेल्या या काही गोष्टी. या व्यतिरिक्त तुम्हालाही काही जाणवलं असेल तर जरूर सांगा.


१. काही वर्षापूर्वी जेव्हा कॅलिफोर्नियामध्ये पोचालो तेव्हा इंटरनेट मिळायचे वांदे होते तेव्हा बाल्कनीमध्ये बसून कुठाल्यातरी शेजाऱ्याच्या इंटरनेटवर दिवस काढलेले. फुकटची कनेक्शन शोधणे असा टाईमपास होता काही दिवस. इकडे घरी पोचल्यावर इंटरनेट तर मिळाले पण काहीही ओपन करा. प्रत्येक वेबपेजवर कुकीजची वार्निंग. “आम्ही कुकीज वापरतोय. वापरणारच आहोत म्हणजे. तरी तुम्हाला सांगतलं ब्वा एकदा” या अशा धर्तीची. मग तुम्ही "got it" क्लिक करायचं. हे असं सगळीकडे. एकदा मला वाटलं की आपल्या मशीनमध्ये काही बिनसलं की काय? पण माझ्या मशीनला काहीही झालेलं नव्हतं. पहिल्यांदा वापरताना जवळ जवळ सगळ्याच वेबसाईट ही वार्निंग दाखवतात इथं. हे म्हणजे वेबसाईटनी युजर ला “केहके लुंगा” असं म्हणाल्यासारखं आहे. पण असो. इथं लोकांना आवडत असावं ब्वा! पुढे Torrent वगैरे काढावे तर चक्क सर्विस प्रोवाईडरन कॉपीराईटची काहीतरी वॉर्निंग दाखवावी!! शिव शिव शिव! हे म्हणजे अतीच की!

२. मला आठवतंय, अमेरिकेमध्ये कुठेपण भटकताना समोर फिरंग आला की भुवया उंचावून गुड मोर्निंग, गुड इविनिंग करून जायचा. नकळत आम्ही पण करू लागलो होतो. समोरच्याकडून उत्तराची अपेक्षा कधीच नसायची. पण हे रुटीन होतं. उगाच जाता येत एकमेकाला ग्रीट करात बसायचं. हा आपण बघितलेला पहिला फोरेणर. (त्या आधी एशियामध्ये फिरलेलो पण तिकडच्या लोकांना फोरेणर नाही म्हणवल. असंच. racist वगैरे नाही. पण ते म्हणजेच आपलेच आयसोटोप वाटले.) तर इकडचा फिरंग चक्क खाली मान घालून निघून जातो!! असं थोडीच करतात फोरेणर? असं कसं? मी एक दोनदा स्वतःहून म्हणायचा प्रयत्न केला. पण समोरचा ऐकायला थांबतो कुठे? आठवडाभर फिरल्यावर मला एक जण भेटला की जो स्वतः बेंचवर बसला होता आणि मी बाजूने जाताना मला गुड इविनींग म्हणाला. हा खरा फोरेणर! पण तो ब्रिटीश नव्हता. :(

३. पुण्यातून बाहेर पडलो तेव्हा ट्राफिकची शिस्त वगैरे लिहिती बसलो होतो. इकडं तर धर्मभ्रष्ट झाल्यासारखं वाटलं. गाड्या सिग्नल पाळतात पण लोक काहीही करतात हो! "जे वॉक" वगैरे भानगड नाहीच! बऱ्याचदा उजवीकडे बघा, डावीकडे बघा, आणि असाल तिथून रस्ता पार करा. हाच एक नियम! तिथे चालणाऱ्या लोकांसाठी लाल पिवळे लाईट आहेत ते करमणुकीसाठी असल्यासारखं! कॅलिफोर्नियामध्ये असताना दंड करायचे लोक! इकडे भाईचारा सुरु होता सगळीकडे. लाल सिग्नलच्या नाकावर टिच्चून आपल्याकडे जशा गाड्या पुढे जातात तसे इथले पादचारी लोक बिनधास्त कुठूनही रस्ता पार करतात. हे म्हणजे एकदम होमली फिलिंग! तसा इथे चक्क रस्त्यावर थुंकणारा गोरा पण मी माझ्या या डोळ्यांनी पाहिलेला आहे. इथे पान खायची संस्कृती नसल्याने असल्या दुर्मिळ गोऱ्यांच्या कलेचे ठसे उमटलेले नाहीत! पण असो. ग्लोबलायजेशन म्हणू हो. आणि काय?

४. भारतामधून आला असाल तर लंडन आपलंच शहर आहे असं वाटायला वेळ नाही लागत. कॅलिफोर्नियामध्ये नव्हतं ब्वा असं वाटलं कधी. याचं कारण म्हणजे इथल्या इमारती. विटांची बांधणी आणि कौलारू छप्पर. किंवा बाहेरून तरी असं दिसतं तसं. आपल्याकडचच पण जरा सुबत्ता असलेलं टुमदार शहर असं लगेच वाटून जातं. आपल्यातलच वाटलं शहर मग सुरु केली किरकिर! म्हणजे वर जी काय आरती ओवाळली, ती अशामुळेच. एकदम आपल्या शहरात करतो तशी! असो. पण इथल्या इमारती खूपच खास! मजा आ गया!! कॅलिफोर्निया मधल्यासारखं लाकडी बिकडी काही नाही इथं काही!

५. आणि शेवटचं म्हणाल तर फ्याशन! आता याचं काय सांगावं रे बाबा! सुरुवातीला "अरे काय हे ध्यान?" पासून ते "इसमे कुछ बात है" पर्यंत जायला फार वेळ नाही लागला. San Francisco मध्ये बघितलेले अचाट प्रकार आठवले. इथे जे दिसले ते आता हळू हळू इंटरेस्टींग वाटण्यापर्यंत मजल गेलीये. शेवटी कसय न. अंगात घालायची गोष्ट एक आणि ती carry करणं दुसरं! हट्टानं रंगवलेले केस, उघडलेली बटणे किंवा घातलेले कपडे, हा प्रकार म्हणजे फ्याशन हे San Francisco मधलं आपलं दृश्य. इथे मात्र जरा elegance वाटला. पहिल्या दिवशी disaster वाटलेल्या स्टाईलची आता डोळ्याला सवय होऊ लागलीये. २ वर्ष राहून पण San Francisco मध्ये गेल्यावर, तिथल्या फ्याशनची सवय नाही झाली! ते अचाटच वाटत राहिलं.

बाकी न, इथले लोक सगळे कशातरी सारखे वाटतात. सगळे. हर किसीकी शकल किसीना किसीसे तो मिलतीही है. यातला प्रकार. म्हणजे प्रत्येकजण आपण पाहिलेल्या कुठाल्या न कुठल्या तरी सिनेमाचा कलाकार वाटतो. सगळे तसेच वाटतात. ट्रेन मध्ये आजूबाजूला बघितलं की च्यायला याला किंवा हिला कुठेतारी बघितलय असं फिलिंग जोरदार येतं. तसही समोर दिसणारा माणूस गोरा आहे म्हणजे ब्रिटीश आहे, असं असण्याची शक्यता ताशी कमीच. आता बाहेरून येऊन राहणारी इतकी खंडीभर माणसं आहेत तर मग त्यात पक्का ब्रिटीश कुठे सापडायचा? अमेरीकेमध्ये लोक पाउंड कमी करायच्या मागं पाळतात. इकडचे लोक पाउंड मिळवायला पाळतात. या अशा धावपळीमध्ये बनलेलं हे शहर. आत्ता जितके दिवस नशिबात असेल तितके दिवस नवं काहीतारी दाखवेल अशी अपेक्षा. आपण आपलं अधाशासारखं बघणं सुरु ठेवावं.

Friday, August 01, 2014

Driving Crazy ... or Driving Easy!



There are two things that bother me when I go out. One is the roads and other is the people on the road! I tried telling things to the road but the words got lost in the potholes! So I turned to the people on the road. And I was there too, very much part of that insanity, making faces at fellow riders! Here is what I want to tell the people who use the road!
  1. It's driving. Really. Else they would have called it racing.
  2. Don't take it literally when they say "Make your own rules".
  3. When it turns Green, it's really not telling you to start honking. Trust me. I have read the rules.
  4. The Yellow is to press the breaks, not the accelerator.
  5. Your vehicle doesn't really eject your seat if you wait until the Red signal goes off. Try staying put. It's safe.
  6. There is a PIL pending in the court demanding government to play meditation music till the time they fix the roads. This peaceful proposal has been submitted by T-Series, Tips and Fountain Music. Hold on to the patience till then. Traffic Jams are considered as indirect Dharna supporting this PIL. So be happy about the traffic jams.
  7. If you are stuck in the traffic jam, then most probably the vehicle in front of you and the one on the back also are stuck in the traffic jam. Don't behave as if you are the only one stuck!
  8. If the lane on your right side is empty, perhaps it is really for the vehicles coming in opposite direction.
  9. Where there is a space, there need not be a way. We got the proverb all wrong!
  10. Driving is a good time to focus on the road. Worth trying out. You may focus on other things while in the parking lot.
  11. It's not smart to look at the smart phone while driving. Mobile phones are to be used when you are not mobile.
  12. When the vehicle gives a side indicator, mostly it is going to turn that direction. It's really not an invitation to you to overtake on that side.
  13. Don't suddenly realize that you also have the accelerator when someone overtakes you. Remember, the accelerator was always there and you were doing just fine without pressing it too hard.
  14. It's completely alright to have to stop on the road for some reason. God understands that it's not a sin.
  15. Honking is not the key to clear the traffic jam. It doesn't work. Really.
  16. If you got so tempted to comment on #4, then you missed the point completely!
  17. Don't worry about #6 a lot. It's false.
Yes, the roads are bad and are designed to get messed up in rainy season. And it's government's job to fix those. And we pay taxes too. And we deserve better driving conditions. And yeah, we are frustrated or desperate!

But let's not add to the misery! We can continue to be in our senses even when we get behind the wheel. What say?
While we wait for the government to fix the roads, let's fix the people on the road. Feel free to share it with those who drive on the roads.

PS (1): If you share it within 10 minutes, then goodluck will come to you tonight in the traffic while going home. You already are seeing what happens when you ignored it.
PS (2): Anyone interested to make poster of it? :-)
PS (3): Go an extra mile, there are hardly any traffic jams there.
PS (4): Don't spend energy in finding out why the vehicles in the photo are driving in wrong direction.

Saturday, July 12, 2014

the drive

 
 
... and he was left alone with his car at the end of the day on an empty road. Clock showed 11:30pm. Radio guy was planning to doze off as he said, मधुर बेला कार्यक्रम अब समाप्त हो रहा है! He rolled down the windows, shuffled thru other radio channels, fixed one that sounded less loud and started driving towards the highway. It was drizzling, he could feel the rain-drops on his elbow of the right hand that was slightly outside the window. It was approaching mid-night, the road was all dark, it was going to be 30 minutes ride till he reached his house. He started driving on the left most lane not to bother anyone else with his slow speed, raised the volume of the song. It was some old Suresh Wadkar song. He remembered, he always has been a fan of such late night drives. A slow number or some country music on the radio doubles the charm of the nightly living streets and the running lights over the head. This time, it was all with a little spice of rainfall too. He felt as if it was an orchestrated exclusive event for him. The roads throwing in a surprise treat. It was 11:45pm. It was chilling cold. The radio track changed to "मौला मेरे" from "चक दे". Now that was too much for a treat. He waited till it reached the line "लौटके आयेगा तू शर्त लगा ले!". It pushed him 6 years back in the past. He could feel his amateur self sitting next to him. He remembered the walk by the ocean and then to the top of the hill side nearby. He remembered the time that he spent watching the overwhelming nature from the top of the hill and putting himself together for coming days. It brought a smile on his face because he felt, he was still standing at the same juncture, carrying the same amateurish tags, newer yet similar philosophies. He wanted not to reach home without finishing the song. He slowed down further, looked outside the window. The blinking yellow lights, the windshield wipers and the droplets falling on his right elbow were adding to the rhythm, pushing him further deep down the memory lane. He turned inside his apartment complex, the music too fainted, the desperate commercial intruded his silent conversation with himself. He parked his vehicle, it was past mid-night. He so much wished, there could be a chai-stall nearby or a possibility of a walk with the cup in the hand, or a midnight cafe with the benches outside and view of the water dripping from outside of the ceiling. He took a deep breath. Looked up towards the sky, felt the droplets on his face. Amidst the chaos of the words in the world around him, this was a welcome change. He looked up again and said, Thank You.

Tuesday, July 08, 2014

जरा चुकलंच! नाही?



महाराज जेव्हा महाराज व्हायचे होते, तेव्हाची गोष्ट ही. पण महाराज, महाराज असल्यामुळे, त्यांना आता महाराजच म्हणू. तसेही कोणाच्या धार्मिक, मानसिक आणि शारीरिक भावना दुखावण्याचा आपला अजिबात विचार नाही. तर एकदा नेहमीसारखेच महाराज सह्याद्रीच्या कडेकपारीमधून घोडदौड करत आपल्या किल्ल्यात परत आले. मावळ्यांची दीन अवस्था बघून महाराजांना दया आली. महाराजांना सारख्या येणाऱ्या या दयेमुळे "महाराजांना दादोजींच्याकडे प्रशिक्षणासाठी पाठवा" हे जिजाऊंचे पत्र कोणीतरी मधल्या मध्ये बदलून "महाराजांना स्वराज्याची स्वप्नं पडू लागलीत म्हणून त्यांना कौंसलिंगला पाठवा" असं करून महाराजांना पोच केलं. जिजाऊनी केलेला आदेश म्हणून महाराजांना पर्याय नव्हता. ते गेले कौन्सलिंगला. तिथे समोर एक इंग्रज बसलेला - केन रुदरफोर्ड. इंग्रज का म्हणाल तर उगाच त्याच्या आडनावावरून त्याची जात हुडकायचा प्रयत्न होऊ नये म्हणून! नाहीतर पुढची गोष्ट वाचायच्या आधीच बरेच निष्कर्ष काढले जायचे! हा केन भविष्यातून भूतकाळात आलेला म्हणे. किंवा अशी आख्यायिका तरी होती.

महाराजांनी आपले विचार त्यासमोर मांडले, "आमच्या या भूमीवर आमच्या माणसांची ही अवस्था? हे बरोबर नाही. स्वराज्य झालेच पाहिजे. या लोकांसाठी मला काहीतरी करायचंय. आणि यासाठी माझे आयुष्य गेले तरी बेहत्तर. पण हे हिंदवी स्वराज्य व्हावे, ही श्रींची इच्छा!"

केनने महाराजांकडे 'तुषार कपूरचा पिच्चर बघतोस का?' असं विचारल्यासारखी नजर टाकली. (म्हणजे खूप कौतुकाच्या भावनेनं. असं म्हणायचं होतं. नाहीतर आपल्याला तुषारच्या चाहत्यांच्यापण भावना दुखवायच्या नाहीत) "छे रे वेड्या. असं थोडीच करतात?" महाराजांना वेड्या म्हणाल्यामुळे चार मावळ्यांच्या भावना दुखावल्या गेल्या, त्यांनी लगेच तलवारी काढल्या. बाह्यावर केल्या. एखादातरी तबेला किंवा अभ्यासिका फोडण्यासाठी त्यांनी तडक गावाकडे धाव घेतली. हर हर महादेवच्या आरोळ्या ऐकू आल्या. केन पुढे बोलू लागला. "आता उद्या म्हणशील की तुला मुघल राजांना पळवून लावायचंय. असं नसतं करायचं ब्वा! तो बघ तो तानाजी. बिचाऱ्याचा पोर लग्नाला येणारे. तुझ्या नादाला लागला तर उद्या त्याचं लग्न बाजूला ठेवून तुझ्याबरोबर गावभर फिरायला येईल! तो बाजी बघ. उद्या तो ऑनसाईट जायचं स्वप्नं बघू शकेल. पण तू नादी लावलास तर पन्हाळ्याच्या बाहेरही पडायचा नाही!"

महाराजांनी आपला मुद्दा परत मांडायचा प्रयत्न केला. केनला कळू शकेल अशी अजूनही त्यांना अशा होती.
"राष्ट्राची निर्मिती किंवा विकृती ही केवळ आपल्या आणि आपल्याच कर्माने होते. हा विचार लोकांच्या मनात रुजवण्याची गरज आहे! स्वराज्य निर्मितीचं कार्य एकट्या दुकट्याच नाही? स्वराज्याचं स्फुल्लिंग या मावळ्यांच्या मनात पेटलं पाहिजे. गुलामगीरी मिटवण्यासाठी त्यांच्यातला स्वाभिमान जागा झाला पाहिजे! मग प्राण गेले तरी बेहत्तर. मग ते प्राण माझे असो किंवा या मावळ्यांचे. हे राज्य स्वर्वांचे होईल. इथल्या लोकांना सक्षम बनवता येईल. आता रायारेश्वारी स्वराज्यस्थापनेची शपथ आणि मग काम सुरु. इथल्या लोकांना मिळत आलेली दुय्यम वागणुक आता थांबली पाहिजे. हे सगळे एक बनले पाहिजेत."

केनचा पेशन्स संपत चालला होता. त्याने परत एकदा मान नकारार्थी हलवत समजावण्याचा प्रयत्न केला. "विघ्नसंतोषीपणा आहे हा. शंभर वर्षाचा अनुभव आहे हो निजामाकडे? तुझ्या CV मध्ये तुम्ही अजूनही फ्रेशर म्हणूनच दिसतंय. स्वराज्याचा आगाऊपणा कुठे करतो?" महाराजांना आगाऊ म्हणालेला ऐकून आणखी चार मावळे बाह्या वर करून तलवारी काढून गावाकडे धावले. "दुय्यम स्थान नको असेल तर स्वातंत्र्य कुठे घेतो? परत मग तुझ्यावर जबाबदारी यायची यांना सुधारून मोठं करायची. त्यापेक्षा सोपा उपाय सांगतो तुला. जरा futuristic आहे. तडक निजामाच्या दरबारी जा. आणि तिथे या मावळ्यांसाठी एकच गोष्ट माग. माग म्हणजे अगदी हट्टच धर. सोडूच नको. निजामाला सांग की बघ या लोकांच्याकडे. कसे दीन आहेत. मागासलेले आहेत. यांना संधी हवी. तर यांच्यासाठी एकच गोष्ट दे. आरक्षण! मग परत ये इकडे. ज्याचा ज्याचा तुला उत्कर्ष करायचा आहे त्याला त्याला मग आरक्षण बहाल कर. ... ... हे बघ. तुला आत्ता झेपणार नाही हे. पण आजपासून तीनशे ते चारशे वर्षानंतर जी प्रगत मनुष्यजात असेल ते हेच करणारेत. तू आज तसे केलास तर इतिहासामध्ये तुझं नाव दूरदृष्टी असलेला म्हणून होईल. ...

एक दूरदृष्टी असलेला ...

एक दूरदृष्टी असलेला बलाढ्य निजामाचा प्रामाणिक सरदार ... शिवाजी भोसले (१६ टक्के आरक्षित)."

============================

कृपया, हे वाचून कोणी बशी आणि बशा फोडू नयेत. कारण तो हेतू नाहीये.
खरं सांगू तर मला हा खेळच कळत नाही. २१ मे २००६ रोजी मी एका आरक्षण विरोधी मोर्चामध्ये सहभागी झालो होतो. आज त्याला नऊ वर्षं होऊन गेलीत. आपल्याला एक नवं आरक्षण देण्यात आलंय. स्वातंत्र्य मिळवून इतकी दशकं उलटली तरीही आम्ही लोकांना मागासच ठेवलंय म्हणून मिरवायचं पदक!

या मुद्द्यामध्ये इतकी क्लिष्टता बाळगली जाते की काय सांगा? क्रिमी लेअर, उत्पन्न पातळी, तात्विक मुद्दे, तांत्रिक मुद्दे, आणि सर्वात महत्वाचे म्हणजे भावनिक मुद्दे! काहीही बोलायला जा की कोणाच्यातरी भावना दुखावतात! तुमचा उद्देश्य काहीही असो. तेवढेच पुरात नाही. मग कशाला पडा यात?

मला आता खूप भीती वाटतेय. माझ्या, आपल्या, सर्वांच्या आरक्षित भविष्याची. पावलो पावली भावना दुखावून घेणाऱ्या समाजाची. कदाचित हे लिहिल्यामुळे कोणाच्या दुखावलेल्या भावनांची. आणि म्हणून माझ्या भविष्याची. आडनावावरून जात हुडकत फिरणाऱ्या सुशिक्षितांची. यावर आपण काहीच करू नाही शकत या रुजत चाललेल्या भावनेची. एसी ऑफिसमध्ये बसून जगातल्या तमाम मुद्द्यांवर लिखाण करून तात्पुरते समाधान मानणाऱ्या तरुणांची. "तू त्यात नको रे पडू!" असं सांगणाऱ्या जिजाऊंची.

============================

असाही विचार केला तर ... की या सगळ्यात महाराजांच्याच भावना दुखावल्या गेल्या असतील? महाराज सोडा, एकूणच स्वातंत्र्यासाठी जे जे झटले त्यांच्या भावना वगैरे दुखावल्या असतील? आरक्षणच हवं होतं तर मग स्वातंत्र्य कशाला घेतलं? गांधी, टिळक, आझाद यांनी आरक्षणच मिळवण्यासाठी लढायचं होतं न? जरा चुकलच त्याचं! वेगळी "strategy" करायला हवी होती! किंवा माझच चुकलं असेल. आणि असेल तर हे लिहिल्याबद्दल सर्वांची बिनशर्त माफी.

Thursday, May 22, 2014

They are inexperienced!

"
बऱ्याचदा मला असं वाटतं की आम्ही लोक खूप approachable होतो जनतेला. आणि म्हणून कोणीही येऊन आम्हाला काहीही बोलून जाणे सोपे होते. सत्ताधारी कोणाच्याही आवाक्याबाहेर! सर्वसामान्य विचारही करू शकत नव्हते त्यांना काही बोलण्याचा. आम्ही केला विचार. तर आम्हाला ते कसं जमणार नाही, हे सांगायला हिरीरीने पुढे आलेले लोक खूप होते. आमच्या चुकांवर हसणारे लोक होते. सुरुवातीच्या काळात प्रश्न पडायचे की, "या" लोकांसाठी आपण सर्वस्व पणाला लावतोय? पण नंतर हा प्रश्न उरला नाही. ते लोक उरले नाहीत यातला भाग नाही. स्वतःला कशाचा फरक पडून घ्यायचा ते शिकलो आम्ही.

तुम्हाला काय वाटतं की देशाला मुक्त करणं हे एकच परमोच्च ध्येय होतं? तुम्हाला ६० वर्षानंतर मागे वळून बघताना असं वाटतंय. किंवा ऐकायला चांगलं वाटत म्हणून तुम्ही असं म्हणता की सगळा देश सामील झाला! ज्याला कळालं त्यानं यात उडी मारली. सगळा देश पेटून निघावा असे दिवस होते ते. पण सगळा देश नव्हता पेटलेला. इंग्रजांची सत्ता असावी असं म्हणणारे पण कमी नव्हतेच. तसे सगळे इंग्रज वाईट थोडीच होते? इंग्रजच करतील सगळं नीट यावरही गाढ श्रद्धा असणारे लोक होतेच. तुम्हा लोकांना काय येतं? बट्ट्याबोळ करणार तुम्ही! आत्ताच धड जमत नाहीये तुम्हाला काही! अनुभव कुठाय तुम्हाला काही? हे असले टोमणे असंख्य वेळा ऐकायचो आम्ही. हे लोक सत्ताधाऱ्याना प्रामाणिक राहिले. याची सल काही काळ राहिली.

वेड लागलंय या लोकांना. अशीच ओळख होती आमची. पण नंतर नंतर अभिमान वाटायचा त्याचापण! आपण जे करतोय ते बरोबर आहे. ते घडणे गरजेचे आहे. यावर अभूतपूर्व विश्वास होता. ज्या लोकांसाठी करतोय, त्यांची थोडीशी जास्ती साथ मिळावी असं वाटायचं. पण तसं होत नाही. प्रस्थापीत बुद्धीजीवी खचितच साथ द्यायला पुढे येतात. खरं सांगू तर क्रांती यांच्या जीवावर नाहीच होत. नाना म्हणून होते एक. आम्ही त्यांचे ऐकायचो. ते शिवाजी महाराजांचे उदाहरण द्यायचे. म्हणायचे, स्वकीयांचा बंदोबस्त करताना महाराजांची अर्धी उर्जा गेली! महाराजांनी आमचे खूप सारे प्रश्न सोडवले. आमच्या शेजारच्या जोशीकाकांना थोडेसे श्रम घेऊन आम्ही काय करतो त्याची माहिती घेणं जड होतं. पण चार लोक नावं ठेवायला लागले की मात्र दुप्पट उत्साहाने हेही सहभागी व्हायचे! अशा लोकांचे कितपत वाईट वाटून घ्यायचे किंवा तेच जोशीकाका नंतर जेव्हा चार लोक चांगले म्हणायला लागले तेव्हा स्तुतीही करू लागले, तर त्याचेही भान कितपत राखायचे, हे सर्व नानांनी दिलेल्या उदाहरणातून कळायचे.

तुम्ही आज ६० वर्षानंतर मागे बघताय तेव्हा तुम्हाला स्वातंत्र्य संग्राम वगैरे वाटतंय. Larger than life! जेव्हा हे सगळं सुरु होतं तेव्हा लोकांना शाश्वती नव्हती की खरच मिळणारे स्वातंत्र्य! पारतंत्र्याची सवय झालेली. त्याच्यात जगण शिकलेले लोक. तू मगाशी म्हणालास तसं, "उंगली क्यू कर राहे हो?" असं म्हणणारे लोक होते. आम्ही नव्हतो १०० टक्के बरोबर. आम्ही organized ही नव्हतो. हर कोपऱ्यातून वेगवेगळे आवाज उठत होते. पण सगळ्यांचा हेतू चांगला होता. एक होता. आमच्यावर टीका करणं काहींनी पसंत केलं. आमच्यातील उणीवा भरून काढण्यासाठी आम्हाला साथ देणं काहींनी पसंत केलं. साथ दिली त्यांना घेऊन आम्ही पुढे गेलो. हे महत्वाचे. हेतू शुद्ध ठेवला तर लोक जुळत जातात. ज्यांना समजायचं त्यांना कळत जात! आज नाही समजलं तरी काय झालं! नाहीच कळणारे ज्यांना, त्याचं दुःख काय करावं!

स्वातंत्र्य मिळवताना जे लोक जीवानिशी गेले ते गेले. तुरुंगवास भोगला तो भोगला. पण त्यापासून कोसभर लांब राहून, साहेबांचा जमानाच चांगला होता असं म्हणणारे लोकही होतेच की. नंतर एकदा जोशीकाका येऊन म्हणाले, मिळालेलं स्वातंत्र्य उपभोगायला आम्ही कितपत लायक अहोत हे काळात नाही! कारण जेव्हा सहभागाची गरज होती तेव्हा आम्ही टीका करत बसलेलो! त्यांना नाना म्हणाले. वेळ अजूनही गेलेली नाही. संग्राम अजूनही संपलेला नाही. १०० टक्के गणितं अजूनही सुटलेली नाहीयेत. आणि ते एकट्या दुकट्याच काम नाहीचे! उणीवा भरून काढता येतात का बघा. तुमच्या बाजूला असंख्य लोक आजही प्रयत्न करतायत. त्याला साथ द्या. ते अपूर्ण असतील. म्हणून त्याना दूर सरू नका. लायक किंवा नालायक यावरून तर ठरवणार? आपल्याला स्वातंत्र्य मिळवायचं होतं. इंग्रजांना घालवण हा फक्त त्यातला एक भाग होता. ते गेले म्हणजे स्वातंत्र्य मिळालं असं थोडीच आहे! आत्ता साथ सोडाल या संग्रामाची तर ६० वर्षानंतरही स्वातंत्र्य मिळालं असं वाटायचं नाही!
"

कर्नल जोगळेकारांबरोबर एक आजोबा भेटले. ते स्वातंत्र्य सेनानी होते. अनायासे भेट झाली आणि गप्पा रंगल्या. त्यांचं नाव विचारायचं राहून गेलं. पण पुन्हा भेट होईलच अशी इच्छा आहे. स्वातंत्र्य मिळालेलं बघायचंय त्यांना. त्यांना अजूनही आशा आहे.

Thursday, May 08, 2014

शहीद झालेला शहीद



७ वर्षामध्ये १७ निर्दोष लोकांना मुक्त करता करता शेवटी शहीदचाही निकाल लागला. मग काही काळ लोकांनी डोक्यावर घेतलं. नंतर परत लंबा सन्नाटा. तसं आपण सन्नाटामधेच राहणारे लोक आहोत म्हणा. आपल्याला कोणी आवाज केलेला आवडतच नाही. तशातलीच कथा. शहीदच्या उद्यापासून अस्तापर्यंतची. नंतर मग जरा ऑनलाईन बघितलं तर मग आणखी गोष्टी कळल्या. खरं खोटं आता कोणाला माहिती? पण जरा विचित्रच आहे नाही? एकूणच आपली निष्क्रियता किंवा काही ठराविक गोष्टींकडे कानाडोळा करण्याची सवय. सगळंच.

शहीद नावाचा सिनेमा पाहिला. शहीद आझमी नावाच्या माणसावर आहे तो. कोण हा माणूस असं विचारणार असाल तर खाली लिंक दिलीये.

दहशतवादी कारवायांमध्ये चुकीच्या पद्धतीने अटक झालेल्यांना सोडवण्याचा ध्यास घेतलेला एक तरुण. यानंच का घेतला असावा? कारण तोही असंच एकदा यामध्ये सापडलेला. आणि असा सापडला की सात वर्ष तुरुंगात बसावं लागलं! सात वर्ष! सात वर्ष म्हणजे आपण निवडणुकीबद्दल ओरडत आपापली देशभक्ती मिरवतोय त्या पेक्षा वीसपट मोठा कालावधी किंवा त्याहूनही जास्त. हा माणूस वकील बनतो. प्रचलीत गोष्टींशी जमत नाही म्हणून आपलीच practice सुरू करतो. सगळं पणाला लाऊन लढतो. कोणासाठी? जे हताश होऊन तुरुंगामध्ये बसलेत त्यांच्यासाठी. ज्यांना माहितीच नाहीये की बाबा आम्ही काय चूक केली! त्यांच्यासाठी. परत कोणाला "बाइज्जत बरी किया" ऐकण्यासाठी ६-७ वर्षं तुरुंगात राहावे लागू नये यासाठी. यामध्ये तयार झालेले शत्रू, न मिळालेलं सहकार्य पण तरीही गाठलेली उंची या सगळ्यांबद्दलचा सिनेमा.

दहशतवादी म्हणून लेबल लावायला आपण सगळे उत्सुक असतोच. चटकन निकाल लावून टाकायचा आपल्या बाजूनं म्हणेज संपला विषय! या अशा चुकीचं लेबल लागलेल्या लोकांना सोडवण्यासाठी शहीद लढला. पण त्याला थोडीफार जी फेम मिळाली ती त्याच्या हत्येनंतर.

उदो उदो व्हायला कोणीतरी मारायला का लागतं हे एक गूढ आहे! म्हणजे जिवंत असताना छळ छळ छळा. आपली अक्कल आणि लायकी नसताना काहीही आणि कसेही वागवा. Opinions are like assholes anyway. Everyone has one. मग आपापलं एक एक मिरवत फिरा. समोर गांधी आणि टिळक जरी आले असते तरी आम्ही त्यानाही आमची मतं ऐकवली असतीच. तीही कट्टरतेने! सखोल वगैरे विचार करणं किंवा ऐकून घेणं किंवा थोडा प्रयत्न करून खरं ते शोधणं हे नाहीच भावत आपल्याला! फेसबुकवर कुठेतरी वाचलेलंही पुरतं की आपल्याला. चांगलं काहीतरी करायला गेलं की त्यानं ११० टक्के चोख असावं ही का अपेक्षा? आणि तो १०० टक्के कसा नाहीये हे दाखवण्यासाठी किती ती चढाओढ! भले ९९ का असेना. पण मग ब्रेकिंग न्यूज अशी असेल की शेवटी १०० टक्के नाहीच न! काय सुख मिळत असेल हे दाखवण्यात आणि बघण्यात. म्हणजे मी नागडा आहेच पण तो ही काही अखंड कपडे घालून नाहीचे!!

आणि माणूस मेल्यावर असं काय घडत असावं की लगेच महानता प्राप्त होते? काहीतरी चांगला साक्षात्कार व्हायला किंवा कोणाचा चांगुलपणा, ग्रेट वगैरे असणं कळण्यासाठी कोणीतरी धारातीर्थी का पडावं लागतं आपल्याला? मला असं वाटतं की कदाचित आपल्याला हा साक्षात्कारही होत नसावाच. आता पडलाच आहे धारातीर्थी तर आमच्याकडे पद्धत आहे त्यांना महान करण्याची. मग करा महान! म्हणजे हे ही तितकंच निरर्थक नाही का? म्हणजे त्याला नावं ठेवतानाही आमच्याकडे पुरेशी माहिती नव्हती. म्हणजे बहुदा नसतेच ती आमच्याकडे. मग मृत्यूनंतरही माहिती मिळवणे आवश्यक नसतच. चार लोक महान करतात, चला आपणही करू. माणूस माकडाची प्रगत आवृत्ती आहे यावर माझा विश्वास नाही. मेंढराची प्रगत (?) आवृत्ती असावा माणूस.

शेवटी सगळीच चिडचिड. उगाच आग ओकतोय. स्वतःच्या निष्क्रियतेवर आलेला राग असावा. तसं म्हणाल तर शहीद बद्दल वाईट का वाटावं? सात वर्षात त्यानं १४ लोकांना आणि त्यांच्या कुटुंबाना जे काही दिलं ते किती लोकांना उभ्या आयुष्यात कोणालातरी देता येतं? कोणाचं आयुष्य जास्ती उजवं?

आपली ही सवय खूप घातक वाटते मला. थोडं अंतर्मुख व्हावं आपण अशी खूप गरज वाटते. आजही कोणीतरी असेल आजूबाजूला. प्रामाणिक हेतूनं काहीतरी करायचा प्रयत्न करत असेल. आपण त्याचं अपयश जास्ती बारीक लक्ष देऊन बघतोय की त्याच्यामध्ये असलेल्या चुकांचा जीवाच्या आकांतानं शोध घेतोय की चक्क पूर्णपणे कानाडोळा करतोय? फक्त हेतू चांगला असणं आपल्याला पुरातय की आपण चार हात लांब राहून ११०% ची मागणी करतोय? सामोराच्यात उणीवा असतील तर त्या आपण कशा भरून काढू, असा विचार करतोय की चला हा पण आपल्यासारखाच incomplete आहे यात सुख मानतोय? आता हे आपापलं गणित. यात कोणाला किंवा त्याच्यामधल्या चांगल्या हेतूला शहीद करवत नाही न हे जेव्हा बघणं जमेल तेव्हा खरं नाहीतर सगळीच Black Comedy! 
Hope we stand up for the right causes. Hope we take efforts to be open and to find out truth. Hope we are proactive when we do that.
शहीद बद्दल ... http://en.wikipedia.org/wiki/Shahid_Azmi

Sunday, April 20, 2014

प्रियकर, प्रेयसी आणि प्रेम!

परवा कसला सही दिसत होता यार चंद्र! पूर्ण चंद्र ग्रहण होतं. बघितलं? लाल लाल बुंद झालेला. नासानं लाइव दाखवलं पण होतं. किती दुर्मिळ योग! भारतामधून नाही दिसला याचं एक दुःख राहीलच. हे सगळं दिवसभर बघून, वाचून, संध्याकाळी टेरेसवर कॉफी घेऊन गेलो. तिथे लाल बुंद चंद्र दिसला. अहाहा. म्हणजे असा किती वेळा दिसतो सांगा न? म्हणजे चंद्राचे इतके बारकावे नुसत्याच डोळ्यानं दिसत होते. दुर्बीण वगैरे असती तर आणि काय काय झालं असतं. एक टक बघत राहिलं त्याच्याकडे तर 3D असल्यासारखा पण दिसत होता. तसा एरवीपण दिसतोच पण तेव्हा जरा जास्तीच. काय काय लिहावं या घटने बद्दल ते कमीच. प्रभावित होऊन मी बघत होतो आणि मागून मित्र आला.

"काय छान दिसतोय .. नाही?"
"अगदीच रे"
"एकदम हम दिल दे चुके सनम आठवला!"
मी गप्प.
"अगदी चांद छुपा बदलमे ... शर्माके मेरी जाना ..."

इतकं out of context कोणी येऊन का असं डिस्टर्ब करावं? देव झोपलेला आहे हेच खरं! नाहीतर देवाला तरी हे असं कसं बघवत असेल? आणि चंद्र शर्मा बिर्माके कुठे छुपातोय? म्हणजे हे सुचतंच कसं? अरे समोर बघ मित्रा! कसा लाल बुंद झालाय. ब्लड मून म्हणत होते दिवस भर सगळे याला. काहीतरी वाचावं की! की दिसला चंद्र की लगेच शर्माके बादल के पीछेच घुसवायचा? हे असले प्रकार करत असावेत जग भर, म्हणूनच लाल बुंद झाला असावा चंद्र. सांगत असेल की अरे बाबानो, थोडी तरी इज्जत करा!

"नाही रे. ते नाहीये आठवत मला." आपला मूक निषेध नोंदवायचा माफक प्रयत्न केला. दिवसभर जे वाचलं ते आठवायचं सुरु होतं. पण हा माणूस ऐकायला तयार नव्हता.
"हं. सपने न मग? चंदा रे, चंदा रे. कभी तो जमीपे आ ... काय गाणं आहे राव हे! आज खासच आहे चंद्र! एकदम romantic! Candle light dinner आणि बाजूला wine चे ग्लास! अहाहा"

बेवडा साला. झिंगूनच असलं असंबंद्ध बोलू शकतात लोक. जमिनीवर कशाला आणतात बाबा चंद्राला. आणि हे असलं म्हणून पोरी कशा काय पटतात यांना? अचाट आहे यार!! मला वाटतं न, या अशा माजलेल्या प्रेमप्रेमी लोकांमुळे एके दिवशी आकाशातून चंद्रच गायब होईल. त्यानं तरी कितीकाळ सहन करावं न? Identity Crisis किती बघा न! पृथ्वीच्या काळजाचा तुकडा बिचारा. पण त्यातही काही शास्त्रज्ञाना प्रोब्लेम आहे. म्हणजे जन्मापासून बिचाऱ्याला त्रास. हा आला कुठून? आतला माणूस आहे की परप्रांतीय? इथून सुरुवात. आता इतकी वर्षं मुकाट्यानं फेरे मारतोय न पृथ्वीचे, मग कुळ कायद्यानं घ्या की त्याला आत. द्या त्याला हक्क. पण हे असले गहन प्रश्न सोडून, लोकांनी याला कुठेही कसाही वापरायला सुरु केलंय! प्रेमाच्या नावानं काहीही करायचं लायसन्स असतंच की. (आता स्पायडर म्यान ला पण नाचवला यांनी प्रेमाच्या नावानं तर बाकीच्यांची काय कथा? पण त्याच्याबद्दल परत कधीतरी!) प्रियकराची प्रेयसी लांब गेली की चंद्र, जवळ असली की तरीही चंद्र. तिच्या चेहऱ्यात चंद्र, चंद्रात ती. चंद्राचा ओवरयुज करून शेवटी लग्न झालं की मग मधुचंद्र! चंद्राच्या कोरीमध्ये आणि शंभर गोष्टी दिसायच्या! चंद्रा बरोबर चांदनी असते, कधी चंदानिया असते. या त्याच्या बहिणी की त्याच्या बायका? हे ही एक न उकललेलं कोडं आहे. बायका असतील तर कृष्णाला सोलिड स्पर्धाच की! एकूण काय तर आपण सोडतच नाहीत चंद्राला. या सगळ्यात त्याचा काहीही संबंधही नाही. त्याला कळतच नसेल की का बाबा मला गोवताय या सगळ्यात?

आता त्या बिचाऱ्याला आपली मतं मांडता येत नाहीत. पण मूक प्राणी वगैरेंवर दया बिया आपण करतच नाही तसंही न? प्रेयसीच्या चेहऱ्यात चंद्र वगैरे दिसणं हा अपमान नाही वाटत समस्त प्रेयासीना? चंद्रावर इतक्या काय प्रेमकविता खपाव्यात? म्हणून Woman Empowerment गरजेची आहे. कॉंग्रेसला कळलंय ते बरोब्बर. (इलेक्शन आहे म्हणून काहीतरी उगाचच आपलं पोलिटिक्स बद्दल! मनावर घेऊ नका नाहीतर तुम्हाला चंद्राची शपथ आहे!). मुलीनी परखड उत्तर दिलं पाहिजे. ही काळाची गरज आहे. एकतर सुरुवार सणसणीत थप्पड मारून झाली पाहिजे. "चंद्रामधलं काय बघून तुला मी आठवले रे? इतके डाग त्याच्यावर. ते डाग म्हणजे मुळात खड्डे आहेत मोठे मोठे! एक lifeless मोठा खडक चंद्र!! तो बघून तुला मी आठवूच कशी शकते?" हा प्रश्न मुलीनी विचारला तरच काहीतरी होऊ शकेल. चंद्राच्या नावावर ही जी काही अंदाधुंदी सुरुये, ती थांबलीच पाहिजे.

तशा मुलीही कमी कुठायत? चंद्राची साक्ष बिक्ष काय काढता अरे!! आपल्या प्रेमाला चंद्र कसा काय साक्षीदार असू शकतो? उद्या कोणाला पुरावा हवा असेल तर चंद्रावर जाऊन शोधा! ती एक लक्ष्य मध्ये प्रीती झिंटा म्हणाली ब्वा की मला चंद बिंद्र म्हणू नको नाहीतर मार खाशील. पण ते हिरोला झेपत नाही आणि तो थेट सैन्यातच भरती होतो! आता हे संस्कार केल्यावर कसं व्हायचं? कोण मुलगी धाडस करेल मग?

पूर्वीच्या काळी, चंद्रावर संशोधन करणाऱ्याना म्हणे खूप विरोध असायचा. म्हणायचे, देव आहेत ते. त्यांना त्या लेवल वरून खाली नका आणू. मला वाटतंय की त्यांना म्हणायचं असेल की चंद्राला त्या लेवलवरून खाली आणू नका, लोकांना झेपणार नाही! देव नाही आहेत ते म्हणालात तर लोक उभी आडवी केस घेतील! त्या लोकांना नक्की भविष्य दिसलं असणार. अतिपरिचयात अवज्ञा! म्हणून नको म्हणत असतील.

असो. शेवटी, मी कॉफी संपवली, आता काम आहे, म्हणून टेरेस वरून कटलो. तो मित्रही कटला. म्हणजे त्याचा काहीही इंटरेस्ट नव्हताच त्या चंद्रात. जणू काही, माझी तपश्चर्या भंग करायला पाठवलेला त्याला! सेक्स रेशो कमी होत चाललाय. देवालाही मेनका भेटली नसेल म्हणून याला पाठवला असणार. काय करणार? आपलं नशीबच असं! कसं आयुष्य काढतोय माझं मला माहिती! खरं सांगतोय. चंद्र साक्षीदार आहे!

Tuesday, April 15, 2014

A Happy Birthday

While the Birthday wishes have started coming in already. I thought of being shameless and start asking for gifts! 

So here is the request. A long one, but a good one.

I have been working on the project "The GoodBook" for a few months now (You may like the FB page for more details :)). Plan is to post the good stories. We already have a bunch and finishing a few more soon. We will start posting once we have a handful of stories ready. We are almost there. But here is to get there faster. 

This birthday, on this 16th April, share a good story with me as a gift. It will help the project. It may be something good that you are doing, or your friend is doing, or someone at some corner of the world, you know, is doing. It may be one paragraph, one page or even a picture. Just share a good deed that is happening around you or that you know.

I have been doing it lately, and it's quite an experience so far. It's all about finding and interacting with some wonderful people around us who are doing good work, and then writing about it. Suddenly, this process started unveiling so many good things that are happening around us every day. It's a great feeling nonetheless. I am sure you would have good time also looking for the good ones and sharing those. I am deliberately not sharing any sample. Let it be open. Any story or event or deed that made you feel good is welcome. Basically, all types of gifts are welcome.

Thank you so much in advance.

A goodness volunteer.
goodnessfreaks@gmail.com (Share your stories on this email address)


PS (1): Feel free to share it with your friends. I won't mind anonymous gifts.
PS (2): Btw, please vote.

Saturday, March 15, 2014

Are we hating a lot lately?

मला न माझं मत मांडायचंय. आता मत मांडायचं म्हणजे काहीतरी पोट तीडकीनं न आवडायला पाहिजे! त्याशिवाय कसं मत मांडणार? मग आता मला आजू बाजूला बघायचंय आणि शोधायचंय की what can I hate! आणि ते कळलं की मग मी ते मत प्रखरतेने मांडायचंय. माझ्यामधला जागृत सुजाण नागरिक जागा करणार. पुढचं सोपं असतं. आपण असं केलं पुढच्याला खो मिळतो. तोही तेच करतो. काहीतरी solid हेट करत बसायचं. विषय असतात की खूप. त्याला कुठं तोटा आहे? आणि आपण तयार करू शकत नाही असं थोडीच आहे? किसका फाट्या, किसका तुट्या?

ज्या हिरीरीनं लोकं केजरीवाल विरोधी लिहितात, मोदीविरोधी लिहितात, सत्यमेव जयते विरोधी लिहितात, किंवा अगदीच मागे जाऊन, गांधी आणि नेहरू विरोधी लिहितात, त्या सगळ्याचच नवल करावं तितकं थोडं आहे!

हल्ली हे मला दररोज आठवतं. टीम मिन्चीन नव्हता का म्हणाला

... And I see it all the time online, people whose idea of being part of a subculture is to hate Coldplay or football or feminists or the Liberal Party. We have tendency to define ourselves in opposition to stuff

दुर्दैवी आहे पण कदाचित खरं आहे. आपण खरच करतोय न असं? स्वतःचं अस्तित्व दाखवून देण्यासाठी आपल्याला कशाचा तरी तिरस्कार करायची का गरज लागावी? एखाद्याला शिक्षा द्यायला, दोषी ठरवायला, आपण इतके का आतुर कसे झालोत? "Share it with your friends if you are a true Indian" हे एवढंच पुरतं आपल्याला? आणि मग आपण आपल्या कोर्टात निकाल लावून टाकतो. प्रत्येकाला ज्या रेटने दोषी ठरवतोय आपण, त्याची भीती कशी वाटत नाहीये, याचं नवल वाटतंय मला. चांगलं करणाऱ्यान, १०० नाही १०१ टक्के चोख असलंच पाहिजे हा तर आपला खूप जुना नियम आहे. आणि १०१ टक्के चोख नसेल तर जी काही चांगुलकी असेल ती त्यानं गुंडाळून ठेवावी कारण मग आम्ही आमच्या चहा नाष्ट्याबरोबर त्याचे लचके तोडत बसणार.

इतकं काही, इतक्या कोणा कोणाबद्दल बोलतो यार आपण. तेही बिनदिक्कत! आपली मतं. आपले शब्द. आपल्यासाठीच बोथट नाही का बनलेत? कशाचच काही वाटत नाही. आणि हे सगळेच करतो आपण, एका मागो मग एक. एकामागून एक अनुकरणच करत बसायचं असेल तर देवानं आपल्याला माणूस का बनवलं असावं? विचाराच्या केवळ चकल्याच पडायच्या असतील, तर विचार करण्याची कुवत आपल्याला का दिली असेल?

आपल्या पुढच्या पिढीसाठी आपण hope तयार करतोय का? आजू बाजूच्या चांगल्या गोष्टी हुडकून त्यांना उचलून धरायचं शिकवतोय का?

मला चांगल्या गोष्टींबद्दल लिहायचंय. बोलायचंय. मला चांगल्या गोष्टी शोधायला शिकायचंय आणि मला जमलं तर बाकीच्यानाही शिकवायचंय.

आज होळी आहे. बघू या आपल्यातल्या बुऱ्या गोष्टीना कडी लावता येते का?

Happy Holi.

Tuesday, February 18, 2014

अजनबी

अनोळखी शहरामध्ये आपुलकी सापडायची तिला. नवी नाती. नवी माणसं. कुठलाही पूर्वग्रह नाही. कुठलीही अपेक्षा नाही. उडत उडत आपोआप ती सर्वात उंच इमारतीच्या छतावर जाऊन पोहोचायची. टेकडी असेल, कधी कोणा अपार्टमेंटच्या टेरेस असेल, कधी कोणा restaurant मध्ये असेल. असं ठिकाण की जिथून अख्ख्या शहराचा आराखडा दिसावा. ते ठिकाण तिचं हक्काचं असायचं. नव्या शहराला लग्गेच आपलसं करायचा हा तिचा सर्वात आवडीचा मार्ग. तासंतास अशा ठिकाणी बसून राहायला तिला आवडे. "इथलं काहीच माहिती नाही" पासून, ते "यहासे दूर जहातक नजर जा रही है, वो सब मेरा इलाका है" असं फिलिंग येईपर्यंत. शहरांमध्ये चुकून कोणीतरी पेहचान का असलाच तरी तिला कोणीही रिसीव करायला नाही येणार, ही तिची अट असायची. कारण, बऱ्याचदा ती एक दिवस आधीच आलेली असायची. हा पहिला दिवस तिला स्वतःसाठी लागायचा. खूप उंचावरून पाण्यात उडी मारायच्या आधी, कठड्यावर काही क्षण काढतात न. तसा हा एक दिवस तिला लागायचा. यासाठी आदल्या दिवशी दुपारी किंवा रात्रीच पोहोचायची तरतूद केलेली असायची. शहर अगदीच अनोळखी असेल तर असलं काही करण्याची गरजच नाही.

रात्रीच्या काळोखात जे शहर दिसतं ते दिवसा नाही दिसू शकत अशा मताची ती. काळोखात न्हाऊन गेलेलं शहर. त्यामध्ये ती मिसळून जायची. या काळोखात समोर स्वतःचं तर प्रतिबिंब तर दिसत नाहीये न? हा प्रश्न तिला कधीच न सुटलेला? म्हणून तिनं असले प्रश्न ऑप्शनला टाकलेले. तसं असायचं काय समोर? लुकलुकणाऱ्या पिवळ्या नि लाल रंगाच्या लांबलचक ओळी. संपूर्ण शहरामधून अखंड पाळणाऱ्या. अधून मधून आपण बीझी असल्याचा चित्कार टाकणाऱ्या. कितीही उंच असली, तरी तिला ग्रीट करायला ते आवाज यायचेच. प्रत्येक शहराचा आवाजही वेगवेगळा. काही वेळा तिला ते आवाज मोठे वाटायचे. काही वेळा त्रस्त. काही वेळा निर्विकार. तर काही वेळा मौनी बाबासारखे, कळून न कळल्यासारखे. या आवाजाबरोबर त्या लाल पिवळ्या रांगांची चुळबुळ. बाजूला पांढर्‍या पिवळ्या पण अजिबात न लुकलुकणाऱ्या खिडक्या. काही पडद्या आड, काही काचे आड, काही गजा आड, तर काही सताड उघड्या. कदाचित प्रत्येक खिडकीची आपली आपली गोष्ट. तरी दुरून सगळ्या एकसारख्याच. रात्र जसजशी वाढत जाई, तसतशी ती लाल पिवळ्या ओळीनी आखलेली गडबड कमी होत जाई. खिडक्यांच्या पलीकडल्या गोष्टीना अर्धविराम मिळे. जीवाच्या आकांताने काहीतरी विकण्यासाठी अखंड जळत असलेले निर्विकार रंगीत साईन बोर्डस, हे एवढेच काय ते बाकी उरत. तिला हा सगळा बदल टिपत बसायला खूप आवडे. एखाद्या कॅनवास वरचे रंग हळू हळू निसटून, अख्खा कॅनवास आपल्यासाठी कोरा करकरीत होतोय असं तिला वाटे. आता हा कॅनवास रंगवायची संधी तिला मिळणार याचा आनंद कुठेतरी लपलेला असायचा त्यात. याच्याच कुठल्या तरी कोपर्‍यात तिची गोष्ट सुरु होणार. तिचे काही रंग तिथे सांडणार. काही रंग तिच्यावर उडणार. या अशा लघुकथांचं पुस्तक म्हणजे तिचं आयुष्य.

.............................


"मी खुश असेन, मी जे काही करेन त्यात. तुम्हाला आणखी काय हवंय?"
"असलं फालतू तत्वज्ञान नको सांगूस! चार लोक जे काय सांगतायत ते मूर्ख आहेत का?"
"चार चौघांनी केलं म्हणून करणं हे तरी कुठं हुशारीचं लक्षण आहे?"
"जगात तू एकटी हुशार! आम्हाला काही अक्कलच नाही की नाही?"
"मी जर मुलगा असते. तरीही तू मला असच अडवलं असतस?"
"हो. अगदीच अडवलं असतं! काळजी वाटणारच की तुझी!"
"मी चार चार चौघांच्या सारखं करणं तुझ्या लेखी जास्ती महत्वाचं आहे की मी खुश असणं?"
"... तुझ्या बाबांशी बोल तू!"

.............................

"तुझं कुठे काही ..."
"त्याचा काय संबंध?"
"आमचच चुकलं. तुझ्याकड लक्ष न दिल्याचा परिणाम!"
"तुमचं बारीक लक्ष होतं माझ्यावर."
"पण जग असच म्हणणार न!"
"तुम्ही जगाची फिकीर केली असती बाबा, तर मला असं वाढवलंच नसतं!"
"तुझा तो एक मित्र होता न ..."
"बॉंड गीरी करू नका."
"तो नसतो आज काल तुझ्या बरोबर."
"तुमचे ते एक टक्कल पडलेले, जाड काळा चष्मा घालणारे उंच मित्र होते. ते आज काल नसतात तुमच्या बरोबर!"
"या गोष्टी सारख्या नाहीयेत! उगाच अक्कल दाखवू नको! चार माणसं सांगतात म्हणून मुद्दाम हट्टानं उलट करायला बघातेयास तू!"
"मला सांगा मग, हे जे तुम्ही आणि आई ने, चार चौघांसारखे, चार चौघांसारखे वगैरे जे सुरु केलाय, तसं केलं की मगच माणूस खुश होतो. याची शाश्वती काय?"
"आम्ही खुश नाहीये का? आम्ही चार चौघांसाराखेच केले न? काय वाईट आहे त्यात?"
"इतका घाम गळून, इतकं शिकून, इतके कष्ट करून जर जीवाच्या आकांताने चार चौघांसाराखेच करायचे असेल तर मग काय मजा? तुम्हालाही तुम्ही काय म्हणताय ते पटत नाहीये बाबा! मान्य करा!"
"... तुझ्या आईशी बोल तू!"

............................

प्रत्येक शहरातली तिची माणसं वेगळी. त्यांच्याबरोबरच्या गोष्टी वेगळ्या. त्या सगळ्यांची ती आवडती. भिरभिरणाऱ्या फुलपाखरासारखी. जितक्या लवकर नव्या शहरामध्ये मिसळायची, तितक्याच लवकर त्यातून अलिप्त होऊन पुढेही निघून जायची. अशा या नव्या शहरांना मिठी मारण्यासाठी तिला अशा उंच जागांची गरज लागायची,

"Madam. It's closing time."

मंद वाऱ्यात उडणारे तिचे केस खूप लांबूनच लक्ष वेधून घ्यायचे. तेच थोडे बाजूला सारून, मग ती म्हणायची, "अरे यार ... आणि थोडा वेळ बसू दे न!!" समोरच्याची भाषा कुठलीही असली, तरी त्याला हे कळून जायचं. नाही कळलं तरी, तिच्या चेहऱ्याकडं बघून तिला नाही कोणीच म्हणायचं नाही! अतरंगी जागा शोधून काढायची ती, म्हणून बऱ्याचदा security guards च तिला हाकायला यायचे!

"Just a few more minutes Madam. We got to close it now!" किंवा "We don't allow anyone here" असलच काहीतरी म्हणायचे. पण तिला नाही म्हणणं त्यांच्या जीवावर यायचं! काही लोकांना हे वरदान असतं. तिलाही ते होतं!

"Thank you so much friend!" आणि अनोळखी शहरात तिनं हा पहिला मित्र बनवलेला असायचा.

Thursday, February 13, 2014

Happy Valentine's Day!

मी एक जाहिरात बघितली. कशाची होती आठवत नाही पण एक छान दृश्य होतं. त्यात एक छोटं कुत्र्याचं पिल्लू आणि एक घोडा मित्र असतात. त्यांचा मालक ते पिल्लू विकून टाकतो. तर सगळे घोडे मिळून त्याला घेऊन जाणारी गाडी अडवतात. आणि मग ते पिल्लू परत येतं. आणि मग धावत धावत जाऊन मालकाला प्रेमानं मिठी मारतं! 

हेच जर माणसाचं असतं तर असं जे झालं ते सगळं विसरून मिठी मारायला जमलं असतं?

न वापरल्यामुळे खूप प्रमाणात उरलेली, देवानं दिलेली, विचार करायची क्षमता वापरून, आपण गोष्टी सोप्या करतो की क्लिष्ट करतो हा संशोधनाचा विषय वाटतो मला. विसरून जाणं ही कला जर जमली तर आई शप्पथ, किती गोष्टी निकालात निघतील! आजसे बीस साल पेहले जो थप्पड लगायी थी, उसकी गुंज आज तक कशाला आठवायला हवी?

खूप ओसरती पहिली जाहिरात ती पण छान वाटलं बघून. ते प्रेम बघून.

लहान मुलांचं नसतं? तुम्ही काहीही म्हणालात, किंवा केलात तरी नंतर येऊन चिकटायची ती चिकटतात. समोरच्याचं आपल्यावर केवळ प्रेमच असू शकतं. यावर गाढ विश्वास असतो त्यांचा. ते पुरतं त्यांना. आता आपण सगळेच कधी न कधी तरी लहान होतोच की! आता कुठल्याशा त्या क्षणाला आपण हे सगळं टाकून दिलं देव जाणे? 

असं तर होत नाहीये, की आपण कोणा कोणावर का का प्रेम नाही करायचं, याचीच मोठी यादी करतोय? की एखादं जरी चांगलं कारण असलं तरी तेही पुरतं आपल्याला प्रेम करायला? अप्रिय गोष्टी विसरायला?

आपल्या आजूबाजूच्या व्यक्ती आणि त्यांच्या कृती या सगळ्यांच्या केवळ चांगल्या आणि चांगल्याच गोष्टी मनात ठेवणं आणि बाकी सगळ्याला फाटा देणं असा असू शकेल यंदाचा Valentine's Day?

आजूबाजूच्या प्रत्येकावर प्रेम करण्याचं, आजूबाजूची प्रत्येक गोष्ट आवडण्याचं, एक तरी कारण शोधणं असा असू शकेल यंदाचा Valentine's Day?

गुलाबांच्या पाकळ्यांच्या पलीकडे, अंधुक मिणमिणत्या मेणबत्त्यांच्या पलीकडे, कागदावरच्या छापील भावनांच्या पलीकडे, केवळ दोन व्यक्तींमध्ये अडकून न पडलेलं प्रेम शोधणं, असा असू शकेल यंदाचा Valentine's Day?

टाळलेला मोह ...!

|| श्री Valentineराव प्रसन्न ||



कॉलेज संपलं. पोरगी जवळपास पटलीच होती. सासराही खिशात होता. रांचोचा पूर्ण मामला सेट होता. पण ते सगळं सोडून पठ्ठ्या कितीतरी वर्षं अज्ञातवासात गेला! पुढे मग त्याला शेवटी पिया येऊन मिळते आणि उनकी नाक नही टकराती वगैरे बाकीचा तपशील सोडा. पण विचार करा या कॉलेज संपल्यापासून ते थेट ते परत भेटेपर्यंतचा भाग दाखवण्याचा मोह टाळणे किती कठीण काम आहे? तुम्ही केलाच नाही न विचार? कारण डायरेक्ट ते दोघे एकमेकांना मिळाले हेच पहिला तुम्ही! मला हा विचार आला. आणि धडकी भरली. मग राजू हिरानीचे आणखी आभार मानले मी. 3-idiots आणखी जास्ती आवडला! लौव ष्टोरीचा मोह टाळला आणि मग भले झाले असली उदाहरणं आपल्याला तशीही विशेष आवडतात! नाही पटत अजून? आता बघा काय काय होऊ शकलं असतं!

थोडा विचार करा!

सगळा मामला सेट असताना रांचो कॉलेज मधून गायब. पियाला पण पत्ता नाही. फरहान आणि राजू पण भांबावलेले. आता पिया आहे भरणार! मेरा प्यार खो गया वगैरे म्हणणार. मग कब तक कुवारी रहोगी म्हणून विरू सहस्रबुद्धे तिला मार्गी लावायची प्रयत्न सुरु करणार. तिकडे रांचोला ही परफेक्ट वेळ आहे हे कळणार! अशाच वेळी विकतची दुखणी आणि तत्वं घ्यायची असतात न! सगळं सुरळीत वगैरे करेल तर मजा काय! मग लगेच रांचो तत्वांशी प्रामाणिक होणार. मिया बीबी राजी वगैरे म्हणून हळूच पियाला संपर्क साधून सच सच सांगून, आपण प्यार पा लिया वगैरे ... आज्जीबात नाही करणार! झूठका सहारा लिया असं पिया म्हणेल म्हणून नाही. पिया म्हणालीही असती की झूठ वगैरे गेलं तेल लावत. तुला मी आवडते मला तू आवडतो. मग कशाला दंगा? पण मग वेळेचं महत्व कसं कळणार न? (मै समय हु. म्हणून लहानपणी आपल्या जनरेशनच्या मनावर वेळेचं महत्व बिंबवलय की नाही?) म्हणून तो तसलं काही आज्जीबात करणार नाही. तर तो पियाला आपल्या दिलमध्ये ठेवून, आपल्या आयुष्याच्या एकमेव ध्येयाकडे जाणार. सायन्स! आता मग त्याला दररोज प्रत्येक टेस्ट ट्यूब मध्ये, प्रत्येक उपकरणामध्ये पिया दिसणार. एकटा नदीकाठी बसून सोनू निगम किंवा थेट आतिफ असलमला गाणी म्हणायला लावणार! त्याच्या सायन्स सेंटरला भेट द्यायला एखादे कपल आले की हा कपाळावर हात मारणार. कारण याला तो आणि पिया आठवणार. कोणी लग्नात आमंत्रण दिलं की याला पिया पहिल्यांदा भेटलेली ते आठवणार. अहाहा. या केवळ सुंदर आठवणी आहेत. याने मला काहीही फरक पडत नाही. हे तो स्वतःला समजावणार आणि प्रेक्षकांना रडवणार.

तिकडे पिया पण अस्ताव्यस्त. आता रांचो गेला. पण काहीतरी केलेच पाहिजे की. मग ती आधी मापात काढलेल्या जुन्या हिरोला पकडणार. तो चप्पल घड्याळांच्या किमती सांगणार. (विसरला? होता की तो एक ... मेरी घडी भी वोही समय दिखती है ... ज्याला म्हणालेला तो) तिला त्याच्या घड्याळ आणि चपलात रांचो दिसणार! पण ती तरीही स्वतःला समजावणार. की अरे हे असेच व्हायचे होते. रांचोची इच्छा हीच होती. नाहीतर थांबला असता न! मग ती स्वतःला या price tag वाल्या माणसाच्या प्रेमात पाडणार. त्यालाही आपल्या प्रेमात पडणार. रांचोच्या आठवणी तर केवळ अशाच! मंद वाऱ्याची झुळूक. गेलेला चांगला वेळ. एक स्वप्न. किंवा असच काहीतरी होतं. या अर्थच श्रेया घोशाल कडून गाणं म्हणवून घेणार.

आता अचानक सगळं सेट झालेलं असताना. मधेच रंचो उपटला तर मग तिच्या मनातली द्विधा दाखवणं हे किती बेष्ट! आहाहा! मग जरा गिल्ट वगैरे. आता तर मी इतके सारे घडवून आणले. आता मीच कशी माघारी फिरू? हा प्रश्न! सदा सुहागन राहो म्हणून तिच्या होणाऱ्या सासऱ्यांनी दिलेला आशीर्वाद तिच्या कानात घुमणार! तसा तिनं स्वतःला सुद्धा या price tag वाल्याच्या प्रेमात पडलयच की! आता आला पहिला हिरो म्हणून अशी कशी टाकेल याला? साजन मध्ये माधुरी नाही म्हणत? मला पण वोटिंगचा हक्क मिळाला पाहिजे! तुम्ही दोघेच का ठरवणार? तसं!

तुम्हाला काय वाटलं की एक फोन आला नी लगेच पिया गेली रांचोकडे? किती काय काय होऊ शकलं असतं!

झालंच तर आणखीही शक्यता आहेतच की. मैने "रांचो"को मनसे अपना पती मान लिया है असं म्हणून पिया काही वर्षं जावेद जाफरी बरोबर पण संसार थाटू शकेल. बघा, वाईट डील नाहीये. श्रीमंत आहे. छान ठिकाणी राहतो. बाप पण मेलाय त्याचा. किंवा वांगडू आडनाव आपल्यामध्ये कसं चालेल म्हणून विरू सहस्रबुद्धे नवीन प्रॉब्लेम तयार करू शकतील! किंवा खास वैचारिक लोकांसाठी, असंही होऊ शकेल. पिया आणि रंचो भेटले. मग ते चर्चा करतील. मुझे अब लौट जाना होगा. ये सही नही है. जमाना हमे जिने नाही देगा. हम अमुक अमुक को क्या मुह दिखायेंगे? असले प्रश्न पडूच शकतात की. तशी मी परवा एक फिल्म पहिली. त्यात एका बहिणीबरोबर लग्न होत असताना शेवटी हिरो म्हणतो अरे थांबा. नेम चुकला. मला त्या दुसरी बरोबर लग्न करायचंय. मग त्यांना असले अमुक अमुक को कैसा मुह दिखायेंगे वगैरे प्रश्न नाही पडत. सुरळीत होतं सगळं. पण असो. तो पण एक टाळलेला मोह असावा! 

विचार करा. काहीही होऊ शकलं असतं!
हे सगळं डोळ्यासमोर आलं आणि मग 3-idiots किती पटीमध्ये जास्ती आवडला काय सांगू? राजू हिरानीला धन्यवाद! किंवा त्या सगळ्यांनाच धन्यवाद! ऐसेहीच taken for granted नही लो!

या valentine's day ला अशा साऱ्या टाळलेल्या लौव ष्टोरीना सलाम! Let's thank them all for not existing and making our life beautiful! 

Happy Valentine's Day!

आपला आनंद द्विगुणीत करण्यासाठी आपल्या आणखी प्रेमी मित्र मैत्रीणीना शेअर करालच अशी अपेक्षा. कळावे. लोभ असावा.
(या शेअर करण्याच्या आणि करवण्याच्या सवयीबद्दल कधीतरी खास लिहायला आवडेल! ... पुढच्या वेळी!)

Sunday, January 19, 2014

I love, we love, you love, you love, he, she, it loves, they love

One in love, one in shell
One is lost so the other in hell
More or less, it's all the same
Like it hate it, we're all lame

It's social, it's public
Yet very specific
Love stories are in abundance
You make it or fake it

It's there, it's not there
It's confused, and a chaotic fare
There's more glare
Than what's actually in there

You connect, you share
You talk, you dare
If you see the roads clear
Why do you take the twist dear?

Dramatic, pathetic, symbolic, alcoholic
Eventually it is never realistic
One in love, one in shell
One is lost so the other in hell


I love the louv! Because it's so funny!

Sunday, January 12, 2014

हट्टाने हुतात्मा!



प्रत्येकाची आपापली अशी खूप पेशल नि युनिक़ ष्टोरी असतेच की. अगदी, प्रत्येक टपरीवर जसा अगदी एक सारखाच पेशल चाय मिळतो. तसा. तशी आपण एक पेशल वाली आणि एकदम युनिक लाव ष्टोरी लिहिली पाहिजे राव. लव ष्टोरी नाही लिहिली तर मग काय लिहिला! तसं लव ष्टोरीला काय काय लागतं? एक नायक? एक नायिका? नाही. आपण आधुनिक ष्टोरी लिहिणार! त्याला खूप सारे लोक लागतात. तेही असे की ज्यातला खरा नायक कोण होता आणि खरी नायिका कोण होती याचाच पत्ता नाही लागला पाहिजे! (म्हणालो नव्हतो एकदम पेशल वाली युनिक स्टोरी असणारे!).

पहिला मुलगा घ्यायचा. पहिली मुलगी घ्यायची. याचं तिच्यावर प्रेम. तिचं याच्यावर प्रेम. तुम्हाला काय वाटलं? हा शेवट आहे? नाही. ही सुरुवात आहे. यांचा टाईम एक्सिस बदलायचा. म्हणजे तिचं याच्यावर प्रेम, तेव्हा याचं तिच्यावर प्रेम नाही. याचं तिच्यावर प्रेम तेव्हा तिचं याच्यावर प्रेम नाही! अहाहा. आता जमतंय. मग आणखी लोक आणायचे. प्रत्येकाला रोजगार मिळालाच पाहिजे की. जेव्हा पहिल्या मुलाचं पहिल्या मुलीवर प्रेम नाहीये, तेव्हा याच्यावर प्रेम करणारी दुसरी मुलगी आणायची. जेव्हा पहिल्या मुलाचं पहिल्या मुलावर प्रेम नाहीये तेव्हा कोणावर तरी असलं पाहिजे की म्हणून दुसरा मुलगा आणायचा. आता कसं सगळं भरल्या भरल्या सारखं वाटतंय.

पहिला मुलगा, पहिली मुलगी, दुसरा मुलगा, दुसरी मुलगी. ही आपली पात्रं. आता हे हलवलेले टाईम एक्सिस जोडायचे. इंटर्वलच्या आधी तिचे याच्यावर प्रेम. इंटर्वलच्या नंतर याचे तिच्यावर प्रेम. तेच तेच सीन रिपीट मारायचे. फक्त याच्या ऐवजी तिला टाकायचं आणि तिच्या ऐवजी याला टाकायचं. सारांश असा की दोनही मुलांचे पहिल्या मुलीवर प्रेम. आणि दोनही मुलींचे पहिल्या मुलावर प्रेम. आता हे बघून तुम्हाला बुलीअन एक्वेशन आठवली असतील तर तुम्ही खरे इंजिनिअर! फक्त आपली ष्टोरी पेशल करायचीये न म्हणून टाईम एक्सिस हलवलाय आपण. तर या सगळ्याच्या इंटरसेक्शन मध्ये पहिला मुलगा नी पहिली मुलगी एकत्र येणार असं वाटत असेल तर फसलात राव तुम्ही. मग ष्टोरी सुरूच कशाला केली असती? आता परम्युटेशन कोम्बीनेशन लावायची. कथा सशक्त झाली पाहिजे न?

पहिल्या मुलाला पहिली मुलगी आवडायला लागली तेव्हा त्याच्यावर दुसऱ्या मुलीचं प्रेम होतं. मग तिला थोडा वेळ तटस्थ ठेवायचं. पहिल्या मुलाला उपरती आली की मग घर बार सब कुछ सोडून पहिल्या मुलीच्या मागे पाठवायचं. पहिल्या मुलीला टायटनची जाहीरात करवायची. म्हणजे तिने सांगायचे की टाईम बघ. तेरा टायमिंग गलत हो गया! वो अलग टाईम था. ये अलग टाईम है. शाळा कॉलेजपासून सगळ्या ठिकाणी लेट पोहचत असला तरी असा दणका त्याला पहिल्यांदाच मिळालाय असा विशेष खुलासा करायचा. मग ह्युमर टाकायचा. मुलाला घड्याळाची दुकानं पालथी घालायला लावायची. तुम्हाला काय वाटलं? परत दुसऱ्या मुलीकड पाठवू आपण त्याला? मग शहाणा म्हणाल की त्याला तुम्ही? असं नाही करायचं. दुसऱ्या मुलीला तटस्थतेतून जागं करायचं. पहिल्या मुलानं अकलेचे धिंडवडे काढलेले बघून तिनं तरीही त्याला परत यायची ऑफर द्यायची. आणि मग हे इथंच सोडायचं. लोकांना कुतूहल वाटलं पाहिजे की! म्हणजे पहिला मुलगा अक्कल थोडी वापरणार की अखंड असाच गुळ काढत बसणार याचं!

तेव्हा इकडे दुसऱ्या मुलाला हळू हळू पहिल्या मुलीच्या प्रेमात पडायचं. (नीट वाचत नाही बा तुम्ही राव. मगाशी दुसऱ्या मुलाचे प्रेम आहे असं थोडीच म्हणालेलो आपण? फक्त मुलीलाच प्रेमात पडलेलं की नाही?). मग सरसकट सगळ्याचाच आवाका वाढवायचा. प्रत्येक पत्राला अधे मधे जग हिंडावंयचं. अगदीच intense इमोशन हव्या असतील तर सगळ्यांना तसंही वेगवेगळ्या भागात राहायला पाठवायचं. तात्विक प्रेम आहे असं म्हणू हवं तर. उगाच सगळे एकत्र कशाला हवेत? तसंही आपली युनिक आहे की नाही ष्टोरी? ग्लोबल विलेजचा मुद्दा मांडायचा. पहिल्या मुलाला तसंही गुळ काढत बसायला आवडतच की. त्याच्या तोंडून अधे मधे तत्वज्ञान वदवायचं. (अहो रेड्यानं देखील गीता म्हणालेलीच की!)


आता या नंतर दोन तीन पर्याय ठेवायचे शेवट करण्याचे.
प्लीज. पहिला मुलगा पहिली मुलगी नाही एकत्र येऊ शकत. कारण ष्टोरी पेशल आहे आपली. ते सोडून विचार करू. तसंही आपल्याला हे सगळं एकत्र आणताना खूप सारा त्याग आणि खूप सारं तत्वज्ञान दाखवायचंय.

एक lite version असं असू शकतं.पहिल्या मुलाने परत दुसऱ्या मुलीकडं जायचं. जैसे थे.
पहिल्या मुलीनं दुसऱ्या मुलाकडं जायचं. जैसे थे.
आपण कसे थिरथिरे नाही हे दाखवून द्यायचं.
पहिल्या मुलानं पुढे जाऊन गुळाच्या बिजिनेस मध्ये invest कारचं.
पहिल्या मुलीनं पुढे जाऊन घड्याळाच्या बिजिनेस मध्ये invest करायचं.


मग standard version असं असू शकतं.पहिल्या मुलीनं टायटनची brand ambassador व्हायचं. माघारी फिरायचंच नाही. दुसऱ्या मुलाकडं घड्याळ जरी असलं तरी ते स्लो चालतंय याच्याबद्दल काहीतरी जागतिक प्रयत्न करवून आणायचे.
पहिल्या मुलानं गुळाच्या ढेपा बनवायचा लघुद्योग सुरु करायचा - बाबाजीका ठुल्लू गुळ केंद्र!
दुसऱ्या मुलानं thanks giving ला स्वस्तात iPad मिळाल्यासारखं खुश व्हायचं आणि दुसऱ्या दिवशी नेहमीच्या कामाला लागायचं.
दुसऱ्या मुलीनं अचंभित होऊन सगळीकडं बघायचं आणि शहाण्या माणसानं यांच्या नादी लागू नये असं म्हणून शहाण्यासारखं यातून बाजूला व्हायचं.


मग premium version असं असू शकतं.पहिल्या मुलीनं टायटनची brand ambassador व्हायचं. माघारी फिरायचंच नाही. पुढे रोलेक्स घड्याळवाल्याबरोबर टायमिंग साधायचं.
दुसऱ्या मुलानं thanks giving ला स्वस्तात iPad न मिळाल्यानं फारसं नाखुश नाही व्हायचं आणि दुसऱ्या दिवशी नेहमीच्या कामाला लागायचं.
पहिल्या मुलानं गुळाच्या ढेपा बनवायचा लघुद्योग सुरु करायचा - बाबाजीका ठुल्लू गुळ केंद्र!
दुसऱ्या मुलीनं गुळ केंद्राला भेट देऊन पहिल्या मुलाला थोडी अक्कल शिकवायची. आणि शेवटी परत अचंभित होऊन शहाण्या माणसानं यांच्या नादी लागू नये असं म्हणून शहाण्यासारखं यातून बाजूला व्हायचं.


मग gold version असं असू शकतं.
एकदम गोव्यामध्ये जायचं. चौघानाही बिड्या फुकत, दारू हाणत, बीचवर हिप्पी झालेलं दाखवायचं!


मग limited version असं असू शकतं.
चौघांनी मिळून विपश्यना करायला जायचं!

Saturday, January 04, 2014

Rewind


I missed the lake today. सकाळी उठलो तेव्हा गाडी काढून लेकवर जाऊन यावं असं वाटलं. अमेरिकतल्या ज्या काही थोड्या गोष्टी मिस करतो, त्यातली ही एक. माझ्याबरोबर असलेल्या प्रत्येकाला किमान एकदा तरी मी तिकडे घेऊन गेलोच होतो. पुढच्या वेळी त्यांच्यापैकी कोणी असायचे नाही बरोबर, हा भाग वेगळा. खूपवेळा कुठल्याशा पार्ट्यांना जायचे टाळून मी एकटाच लेकवर जाऊन बसायचो. किंवा सकाळी बाकी लोक उठायच्या आत चक्कर मारून यायचो. It was always peaceful. It was always soothing. एक थकेला कॅफे होता बाजूला. तिथे चुकून कधीतरी कधीतरी काहीतरी घेतलं असेल. तिथल्या walking trails ना, बेंचेस ना, काठावरच्या बाकड्याना माझी आठवण असावी. लेकवर बहुदा एकटाच जायचो पण तरीही लेकवर एकटं नाही वाटायचं.

एखाद्या ठिकाणाशी काहीही कारण नसताना जवळीक होते, तशातली ही लेक होती. Love at first sight! लेकच्या बाजूची walk, किंवा मध्यरात्री Stanford University वर मारलेला फेरफटका, या गोष्टी माझ्या स्वतःच्या होत्या. माझ्या हक्काच्या. US वरून तुझ्यासाठी काय आणू, असं विचारलं कोणी तर मी या दोन गोष्टी नक्की सांगेन.

Wednesday, December 18, 2013

The Glass Window

I am standing at the glass window, staring at the darkness outside. I stand here often. I have been doing it since I started living here. I think I am a savior! I think I am born to save something or someone from somebody … somehow! I am waiting for things to happen around me so that I can accidentally turn into the hero that everyone ever wanted! Or maybe I am supposed to know something … about something … that nobody ever knew about! I continue to stare outside. It’s darkness everywhere. I have hope but it’s a hopeless land.

I never saw anything magnificent outside!
No gigantic creature emerged out of nowhere!
No spaceship landed!
I never even saw any superhero swinging around here!
Nobody ever saved the world here! They don’t even save water!
I never saw anyone going around finding any clue to solve any mystery!
There is rather no mystery here other than absence of any mystery!
No ghost ever found this as an attractive place!
Nobody’s secret is guarded here!
There is no music played on my entry of exit from anywhere in any angle!

But I have hope. I am sure things will change. Someday, this window will break. Real things will be visible and hero will emerge.

I continue to stare at windows 8 now!
yawndarkness continues!

Saturday, November 16, 2013

Shampoo and Biscuits

"... ...
So Sachin won a match, and he got hundreds of thousands! My brother almost died on the border while saving a village! He got nothing. He got nothing because his name can't sell a shampoo or biscuit! So no one was interested in paying him. I voiced this, and they said I was being dramatic!They asked for a proof if my brother really is in army! Is this why people study and get smarter? to question people? They really asked me proofs, believe me. And I am dramatic when I talk about my brother. My brother is earning pride. So is my entire family. He made his choice to go to army and fight for the country. He is happy there. He never complained about money, nor is he short of it. But I feel bad for him. Sachin hits a sixer and every one cheers. Entire nation cheers. My brother and his troop, hit a terrorist, no one cares. They take a bullet and no one screams. Sachin is given out. And the nation gets hurt!

Well, I like Sachin too. Why would I hate him?

It's not only about the imbalance of recognition. It's about ignorance too.
Many people in my neighborhood say, we all should go and live abroad. There is nothing left in this country. Then what is my brother protecting? Why do they all ridicule the whole purpose of the life of my brother? Why not call my brother back right away? Let them all come back. But my brother doesn't care about it all. He says, there are people who think like that, who say like that. There are cynical people. But they don't make a country. They make nothing. There are people who invent things, solve problems, help others, inspire many. They make the country. One ought to focus on the bright side and protect it. It's a skill. Our country needs you to have it.

I say, he isn't aware of the darkness here. Or I never understand the brightness that he sees.

I want respect for him and his troop. Because the country doesn't run on shampoo and biscuits."

It was one of my colleagues, on this bhaubij. While leaving, she said, "Well, He likes Sachin too." as always, it was followed by her priceless smile.

Friday, October 18, 2013

सहज आठवलं म्हणून ...

आठवणीतल्या काही गोष्टी. काही ऐकीवातल्या. काही अनुभवलेल्या. काही बनवलेल्या. पण काहीतरी सांगून गेलेल्या. किंवा बरेच प्रश्न टाकून गेलेल्या. अशातलीच ही एक.

पुण्यातून मुंबईमध्ये कामासाठी जात होतो. Express Way सुरु व्हायचाच होता. हिंजेवाडी ब्रिज ओलांडला. संध्याकाळी परत येताना या इथेच गाड्या तुंबून काय हालत झालेली असेल याचा विचार आला. उगाचच उजवी भुवई वर आणि डावा डोळा लहान करून स्वतःशीच नाराजी व्यक्त केली. उगाच चीप चीप आवाज करत ड्राईवरला विचारलं, "तुला काय वाटतंय? कसं सुरुये सगळं आपल्याकडे एकूणच? काय होईल?"

"वाट लगा है देश का! हे नाही होत. ते नाही होत." असं आपल्यासारखंच काहीतरी बोलेल असं वाटलेलं मला. असलं बोलत, घरी किंवा ऑफिस मध्ये बसणं हाच असतो की आपला विरंगुळा.

"मस्त सुरुये सगळं!" तो म्हणाला.
"मस्त सुरुये?"
"हं!"
"पूर्वी ५-६ तास लागायचे या रस्त्यावरून मुंबईला पोचे पोचेपर्यंत. आता २-३ तास लागतात. तेव्हापासून चालवतोय गाडी मी. आणखी ३-४ वर्षामध्ये, साहेब, सिंगापूर होईल इथे!"
"किती तास चालवतोस गाडी दररोज?"
"कमीत कमी १२ तास तरी होतातच"
"कमीत कमी?"
"हो. त्यावर एक तास जरी झाला तर ज्यादा पैसे मिळतात."
"किती?"
"प्रत्येक तासाचे पन्नास रुपये."
"इतका वेळ बाहेर असतोस?"
"घर बैठके क्या है साहब? पैसा बहार है! देश तो आगे बढ राहा है, घर बैठा तो पीछे रेह जाऊंगा."

This is where the country is heading. Either with us. or without us! and this driver could see it. Can we?